मैत्री अशीही (एक सत्यकथा) लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मैत्री अशीही (एक सत्यकथा) लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मैत्री,अशीही (एक सत्यकथा)

मैत्री,अशीही (एक सत्यकथा) 

20 मे 2025 रोजी मला वर पक्ष असलेल्या मित्राकडून Whats app वर लग्नाची प्रत्रिका आली. लागोपाठ आठ दिवस पोस्ट पाठवत होते. शेवटच्या एक दिवसाअगोदर मला त्यांचा फोन आला. आपण आमच्या विवाह सोहळा उपस्थित राहुन,वधु वरांना शुभेच्छारुपी आशिर्वाद द्यावा.मी त्यांना होय,नक्कीच मी लग्न कार्यास उपस्थित राहीन असे सांगितले. 

प्रत्रिका पाहिल्यावर बघितले तर वधु माझ्या खास मित्राची मुलगी होती. हे पाहिल्यावर मला खूप आनंद झाला.

 वधूचे वडील व मी  शाळा आणि काँलेज मध्ये एकाच बेंच बसायचो. कधीतरी हॉटेल नाश्ता करायचो. एकत्र चहा घ्यायचो. आमची खूपच दृढ मैत्री होती. एकमेकाशिवाय कधी राहिलो नाही. तो माझ्या पेक्षा थोडा जास्त हुशार होता. मी मध्यम होतो.

पदवी शिक्षण झाल्यावर दोघांच्याही वाटा वेगळ्या झाल्या..तो उच्च पदवावर गेला.नंतर एकमेकांची लग्न झाली मी माझ्या मित्राला आग्रहाने प्रत्रिका घरी जाऊन दिली. त्याने लग्नाला येण्याच वचन दिलं, पण तो काही माझ्या लग्नाला आला नाही.विशेष म्हणजे त्यांने त्याच्या लग्नाची मला प्रत्रिका सुद्धा दिली नाही.आमचे एकमेकांकडे मोबाईल नंबर होते.ते एकमेकांच्या मोबाईल मध्ये सेव्ह होते. असे असताना सुद्धा त्याने लग्नाचा साधा मेसेज सुद्धा केला नाही.

ज्यांच्या मुलांचे लग्न होते, ते सुद्धा माझे मित्रच होते. खूप छान आमची मैत्री होती. तर  त्यांच्या मुलाचा माझ्या ह्या मित्रांच्या  मुली सोबत 20/05/2025 विवाह सोहळा होता.

मी माझ्या या बालमित्राचे रोज Whats, up स्टेट्स दररोज पाहायचो.त्यांच्या मुलीचा विवाह सोहळा दिनाचे खूप फोटो असायचे.

मला वर पक्षाकडून प्रत्रिका आली आहे.मी विचार करतोय, आपला बालमित्र नक्कीच आपल्याला प्रत्रिका पाठवीन.पण लग्न दिवसांपर्यंत मला वधु पक्षाची म्हणजे माझ्या बालपणीच्या मित्रांची प्रत्रिका आली नाही.

मी पुरता गोंधळून गेलो होतो.लग्नाला जावे की न जावे? पण वर पक्षाकडे माझी इज्जत खूप होती.आणि मला मानणारा वर्ग खुप मोठा होता.माझं वागणं,माझं बोलणंआणि माझी राहणीमान. समाजातील माझी इमेज अतीशय चांगली आहे. प्रत्येकजन माझ्या सोबत आपुलकीने वागायचा.

विवाह सोहळा दिवस उजाडला.मला सकाळी वर पक्षाकडून फोन आला.आपण आमच्या विवाह सोहळा दिनाचे पाहुणे आहात.आपणास नक्कीच विवाह सोहळाला यावेच लागणार आहे.

मी निश्चय केला. चला आपल्या मित्रांने आपणास प्रत्रिका दिली नाही,त्यांचा मेसेज अथवा फोन नाही.वर पक्षाकडून आपणास आग्रह करतात तर आपण विवाह सोहळाला उपस्थित राहुन वधुवरांना शुभेच्छा देऊ या.

मंगल कार्यालयात मी आणि माझे काही मित्र पोहचलो. प्रवेश द्वारा समोर स्वागताला उभी असलेली दोन्ही बाजुची मंडळी होती.एका बाजुला वधु कडील मंडळी आणि एका बाजुला वरपक्षाकडील मंडळी.

मी प्रवेशद्वारा जवळ पोचताच वर पक्षाकडील मंडळीने माझे अतिशय सुंदर स्वागत केले.शाल श्रीफळ आणि फेटा बांधून स्वागत केले.माझं स्वागत होत असताना नकळत माझ्या मित्रांचे माझ्याकडे लक्ष गेले. त्याला माझा सत्कार झालेला आश्चर्यकारक वाटलं. तरीही तो जवळ आला नाही की, साधी ओळख दाखवली नाही.

लग्नमंडपात गाद्या होत्या. तिथं पर्यत वर पक्षाकडील मित्र आम्हाला घेऊन माझा बसण्यापर्यत मान दिला.नंतर स्पिकर वरही पुकारण्यात आले. ज्यामध्ये माझ्या विशेष कामाचा गौरव होता, समाजात असलेल्या कार्याची दखल घेऊन निवेदकाने त्याच्या विशिष्ट पद्धतीने माझा नामोल्लेख केला होता. हे सर्व माझ्या मित्रांने ऐकलं, आणि त्यांच्या चेहरावरचा नुर एकदम पालटला.त्याला काय करावे हेच समजेना.तो माझ्या दोन वेळा जवळुन गेला पण त्यांची बोलण्याची हिम्मत झाली नाही.

मंगलाष्टका झाल्या.सर्व आलेल्या पाहुण्यांना शब्द सुमनांने आभार झाले.वरपक्षाकडील मंडळी जेवणाचा आग्रह करीत होती.मनापासून जेवण्याची इच्छा नव्हती पण आग्रह खुप झाला.त्याच वेळी एक चमत्कार घडला.माझा हा बालपणीचा मित्र माझ्या जवळ आला.धायमोकलुन माझ्या गळ्यात पडुन रडु लागला.मला ही काय करावे हे समजेना आणि माझ्या जवळ वरपक्षाकडील मंडळींना काही समजले नाही..मी स्थितप्रज्ञ झालो होतो.

तो म्हणत होता मित्रा, मी खूप चुकलो आहे मला माफ कर.मी तुला समजु शकलो नाही.तुझ्यातील चारित्र्य मनाचा मोठेपणा व तुझा समाजाप्रती असलेला भाव मला दिसला नाही. माझा अहंकार मला तुझ्या पासून दुर घेउन गेला.

एका मध्यम व्यक्ती सोबत आपण उच्च पदावर गेल्यावर का मैत्री करावी.मी तुझ्या सोबतच नाही तर आपल्या वर्गातील सर्वसाधारण नोकरी करत असलेल्या मित्रा सोबतची मैत्री मी उच्च अधिकारी झाल्यावर संपुष्टात आणली.आज माझ्या मुलीच्या लग्नात तुझा सत्कार होतोय, वरपक्षाकडील मंडळी तुझ्या मागे पुढे करतात.तुला प्रत्रिका बघुन समजलं होतं माझी मुलगी दिलीय तरीही तु स्थितप्रज्ञ होतास. ना चेहरावर कसलाही भाव. ना चेहरावर अपमानाची छटा. मित्रा मला माफ कर.

त्याने मग त्याच्या पत्नीला कोणाला तरी बोलावण्यास पाठवुन माझी ओळख करून दिली.दोघांनीहि हात जोडून. विनंती केली आपण जेवन करुन जावे..मी ही मागचं सगळं विसरून वरवधुच्या शब्दाला मान देऊन जेवण केले. माझा तो मित्र.मला आग्रहाने जेवु घालीत होता.माझ्या हदयात एक आनंदाची लहर येऊन गेली.

तुम्ही चांगलं वागा. तुम्ही चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्त्व ठेवा.तुमचा समाजाला हेवा होईल असच चालत राहा.नक्कीच एक दिवस तुम्हाला झिडकारलेली व्यक्ती तुमच्या प्रेमात अथवा तुम्हाला मिस केल्या शिवाय राहणार नाही.

त्या दिवशी मित्राने घरी येऊन आम्हा सहपरीवाराला घरी येण्याचे आमंत्रण देण्यास येतो असं वचन दिलं.

मी ही दिलसे माफ केलं.कारण तो माझाच बालमित्र होता.

हरे कृष्ण राधे कृष्ण 🙏🙏

लेखक:- बालाजी शितोळे

सच्चा मित्र काशिनाथ जढर

गावातील एकमेव विश्वासू व्यक्तीमत्व कोणते असेल तर ते म्हणजे काशिनाथ जढर. हे गावातील एखादे लहान मुलसुद्धा सांगेल. काशिनाथ हे आमच्या सबंध गावात...

विठू नांगरे कलंदर माणूस