श्री बाळासाहेब मेदगे यांचा आदरांजली पर लेख. लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
श्री बाळासाहेब मेदगे यांचा आदरांजली पर लेख. लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

श्री बाळासाहेब मेदगे यांचा आदरांजली पर लेख

सुप्रसिद्ध लेखक आणि सामाजिक बांधिलकी जपणारे आमचे मित्र श्री बाळासाहेब मेदगे यांनी त्यांच्या शिक्षका विषयी आदरांजली पर लेखन केले आहे.

आदरांजली शिंदे गुरुजी यांना

सन 1979 असावे त्या दरम्यान औदर गावात फक्त दोन शिक्षकच सातवी पर्यंत वर्ग शिकवत होते.आम्हाला असणारे आदरणीय निर्मळ गुरुजी एक महिन्याच्या प्रदीर्घ सुट्टीवर गेले होते.अशा वेळी दुसऱ्या गावातील शिक्षक येऊन तो कार्यकाल पूर्ण करत होते.

आमच्या शेजारी असणाऱ्या देवोशी गावात शिंदे गुरुजी म्हणून प्रख्यात शिक्षण महर्षी गुरूंचे काम पहात होते.शासनाच्या आदेशाने त्यांना औदर मध्ये एक महिन्यासाठी यावे लागणार होते.

जानेवारी महिन्यातील पहिला सोमवार होता.एक पँट शर्ट घातलेली व्यक्ती सायकल वरून उतरत होती. गोऱ्या साहेबांची लय प्राप्त झालेली,केस रचना व्यवस्थित असलेली,व्यक्ती सायकल पार्क करून शाळेच्या होरंड्यावर प्रवेश करती झाली.

आल्या नंतर सरळ ते मुख्याध्यापक यांना भेटले होते. शाळेत एक कुजबुज चालली होती.बदली गुरुजी म्हणून शिंदे गुरुजी एक महिन्यासाठी आलेले आहे.आणि लगेच ते आमच्या वर्गात आले. त्यांनी त्यांचा परिचय सगळ्यांना करून दिला.एक सुंदर हास्य चेहऱ्यावर दिसत होते.

आमच्या वर्गात तीन वर्ग होते. दुसरी,चवथी,आणि सहावी, प्रत्येकी वर्गात साधारण आठ दहा विद्यार्थी होते. दोन वर्गांना त्यांनी काही तरी अभ्यास दिला होता, त्यामुळे त्या दोन्ही वर्गातील विद्यार्थी त्यांचा अभ्यास करण्यात गर्क झाले होते.आमचा वर्ग सहावीचा होता. गुरुजींनी आमच्या कडे त्यांचे लक्ष वेधले.

गुरुजी हसत हसत म्हणाले,

विद्यार्थी मित्रानो, 

आज एक कविता तुम्हाला मी शिकवणार आहे, कवितेचे नाव आहे "आला क्षण, गेला क्षण"  प्रत्येकाने मराठीचे पुस्तक उघडून ही कविता काढा,असे म्हटल्या बरोबर सगळ्यांनी मराठीचे पुस्तक उघडले.आमच्या वर्गात पंधरा मुले होती. वर्ग स्तब्ध झाला होता. वर्गात शांतता पसरली होती.कारण गुरुजी हे सगळ्यांना नवीन होते,कसे शिकवणार या कडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

बाहेर वातावरण थंडीचे होते.शेतकरी वर्ग बटाट्याच्या शेताला पाणी भरण्यात व्यस्त होता.आणि गुरुजी नी आपली वाणी आमच्या पुढे प्रस्तुत करण्यास सुर वात केली होती.

गुरुजींनी कवितेच्या कवीचा परिचय एवढा सुंदर करून दिला की, विद्यार्थी पूर्ण कान लावून ऐकत होते.पुढे काय होणार. कवितेच्या शीर्षकावर जवळ पास दीड तास गुरुजी बोलत होते आणि आम्ही बळ बांधून ऐकत होतो.

क्षण या दोन शब्दावर एवढे सुध्दा बोलता येते या विचाराने मी तर पूर्ण भारावून गेलो होतो.कविता शेवटच्या चरणावर येऊन पोहचली होती मधून मधून गुरुजी काही प्रश्न सुध्दा विचारत होते जो तो आपापल्या बुद्धीी प्रमाणे उत्तरे देत होता. गुरुजींनी त्यांच्या ही उत्तराचा सन्मान केला होता.

आणि तो दिवस एका कवीच्या प्रतिभेच्या विषयाला अनुसरून आनंदात गेला होता.आम्ही शाळा सुटल्या नंतर गुरुजींचे कौतुक करत होतो.

एक महिना कुठे गेला कळलेच नाही. तसे आमचे निर्मळ गुरुजी सुध्दा त्याच प्रमाणे शिकवत होते. त्यामुळे आम्ही त्यांची तुलना कधी केलीच नव्हती. 

सातवी झाल्यानंतर आठवीला ज्यावेळी वाड्यात प्रवेश घेतला त्यावेळी सहजच आमचे लक्ष एस.एस.सी.बोर्डात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांच्या यादी वर गेले तर त्या ठिकाणी 1967 बॅच मध्ये प्रथम क्रमांक या गुरुजींचा दिसला होता.त्याच वेळी त्यांची ती कविता पुन्हा एकदा मनाच्या पार्लमेंट मध्ये आनंदाचे भरते करत होती.

आज सकाळी गुरुजींच्या जाण्याची बातमी कळली त्यावेळी मात्र आम्ही पूर्ण निशब्द झालो.


लेखक:- बाळासाहेब मेदगे औदर ता.खेड (पुणे)

सच्चा मित्र काशिनाथ जढर

गावातील एकमेव विश्वासू व्यक्तीमत्व कोणते असेल तर ते म्हणजे काशिनाथ जढर. हे गावातील एखादे लहान मुलसुद्धा सांगेल. काशिनाथ हे आमच्या सबंध गावात...

विठू नांगरे कलंदर माणूस