आदिवासी समाज दशा आणि दिशा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आदिवासी समाज दशा आणि दिशा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

आदिवासी समाज दशा आणि दिशा


आदिवासी समाज दश आणि दिशा 

.

आदिवासी म्हणजे अधिवास म्हणजे प्राचीन काळापासून इतिहास ज्यावेळी लिहिला गेला त्याच्याही आधीपासून भारतात राहणारा समाज होय आज आपण महाराष्ट्राचा इतिहास पहिला भारताचा इतिहास पाहिला जगाचा इतिहास पाहिला या इतिहासामध्ये अगदी प्राचीन काळाचे वर्णन आहे परंतु आदिवासी समाज हा इतिहास लिहिणार यांचाही आधीपासून भारतात महाराष्ट्रात नांदतो आहे हे सर्वांनी मान्य केले आहे भारतात महाराष्ट्रात अनेक स्थित्यंतरे झाली परंतु आदिवासी समाज हा मूळ निवासीच राहीला. 1970 पर्यंत आदिवासी समाज मुख्य प्रवाह प्रवाहात आलेल्या नव्हता तथापि माननीय कृष्णराव मुंडे साहेब हे आमदार झाल्याने ते नियोजन मंडळाचे अध्यक्ष झाले आणि त्यांच्या काळात शिक्षक ग्रामसेवक तलाठी अशा अनेक नोकऱ्या आदिवासी समाजातील तरुणांना मिळवून दिल्या त्यामुळे समाज मुख्य प्रवाहात हळू हळू येऊ लागला शिक्षणाचे महत्व कळले शिक्षणामुळे काही का होईना प्रगती झाली आज अनेक लोक आईएएस अधिकारी वर्ग 1 चा अधिकारी वर्ग 2 चे अधिकारी वकील डॉक्टर इंजिनीयर आहेत अनेक लोक पुणे मुंबई संपूर्ण महाराष्ट्र नोकरीच्या निमित्ताने कार्यरत आहेत शिवाय विधानसभेत आपले 24 आमदार कार्यरत आहेत नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत याठिकाणी आपले बरेच पदाधिकारी राजकीय पातळ्यांवर कार्यरत आहेत ही आपल्या जमेची बाजू असली तरी अजूनही 75% आदिवासी समाज विविध योजना शिक्षण नोकरी या पासून वंचित आहे ही खरी शोकांतिका म्हणावी लागेल. आपल्या समाजात तीन वर्ग तयार झाले आहेत. पहिला वर्ग म्हणजे सुपर क्लास वन अधिकारी उच्चशिक्षित यांचा उच्चभ्रू वर्ग. त्यातील ठराविक हाताच्या बोटावर मोजता येईल इतके लोक समाजासाठी काहीतरी करतात. परंतु बाकीचे कधी वर्षानुवर्ष गावाला येत सुद्धा नाहीत ,त्यामुळे ते लोक समाजापासून काहीसे अलिप्त आहेत. आता पाहूया वर्ग 2 समाज वर्ग दोन समाज म्हणजे सर्वसाधारण नोकरी करणारे तुम्ही-आम्ही वर्ग 2 वर्ग-3 वर्ग 4 मध्ये नोकरी करणारे तुम्ही-आम्ही. चांगल्या कंपन्यांमध्ये बऱ्यापैकी नोकरी करणारे लोक. तसेच समाजाची आवड असणारे लोक.या लोकांचे सतत विविध कार्यक्रमानिमित्त गावाला नेहमी येणे-जाणे असते. त्यामुळे गावाकडील लोकांचे दयनीय संसार पाहून अनेकांना आपल्या गावाविषयी काहीतरी करावे, गावाचा विकास झाला पाहिजे, आपल्या आदिवासी समाजाचा विकास झाला पाहिजे ही सततची भावना त्यांच्या मनात असते. ते इतरांना तसे बोलूनही दाखवतात. परंतु रोजचे दैनंदिन कामकाज सुट्ट्यांमध्ये घरातील कामे यामुळे त्यांना ना म्हणावा तसा वेळ मिळत नाही, त्यामुळे त्यांना आदिवासी समाजाविषयी सामाजिक आर्थिक मदत करायची इच्छा असूनही व योग्य संघटन नसल्याने म्हणावी तशी मदत करणे किंवा योगदान देणे शक्य होत नाही.आता राहता राहिला वर्ग तीन चा समाज. या समाजात गावाकडील शेतकरी मजूर ,कामगार, नोकरी नसलेले तरुण, तात्पुरती नोकरी करणारे तरुण यांचा वर्ग या समाजाचा खऱ्या अर्थाने विचार केला तर त्यांचा पुढील भविष्याविषयी निश्चित असा फोकस नसल्याने व हातात जगण्या इतके पैसे नसल्याने हा वर्ग मुख्य प्रवाहापासून भरकटला आहे. त्यामुळे बाकीच्यांनी कितीही जीव तोडून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला तरी अशक्य आहे. याचा विचार सुशिक्षित समाजांनी करणे गरजेचे आहे. आपला समाज पूर्वीची परंपरागत शेती अजूनही करत आहे, त्यामध्ये नवीन सुधारणा नवीन तंत्रज्ञानाचा वापर करताना दिसत नाही. आपल्याकडील अंगभूत कौशल्याचा वापर करताना दिसत नाही, काही लोकांना भरपूर शेती असूनही ते नोकरीच्या शोधात किंवा रोजगाराच्या शोधात गाव सोडून तुटपुंजा वेतनावर दूर शहरात फटके जिणे जगत आहेत. ही शोकांतिका म्हणावी लागेल. वाढती व्यसनाधीनता आणि त्यामुळे होणारे मृत्यू यांचे प्रमाण जास्त आहे, त्याचप्रमाणे निकृष्ट आहारामुळे स्त्रियांच्या शरीरातील हिमोग्लोबीन चे प्रमाण झपाट्याने कमी होत आहे. याही बाबी अतिशय महत्वाच्या  आहेत. आज गावोगावी वाढत्या व्यसनाधीनतेमुळे समाज अनेक वर्ष मागे गेला आहे. यासाठी ठोस नियोजन करणे आवश्यक आहे. यासाठी बृहत आराखडा करून शासनाच्या माध्यमातून, समाजसेवकांच्या माध्यमातून, विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून, तुम्हा-आम्हा नोकरदारांच्या माध्यमातून यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी वेळ देणे हे आवश्यक आहे. आपल्या समाजात आपण काही लोकांना प्रतिनिधी किंवा विविध पदावर नेमणूक करतो. परंतु काही लोक एखाद्या कार्यक्रमा पुरते हजेरी लावतात. आणि निघून जातात. यासाठी सामाजिक आवड असणाऱ्या व समाजाची तळमळ असणाऱ्या लोकांची राज्य,  जिल्हा,  तालुका, भाग आणि ग्राम समिती समिती गठित  करणे आवश्यक आहे. त्या माध्यमातून प्रत्येक भागात किंवा गावात शेती विषयक व्यसनमुक्ती विषयक, आरोग्यविषयक, शैक्षणिक अशी नामांकित व्याख्याने आयोजित केली पाहिजेत. एखाद्या भागात व्यसनमुक्ती केंद्र ,कृषी सहाय्य व सल्ला केंद्र, रोजगाराच्या संधी मार्गदर्शन इत्यादी मेळावे आयोजित केली पाहिजेत. आदिवासी समाज हा मुख्यत्वे डोंगर दर्‍यात राहणारा समाज आहे. अनेक लोकांना चांगल्या शेतजमिनी आहेत. तर काही जणांना माळरान आहे. या माळरानात किंवा डोंगरावर पावसाळ्यातील पाणी ठराविक ठिकाणी आडवून उन्हाळ्यात या माळरानावर किंवा डोंगरावर कलमी आंबे ,जांभूळ, फणस किंवा अनेक फळझाडे लावली तर येत्या चार-पाच वर्षात त्यांना दोन तीन लाखाचे उत्पन्न मिळू शकते. शिवाय परिस्थिती नुसार वेगवेगळी पिके येतील का?याचाही विचार करावा लागेल.त्यासाठी प्रत्येक भागात प्रत्येक गावात पाणी फाउंडेशन ही योजना राबवली पाहिजे. पावसाळ्यातील ओढया नाल्याने वाहणारे पाणी प्रत्येक गावात  कधी श्रमदानाने तर कधी शासनाच्या मदतीनेआडवले गेले पाहिजे.  त्याचा योग्य वापर करून झाडे फळे फुले व शेती यासाठी उपयोग केला पाहिजे.आपल्या समाजात अनेक ग्रामसेवक,कृषि सेवक,कृषि सहायक,कृषि अधिकारी,जनावरांचे डाँक्टर,शिक्षक आरोग्य कर्मचारी,समाजसेवक सरपंच,सदस्य विवीध पदाधिकारी आहेत.त्यांचाही समाजासाठी उपयोग करून घेतला पाहिजे.त्यांना मान सन्मान दिला तर ते स्वयंस्फुर्तीने मदतीसाठी पुढे येतील.त्यासाठी भागनिहाय या लोकांची समिती गठित करणे आवश्यक आहे.त्यामधून कुणीही वंचीत राहता कामा नये.सर्वांची मिटिंग महिन्यातून एकदा झाली पाहिजे. सर्वांनी मिटींगला येणे बंधनकारक केले पाहिजे. आपणही आपल्या समाजाची काही देणे लागतो ही भावना त्यांच्यात रुजवली पाहिजे. त्यामुळे लोक एकत्र येतील संवाद साधला जाईल. एकमेकांच्या भेटीगाठी होतील. यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे .मासिक सभेमध्ये सरकारी योजनांचा आढावा, नामांकित व्याख्या त्याचे व्याख्यान आयोजित करण्याचे नियोजन करणे, सर्व अधिकारी कर्मचारी ग्रामस्थ यांच्याशी योग्य समन्वय ठेवणे इत्यादी अनेक कामांचा आढावा घेता येईल. यासाठी समाज परिवर्तन करणे, आदिवासी समाजाला  दिशा देणे ही काळाची गरज आहे. तरच खऱ्या अर्थाने आदिवासी समाज प्रगतीपथावर गेल्याशिवाय राहणार नाही. व लोकही आर्थिक मदत सामाजिक मदत करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने पुढे येतील. परंतु त्याचे बीज कुठेतरी पेरणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. आणि आपण आपली स्वतःपुरतं न पाहता समाजासाठी काहीतरी फुल ना फुलाची पाकळी म्हणून मदत केली पाहिजे, समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमात हिरीरीने भाग घेतला पाहिजे. एकमेकांचा सन्मान केला पाहिजे.  हीच खरी मा. बिरसा मुंडा मा. राघोजी भांगरे मा. सत्तू मराडे, मा. नाग्या कातकरी शिवनेरी वरील थोर क्रांतीकारक हुतात्म्यांना  आदरांजली ठरेल .

आदिवासी दिनानिमित्त या सर्व नेत्यांना माझी भावपूर्ण आदरांजली 



सच्चा मित्र काशिनाथ जढर

गावातील एकमेव विश्वासू व्यक्तीमत्व कोणते असेल तर ते म्हणजे काशिनाथ जढर. हे गावातील एखादे लहान मुलसुद्धा सांगेल. काशिनाथ हे आमच्या सबंध गावात...

विठू नांगरे कलंदर माणूस