सर्पदंश लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सर्पदंश लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सर्पदंश सत्य घटना व उपचार

सन १९९८ मधला श्रावण महिना...नुकत्याच भात लावण्या संपलेल्या होत्या.शेतकरी वर्ग थोडा निवांत झाला होता.शेताची उरलेली कामे,जनावरासाठी हिरव्या गवताच्या पेंढ्या कापुन आणने जनावरे सांभाळणे येवढीच काय ती कामे करायची.बाकी निवांत....

ग्रामीण भागात श्रावण महिन्यातील अतिशय सुंदर व मनमोहक वातावरण असते.सगळीकडे हिरवेगार डोंगर..व डोंगर द-यातुन पांढरेशुभ्र खळखळणारे ओढे- नाले,ओहळ आणि दुथडी भरून वाहणारी नदी..मधेच एखादी पावसाची जोरदार सर तर थोड्याच वेळात पडणारे उन व साथीला पडणारे इंद्रधनू असे विलोभणीय दृश्य असते..

गावात अनेक ठिकाणी ग्रंथ.पोथ्या- पुराणांचे पारायण असायचे.सोमवार,गुरूवार,शनिवार उपवास..असायचा. त्या दिवशी सोमवार होता..मी आँफिसमधून नुकताच घरी येऊन  हातपाय धुऊन बसलो होतो.दिवसभर उपवास असल्यामुळे कधी एकदा जेवण करतो असे झाले होते..

आणि अचानक आमच्या घरी गावातील श्री.गणपत मोहन आले.आणि म्हणाले..कपडे घालुन तयार व्हा..दामू मोहन यांच्या बायकोला सर्पदंश झाला आहे.ताबडतोब चला...दामू मोहन व त्यांचे कुटुंब म्हणजे गावातील आदर्श कुटुंब. सर्वाबरोबर मिळुनमिसळून राहणारे कुटुंब..विशेष म्हणजे आमच्या वडीलांचे दामू मोहन हे अत्यंत जवळचे मित्र होते.

सर्पदंश म्हटल्याबरोबर कपडे घातले व जेवण न करताच लगेचच मोटार सायकल घेऊन श्री,गणपत मोहन यांना घेऊन त्यांच्या घरी निघालो.तेथे संपुर्ण गावातील व वाड्या वस्त्यांतील खुप लोक जमा झालेले.दामू मोहन यांची पत्नी अर्धवट बेशुद्ध अवस्थेत झोपलेली..

खुप लोकांचे म्हणने असे की तीला डाँक्टर कडे घेऊन न जाता गोट्या कातक-याकडे न्या.तो औषध देईल..तेथे देवीची भक्तीन पण आहे.ती काहीतरी अंगारा देईल...

मी म्हणालो..आपण डेहणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊया..परंतू खुप लोकांनी विरोध केला..त्यांचे म्हणने असे की दवाखान्यात डाँक्टर नसतात.औषधे नसतात.डेहणे थोडे लांब आहे...विष शरीरात भिनत चालले आहे..तीथ पर्यत पेशंट जगला पाहिजे....त्यापेक्षा विठ्ठलवाडी हे अंतर जवळ आहे.

लोकांच्या प्रतिक्रिया ऐकण्यापेक्षा पेशंटला उपचार मिळणे अतिशय महत्त्वाचे होते. माझ्या मोटारसायकलवर मी, संर्पदंश झालेल्या काकू,माझा चुलत भाऊ मारुती धर्मा तळपे व गावातील समाजसेवेची आवड असनारे व गावच्या धार्मिक कार्यात भाग घेणारे श्री.कमाजी (म्हतारबा) हुरसाळे असे चौघे निघालो.शिरगावला आल्यावर डेहण्याला जायचे की विठ्ठलवाडीला असा संभ्रम पडला..मारुती म्हणाला विठ्ठलवाडी तर कमाजी म्हणाला डेहणे..शेवटी मी डेहण्याकडे गाडी वळवली....

धुओली गावाजवळ गेल्यावर काकुंनी मान टाकली..नाडीचे ठोके थांबले...मारुती म्हणाला..गाडी मागे वळव...पेशंट संपला...माझ्या हृदयात चर्रर्र झाले...गावातील लोक आता आपल्याला खुप बोलतील व पेशंट गेल्याचा बधूपणा आपल्यावर येईल.याचे शल्य टोचत राहणार.असा विचार येऊन गेला.

विचाराच्या.तंद्रीत.तशीच गाडी घेऊन रात्री ८.३० वा. डेहणे गाठले..दवाखान्यात गेलो तर तेथे कुनीच नव्हते...त्यातच लाईट गेलेली..त्यामुळे अजुनच अस्वस्थ वाटू लागले.

नको ते विचार मनात येऊ लागले.आणि अशातच एका स्रीचा आंधारातुन आवाज ऐकू आला.

कोण आहे..?..बहुदा त्या रात्रपाळीच्या नर्स असाव्यात...

आमच्या या काकूंना सर्पदंश झालाय...

डाँक्टर आहेत का? मी विचारले..

हो, आहेत...

थांबा, मी बोलावते..

असे म्हणून नर्सबाई गेल्या.व लगेचच डाँक्टर व नर्सबाई भलीमोठी इमर्जन्सी ट्युब (विजेरी) घेऊन आल्या..

पेशंटला काँटवर झोपवण्यात आले.

डाँक्टरांनी काकूंना तपासले..तपासुन झाल्यावर डाँक्टर  बोलले.पेशंट जगण्याची फक्त ५% खात्री आहे.खुप उशिर झाला आहे,.तरीही मी प्रयत्न करतो.बघुया..

तेवढ्यात कमाजीने प्लँस्टिक पिशवी डाँक्टरांकडे दिली.त्यामध्ये  काकूंनी मारलेला साप होता..

डाँक्टरांनी साप निरखून पाहिला.व बोलले.Good,आता आपल्याला उपचार करणे खुप सोपे झाले..

तात्काळ काकूंना सलाइन लावण्यात आले.व त्यामध्ये इंजेक्शन भरले.सलाइन.संपल्यावर पुन्हा दुसरे..अशा प्रकारे तीन-चार सलाईन लावली.तो पर्यंत गावातील खुप लोक आले होते.व वेगवेगळ्या चर्चा करत होते..थोड्याच वेळात काकुंनी डोळे उघडले..सगळ्यांचा जीव भांड्यात पडला.नववे सलाईन व औषध संपल्यावर काकू बोलू लागल्या.

महाराष्ट्रातील पश्चिम भागात असणाऱ्या सापाच्या जाती 

पश्चिम महाराष्ट्रात विविध प्रकारचे विषारी आणि बिनविषारी साप आढळतात. महाराष्ट्रात एकूण ५२ जातीचे साप आढळतात, त्यापैकी हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच साप विषारी आहेत.

पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख विषारी साप

नाग

हा महाराष्ट्रातील सर्वांनाच परिचित असलेला साप आहे. याचा रंग काळा किंवा तपकिरी असतो. धोक्याच्या वेळी फणा काढून उभा राहतो आणि 'फुस्स' असा आवाज करतो. नागाच्या फण्यावर इंग्रजी 'U' आकाराची किंवा गोलाकार खूण असते, ज्याला 'चष्म्याची खूण' म्हणतात.

विषाचा प्रकार: न्यूरोटॉक्सिक (मेंदू आणि मज्जासंस्थेवर परिणाम करणारे). यामुळे चक्कर येणे, तीव्र वेदना होणे, पॅरॅलिसिस किंवा हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. वेळेवर उपचार न मिळाल्यास अर्ध्या तासात मृत्यू होऊ शकतो.

मण्यार 

हा सर्वात घातक विषारी साप मानला जातो. याचा रंग गडद निळसर-काळा असून अंगावर पांढरे पट्टे असतात (शेपटीकडे जास्त स्पष्ट). हा रात्री जास्त सक्रिय असतो.

विषाचा प्रकार: न्यूरोटॉक्सिक. या सापाचे विष नागापेक्षाही १५ पटीने जास्त विषारी असू शकते. 

चावा घेतल्यास घसा कोरडा पडतो, पोटात दुखते आणि श्वास घ्यायला त्रास होतो. हा सहसा चावल्यास वेदना होत नाहीत, त्यामुळे दंशाची जाणीव लवकर होत नाही, जे अधिक धोकादायक आहे.

घोणस 

हा महाराष्ट्रातील एक सामान्य आणि अत्यंत विषारी साप आहे. याचा रंग करडा असतो आणि अंगावर साखळीसारख्या दिसणाऱ्या तीन समांतर रेषा असतात. हा साप कुकरच्या शिट्टीप्रमाणे आवाज काढतो.

विषाचा प्रकार  हेमोटॉक्सिक (रक्तभिसरण संस्थेवर परिणाम करणारे). यामुळे रक्त गोठण्याची क्षमता कमी होते आणि रक्तस्त्राव होतो (नाक, कान, डोळे, लघवीतून). रक्तदाब कमी होऊन किडनी निकामी होऊ शकते. भारतात सर्पदंशामुळे सर्वाधिक मृत्यू घोणसमुळे होतात.

फुरसे

हा साप प्रामुख्याने कोकणात, विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात आढळतो. याचा रंग तपकिरी, फिकट पिवळसर किंवा वाळूसारखा असतो. याला ग्रामीण भागात 'फरडं'असेही म्हणतात.

विषाचा प्रकार: हेमोटॉक्सिक. याच्या विषाचा परिणाम रक्त गोठण्याच्या प्रक्रियेवर होतो आणि मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होतो. रक्तस्त्राव जास्त झाल्यामुळे रक्तदाब कमी होऊन किडनी निकामी होऊ शकते.

या प्रमुख चार विषारी सापांव्यतिरिक्त, पश्चिम घाटात किंग कोब्रा आणि मलबारी चापदा व बांबू चापदा यांसारखे विषारी साप देखील आढळतात.किंग कोब्रा हा भारतातील सर्वात विषारी सापांपैकी एक आहे आणि त्याची लांबी खूप जास्त २० फुटांपर्यंत वाढू शकते.

पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख बिनविषारी साप

महाराष्ट्रामध्ये आढळणाऱ्या बहुतेक सापांच्या प्रजाती बिनविषारी आहेत, म्हणजे त्यांच्या चावण्याने मनुष्याला मृत्यू येत नाही. काही प्रमुख बिनविषारी साप खालीलप्रमाणे:

धामण 

हा एक लांब आणि चपळ साप आहे. याचा रंग तपकिरी ते हिरवट असतो. हा उंदरांचा मोठा शत्रू मानला जातो आणि त्यामुळे तो शेतकऱ्यांचा मित्र आहे. हा माणसांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो.

मांडूळ

याचा रंग तपकिरी ते लालसर असतो. हा पूर्णपणे बिनविषारी आणि शांत स्वभावाचा असतो.


कवड्या  

हा दिसायला मण्यार सापासारखा वाटू शकतो, पण तो पूर्णपणे बिनविषारी आहे. याचा रंग तपकिरी, फिकट तपकिरी ते गडद तपकिरी असतो आणि अंगावर फिकट रंगाचे पट्टे असतात.

तस्कर 

हा एक अतिशय निरुपद्रवी आणि शांत स्वभावाचा साप आहे. याचा रंग तपकिरी किंवा पिवळसर असतो आणि अंगावर काळ्या-पांढऱ्या चौकोनांचे पट्टे असतात.

दिवड 

हा एक सामान्यतः पाण्यात आढळणारा बिनविषारी साप आहे. याचा रंग हिरवट किंवा तपकिरी असून अंगावर काळे ठिपके असतात. हा मासे आणि बेडूक खातो.

हरणटोळ  

हा झाडांवर आढळणारा हिरव्या रंगाचा साप आहे. याचे डोके लांब आणि टोकदार असते. हा बिनविषारी साप आहे, हा जास्तीत जास्त झाडावर आढळतो.याचा चावा फारसा धोकादायक नसतो,


कुकरी 

हा लहान आकाराचा बिनविषारी साप आहे. याचा रंग तपकिरी असून अंगावर २०-६० काळे आडवे पट्टे असतात. हे साप सरडे, पाली आणि त्यांची अंडी खातात.

साप चावण्याची लक्षणे तुम्हाला कोणत्या प्रकारच्या सापाने चावला आहे यावर अवलंबून असू शकतात.


विषारी साप चावल्याची लक्षणे 

त्वचेवर चाव्याच्या खुणा -  स्पष्ट जखमा दिसतात.किंवा  लहान ओरखडे असू शकतात.

चाव्याव्दारे सूज येणे, जखम होणे किंवा रक्तस्त्राव होतो.

साप चावल्यानंतर थोड्याच वेळात चाव्याभोवती तीव्र वेदना सुरू होतात.

एकदा विष शरीरात पसरू लागले की, इतर लक्षणे दिसू शकतात, जसे की 

श्वास घेण्यास त्रास होणे.

हृदयाचे ठोके थोड्या थोड्या वेळाने पडणे. किंवा मंद होणे.

मळमळ (आजारी वाटणे), उलट्या (आजारी असणे) किंवा पोटदुखी

डोकेदुखी , चक्कर येणे

दिसायला अंधुक दिसणे.

स्नायू कमकुवत होणे किंवा अर्धांगवायू  रुग्णाची हालचाल मंदावणे.

 प्राथमिक उपचार 

सर्पदंश झालेल्या जागेच्या वर घट्ट आवडपट्टी बांधतात.

नव्या ब्लेडने दंश झालेल्या ठिकाणी दोन उभ्या आडव्या चिरा पाडतात. 

दंश झालेल्या ठिकाणचे रक्त वाहू द्यावे. त्यामुळे शरीरातील विष रक्ताद्वारे बाहेर फेकले जाते. 

पोटॅशियम परमॅग्नेट च्या द्रावणाने जखम धुतात व काही जखमेच्या ठिकाणी दाबून बसवतात.

अत्यंत महत्त्वाचे 

ॲम्ब्युलन्ससाठी कॉल करा (000 किंवा 112). 

सर्पदंश झाल्यावर शक्य तितक्या लवकर ॲण्टीवेनम घेणे आवश्यक आहे. यामुळे शरीरातील विष पसरण्यापासून रोखता येते.अँटीवेनम हे एक इंजेक्शन आहे. ते आपल्या नजीकच्या सरकारी दवाखान्यात असणे आवश्यक आहे. याबाबत सतत सरकारी दवाखान्यात खात्री करून घेणे आवश्यक आहे. 

सर्पदंशावर कोणत्याही प्रकारची गोळी नसते हे ध्यानात घ्या.

रामदास तळपे 

जाहिरातीसाठी संपर्क :- 7321865959


सच्चा मित्र काशिनाथ जढर

गावातील एकमेव विश्वासू व्यक्तीमत्व कोणते असेल तर ते म्हणजे काशिनाथ जढर. हे गावातील एखादे लहान मुलसुद्धा सांगेल. काशिनाथ हे आमच्या सबंध गावात...

विठू नांगरे कलंदर माणूस