🇮🇳 लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
🇮🇳 लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

भारताने दहशतवादी तळावर केलेला हल्ला आणि ट्रोलर

भारताने दहशतवादी तळावर केलेला हल्ला आणि  ट्रोलर
  
नुकत्याच झालेल्या भारत पाकिस्तान युद्धाच्या स्थगितीमुळे ट्रॉलर्सनी आणि वाचाळ वीर नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. यासाठी ते वेळोवेळी इंदिराजींची तुलना करून 1971 मध्ये झालेल्या भारत पाक युद्धाचे दाखले देत आहेत.

पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये 26 निष्पाप लोक मारले गेले. यावर काहीतरी कारवाई करणे आवश्यक होते. त्यासाठी भारत सरकारने पाकिस्तान बरोबर युद्ध न करता त्यांच्या दहशतवादी तळावर हल्ले करण्याचा निर्णय घेतला. व त्याप्रमाणे पाकिस्तानी दहशतवादांच्या नऊ तळावर हल्ला केला. त्यामध्ये शंभर अतिरेकी व 50 सैनिक मारले गेले. याचे पुरावे ही भारतीय सैन्याने व्हिडिओच्या माध्यमातून दिले आहेत.

परंतु तथाकथित वाचाळ वीर नेत्यांनी व ट्रॉलर्सनी भारताने केलेल्या स्ट्राइक हल्ल्यांना युद्धाची उपमा दिली.आणि हे युद्ध संपूच नये. यासाठी मीडियावर मोठ्या प्रमाणात गवगवा केला. परंतु त्यांना हे कळले नाही की मुळात हे युद्धच नव्हते. हा पाकिस्तानी दहशतवाद्यावर स्ट्राइक हल्ला होता. परंतु दहशतवाद्यावरील स्ट्राइक हल्ला आणि प्रत्यक्ष युद्ध यातील फरक या महाभागांना कळलाच नाही.

 देशाचे नेतृत्व करत असताना देशाच्या प्रमुखाला अनेक निर्णय घ्यावे लागतात.भारत हा अनेक राज्यांनी बनवलेला खंडप्राय देश आहे, भारत देशात विविध जाती-धर्माचे लोक भारतात राहतात.येथे अनेक संस्कृती एकत्रितपणे नांदत आहेत याचे भान देशाच्या प्रमुखाला ठेवावे लागते. मग तो कोणत्याही पक्षाचा नेता असो.

भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची तुलना सतत भारतीय तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्याबरोबर केली जाते. व सन 1971 मध्ये पाकिस्तानचे दोन तुकडे केल्याबद्दल त्यांचा उदो उदो केला जातो.

परंतु सन 1971 च्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये पाकिस्तानचे 90 हजार सैनिक भारतीय सैन्याने पकडले होते. व भारतीय सैन्याने लाहोरपर्यंत पाकिस्तानचा प्रदेश जिंकलेला होता.असे असतानाही भारत पाकिस्तान मध्ये जो द्विपक्षीय करार सिमला येथे झाला. त्या करारामध्ये एकमेकांनी एकमेकांच्या देशावर हल्ले करायचे नाहीत.भविष्यात युद्ध करायचे नाही. तसेच भारतीय सैन्याने पकडलेले पाकिस्तानचे 90 हजार सैनिक त्यांना परत करायचे. त्याचप्रमाणे भारताने लाहोर पर्यंत पाकिस्तानचा जो प्रदेश जिंकला आहे तो प्रदेश पाकिस्तानला परत द्यायचा. असा द्वीपक्षीय करार करण्यात आला.

परंतु यापुढे पाकिस्तानने सिमला कराराला केराची टोपली दाखवली व सतत भारताविरुद्ध कुरापती सुरू केल्या. त्यामुळे 1971 चे युद्ध जिंकूनही भारताच्या पदरी काहीच पडले नाही. त्यावेळी संधी असतानाही पाकिस्तानने बळकावलेला काश्मीरचा 720 चौरस किलोमीटरचा भू भाग परत मिळवता आला असता. कारण भारताने युद्ध जिंकले होते. पाकिस्तानचे 90 हजार सैनिक पकडले होते. शिवाय पाकिस्तानचा लाहोरपर्यंतचा प्रदेशही जिंकला होता. असे असतानाही पाकव्याप्त काश्मीर परत मिळवता आला नाही. इंदिराजींनी तेव्हा वाटाघाटीच्या वेळी युनोच्या शिष्ट मंडळांला जर सहभागी करून घेतले असते. तर नक्कीच काहीतरी तोडगा निघाला असता. परंतु त्याची आजही किंमत भारतीयांना चुकवावी लागते.

पण ट्रोलर आणि नेते म्हणतात की, इंदिराजी ह्या भारतातील सर्वश्रेष्ठ पंतप्रधान पैकी एक आहेत. परंतु त्यांचे लोकसभा सदस्यत्व अलाहाबाद सत्र न्यायालयाने रद्द केले तेव्हा इंदिरा गांधी यांनी भारतावर आणीबाणी लादली.आणि राष्ट्रपती राजवट लागू केली.भारतीय पत्रकारितेवर निर्बंध आणले गेले, विरोधी पक्षातील लोकांना व इंदिरा गांधी यांना विरोध करणाऱ्या लोकांना तुरुंगात पाठवले.अनेकांना प्रचंड मनस्ताप भोगावा लागला,अनेकांना नजर कैदेत ठेवले. लोकशाहीची ढळढळीत हत्या केली.
असे असतानाही आता हेच मीडियावाले, तथाकथित पुढारी बोलतात,की मोदी पत्रकार परिषद घेत नाहीत. मोदी हुकूम शहा आहेत.केवळ मन की बात सांगतात.परंतु मोदींनी कधीही पत्रकारांवर निर्बंध लादले नाहीत, आज आपण फेसबुक इंस्टाग्राम वर यूट्यूब चैनल वर एखाद्या पोस्टवर लोक मोदी विषयी किती वाईट कमेंट करतात हे एकदा पहा.अशा कमेंट जर इंदिराजींच्या काळात झाल्या असत्या तर नक्कीच त्यांनी यांना फासावर लटकवले असते.

काही लोक म्हणतात की भाजपमध्ये मोदी आणि शहा यांच्या बाबतीत बोलायला कोणाचीही हिंमत नाही.परंतु त्या काळात इंदिराजीवर बोलण्याची त्यांच्या पक्षातील तर सोडाच परंतु भारतातील एकही नागरिकांमध्ये हिम्मत नव्हती.

अनेक तथाकथित पुढारी म्हणतात की मोदी हुकूमशहा आहेत. मग ते इंदिरा गांधी यांच्यासारखी आणीबाणी का लागू करू शकत नाहीत?



इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळाने त्यावेळी जो नसबंदीचा निर्णय घेतला तो जरी चांगला निर्णय असला तरी त्याची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे केली गेली नाही.त्या काळात सापडेल त्याची नसबंदी करायचे आदेश देण्यात आले. हे आदेश संजय गांधी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिले होते. व दररोज किती नसबंदी झाली याचे अहवाल दररोज पाठवण्यात यावेत असेही आदेश होते. त्यावेळी अनेक हिंदू गरिबांवर अत्याचार झाला. ज्यांची लग्नच झाली नाहीत त्यांच्याही नसबंदी करून टाकल्या. परंतु हाच निर्णय मुस्लिमांना बाकी लागू नव्हता. त्यांना बारा बारा मुले झाली तरी त्यांना नसबंदीचा निर्णय लागू नव्हता. मग हा हिंदू मुस्लिम भेदभाव त्यांनी का केला? केवळ मुस्लिमांची संख्या वाढवण्यासाठी तर नव्हे?


पंजाब मध्ये नेहमीच अकाली दलाची सत्ता येत होती. तिथे काँग्रेसला चंचू प्रवेश करण्यासाठी म्हणून भिन्द्रणवाले यांना काँग्रेसने हाताशी धरून अकाली दलाला नामोहरम करण्याचा प्रयत्न केला. व त्यांना आर्थिक रसद पुरवली. हेच भिंद्राणवाले भारत सरकारकडे पंजाब राज्याची वेगळ्या खालीस्थानाची मागणी करू लागले. त्यासाठी भिंद्राणवाले यांनी पंजाब मधील जनता त्यांच्या बाजूने वळवली.आणि याच बिंद्रनावाले यांना पकडण्यासाठी अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात इंदिरा गांधी यांनी मंत्रिमंडळाची मान्यता नसतानाही मिलिटरी घुसवली. भिद्रानवाले यांना पकडण्याच्या नादात भारतीय आर्मीने अंदाधुंद गोळीबार केला. त्यामध्ये सुमारे पाच हजार शीख जनता, स्त्रिया, लहान मुले यांची हत्या झाली. भिद्रनवाले यांना मारले गेले. परंतु पंजाब प्रश्न तसाच पेटता राहिला. तो प्रश्न पुढे 1991 साली आलेल्या पी. व्ही. नरसिंहराव यांनी सोडवला..

1993 मध्ये मुंबई मध्ये बॉम्बस्फोट झाले त्यामध्ये अनेक लोक मारले गेले त्यावेळी पी व्ही नरसिंहराव यांना का जबाबदार धरले नाही.?

दहा दहशतवादी गुजरात मार्गे मुंबईत येऊन अंधाधुंद गोळीबार केला, अनेक लोक मारले गेले. सतर्क असलेल्या पोलिसांनी पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातले व एक अफजल कसाब याला नंतर फाशी देण्यात आले. मग उर्वरित दहशतवादी का पकडण्यात आले नाहीत? हे केवळ मुंबई पोलिसांना जबाबदार धरण्यात काही अर्थ नव्हता. त्यांची जबाबदारी त्यांनी पार पाडली परंतु गुजरात बॉर्डरवर भारतीय सैन्य तैनात करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची होती. का त्यांनी सुरक्षा ठेवली नाही? दहशतवादी भारतीय हद्दीत घुसलेच कसे? हा प्रश्न आता नेते म्हणावणाऱ्यांना का आठवत नाही. तेव्हा डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान होते. का त्यांना जाब विचारला नाही?

भारतीय सैन्याचे अधिकारी जीव तोडून व पुरावे देऊन सांगत आहेत. की आम्ही पाकिस्तान बरोबर युद्ध केलेले नाही केवळ दहशतवादी तळ असलेल्या जागेवर एअर स्ट्राइक केले आहे. त्यामध्ये शंभर दहशतवादी मारले गेले आहेत.आणि पाकिस्तानची जवळजवळ 50 सैनिक मारले गेले आहेत.

आणि हे नालायक भारतीय पुढारी म्हणतात की मोदींनी युद्धबंदी करायला नको होती. अरे मूर्खांनो! हे युद्ध नव्हतेच मुळी. केवळ दहशतवादी तळावर एअर स्ट्राइक होते.आपली मोहीम फत्ते झाली आहे. उगाच युद्ध करून भारतीय सैन्याची हानी आणि भारतीय आर्थिक नुकसान कशाला करून घ्यायचे. ही साधी अक्कल यांना नाही. तुम्हाला स्वार्थासाठी केवळ या पक्षातून त्या पक्षात जायचे. व खुर्ची मिळवायची आणि देश सेवा केल्याचा आव आणायचा एवढेच माहित आहे.

आणि राहिला विषय ट्रोल करणाऱ्या लोकांचा.अरे मूर्खांनो! तुम्हाला नीट खायला मिळत नाही,आपण कोणाला ट्रोल करतो. याबाबत आपली लायकी काय आहे.आपली किती समाजात वट आहे याचा पहिला विचार केला पाहिजे. त्यापेक्षा काहीतरी काम धंदा केला तर निश्चितच तुम्हाला, नाही देशासाठी परंतु तुमच्यासाठी तरी काहीतरी करता येईल. कुणालाही ट्रोल करून पोट भरत नसतं. मग तो कोणीही असो राजकारणी असो, कलाकार किंवा क्रीडा क्षेत्रातला असो किंवा कोणीही सामान्य माणूस असो त्यांची तळतळ नक्कीच तुम्हाला भोगावी लागनार हेही तितकेच खरे.

शरदराव जठार एक समाजसेवक



 शरद जठार एक समाजसेवक 

समाजामध्ये चांगले काम करणाऱ्या प्रत्येक माणसाला पाठिंबा देऊन त्याच्या मागे उभे राहून त्याला सतत प्रेरणा देणे हे प्रत्येकाचे काम आहे.यामुळे निश्चितच चांगले कार्यकर्ते घडुन भागाचा विकास,लोकांचे प्रश्न सोडवण्यास मदत होत असते.असेच आपल्या भागात श्री शरद जठार यांचे सामाजिक काम पाहून प्रत्येकाला एक नविन उर्जा प्राप्त होत असते.आज २९ श्री.शरद जठार यांचा वाढदिवस हेच औचित्य साधून त्यांच्याविषयी त्यांच्या कर्तुत्वाची माहीती वाचकांपर्यंत पोहचवावी या उद्देशाने दोन शब्द त्यांच्याविषयी लिहितो.

श्री.शरद जठार यांचा तसा माझा फारसा परिचय नव्हता..फक्त ते धुओली गावचे उपसरपंच आहेत.व भोसरी येथे राहतात.एवढेच माहीती होते.एकदा आँफिसमध्ये काम करत असताना एक शिक्षक काही कामानिमित्त आँफिसमध्ये आले व बोलता बोलता त्यांनी 

साहेब तुम्ही जुन्नर तालुक्यातील  का? असे विचारले.

मी म्हणालो मी खेड तालुक्यातील मंदोशी गावचा आहे.वाडा गावच्या  पश्चिम भागात माझे गाव आहे.

ते म्हणाले धुओली गाव पण तिकडे आहे का? 

मी -  हो.

तर ते म्हणाले तुम्हाला ते शरद जठार माहीत असतील ? 

मी - हो.माहित आहेत.

ते - अहो त्यांच्यामुळे आमचा पेशंट वाचला आमच्या पेशंटला यशवंतराव चव्हाण मेमोरियल हाँस्पिटलला (वाय.सी.एम.) अँडमीट करून घेत नव्हते.सर्व प्रयत्न करून पाहिले पण सर्व प्रयत्न निष्फळ ठरले.कुणीतरी श्री. शरद जठार यांचा फोन नंबर दिला.शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांना फोन केला.आणि पुढच्या दहाच मिनीटात आमचा पेशंट अँडमिट करून घेतला. 

पुढे तो सुखरूप बरा झाला.इथेच आमची चर्चा संपली.पुढे एकदा काहीतरी कामानिमित्त शरद जठार यांना फोन केला होता.त्यांनी मला त्यांच्या नायफड पंचायत समिती गण या ग्रूपमध्ये सामाविष्ट केले.व पुढे त्या ग्रूपच्या माध्यमातून श्री शरद यांचे सामाजीक कामाचे एकेक पैलू उलगडत गेले.व त्यांच्या विषयी आदर वाटू लागला.

ते करीत असलेले काम पश्चिम भागाच्या दृष्टीने अतिशय मोलाचे आहे.सामाजिक काम करत असताना अनेकांचे स्वार्थ त्यात आडवे येतात.त्यामुळे सामाजिक कामाला गती मिळत नाही.त्यासाठी सर्व लोकांनी सामाजीक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सशर्त पाठिंबा दिला पाहिजे व प्रसंगी त्यासाठी रस्त्यावर उतरायची तयारीही ठेवली पाहिजे.

मझ्या मते पश्चिम भागात जर सामाजिक कार्यकर्त्यांची फौज असेल तर सर्व शासकिय योजना वैयक्तिक लाभाच्या योजना व इतर कामे चांगल्या प्रकारे राबल्या जातील. श्री शरद जठार यांच्कडे ग्रामपंचायतचे नेतृत्व आहे.

मानव अधिकार तालुका अध्यक्ष पद आहे जिल्हास्तरावर अनेक राजकिय व सामाजीक प्रमुख व्यक्तीबरोबर चांगले सबंध आहेत व या माध्यमातून ते चांगले काम करत आहेत ही नक्कीच अभिमानास्पद बाब आहे. 

आपल्या भागातील कोरोनाचा संसर्ग असलेल्या व्यक्तीला रक्तातील प्लाझ्मा उपलब्ध करून देण्याचे कामसुद्धा त्यांनी केले आहे. तर रात्री आपल्या भागातील मयत झालेल्या कोरोणा पेशंटला रात्री दोन वाजता स्मशानभुमीत P.P.P किट घालूनअग्नीडाग दिला आहे. 

आपआपसातील वादविवाद, मतभेद विसरून चांगले काम करणा-या व्यक्तीला नक्कीच पाठिंबा दिला पाहिजे.पश्चिम भागाला आज व्यसनमुक्ती केंद्राची गरज आहे.छोटे व्यवसाय मार्गदर्शन केंद्र व  मेळावे.व्यसनाधिन लोकांसाठी प्रबोधनकार यांची व्याख्याने आयोजीत करणे.

सर्व भागातील सरंपंच,ग्रामसेवक,कृषिसेवक,तलाठी,आरोग्य सेविका,शिक्षक प्रतिनीधी ,पशुधन पर्यवेक्षक यांचा मेळावा आयोजीत करून सर्वसामान्यां पर्यत सरकारी योजना कशा राबवता येतील यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.आजही पैशाने न होणारी कामे  

शरद जठार यांच्या शब्दाने होतात.हे ही महत्त्वाचे आहे.त्यांनी केलेल्या कामाची माहीती समाजातील प्रत्येक माणसापर्यंत पोहचली पाहीजे व त्या कामाची दखल सर्वांनी घ्यावी यासाठी मी त्यांच्या काही सहका-यांकडून त्यांच्या विषयी माहीती मिळवली.त्या माहीतीवर थोडासा प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न करतो.

*केलेली सुरवात*

भोसरीसारख्या ठिकाणी शिक्षण घेत असताना सकाळी काॅलेज  व दुपार नंतर  STD बुथवर 500 रूपये महिना पगारावर काम केले.

नंतर प्रायव्हेट कंपनीत करत असताना भरपुर असा मित्र परिवार जमवला.व त्यांचेशी चांगले सबंध ठेवले.नंतर माॅ साहेब ग्रुपची स्थापना केली व तिथुन पुढे सामाजिक कार्याची आवड निर्माण होत गेली. 

ग्रुपच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत असताना भोसरी सारख्या ठिकाणी असलेले विविध भागातील मा.नगरसेवक, मा.आमदार मा.लोकप्रतिनिधी यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी  दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. आपल्याला मिळत असलेला मित्र परिवार व लोक प्रतिनिधी यांच्या सहकार्याच्या जोरावर धुओली गावात व पश्चिम भागात काम करण्यास सुरुवात केली. 

पश्चिम भागातील तरुण सहकारी, मा.पंचायत समिती सदस्य, मा.जिल्हा परिषद सदस्य, मा.आमदार या लोक प्रतिनिधींच्या सहकार्याच्या जोरावर पश्चिम भागात चांगल्या प्रकारे काम करण्याची संधी मिळत आहे.  

*उपसरपंच म्हणून बिनविरोध*  *निवडून आल्यानंतर पहिला* *ध्वजारोहण  गावातील जेष्ठ* *नागरिकाच्या हस्ते केला.*

*गावातील असणारा वादविवाद* *मिटवले.*.

*गावातील विविध चांगल्या कामांची प्रशासनाने दखल घेत, गावाला जिल्हा परिषद गटात *संत गाडगे बाबा*ग्रामस्वच्छता पुरस्कार प्रथम क्रमांक मिळाला*गावात विविध विकास कामे मार्गी लावली.*

*वाढदिवसाचा खर्च टाळून गावातील*गरजू महिलांना साड्या* *वाटप केल्या.*

*गावातील एका गरीब कुटुंबाला* *दरवर्षी दिवाळीला मिठाई व कपडे करण्यात येतात.*  

*नायफड पंचायत समिती गण* *ग्रुपच्या माध्यमातून मित्र* *परिवाराच्या*सहकार्याने कोरोना* *काळात रक्त दान शिबिराचे आयोजन करण्यात आले*

मा.आमदार महेशदादा लांडगे स्पोर्टस् च्या माध्यमातून पश्चिम* भागात जेष्ठ नागरिकांना ब्लॅंकेट  वाटप करण्यात आले

नायफड पंचायत समिती गण ग्रुपच्या*माध्यमातून अपघात ग्रस्त तरुण राजु लांघी या तरुणाला पैसे व धान्य वाटप करण्यास मदत..

*पुणे या ठिकाणी असलेले* *यशवंतराव*चव्हाण हाॅस्पिटल* *(YCM) या ठिकाणी आपल्या    पश्चिम*भागातील नागरिकांचा* *कुठल्या ना कुठल्या कामासाठी* *संपर्क येतो तेव्हा त्यांना अ‍ॅडमिट* *करण्यापासून तर ते डब्याची व्यवस्था*करणे, वेळ प्रसंगी घरून* *डब्बा देणे, त्यांच बिल कमी करणे गाडीची व्यवस्था करून देणे* *काही नागरिकांचा वेळ व पैशाची* *बचत व्हावी, या वेळी त्या* *नागरिकांच्या नातेवाईक यांचे जन्म व*मृत्यू दाखले अगदी घर* *पोहच करणे, अगदी  अ‍ॅडमिट* *असलेल्या पेशंटला वेळो वेळी फोन*करून चौकशी करणे, त्यांना* *धीर देणे. रात्री अपरात्री फोन*आला तर त्या ठिकाणी जाऊन*मदत करणे, कोरोना* *काळात मयत झालेल्या आपल्या* *भागातील पाॅझिटीव पेशंटच्या* *नातेवाईक यांना रात्री दोन- तीन* *वाजता स्वता: त्या ठिकाणी* *उपस्थित*राहुन अंत्यविधी* *करण्यास*मदत करणे.आगदी* *कोरोना काळात वैयक्तिक लक्ष* *घालुन गावातील लोकांना अर्सेनिक*गोळ्यांचे वाटप केले*  *कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या* *महापुरात पुरग्रस्त भागाला खेड* *तालुका पश्चिम भागातुन 500 किलो*तांदुळ जमा करून* *पुरगरस्तांना  पश्चिम भागाच्या वतीने मदत पोहचवली* 

धुवोली/ वांजाळे संयुक्त ग्रामपंचायत ग्रामस्तरीय कोरोना समितीच्या वतीने  कोरोना विषयी नियोजन करण्यात येऊन  गावात सॅनिटाईजर, मास्क चे वाटप करण्यात आले. तसेच भविष्यात गावात कोणी रुग्ण पाॅझिटीव आला, तर त्याच्यासाठी ग्रामपंचायतचा असलेला हाॅल रिकामा करुन त्या ठिकाणी विलगीकरण (Corantine) करण्याची व्यवस्था करण्यात आली. यामुळे गावात  लोक सुरक्षित राहातील  आणि प्रशासनाचा ताण देखील कमी होईल. असेच नियोजन ग्रामीण भागातील लोक प्रतिनिधींनी करणे आवश्यक आहे..  जेणेकरून प्रशासनाचा ताण नक्कीच कमी होईल. हा प्रयत्न नक्कीच स्तुत्य म्हणावा लागेल.

सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्यांच्या वतीने आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मानवाधिकार मीडीया फाउंडेशनच्या वतीने कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

शरद जठार करत असलेले हे सामाजिक काम खरोखरच उल्लेखनीय आहे.हे नाकारून चालनार नाही.त्यांच्या या सामाजीक कामाची सर्वांनी दखल घेऊन त्यांना सहकार्य करणे आवश्यक आहे.


 


सच्चा मित्र काशिनाथ जढर

गावातील एकमेव विश्वासू व्यक्तीमत्व कोणते असेल तर ते म्हणजे काशिनाथ जढर. हे गावातील एखादे लहान मुलसुद्धा सांगेल. काशिनाथ हे आमच्या सबंध गावात...

विठू नांगरे कलंदर माणूस