माझा मित्र काशिनाथ जढर एके दिवशी माझ्या कडे
आला व मला म्हणाला. रामदास आज रात्री माझ्या बरोबर झोपायला रानात आमच्या गोठ्यावर यावे लागेल मी विचारले का रे ?
तो म्हणाला अरे दादा व वहिनी लग्नाला गेले आहेत. ते येनार नाहीत व गोठ्यावर गायी बैल व म्हशी आहेत.तेव्हा जावं लागेल.मी त्याला होकार दिला.
रात्री आम्ही दोघे रानातील गोठ्यावर झोपायला गेलो.रात्री तेथे शांत झोप लागली. सकाळी अगदी पहाटेच जाग आली.नंतर झोप काही येईना.
चला बाहेर लगवीला जाऊ असा विचार करून काशिनाथला उठवले.आम्ही बाहेर आलो. नुकतेच उजाडत होते. गार वारा सुटला होता.
आमच्या गोठ्याच्या पुढे एक मोठा कडयासारखा डोंगर होता. तेथुन गावात येण्यासाठी पाउलवाट होती. ती वाट वळणावळणाची होती.आम्ही तेथेच लगवीला उभे होतो.
मी अचानक वर समोर असलेल्या कड्याकडे पाहिले. तेथील पाउलवाटेने एक नउवारी लुगडे नेसलेली व डोक्यावर गाठोडे असलेली बाई चालली होती. मी काशिनाथला दाखविले.
तो म्हणाला अरे! ही तर चिंधाबाई आहे. आमच्या गावातील एक बाई जवळच असलेल्या नायफड या गावात दिली होती.आम्हाला वाटले तिच आहे.
काशिनाथ म्हणाला अरे ! ही इतक्या सकाळी कशाला आली असेल ? ही उठली असेल तरी कधी ? आणि निघाली असेल कधी ? कारण नायफड ते आमचे मंदोशी गाव सुमारे ५ कि.मी.असेल.
शिवाय रानातून व डोंगरातून येणारी वाट.असे आम्ही बोलत होतो. चिंधाबाई वळणवळणाने असलेल्या पाउलवाटेने चालत होती. ती ज्या वळणावर आली,तेथे मोठे झाड होते.तेथे जवळच मोठा दगड होता.
आम्ही पहात असताना अचानक त्या झाडाचा कडकड आवाज झाला आणि झाड उन्मळून त्या बाईच्या अंगावर पडले. त्या बरोबर ते झाड व तो मोठा दगड खाली घरंगळत आला. एकच मोठा आवाज झाला. चिंधाबाईचे काय झाले असेल या विचारांनी आम्ही सुन्न झालो.
नंतर लगेचच गावात जाउन ही खबर लोकांना दिली.सर्व जण घटना घडली तेथे आलो.तर त्या ठिकाणी झाड, चिंधाबाई व दगड या पैकी काहीही दिसले नाही.लोकांनी आम्हांला वेडयात काढले. तुम्हाला भास झाला असेल असे म्हणून निघुन गेले.
परंतु एक कळले नाही.एकाच वेळी दोघांना कसा भास झाला. नव्हे ते भुतच होते याची पक्की खात्री झाली.
(विशेष म्हणजे चिंधाबाई अजुनही हयात आहे.) ..........सत्य घटना .दि.५/१२/१९९२.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा