वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरण शोध आणि बोध लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरण शोध आणि बोध लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरण शोध आणि बोध

वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरण शोध आणि बोध 

परवाच वैष्णवी हगवणे या नवविवाहितेने सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. सध्या मीडियावाले ही एकच बातमी फिरवून फिरवून काथ्याकुट करत आहेत.

खरंतर मीडियावाल्यांनी यावर समाज प्रबोधन करण्याची गरज आहे. परंतु ते न करता ते केवळ त्यांच्या मुलाखती घेऊन त्यांचा टीआरपी वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.

वैष्णवी कस्पटे यांची श्री. सुशील हगवणे यांच्याबरोबर कुठेतरी भेट झाली. एकमेकांना इंस्टाग्राम वर चॅटिंग करू लागले. त्यानंतर ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले.

त्यानंतर हगवणे यांनी वैष्णवी हिला लग्नाची मागणी घातली परंतु वैष्णवीच्या घरच्यांनी या लग्नाला नकार दिला. परंतु कसपटे यांनी एक दिवस वैष्णवीच्या घरी येऊन वैष्णवीला घेऊन जाण्यासाठी तयार केले. व वैष्णवी जाण्यास तयार झाली. हे पाहून तिच्या वडिलांनी निर्णय घेतला की आपण हे लग्न लावू, असे पळून जाऊ नका.

त्यानंतर कसपटे यांनी रीतसर वैष्णवी चे लग्न सुशील हगवणे या तरुणाबरोबर लावून दिले. लग्नाला तिला हुंडा म्हणून अत्यंत महागडी अशी फॉर्च्यूनर गाडी आणि 51 तोळे सोने भेट दिली.

लग्नानंतर चांदीची भांडी वेळोवेळी रोख रक्कम सुद्धा दिलेली आहे.असे कस्पटे यांच्या मुलाखती मधून ऐकायला मिळाले.

वेळोवेळी हगवणे यांनी वैष्णवीला वेठीस धरून कस्पटे यांच्याकडून एक प्रकारे खंडणीच वसूल केली. वैष्णवी त्यांच्या लेखी एक सोन्याचे अंडे देणारे कोंबडीच होती.

त्यानंतर हगवणे यांनी वैष्णवीच्या वडिलांकडे व्यवसायासाठी एक कोटी रुपये रकमेची मागणी केली.त्यासाठी वैष्णवीला वेळोवेळी मानसिक, शारीरिक त्रास दिला,मारहाण केली. त्यानंतर वैष्णवीने आत्महत्या केली.असेही कस्पटे यांनी मुलाखतीत सांगितले.

वैष्णवी हगवणे या मुलीचा स्वभाव शांत होता. त्यामुळे तिच्या स्वभावाचा फायदा घेऊन हागवणे कुटुंब आणि तिच्यावर अनेक प्रकारचे अत्याचार केले.

मुलाचे वडील राजेंद्र हगवणे यांची जवळजवळ शंभर कोटी रुपयांची प्रॉपर्टी असतानाही त्यांना पैशाची किती हाव होती हे या प्रकरणांमधून स्पष्ट होते. हे एक विकृत मानसिकताच म्हणावी लागेल.

प्रत्येक आई-वडिलांना आपल्या मुलांची चांगली व्हावे अशी प्रामाणिक इच्छा असते.त्या पोटी त्यांना मनाला मुरड घालून त्यांच्या भल्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात.

या प्रकरणाला न्याय तर मिळेलच परंतु काही शक्ती मीडियाचा गैरवापर करून आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी नाहक उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टार्गेट करत आहेत. 

कुणीही नेते मंडळींनी किंवा प्रतिष्ठित व्यक्तींनी एखाद्याच्या लग्नाला जाणे हा थोडाच गुन्हा आहे? म्हणे काय तर अजितदादांनी फॉर्च्युनर गाडीची चावी मुलाच्या हातात दिली. अजित दादांनी हुंड्या साठी समर्थन दिले. म्हणून त्यांचा राजीनामा मागत आहेत. हुंडाबळी कायदा असताना अजित दादां सारखा खासदार, आमदार, विविध मंत्री पदे भूषवणारा नेता हुंड्याला समर्थन देणे शक्य तरी आहे का? 

वैष्णवीला छळणाऱ्या हगवणे कुटुंबाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी तमाम महाराष्ट्राची मागणी आहे.

एखाद्याला न्याय मिळणे ऐवजी हे प्रकरणाचे राजकीय भांडवल कसे करता येईल व त्याचा फायदा कसा घेता येईल. हे राजकीय लोक एखाद्याच्या काठीने साप मारून बरोबर आपली पोळी भाजून घेत आहेत. व नहाक एखाद्याला बदनाम करत आहेत. 

मीडियाला याबाबत काहीही देणे घेणे नाही. आठ दिवस ही बातमी फिरवून फिरवून नको त्यांच्या मुलाखती घेऊन लोकांच्या पचनी पाडायची व आपला टीआरपी वाढवायचा एवढेच त्यांचे काम आहे. समाज प्रबोधन करण्याचे त्यांना काही गरज राहिलेली नाही. अशावेळी मीडियाने तज्ञ लोकांच्या मुलाखती घेऊन समाजाचे प्रबोधन करणे गरजेचे आहे.

असेच एक दुसरे उदाहरण माझे एक मित्र मिलिटरी मध्ये होते. ते मिलिटरी मधून रिटायर झाल्यानंतर घरी शेती करू लागले. वीस एकर शेतीमध्ये ते बटाट्याचे उत्पादन घेत होते. अतिशय प्रगतशील असे शेतकरी शिवाय मिलिटरी मॅन. भागात त्यांचा एक दरारा होता. 

त्यांची मुलगी लॉ कॉलेजला शिकायला होती. कॉलेजला शिकत असताना तिचे एका टुकार व कोणतेही काम करत नसलेल्या मुलावर प्रेम जडले. व करील तर या मुलाशीच लग्न करेल अशी तिने मनाशी खूनगाठ बांधली.वडील आपल्या लग्नाला मान्यता देणार नाहीत हे जाणून एक दिवशी घरी चिठ्ठी ठेवून मुलगी घरातील एक लाख रुपये व काही सोन्याचे दागिने घेऊन या टोकर मुलाबरोबर पसार झाली.

दुसऱ्या दिवशी चिठ्ठी वाचून मिलिट्री मॅन असलेल्या मित्राला जबरदस्त धक्का बसला. त्यांच्या मते आता माझी सर्व प्रतिष्ठा धुळीला मिळाली. यावर चर्चा चर्वण झाले.अनेकांनी त्यांना सल्ला दिला. मुलगी कुठे असेल तिथून घेऊन या आणि मुलीचे रीतसर त्या मुलाबरोबर लग्न लावून द्या.

शेवटी हाच निर्णय घेऊन मुलाच्या घरी जाऊन आम्ही लग्न लावून देतो मुलगा कुठे आहे त्याला घेऊन या. असे मुलीच्या कडच्यानी सांगितले. मुलाला आणि मुलीला मदत करणारे मित्रांनी मुलास आणि मुलीस घरी बोलावून घेतले.

रीतसर लग्नाची बोलणी झाली. मुलीला घरी आणण्यात आले. सर्व नातेवाईकांनी आणि वडिलांनी मुलीला खूप समजावले परंतु मुलीचे एकच म्हणणे. करील तर त्याच्याशी लग्न करेल नाहीतर नाही. सर्व उपाय खुंटले.

आणि मुलीचे जमिनीवरील हक्क सोड पत्र घेऊन तिचा मोठ्या समारंभात लग्नविधी लावून दिला.

मुलगी नांदायला सासरी आली. नव्याचे नऊ दिवस संपले. जवळ असलेले सर्व पैसे संपले.शेवटी दागिने ही गहाण ठेवले व मौज मजा केली. मुलगा काहीच काम करीत नसल्यामुळे पैशाचा स्त्रोत हा तसा नव्हताच. शिवाय सासर कडे ज्यांची परिस्थिती ही बेताचीच असल्यामुळे चैन करणे यांना काही परवडेना.मुलीच्या वडिलांनी लग्न झाल्या झाल्या मुलीबरोबरचे सर्व संबंध तोडून टाकल्यामुळे मुलीला वडिलांकडे सुद्धा मदत मागता येईना.

मुलगा कोणतेही काम करत नव्हता, त्यामुळे पैसा नाही. मुलाला दारूचे व्यसन लागले. संध्याकाळी घरात भांडणे होऊ लागली. मुलीला अक्षरशः मजुरी करण्याची वेळ आली. नवरा मुलीकडे मजुरी केलेल्या पैशांची सुद्धा मागणी करायचा.अशी बिकट अवस्था मुलीची झाली.

समाजात अशा या घटना सतत घडत असतात. तर मुख्य मुद्दा हे सर्व कशामुळे झाले.आज आपण मुला-मुलींना संपूर्ण स्वातंत्र्य देतो.प्रत्येकाकडे आज मोबाईल आहे. रात्री दोन दोन वाजेपर्यंत चॅटिंग करणे, रील पाहणे, इंस्टाग्राम,फेसबुकचा सर्रास वापर करताना तरुणाई दिसत आहे. आणि ती बघून त्यावर आपले मत ठरवत आहेत. 

कोणताही अनुभव नसताना निर्णय घेण्याची स्वातंत्र्य ते आई-वडिलांकडे मागत आहेत.आई-वडिलांच्या अनुभवाला केराची टोपली दाखवत आहेत. आणि आपणच कसे हुशार आणि अनुभवी आहेत हे सिद्ध करताना दिसत आहेत.

काही काही मुले / मुली तर आई-वडिलांना, तुम्हाला काय कळतंय यातलं. तुम्ही गप्प बसा. अशी वाक्य त्यांच्या तोंडावर फेकतांना दिसत आहेत.

समाजाची दुसरी बाजू तर अतिशय विदारक आहे. स्वतःला सुशिक्षित आणि हाय प्रोफाईल म्हणून घेणारे काही काही आई-वडील मुलींच्या लग्नाचे वय संपून देखील प्रतिष्ठेच्या बडेजवा पाई चांगली चांगली स्थळे हातची घालवत आहेत. या पायी मुलीचे वय केव्हाच उलटून गेलेले असते. याची ते पर्व देखील करत नाहीत. 

पूर्वी लोक म्हणायचे, मुलीचे लग्न योग्य वेळी होणे हे केव्हाही चांगले. त्या काळात फार फार तर 24 च्या आत मुलीचे लग्न केले जाई.

परंतु आता शिक्षणाचे कारण सांगून किंवा सेटल होण्याची कारण सांगून 32- 35 पर्यंत लग्न केले जात नाही. यातून हे लोक निसर्ग नियम तोडत आहेत हे स्पष्ट आहे.

आज समाजाला संस्काराची गरज आहे, परंतु आजच्या या आधुनिक सोयी सुविधा ब्रह्मराक्षस बनून आपल्याच छाताडावर बसले आहेत. श्रीराम श्रीकृष्ण यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या हिंदुस्थानात आज आपल्याकडील असgलेल्या संस्कारांचा ऱ्हास होऊन एक विदारक चित्र समाजात निर्माण झाले आहे.


सच्चा मित्र काशिनाथ जढर

गावातील एकमेव विश्वासू व्यक्तीमत्व कोणते असेल तर ते म्हणजे काशिनाथ जढर. हे गावातील एखादे लहान मुलसुद्धा सांगेल. काशिनाथ हे आमच्या सबंध गावात...

विठू नांगरे कलंदर माणूस