ग्रामीण भाग दशा आणि दिशा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
ग्रामीण भाग दशा आणि दिशा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

ग्रामीण भाग दशा आणि दिशा


 ग्रामीण भाग दशा आणि दिशा 

१९७२ मध्ये आलेल्या दुष्काळामध्ये अनेक ग्रामीण भागातील अनेक लोक विस्थापित झाले.पोट भरण्यासाठी अनेक लोक गाव सोडून नोकरीच्या शोधात मुंबई ,भिवंडी.पुणे अशा शहरात किंवा अन्य ठिकाणी गेले. तिकडे मिळेल ती नोकरी करून पोट भरू लागले व जमेल तशी मदत गावी कुटुंबाला करू लागले.

काही जण खटपटी करून सरकारी नोकरीत चिकटले.तर काहीजण कुठं खाजगी मध्ये किंवा हमाली वगैरे मिळेल ती नोकरी करू लागले व जमेल तशी मदत गावाला आपल्या कुटुंबाला करू लागले.

मुंबईच्या मानाने गावचे जीवन तसे खुप चांगले होते.गावाला काम केलेच पाहिजे असे काही नव्हते,दोन वेळची भाकर व राहायला निवारा होता.पण मुंबईचे जीवन मात्र अतिशय खडतर होते. 

कामाचे स्वरूप,राहाण्याची व खानावळीची सोय याचे काय वर्णन करावे? शब्दात वर्णन करणे कठिण.मुंबईचे जीवन दहा बाय दहाच्या अत्यंत छोट्या खोल्या.त्यात राहणारी सात,आठ पोराबाळांसह राहणारी माणसे.त्यामध्ये त्यांच्याकडे जेवायचे. बाहेर कुठेतरी रस्त्यावर, झाडाखाली,किंवा मिळेल त्या जागेवर झोपायचे. आंघोळ व कपडे धुण्याचे हाल तर विचारूच नका. काहीजण कामाच्या ठिकाणी अंघोळ करायचे व कपडे धुऊन तसेच ओले कपडे अंगात घालायचे.जेवणाचे त्यातल्या त्यात जरा बरे होते.कारण गावच्या किंवा भागातल्या ओळखीच्या ठिकाणी खानावळीची.व्यवस्था असे.

गावावरून आलेला तरूण रोजचे कष्टाचे काम.त्त्यामुळे त्याचा खाण्याचा आहार साहजीकच जादा असायचा.परंतु त्यामानाने खानावळीत भरपेट जेवण मिळायचे नाही.अर्धपोटी राहुन काम करावे लागे.हे दररोज च्या कामाचे स्वरूप असे.

त्याकाळी लोक जास्त शिकलेले नसायचे.त्यामुळे नोकरीचे चान्सेस कमीच असायचे.पण प्रत्येक जणाचा एकच उद्देश असायचा तो म्हणजे गावाकडचे आपले कुटुंब जगवले पाहिजे. भले आपल्याला कितीही कष्ट पडले तरी चालतील.कितीही यातना भोगाव्या लागल्या तरी चालतील.आता हेच आपले जीवन. परंतु आता माघारी फिरणे नाही.घरी गावाला जाणे नाही अशी पक्की मनाशी खुणगाठ बांधुन नव्या जोमाने काम करत.व आलेले दिवस कसेतरी कष्टाने ढकलत.मुंबईला गेलेला कष्टकरी समाज मिळेल तसे काम करत होते.

काहीजण मिल मध्ये तर काहीजण कुठे सरकारी नोकरी मिळते का? या साठी प्रयात्न करत.त्यांचे कामाचे खाडे होत. त्यांचे हाल तर विचारू नका.प्रसंगी त्यांना उपाशी तापाशी रहावे लागे. नोकरी शोधायला. दिवस- दिवस पायी वणवण करायची.दिवसभर अन्नाचा कण पोटात नसायचा. शिवाय नोकरी मिळेलच याची शाश्वती नसे. शिवाय इकडे कामाचा खाडा व्हायचा ते वेगळाच.

कधी कधी असलेली तात्पुरती नोकरी पण जायची आणि बेरोजगार व्हायची वेळ यायची.अशाही परिस्थितीत सरकारी नोकरी मिळेल ही आस असायची. 

त्याकाळी भागातील काही लोक सरकारी नोकरी करायचे. त्याकाळात टाकसाळ, फोर्ट अमिनेशन फॅक्टरी ,विविध बँका, मंत्रालय इत्यादी ठिकाणी वर्ग 4 मध्ये काही लोक कामाला होते. 

त्यावेळी त्या ठिकाणी कधी कधी भरती निघायची.आणि हे लोक आपल्या गावातील आपल्या भागातील लोकांना  मुंबईला आणायचे.त्यांचे खाण्यापिण्याची राहायची व्यवस्था करायचे.आणि तेथे चिटकवायचे. 

त्याकाळात जे नोकरीला होते त्यांना गावचा, भागाचा, प्रचंड अभिमान असायचा. आपल्या भागातील आपल्या गावातील तरुण नोकरीला लागले पाहिजेत. त्यांची घरेदारे सुखी झाली पाहिजेत. सुखाचा संसार झाला पाहिजे. समाजासाठी त्यांचा हातभार लागला पाहिजे. ही भावना होती. ही सामाजिक बांधिलकी होती. त्यांनी कधीच स्वतःपुरते पाहिले नाही. नेहमीच समाजाचा विचार केला आणि या विचारातूनच अनेक तरुण नोकरीला लागले. त्यांना रोजीरोटी मिळू लागली. त्यांचे संसार झाले. फुलले, बहरले. तर काही लोक आहे ते काम प्रामाणिकपणे करू लागले. जरी त्यांना सरकारी नोकरी मिळाली नाही तरी त्यांचेही संसार चांगल्या प्रकारे झाले. त्यांनीही भागाची, गावची आपल्या कुटुंबाची उत्तम प्रकारे सेवा केली.

त्याकाळात मुंबईकरांनी गावाला आपल्या कुटुंबाला वेळोवेळी आर्थिक मदत केली. घरात आठरा विश्वे दारिद्र्य असलेल्या भावा बहिणींची लग्न, नवीन घराचे बांधकाम, स्वतःचे लग्न, शेतीची सुधारणा, विहिरी बांधल्या. बैल, जनावरे घेताली. भावा-बहिणीच्या मुलांचे शिक्षण केले  त्यांना नोकऱ्या लावल्या नातेवाईकांना मदत केली. गावच्या त्यांच्या कुटुंबानेही त्यांनी दिलेल्या पैशाचा योग्य विनियोग केला. त्यामुळे त्यांची घरेदारे सुधारली. जमीन सुधारणा झाली. शेतात चांगले उत्पन्न येऊ लागले. कधीकधी काही जमिनी विकत घेतल्या गेल्या. त्यात सुधारणा केल्या. 

त्या काळात एकत्र कुटुंब पद्धती होती. एकमेकाबद्दल प्रेम होते आपुलकी होती. जिव्हाळा होता. मुंबईकर प्रत्येक वर्षी गावाला येत असत. गावकरी त्यांचे उत्तम प्रकारे स्वागत करत. गावच्या विकासासाठी, मंदिरासाठी, धर्म शाळेसाठी, चावडी साठी सार्वजनिक भांडी, सार्वजनिक खेळांचे उदा.लेझिम, झांज ढोल,भजनाचे साहित्य,मंदिर जीर्णोद्धार, यात्रा -जत्रा सणवार यासाठी मुंबईकर आर्थिक मदतीत नेहमीच गावाच्या पाठीशी असत. 

या मुंबईकरामुळे नोकरी करणाऱ्या मंडळींमुळे खऱ्या अर्थाने कुटुंबाचा, गावाचा, भागाचा विकास झाला. लोक प्रपंचाला लागले. त्यांनी जर स्वतःचा जीव मारला नसता, त्याग केला नसता तर क्षणभर विचार करा.

आज आपण कितीतरी वर्ष मागे असतो. आपली अवस्था काय झाली असती. हा विचार न करणेच बरे.परंतु पुढे काळ बदलला.

परंतु आजकाल लोक साधे सख्ख्या भावाला किंवा बहिणीला व नातेवाईकांना विचारत नाहीत. सामाजीक कामात भाग घेत नाहीत. कोणाच्या सुख-दुःखात भाग घेत नाहीत. असे लोक म्हणतात की समाजाचा विकास झाला पाहिजे. भागाचा विकास झाला पाहिजे. देशाचा विकास झाला पाहिजे. त्यावेळी फार मोठे आश्चर्य वाटते. कधीकधी हसावे की रडावे हेच कळत नाही.

कधीकधी हेच लोक समाजाचा विकासासाठी समाजाचे नेतृत्व Target निघतात. त्यावेळी आश्चर्य वाटतं.अशा लोकांना समाज किती स्वीकारेल याचेही भान या महाभागांना नसते.

आपल्या आधीच्या पिढीने अतिशय दुःखात स्वतःचा जीव मारून कुटुंबांचा विकास केला आहे प्रसंगी त्यांनी त्यांच्या आवडी निवडी हौस मोज त्यांचे छंद खाणे पिणे यांना कधीच महत्व न देता आपल्या पुढच्या पिढीला आपल्यासारखे वाईट दिवस येऊ नयेत आपली पुढची पिढी सुखी झाली पाहिजे हा विचार त्यांनी सतत डोळ्यांपुढे ठेवून ते जगले.

आणि आज आपण आपल्या आजोबा, पंजोबा, वडील ,चुलते यांच्यामुळे सुखाचे चार घास खातोय. याचा तरुण पिढीने विचार केला पाहिजे.आपल्या वडील व आजोबांना तुम्ही संसार कसा उभा केला? त्यासाठी काय  यातना भोगल्या? हे विचारणे आवश्यक आहे. त्यांना मानसन्मान दिला पाहिजे. त्यांचा सल्ला घेतला पाहिजे. 

कधीकधी काळाच्या ओघात त्यांचा सल्ला कसा निरुपयोगी आहे हेही ही तरुण पिढीने खुबीने त्यांना पटवून दिले पाहिजे. उगाच तुम्हाला काही कळत नाही. तुम्हाला अकलेचा भाग नाही. तुम्ही आमच्यासाठी काय केले ? केले तर उपकार केले का? ही भाषा असेल तर सामाजिक विकास होणे अवघड आहे हेही तितकेच खरे.

सच्चा मित्र काशिनाथ जढर

गावातील एकमेव विश्वासू व्यक्तीमत्व कोणते असेल तर ते म्हणजे काशिनाथ जढर. हे गावातील एखादे लहान मुलसुद्धा सांगेल. काशिनाथ हे आमच्या सबंध गावात...

विठू नांगरे कलंदर माणूस