जुने दिवस,जुन्या आठवणी

खेडोपाडी अनेक सुधारणा झाल्या असल्या,आणि कितीही सोयी सुविधा उपलब्ध असल्या तरी जुन्या काळी जी मज्जा होती.ती आता राहिली नाही.

काळ बदलला, प्रत्येकाच्या आयुष्यात अमुलाग्र बदल झाला. तरी जुन्या आठवणीने मन भरून येते. आणि जुने दिवस, जुन्या आठवणी आठवतात. हा आठवणीचा ठेवाच म्हणावा लागेल.

जुने दिवस जुन्या आठवणी 

आठवणींचा ठेवा :

साधं आंघोळीचे उदाहरण घ्या.घरातील प्रत्येकाला अंगाला लावायला आज वेगवेगळा साबण असतो. परंतु त्या काळात साबण हा बघायलाही मिळत नसे.

पूर्वी लोक अंग घासण्यासाठी, किंवा अंगावरील मळ काढण्यासाठी वेगवेगळ्या घासणींचा उपयोग करत असत. दगडाची घासन,कौलाची घासण व त्यानंतर फेसाची घासन हे प्रकार प्रसिद्ध होते.

पूर्वी घराच्या भिंती बांधताना डबरांची गरज भासत असे. त्यासाठी लोक दगड फोडण्यासाठी सुरुंगाचा वापर करीत. दगडाचे डबर बनवताना छोट्या छोट्या खडबडीत चिपा निघत. याच खडबडीत छोट्या छोट्या चिपांचा वापर लोक आंघोळीच्या वेळी अंग घासण्यासाठी करत.

खूप पूर्वी व त्यानंतरही अनेकांच्या घरांवर नळीची कवले असत. लोक या कौलांचा अत्यंत सुबकपणे घासणी साठी उपयोग करत असत.नळीचे कौल व्यवस्थित फोडून त्याचे रूपांतर घासणीत करत.आतल्या बाजूला चूक किंवा खिळ्याने उभ्या आडव्या रेघा मारत.काही लोकांच्या कवलाच्या घासणी या ओबडधोबड असत तर काही लोकांच्या या कौलांच्या घासणी अत्यंत सुबक असत. या घासणी घेऊन लोक आंघोळीसाठी ओढ्यावर किंवा नदीवर जात असत.लोक या घासणी खुप जपून वापरत.कारण ती हातातून पडल्यावर फुटायची भीती असे. 

गावाकडील काही लोक मुंबईला असत. ते जेव्हा गावाला येत तेव्हा फेसांच्या घासणी घेऊन येत.फेसाची घासणी म्हणजे साबणाच्या वडीप्रमाणेच भासे.फेसाची घासणी ही पांढरीशुभ्र असून त्यावर छोटी छोटी छिद्रे असत. ही घासणी दिसायला अत्यंत सुबक जरी असली तरी काही दिवसातच ती झिजून जात असे. मला फेसाची घासणी खूप आवडायची. परंतु याला फेसाची घासणी का म्हणतात हे अजूनही मला कळले नाही. अनेक लोकांना फेसाच्या घासणीचे अप्रूप वाटायचे. काही लोक मुंबईकरांना,मुंबईवरून येताना फेसाची घासणी घेऊन येण्याचे आवर्जून सांगत असत.

स्त्रिया केस धुण्यासाठी शिकेकाईचा उपयोग करत असत.जंगलातून शिकेकाईच्या शेंगा आणल्या जात. त्या उखळामध्ये कुठून त्याची पावडर केली जाई. व त्या शिकाकाईची पावडर आंघोळ करताना डोक्याला लावत असत.शिकेकाईची पावडर ही आजच्या केमिकल युक्त साबणापेक्षा कितीतरी पटीने सरस होती.

लाईफबॉय साबण 

त्यानंतर बरेच दिवसांनी गावाकडे पहिला साबण कोणता आलाअसेल तो म्हणजे लाईफ बॉय साबण.कागदी वेस्टनामध्ये असलेली ही छोटीशी मऊशार,वेगळाच सुगंध असलेली लाल वडी होय.अंघोळ केल्यानंतर या साबणाचा वेगळाच सुगंध दरवळत असे. त्या काळात गावाकडील लाईफ बॉय साबण हा खूपच प्रसिद्ध झाला होता."लाईफ बॉय ज्याचे घरी आरोग्य तेथे वास करी" हे स्लोगन असलेल्या वाक्याची जाहिरात रेडिओवर त्यावेळी फार प्रसिद्ध झाली होती. लाईफ बॉय इतकी प्रसिद्धी गावाकडे इतर कोणत्याही साबणाला मिळाली नसेल हे मात्र नक्की.

गावाकडे डोक्याला लावण्यासाठी आजही खोबरेल तेलाचा उपयोग केला जातो. खोबरेल तेल आजही गावाकडे टिकून आहे.

 सनलाईट साबण 

501 बार हा  साबण फुटभर तरी लांब असे. लोक पाहिजे तेवढा साबण कापून वापरत असत. सन लाईट साबण हा पण त्याकाळी फारच प्रसिद्ध होता. बटाट्यापासून तयार झालेला भवरा छाप हा साबण गरीब लोक वापरत असत.

परंतु त्याने कपडे जास्त निघत नसत.भवरा छाप साबणाला कागदी वेस्टन नसे.

 निरमा पावडर 

त्यानंतर निरमा साबण गावाकडे फारच प्रसिद्ध झाला. वॉशिंग पावडर निरमा, दूध की सफेदी निरमा से आई रंगीन कपडा को पिल पिल जाई.वॉशिंग पावडर निरमा ही जाहिरात टीव्हीवर फारच प्रसिद्ध झाली होती. निरमाने तेव्हा गावाकडली बाजारपेठ व्यापून टाकली.आणि सन लाईट,501 बार साबण मागे पडले.

निळ पावडर

पूर्वी गावाकडे बरेच लोक हे धोतर, सदरा, टोपी, लेंगा वापरत असत. हे सर्व कपडे पांढरे शुभ्र असत. शाळेच्या मुलांचा गणवेशही पांढरा असे.त्यामुळे पांढरी कपडे अजून स्वच्छ दिसण्यासाठी निळी चा उपयोग प्राधान्याने होत असे. निळ पावडर,निळीचे खडे त्यावेळी फार प्रसिद्ध होते. दुकानदार निळ पावडर हे बरणीत ठेवत असत. दहा पैसे, चार आण्याला  निळ पावडर मिळत असे.आम्ही शनिवारी शाळा सुटल्यावर दत्ता शेठ कोरडे यांच्या दुकानातून चार आण्याची निळ घेत असू.

त्यानंतर बाटलीतून लिक्विड स्वरूपात निळ विक्रीस उपलब्ध 

होऊ लागली. इना -लिना ही निळीची बाटली त्यानंतर फारच प्रसिद्ध होऊ लागली. आणि पावडर स्वरूपात असलेली नीळ हद्दपार झाली.

पूर्वी गावाकडे अनेक लोक तंबाखू जरी खात असत,तरी अनेक पुरुष विड्या ओढत असत. स्त्रिया तपकीर किंवा मशेरी लावत असत. त्यासाठी खास तपकिरीची डबी असे.चिमूटभर तपकीर नाकात कोंबल्यास शिंका मागून शिंका येत असत. कधीतरी गंमत म्हणून आम्ही झोपलेल्या माणसाच्या नाकासमोर तपकीर धरत असु. त्यानंतर त्याला ज्या काही शिंका येत विचारू नका.

त्या काळात अनेक लोक व स्त्रिया सर्रासपणे मशेरी लावत असत. त्यासाठी बाजारात मशेरी भाजण्यासाठी मोठ-मोठी तंबाखूची पाने मिळत.स्रिया दिवसातून खूप वेळा मशेरी लावत असत.तर काही तपकीर लावत असत.

 तपकीर 












कोलगेट पावडर 
त्यानंतर हळूहळू खेडेगावात कोलगेटची पावडर दुकानांमधून उपलब्ध होऊ लागली.कोलगेटची ही पावडर छोट्याशा लोखंडी डब्यातून उपलब्ध झाली.ही पावडर अतिशय गोड व तोंडाला (दाताला नव्हे ) थंडावा देणारी होती. त्यामुळे ही पावडर पुढे खूप लोकप्रिय झाली.त्यानंतर हीच कोलगेट पेस्ट स्वरूपात ब्रशसह विक्रीसाठी बाजारपेठेत उपलब्ध होऊ लागली.त्यानंतर अनेक प्रकारचे ब्रँड बाजारात उपलब्ध होऊ लागले. आणि ही कोलगेटची पावडर हळूहळू मागे पडत चालली.
त्याकाळी लोक पिवळी तंबाखू खात असत. पुरुषांकडे तंबाखू साठी वेगवेगळ्या डब्या असत. एका बाजूला तंबाखू व दुसऱ्या बाजूला चुना असा एक डबीचा प्रकार होता. शिवाय चुना काढण्यासाठी डबीलाच एक छोटी जाड तार बांधलेली असे. काही लोकांकडे तंबाखू व चुना यासाठी दोन डब्या असत.तर काही लोकांकडे तंबाखू साठी खास बटवा असे. त्या बटव्यात तंबाखू व चुना ठेवता येत असे. स्त्रियांच्या कमरेला छोटीशी पिशवी असे. त्या पिशवीत तंबाखू, चुना अथवा तपकीरिची डबी,नाचकिंड आणि काही सुट्टी नाणी असत.

माझे वडील आमच्या आजीसाठी बाजारातून कळीचा चुना आणत हा चुना छोट्याशा मातीच्या ढेकळासारखा असे.

 हा चुना छोट्या लोखंडी डब्यात ठेवून थोडेसे थंड पाणी घातले जाई. त्यानंतर चुण्याला उकळी फुटत असे. चुण्यासह पाणी उकळू लागे. त्यानंतर हळूहळू हा चुना थंड होत असे. थंड झाल्यावर हा चुना लोण्याचा गोळ्यासारखा भासे.त्यानंतर हा चुना तंबाखूला अथवा नागिलीच्या पानाला लावायला उत्तम असे. 

चारमिनार सिगरेट 

संभाजी विडीप्रमाणेच सिगारेट ओढणारे लोकही त्या काळात हाताच्या बोटावर मोजणारे का होइना चार दोन लोक गावाकडे असायचेच. त्याकडे गावाकडे पिवळा हत्ती व चारमिनार सिगरेट दुकानांमध्ये विकायला असायची. छोट्या हळदी कलरच्या बॉक्समध्ये या सिगरेट विक्रीस असत. काळाच्या ओघात या सिगरेट ही मागे पडल्या व त्यानंतर अनेक ब्रँड विक्रीस उपलब्ध होऊ लागले.

अडकित्ता


काही लोक सुपारी खात असत.त्यासाठी अडकिता असे. काहीलोकांकडे लोखंडी तर काही लोकांकडे पितळी अडकिता असे.अडकित्याने बारीक केलेली सुपारी खायला एक वेगळीच लज्जत येई. काही लोकांकडे नागिलीची पाने असत. नागिलीच्या पानाच्या पाठीमागे थोडासा चुना लावून त्यावर काताचा खडा आणि सुपारीचा तुकडा टाकून पान तोंडात टाकून चघळत असत. पान खाण्याचा शोक तंबाखू खाणाऱ्यांपेक्षा कमी होता.

त्यानंतर गायछाप तंबाखू व बादशाह जर्दा यांनी गावची बाजारपेठ व्यापली. व हळूहळू पिवळी तंबाखू हद्दपार झाली.
गावाकडे त्याकाळी अनेक लोक विड्या ओढत असत. आपल्याकडे दसऱ्याला सोने म्हणून जी पाने वापरतो त्या पानाच्या लोक विड्या बनवत असत व त्यामध्ये पांढरी तंबाखू भरून लोक विड्या ओढत.

 संभाजी विडी 
त्यानंतर गावाकडे संभाजी विडी बंडल विक्रीस उपलब्ध होऊ लागले.आणि हळूहळू लोक संभाजी विड्या ओढू लागले. व संभाजी विडीची लोकप्रियता हळूहळू वाढू लागली. त्यानंतर ती शिगेला पोचली.  

काळ बदलत राहतो,त्याप्रमाणे बदल घडत राहतात. आज जे आहे ते उद्या नसेल. काळा पुढे कुणीही मोठा किंवा छोटा नसतो. काळ हा श्रीमंत माणसाला भिकारी करतो. तर भिकारी असलेल्याला श्रीमंत करतो. त्यामुळे माणुसकी,आपुलकी, प्रेम व जिव्हाळा हेच माणसाला आठवणीत ठेवतात. आठवणीतील हे जुने क्षण कधीच विसरू शकत नाही हे तितकेच खरे.

रामदास तळपे 




संदेश वाहनांमध्ये झालेले बदल


फार पुर्वीचा काळ.गावातील कुणीतरी एखाद दुसरा माणुस पुण्या- मुंबईला असायचा.आमच्या गावातील बरेच लोक तेव्हा भिवंडी येथे कामधंद्यासाठी होते. काही लोक शेतीची कामे उरकुन भिवंडी येथे कामासाठी जात असत. त्यामळे त्यांचे गावी सतत येणे जाणे असाय

संदेश वाहनांमध्ये झालेले बदल 

ज्यांचे कुणी मुंबई,भिवंडीला असे त्यांच्यासाठी त्यांचे लोक विविध रानभाज्या आळवडीची पाने,करटुली,चाव्याचा बार,चाव्याची भाजी,हारब-याची भाजी, हरभरा किंवा गव्हाचा हुळा,तांदुळ व खोब-याची वाफोळी,काकडीची पिसोळी तांदुळ वगैरे गावाहुन पाठवत असत. त्याबरोबरच एखादी चिठ्ठी लिहुन दिलेली असे.

चिट्ठी आई हे वतन से 

त्याच बरोबर मुंबई किंवा भिवंडीहुन एखादा माणुस गावी जाणार आहे असे समजताच तिकडे राहणारे लोक आपापल्या गावी राहणाऱ्या नातेवाईक,आई वडील,भाऊ वगैरे लोकांना थोडेफार पैसे देण्यासाठी आदल्या  दिवशी गर्दी करत.सोबत एखादी चिठ्ठीही पाठवत.त्याबरोबर चहापावडर, एखाद डझन  कपड्याचे / अंगाचे साबण,खोब-याचे तेल वगैरे सामान त्यांच्याकडे देत असत.

दसरा,दिवाळी,यात्रा किंवा घरात कुणाचे लग्न असेल तर पुणे,मुंबई व भिवंडीकर यांची लोक अतुरतेने वाट पहात असत.प्रवासात मुंबईकरांचे प्रचंड हाल होत.खंडाळा घाटात ट्रँफिक जाम मुळे एक ते दिड दिवस घाटातच मुक्काम करावा लागे.

मुंबईचा हलवा 

मुंबईकरांनी आणलेला हालवा काय अप्रतिम होता.चवच न्यारी.मुंबईकर,पुणेकर व भिवंडीकरांचा थाटच न्यारा असायचा. मुंबईकर जेव्हा गावावरून मुंबईला जायला निघत तेव्हा सारा गाव त्यांना पोहचवायला एस.टी.स्टँड पर्यंत जात असत.

आम्ही शाळेत असताना गावातील लोक पोष्टकार्ड आणायला सांगत. त्यावेळी साधे पोष्टकार्ड १५ पैशाला होते. तर अंतरदेशीय निळे ४५ पैशाला. गावात कुणाला पत्र लिहायचे असेल तर सर्वजन माझ्याकडे येत असत.

साधे पोस्ट कार्ड 

पत्राचा मायना ही ठरलेलाला असे तो लिहावाच लागे.

चि..........यांस पत्र लिहीणार........ यांचे अपनास अनेक अशिर्वाद...

पत्र लिहिण्यास कारण की आम्ही इकडे सर्व लहानथोर खुशाल आहोत.तुम्ही तिकडे सुखरूप असशाल अशीआम्ही देवाजवळ प्रार्थना करतो.हे लिहिल्यावर दुसरे काही लिहायला जागाच शिल्लक राहत नसे.

आंतरदेशीय निळे कार्ड 

त्यातल्या त्यात अंतदेशीय (निळे) चांगले होते. लिहायला भरपुर जागा होती. शिवाय फोल्ड करून चिटवल्यावर आतला मजकूर इतरांना वाचता येत नसे. शिवाय डिंक पण अधीच त्यावर असे फक्त ओले करून चिकटवायचे बस्स.

लोक पोष्टमनची अतुरतेने वाट पहायचे. पत्र आल्यावर ते वाचुन दाखवायचेही काम करावे लागे. आपल्याला आलेले पत्र चार-चार वेळा वाचुनही परत परत वाचावेसे वाटे. मी काँलेजला असताना गावाकडील मित्रांनी विशेषतः  दत्ता तिटकारे, दगडू जढर, राघुजी आंबवणे यांनी लिहिलेली पत्र अद्यापही माझ्याकडे आहेत. तो एक अनमोल ठेवाच म्हणावा लागेल.

काही लोक मुंबईहुन गावातील त्यांच्या आई,वडील किंवा भावाला मनीआँर्डर करत.पोष्टमन गावात येऊन मनीआँर्डरचे पैसे द्यायचा.

काही दुःखद प्रसंग घडला किंवा एखाद्याला सरकारी नोकरीचे बोलावने आलेतर  तार यायची. तार ही पत्राच्या मानाने खुपच लवकर पोहचत असे. तारेच्या कागदावर अतिशय छोटा व असंदिग्ध मजकूर असे. तार वाचायाला तज्ञ माणसाची मदत घ्यावी लागे. अनेक वेळा तार वाचण्याचे दिव्य मला पार पाडावे लागत असे. लोक तासनतास माझी तारेवरचा मजकूर वाचण्यासाठी वाट पहात असत. आमची स्वारी दुर कोठेतरी रानारूनात,ओढ्यावर किंवा विहिरीवर पोहायला गेलेली असे.कधीकधी लोक मला तेथे शोधायला येत असत.

कधीकधी गावातील लोकांना महत्त्वाचा निरोप द्यायचा असेल तर वाडा येथे पोष्टआँफिसमध्ये जाऊन फोन करावा लागे.

त्या काळात टेलिफोनच्या सुविधा तालुक्याच्या गावापर्यंत किंवा त्यापुढील मोठ्या गावांमध्ये होत्या. श्रीमंत माणसाकडेच तेव्हा फोन सुविधा उपलब्ध असायची. आताचे बीएसएनएल व पूर्वीचे भारत संचार निगम कडे अर्ज दाखल केल्यावर वर्षा दोन वर्षांनी टेलिफोन सुविधा उपलब्ध व्हायची. काही लोक आमदार खासदारांचे उंबरे झिजवून वशिला लावून सहा महिन्यात सुविधा उपलब्ध करून घ्यायचे.

पूर्वीचे टेलिफोन 












S. T. D. बुथ

त्यानंतर मात्र मोठ्या गावात.तालुक्याच्या ठिकाणी S.T.D. काँल सेंटर सुरू झाले.लाकडाच्या पिवळ्या बुधमध्ये जाऊन बोलायचे.ज्याला नंबर डायल करता येत नसे.त्यास बुध मालक बाहेरुन फोन लावुन देत असे.आपण फक्त आतमध्ये जाऊन फोन उचलायचा आणि बोलणे सुरू करायचे.

आतमध्ये प्रायव्हसी असल्यामुळे निवांत बोलता यायचे.बाहेर रांग लावुन लोक थांबलेले असत.एखाद्याचे बोलणे खुपवेळ चालल्यावर बाहेरच्यांना प्रचंड वैताग यायचा.लोक कधी एकदा यांचे बोलणे संपतेय याची वाट पहात असत.

लाल डब्बा कॉइन वाला फोन P. C. O.

लोकल फोन करायला बाहेर एक रूपयाचे नाणे टाकुन लाल डब्बा फोन (Coin - Box) असायचा.त्यासाठी हाताखाली सुट्टी नाणी ठेवायला लागत. सात सेकंद होण्याआधी दुसरे नाणी टाकावे लागे. तत्पूर्वी तुंग तुंग असा आवाजाचा इशारा होई. त्याबरोबर दुसरे नाणे कॉइन बॉक्स मध्ये टाकावे लागे.त्यावेळी S.T.D.बुध व  Coin box ची प्रचंड क्रेझ होती. रुपया ऐवजी काही लोक पॅकिंग करायच्या पत्र्याच्या चकत्या टाकून सुद्धा फोन करत असत.

सर्वसामान्य लोकांकडे नोकिया,रिलायंस,मटरोलोचे Black & White  हँडसेट येव्हांना यायला लागले होते.सुरूवातीला ३५०/- चा रिचार्ज केल्यावर फक्त ५०/-रू.चा टाँकटाइम मिळे.१ मिनीटाला ३.रू ५० पैसे आकारले जात.शिवाय Incomining लाही बील आकारले जाई.दोन,चार फोन केल्यावर लगेच पैसे संपत असत. त्यानंतर मात्र फोन रिचार्ज स्वस्त झाले.

पुढील एकदोन वर्षात अनेक रंगीत हँडसेट आले.त्यात रेडिओ व एफ एम ची गाणी यांची सोय होती.शिवाय या मोबाईलमध्ये s/d कार्ड (काळी छोटी चीप) होती. ही चीप १ जी.बी.,२ जी.बी ची असायची.यामध्ये आवडीची गाणी भरून मिळत असत. त्यामुळे मोबाईलवर हवे ते गाणे ऐकायला मिळत असे.

त्यानंतर Toush screen चा जमाना आलो.अनेक प्रकारचे मोबाईल आले.Whats up, Face book, insta gram, यु ट्युब, अशी अनेक माध्यमे आली.त्यामुळे जग अधिकच जवळ आले.मोबाईल प्रत्येकाचा एक अविभाज्य घटक झाला. लोक तासंतास मोबाईलवर टाईमपास करू लागले. आपल्या नातेवाईकांना मित्र-मैत्रिणींना लग्नाच्या पत्रिका किंवा ठराविक कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका प्रत्यक्ष भेटण्याऐवजी किंवा फोन करण्या ऐवजी Whats up वर पाठवू लागले. मोबाईल मुळे जग जवळ आले परंतु माणसे दूर गेली.

घरातल्या घरातच माणसे एकमेकांपासून दूर गेली. मोबाईल मुळे कोणी कोणाशी बोलायची सोय राहिली नसल्यामुळे . परदेस जाके परदेस पिया, भूल न जाना किया या गाण्याला काहीही अर्थ राहिला नाही. चिट्ठी आई है, आई है, हे तर केव्हाच हद्दपार झाले.

लेखक - रामदास तळपे 


बाजाराच्या आठवणी

ग्रीष्मातले तप्त ऊन भाजून काढायचे. अंगाची लाही लाही व्हायची. घामाच्या धाराने अंग भिजून जायचे.याच वेळी उन्हाळ्यातील शेतीची कामे बऱ्यापैकी झालेली असत.

बाजाराच्या आठवणी 

हा हा म्हणता जून महिना उजडायचा.आकाशात ढग घोंगवायला सुरुवात व्हायची. ऊन सावल्यांचा खेळ सुरू व्हायचा. तोपर्यंत एक, दोन वळीव पडून गेलेले असायचे. हवेमध्ये बऱ्यापैकी गारवा निर्माण झालेला असायचा. आणि अशातच वेध लागायचे ते शाळा सुरू होण्याचे.

शाळेतील मुलांना नवीन शाळेचा गणवेश घ्यायचा असे. वह्या आणि पुस्तके घ्यायचे असत. नवीन दप्तर, छत्री, बूट घ्यायचे असत. त्यामुळे नेहमी बळेच पाठीमागे लागून बाजाराला जाणाऱ्या मुलांना आई वडील अगदी पुढे घालून बाजाराला नेत असत.

पावसाळ्यापूर्वी बाजाराला जाणे खूपच गरजेचे असे. कारण ग्रामीण भागात सुरुवातीचे तीन महिने धुवाधार पाऊस पडत असायचा.त्यामुळे तीन महिन्यांचा बाजार एकदमच करायचा असे. अगदी घरातील दोन-तीन माणसांना सुद्धा बाजाराला घेऊन जावे लागत असे.

जनावरे सांभाळणाऱ्या गुराख्याला घोंगडी आणि कागद घ्यायचा असे.बाजरी, कडधान्य, मीठ, मसाले, स्वयंपाकाच्या वस्तू असे बरेच साहित्य खरेदी करायचे असायचे. तुटलेली छत्री दुरुस्त करायची असे.

शनिवार हा वाडा गावच्या बाजाराचा दिवस असायचागा वाकडील काही लोक व स्त्रिया अगदी पहाटे उठून स्नानादी क्रियाकर्म करून बाजरीच्या भाकरी, शेंगदाण्याची किंवा लसणाची चटणी फडक्यात गुंडाळून बाजाराला निघण्याची तयारी करत असत. बाजारात विक्री करण्यासाठी तांदूळ,गहू, ज्वारी, कोंबड्या,अंडी भुईमुगाचे बी,मध,अशा विविध वस्तू बाजारात विकण्यासाठी अगदी सकाळीच घेऊन जात असत.

गावाच्या स्टॅन्ड पासून अगदी सकाळी एसटी असे. शिवाय दूध वाहतूक करणारी दूध गाडी सुद्धा अगदी सकाळीच गावाकडून जात. अगदी सकाळी स्टैंड वर बाजाराला जाणाऱ्या लोकांची जत्रा भरे. काही लोक एसटी मधून तर काही लोक दूध वाहतूक करणाऱ्या ट्रक मधून बाजाराच्या ठिकाणी जात असत.

छत्रपतींच्या काळा पासूनची बाजारपेठ वाडा गाव

पश्चिम महाराष्ट्रातील वाडा ही खेड तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनची बाजारपेठ होती. त्यावेळी संपूर्ण मावळ भागातून बाजार करण्यासाठी लोक वाढायला येत असत. वाडा गाव हे पश्चिम महाराष्ट्रात तांदळाची मोठी बाजारपेठ होती. मावळ भागातून उत्पादित होणारा तांदूळ वाडा गावात विक्रीस उपलब्ध असे. तांदूळ खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक,उत्तर प्रदेश मधून व्यापारी लोक त्यावेळी येत असेल. पश्चिम भागातील खडक्या, जीर, रायभोग, इत्यादी उच्च प्रतीचा माल विक्री करण्यासाठी उपलब्ध असे.

एसटी मधून व ट्रक मधून अगदी कोंबून भरलेले बाजारकरू वाडा गाव जवळ येताच त्यांची उतरण्याची लगबग सुरू होई.  गाडीतील चेंगराचेंगरी मधून मार्ग काढत लोक उतरू लागत.

धान्य बाजार 

गाडीतून उतरताच बाहेर बाजारात जिकडे तिकडे माणसेच माणसे दिसत. गर्दीच्या कोलाहालातून व घोंगटातून वाट काढत आम्ही पुढे सरकत राहू. बाजारा च्या सुरुवातीलाच ज्वारी, बाजरी, गहू,भुईमगाचे बी घेण्यासाठी व्यापारी वजन काटा व रिकाम्या पिशव्या मांडून अगदी ऐसपैस बसत असत. समोर अनेक शेतकरी आपला माल विकण्यासाठी गर्दी करून उभे राहत असत. व्यापारी शेतकऱ्यांचा माल सुरुवातीला अगदी पाडून मागत असत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर अगदीच ना पसंती असे. काही वेळाने मालाची घासा घिस करून आपला माल विक्री करत असत. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या तिथे धान्याच्या पोत्यांच्या थप्प्या लागत. 

अनेक शेतकरी लोक भुईमुगाची बी, ज्वारीचे बी, भाताचे बी अशी अनेक बी बियाणे घेऊन विक्री करण्यासाठी बसलेले असत.तिथेही बियाणे घेण्यासाठी अनेक शेतकऱ्यांची गर्दी असे.

प्रसिद्ध तांदळाची बाजारपेठ 

थोडे पुढे गेल्यावर प्रसिद्ध अशी तांदळाची बाजारपेठ असे. तेथे शेतकरी व व्यापारी आणि फुटकळ ग्राहक यांची प्रचंड गर्दी असे. गर्दीतून वाट काढून पुढे जावे लागे. शेतकरी लोक आपापला तांदूळ घेऊन विक्री करण्यासाठी त्या ठिकाणी बसत असत. काही लोकांचा अगदीच थोडा माल असे त्यामुळे ते आपला माल फुटकळीने विकत असत. 

मोठा शेतकरी असलेले लोक व्यापाऱ्यांना आपला तांदूळ विकत असत. काही छोटे व्यापारी किंवा दुकानदार हे सुद्धा तांदूळ विकत घेऊन आपल्या दुकानात विकत असत. व्यापारी वर्गाने विकत घेतलेला तांदूळ ट्रकमधून कर्नाटक, बेळगाव, महाराष्ट्रातील उर्वरित भाग, व अगदी पंजाब पर्यंत पोहोचत असे. 

अंतू शेठच्या राईस मिल मधून भरडून आणलेल्या तांदळाची दरवळ सगळीकडे सुटत असे. तांदळाच्या दरवळीच्या सुगंध देखील आम्ही तांदळाच्या बाजारातून फिरत राहु.

प्रसिद्ध अशी अनंत केदारी यांची राईस मिल 

यासाठी मोठमोठे शेतकरी आदल्या दिवशीच खटार गाडीमध्ये भाताची पोती घेऊन वाडा गावामध्ये दाखल होत असत. प्रसिद्ध अशा अनंता केदारी यांच्या राईस मिलमध्ये शुक्रवारी काळापासून ते शनिवारी पहाटेपर्यंत भाताची गिरणी चालू असे. कारण शनिवारी शेतकऱ्यांना तांदूळ विक्री करावा लागत असे. त्यामुळे ही धांदल उडत असे. 

त्यावेळी अनंत केदारी यांची राईस मिल फारच प्रसिद्ध होती. अनंत केदारी हे लोकांना ऐन वेळेस आर्थिक मदत करत असत. व सुगी संपल्यानंतर त्यांच्याकडून धान्य विकत घेत असत. ते आणि अनेक विद्यार्थ्यांना देखील मदत करत होते. शिवाय ते जिल्हा परिषद सदस्य होते.

तेथेच त्यांची शेंगदाणे ,खुरासणी,सुर्यफुल यांची तेल गिरणी होती.या ठिकाणी प्रचंड गर्दी व्हायची.भात भरडण्यासाठी व तेलाचे घाणे काढण्यासाठी पहाटे पासुन नंबर लागायचे.लोक भाताची पोती खटारगाडीत किंवा ट्रकमध्ये भरून भात भरडण्यासाठी साठी मुक्कामाच्या तयारीने यायचे. 

तांदूळ विकून आलेल्या पैशातून लोक पावसाळ्यापूर्वीचा बाजार करण्यासाठी लगबग करत.

कोंबड्या व अंड्यांचा बाजार 

तांदळाच्या बाजाराच्या अगदी शेजारीच अनेक शेतकरी स्त्रिया कोंबड्या व अंडी विकायला घेऊन बसत असत. 

तेथेही काही व्यापारी व फुटकळ ग्राहक यांची प्रचंड गर्दी असे. अगदी घासा घिस करून कोंबड्यांची व अंड्यांची विक्री होत असे. अनेक मोठमोठे व्यापारी कोंबड्या व अंड्यांची खरेदी करत असत. व दूर शहरात छोट्या छोट्या दुकानदारांना ते विकत असत. 

त्यामुळे कोंबड्या व अंड्यांचे खरेदी करण्यासाठी दूरदूरचे व्यापारी वाडा गावी येत असत. ज्याप्रमाणे वाडा ही तांदळाची बाजारपेठ होती त्याचप्रमाणे कोंबड्या व अंड्यांची सुद्धा होती. कोंबड्या विकून झाल्यावर बायका लगदी पैसे घेऊन बाजार करण्यासाठी बाजाराच्या गर्दीत दिसेनाशा होत असत.

वषटाचा बाजार 

त्या शेजारीच अनेक दुकानदार वाकट, बोंबील, सुकट, खारा मासा, ढोमेली पाटयामधून घेऊन विकायला बसत असत. तेथे माल विकत घेण्यासाठी स्त्रियांची प्रचंड झुंबड उडे. सगळीकडे या मालाचा सुगंध की दुर्गंध? दरवळत राहायचा. अगदीच नाकाला रुमाल किंवा पदर लावून तेथून मार्गक्रमण करावे लागत असे.

अनेक बायका पावसाळ्यातील तीन महिन्यांसाठी सुकट, वाकट, बोंबील, इत्यादी मालाची खरेदी करत असत. घरी गेल्यावर पॅक बंद डब्यात त्यांना हा म** ठेवायचा असे.

विविध दुकाने

पुढे संसार उपयोगी साहित्य, खेळण्याची दुकाने, भांड्यांची दुकाने, आरसे, कंगवे व स्त्रियांची सौंदर्य प्रसाधनाची दुकाने, चप्पल व बूट यांचे दुकाने ओळीने मांडून दुकानदार विक्री करण्यासाठी बसलेले असत.

बाजारातील वाद-विवाद 

जागेवरून काही दुकानदारांची वादावादी होई. दोन्ही बाजूला दोन दुकानदार ठराविक अंतर सोडून बसलेले असत. तेवढ्यात तिथे एक म्हातारा दुकानदार येऊन आपले कापडांचे दुकान थाटू लागे. 

तेवढ्यात शेजारचा दुकानदार त्याला म्हणे 

अरे ये  म्हाताऱ्या? ती जागा नारायण शिंप्याची आहे. उचल तिथून तुझे दुकान.

म्हातारा म्हणे त्याने विकत घेतली आहे का? असे म्हणून तो आपले दुकान बेफिकीरपणे थाटू लागे. काही वेळानंतर नारायण शिंपी तेथे हजर होई.

नारायण शिंपी मग त्या म्हातार्‍याच्या दुकानाजवळ आपले कपड्यांची गाठोडे आपटून म्हणे हे म्हाताऱ्या? माझ्या जागेवर का बसलास.ही जागा माझी आहे.

यावर म्हातारा म्हणे, या जागेवर नाव लेहलं हाय का तुझं?

लवकर दुकान उचल, नाहीतर फेकून देईल!

फेक बरं? म्हातारा नारायण शिंपी ला म्हणे.

यावरून दोघांची एकच वादावादी होई. गिर्हाईक लोक त्यांची गंमत बघत असत. मग शेजारचे दोन्ही दुकानदार त्यावर मार्ग काढत. दोघे दुकानदार थोडे त्यांचे दुकान थोडे सरकवून बसत. व म्हाताऱ्याला ही थोडं सरकायला सांगत. म्हाताऱ्याही मग थोडं सरकून नारायण शिंप्याला आपले दुकान थाटायला जागा करून देत असे. हेच चौघे दुकानदार दुपारनंतर आपापली माझी भाकरी एकमेकांना देत. सकाळी झालेले भांडण विसरून जात.

तोपर्यंत गर्दीचा भर होई. जिकडे तिकडे प्रचंड गर्दी असे. दुकानापुढे गिर्‍हाईकांची प्रचंड गर्दी होई. दुकानदार गिर्हाईकांची गर्दी पाहून हातबल होत असत. लोकांना बाजार घेऊन घरी जाण्याची घाई असे.

घोंगड्यांचा बाजार 

पावसाळ्यात पावसापासून रक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना घोंगडीची अत्यंत आवश्यकता भासायची. यासाठी दूरवरून सांगली जिल्ह्यातून अनेक व्यापारी घोंगड्या विकण्यासाठी वाडा गावच्या बाजारात येत असत. अनेक प्रकारच्या घोंगड्या विक्रीसाठी उपलब्ध असत.

त्या काळात घोंगडीला प्रचंड मागणी असे. व घोंगडीचे भावही जास्तच असत. तरीही घोंगडी ही घ्यावीच लागे. घोंगडी, ब्लॅंकेट, सोलापुरी चादरी इत्यादीं मालाच्या थप्प्या लागलेल्या असतात. त्यावेळी घोंगडी चे दोन प्रकार होते. 

काळी घोंगडी व भुरकट घोंगडी. काळ्या घोंगडीला विशेष मागणी होती. अनेक लोक तेथे घोंगडी घेण्यासाठी गर्दी करत. व अगदी पारखून निरखून घोंगड्या घेत असतात. बाजार भावावरून व्यापारी व शेतकरी यामध्ये अगदीच घासा घीस होत असे.

अनेक स्त्रिया घोंगडी खरेदी करण्यासाठी आलेले असत. परंतु त्यांना त्याचा भाव करता येत नसे. ओळखीचा माणूस दिसतच त्या त्याला बोलावत.

 दादा.. चल. मला तेवढी घोंगडी घेऊन दे..

 घोंगडी च्या दुकानात जाऊन अनेक काळ्या व भुरकट घोंगड्या उलथ्या, पालथ्या करून त्यातून एक मनाजोगती घोंगडी निवडून त्याचा भाव काय हे व्यापाऱ्याला विचारले जाई.

व्यापारी म्हणे 70 रुपये 

काय बोलता? मागच्या आठवड्यात तर 45 रुपयाला नेली होती. एका आठवड्यात एवढी किंमत वाढली काय?

किती देणार बोला?

45 रुपये.

परवडत नाही.. साठ रुपये द्या आणि घेऊन जा.

शेवटचे पन्नास रुपयाला द्या नाहीतर राहू द्या पुढच्या दुकानात जातो. 

असं करा 55 रुपये दे आणि घ्या.

नाय परवडणार पन्नास रुपयाला द्यायचे असेल तर बघा.

 बर ठीक आहे घ्या. असे संवाद चालत.

बापू केदारी यांचे स्टेशनरी दुकान 

आम्ही काही बाजार घेऊन बापू केदारी यांच्या दुकानात जात असू. तिथे गिर्हाईकांची प्रचंड गर्दी असे. दुकानदार सराईतपणे गिऱ्हाईकांना त्यांच्या वस्तू देत असत. आम्ही तिथे गेल्यावर बापू केदारी आमच्या वडिलांना म्हणत. या..या.. गुरुजी या, काय घ्यायचय मुलाला? द्या इकडे यादी. 

ये नारायण ही यादी घेरे? यादीतील वस्तू काढून दे पटकन गुरुजींना.

100 पेजेस 200 पेजेस वह्या, दुरेघी वह्या, कंपास पेटी, रंगपेटी, पेन, पेन्सिल, खोड रबर, पुस्तके, अशा अनेक शालोपयोगी वस्तू घ्यायच्या असत.

बापू केदारी यांच्या दुकानात असलेले सेल्समन पाहिजे ते साहित्य काढून देत असत. त्यावेळी प्रत्येक वहीवर सुनील गावस्कर, कपिल देव, मांजरेकर अशा क्रिकेटर ची चित्रे असत. आम्ही आवडत्या क्रिकेटर ची चित्रे असलेल्या वह्या घ्यायचो.

छत्र्या खरेदी 

छत्रीच्या दुकानात तर प्रचंड गर्दी असे. त्यावेळी साध्या छत्री आणि टेरीकॉटच्या  छत्र्या व साध्या मांजरपाट काळ्या कापडाच्या छत्र्या विक्रीस उपलब्ध असत. साध्या छत्र्या स्वस्त असत. अनेक गरीब गिर्‍हाईक साध्या छत्र्या पसंत करत. तर मध्यमवर्गीय लोक मात्रे टेरीकॉटच्या छत्र्या विकत घेत असत. टेरीकोटच्या छत्र्या टिकायला चांगल्या व अगदी हलक्या असत. परंतु साध्या छत्र्या पाऊस आल्यावर खूप जड होत. व लवकर  वाळत देखील नसत. 

छत्र्या विकत घेतल्यावर साबुर्डीच्या गोपाळे पेंटर कडून, किंवा विजय पेंटर कडून छत्रीवर रंगीत अक्षरात नाव व पत्ता टाकून घेत असू. दोन रुपयात पेंटर नाव टाकून देत असत.

नवनीत शेठ, कादर भाई कापड व्यापारी

वह्या पुस्तके व छत्री घेऊन मुख्य बाजारपेठेत नवनीत शेठ, कादर भाई, यांच्या दुकानात कपडे घेण्यासाठी प्रचंड गर्दी असे. काही लोकांना कापड घ्यायचे असे. तर काही लोकांना रेडिमेड कपडे घ्यायचे असत.

रेडीमेड कपड्यांचे सुद्धा दोन प्रकार असत. साध्या जाड्या भरड्या कापडाच्या खाक्या चड्डया. आणि मांजरपाट कापडाची शर्ट. तसेच टेरीकोट चड्ड्या व टेरिकोट शर्ट सुद्धा विक्रीस उपलब्ध असे. टेरीकोट कपडे ही तुलनेने महाग असत.अनेक लोक रेडिमेड कपडे घेत असत. रेडीमेड कपड्यांची शिलाई अगदीच कच्ची असे. शिलाई लगेच उसवत असे. त्यामुळे काही लोक कापड घेऊन ते शिंप्याकडे शिवायला देत.

लेंगा, पैरण स्पेशलिस्ट दामू अण्णा 

वाडा गावात पेहरण व लेंगा पेशालिस्ट दामू अण्णा क्षीरसागर हे फार प्रसिद्ध होते. ते सकाळी दिलेले कपडे संध्याकाळपर्यंत शिवून देत असत. ही त्यांच्या धंद्याची खासियत होती. दामू अण्णांच्या दुकानात गिऱ्हाईकांची प्रचंड गर्दी असायची. फुल पॅन्ट, शर्ट इत्यादी शिवण्यासाठी तेथे गर्दी असायची. व्यवस्थित माप घेऊन तेथे कपडे शिवण्याचे काम चाललेले असायचे.

काही लोक शिवून झालेली कपडे नेण्यासाठी तेथे आलेली असत. शिवून तयार झालेल्या कपड्यावर गिऱ्हाईकांचे नाव लिहिलेले असे. दामू अण्णा सराईतपणे गिऱ्हाईकांची शिवलेली कपडे शून्य मिनिटात त्यांना काढून देत असत.

भाजी मंडई 

भाजी मंडई मध्ये देखील ग्राहकांची प्रचंड गर्दी असे. त्यावेळी लोक लाल मिरच्या, आणि कांदे घेण्यासाठी फारच गर्दी करत असत. लाल मिरच्यांचे मोठे मोठे ढग लावून भाजीचे व्यापारी बसलेले असत. नाका तोंडात मिरच्यांचा वास जाऊन ठसका लागे.

मिरच्या विकत घेऊन शेजारीच असलेल्या मिरची कांडप केंद्रात त्याची भुकटी बनवली जाई. काही स्त्रिया मसाला बनवत असत. मिरची कांडप केंद्रातही प्रचंड गर्दी असे. काही स्त्रिया मिरच्या घेऊन त्या वाळवून घरात असलेल्या उखळात कुठून त्याची भुकटी बनवत असत.

मिरची प्रमाणे कांद्यांना सुद्धा खूपच मागणी असायची. त्यावेळी गावरान असा फिकट गुलाबी कांदा फारच प्रसिद्ध होता. कांदा फोडताच नाका तोंडातून पाणी येत असेल. आत्ताच्या बाजारपेठेत तो कांदा कुठेच दिसत नाही. लोक अगदी 25 ते 30 किलो कांदा विकत घेत असत.

मसाल्यांची दुकाने 

बाजारातील मसाल्यांच्या दुकानात स्त्रियांची रेडीमेड आयता मसाला घेण्यासाठी तोबा गर्दी असे. अनेक मसाल्यांचे व्यापारी बाजारात येऊन आपला माल विकत असत. त्यामध्ये धने, जिरे, गरम मसाला, मोहरी,सौदा, बडीशेप, हिंग, तेज पत्ता, हळद, हळकुंडे, अशा अनेक मसाल्याच्या वस्तू घेण्यासाठी गर्दी होत असे. 

खाऊची दुकाने हॉटेल 

बाजारात रस्त्याच्या कडेला वाडा गावची काही हॉटेल मालक आपापली दुकाने थाटत असत. तेथे कळीचे लाडू, म्हैसूर पाक, गोडी शेव, आणि भेळ इत्यादी वस्तू विकायला असत. अनेक बाजार करू या दुकानांमधून खाऊच्या वस्तू खरेदी करत. 

ग्रामपंचायत शेजारी असलेले पावडे यांचे हॉटेल 

बाजारात सकाळपासून फिरल्यामुळे लोक दमून भागून गेलेले असत.पोटामध्ये भुकेने कावळे ओरडत असत. आणि मग अचानक आपापल्या आवडीच्या हॉटेलमध्ये पाय फिरकू लागत.

बाजाराच्या दिवशी हॉटेलमध्ये सतत ताजा माल काढण्याचे काम चालू असे. मिसळ व भाज्यांच्या घमघमाटाने लागलेली भूक अजूनच व्याकुळ करू लागे. कधी एकदा मिसळ आणि भजावर ताव मारतो असे होई. या आधी बाजारात एक दोन बर्फाच्या गारेगारी खाल्लेले असत. परंतु त्या पाण्याने भुकेची आग थोडीच शमणार आहे?

वाडा गावच्या ग्रामपंचायत शेजारी पावडे यांच्या हॉटेलमध्ये अनेक बाजार करू आपल्या जवळची थोडक्यात बांधलेली भाकरी सोडून जेवायला बसत असत. त्यासाठी मिसळ  त्याकाळी फारच प्रसिद्ध होती. मिसळ बरोबर आणलेली भाकरी आणि चटणी खाल्ली जात असे.

मिसळ च्या जोडीला वडा आणि भजी देखील असत. जिलेबी असे. कळीचे लाडू असत. लोक आपापल्या आवडीप्रमाणे हॉटेलमधल्या पदार्थांची मागणी करायचे.

जेवण करून झाल्यावर तृप्तीचे ढेकर देत हॉटेलमधून बाजार करू बाहेरचा रस्ता धरत. तोपर्यंत दुपारचे चार साडेचार वाजलेले असत. सगळ्यांना मग घरी जायची घाई होई.

सटी स्टँड येथील राहुळ यांचे हॉटेल 

एसटी स्टँड जवळील राहुल यांच्या हॉटेल सुद्धा प्रसिद्ध होते. पश्चिम भागातील मावळतील आलेले अनेक लोक त्या ठिकाणी आपल्या भाकरीची गाठोडे सोडून मिसळवर ताव मारत असत रावळ यांची म्हातारी गल्ल्यावर असे.

कहाणे वडापाव 

त्यावेळी कहाणे यांचा वडापाव सुद्धा फारच प्रसिद्ध होता. वडापाव खाण्यासाठी त्या ठिकाणी एकच गर्दी उसळत असे. लोक उभे राहून बसून मिळेल ती जागा बघून वडापाव खात असत.

स्टॅंडवर आल्यावर बाजार करू एसटीची वाट पाहत असत. तर काही ठिकाणी लोक ट्रकांमध्ये बसलेले असतात. त्यावेळी जीप, मोटरसायकल वगैरे यांची सुविधा नव्हती. एसटीला प्रचंड गर्दी असे. आपल्याजवळील बाजाराच्या पिशव्या घेऊन लोक एसटी मध्ये जागा धरण्यासाठी एकच गर्दी करत. काही लोकांना मात्र हे जमत नसे. काही लोक ट्रक मध्ये आपला बाजार घेऊन बसत असत. त्यामध्येही चेंगराचेंगरी होई. कुणाचे पाय बाजारांच्या पिशव्यांवर पडत असत. त्यावरून भांडणे होत.

स्टॅन्ड वरील ममता क्लिनिक आणि डॉक्टर काजळे व दिक्षित  यांचे क्लिनिक 

एसटी स्टँड जवळील डॉक्टर अविनाश कुलकर्णी यांच्या दवाखान्यात मावळातील थंडी तापाचे, सर्दी पडशाचे, असे अनेक संसर्गजन्य आजाराने ग्रस्त असलेले पेशंट उपचार घेण्यासाठी येत असत. तेथे सुद्धा खूपच गर्दी असे.

त्याचप्रमाणे डॉक्टर काजळे, दीक्षित यांच्या दवाखान्यात सुद्धा पेशंटची खूपच गर्दी असायची.

 कडलक आत्यांचा खवा 

पोलीस चौकीच्या पाठीमागे राहणाऱ्या कडलक आत्यांचा  खावा सुद्धा फारच प्रसिद्ध होता. त्यांच्या खव्याचा सुगंध दरवळत राहायचा. कवा घेण्यासाठी सुद्धा तिथे खूपच गर्दी असायची. मी वाड्याला कधी कधी त्यांच्या घरी मुक्कामाला थांबत असे.

 नाईक यांचे घड्याळाचे दुकान 

 ग्रामीण भागातून आलेल्या अनेक लोकांची घड्याळांची दुरुस्ती नाईक यांच्या घड्याळाच्या दुकानात चालत असत. आपापली घड्याळ दुरुस्त करण्यासाठी उभे राहत.

एसटी किंवा ट्रक बाजारकरूनी फुल भरल्यावर मार्गक्रमण करीत असे. प्रत्येक स्टॉपवर लोक उतरल्यामुळे हळूहळू गर्दी कमी होई.

आपला स्टॉप आल्यावर एकदाची गाडीतून उतरून घरच्या दिशेने पावले चालू लागत. कधी एकदा घरी जाऊन आपण घेतलेल्या वस्तू मित्रांना दाखवतोय असे होई.

 रामदास तळपे 




 






 

 




भारतीय चलन आणि नाण्यांचा आधुनिक इतिहास

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सन 1952 नंतर भारतीय चलनी नोटांच्या इतिहासात अनेक महत्त्वाचे बदल झाले.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सन 1952 नंतर भारतीय चलनी नोटांच्या इतिहासात अनेक महत्त्वाचे बदल झाले.

भारतीय चलन आणि नाण्यांचा आधुनिक इतिहास

दशमान पद्धत 

दशमान पद्धतीचा अवलंब (Decimalisation)  1957 मध्ये करण्यात आला.

त्याआधी भारतीय चलनात रुपया, आणा, पैसे आणि पई यांसारखे घटक होते. एक रुपया म्हणजे सोळा आणे,एक आणा म्हणजे चार पैसे आणि एक पैसा म्हणजे तीन पई.

दिनांक 1 एप्रिल 1957 रोजी दशमान पद्धती (Decimal System) लागू करण्यात आली. यानुसार, एक रुपयाचे 100 'नये पैसे' असे विभाजन करण्यात आले.'नये पैसे' हे नाव काही वर्षांनी वगळण्यात आले आणि ते फक्त 'पैसे' म्हणून ओळखले जाऊ लागले. यामुळे चलनाचे व्यवहार अधिक सोपे झाले.

नवीन नाण्यांची ओळख

दशमान पद्धती लागू झाल्यानंतर 1, 2, 5, 10, 25 आणि 50 नये पैसे तसेच एक रुपयाची नाणी जारी करण्यात आली.

पूर्वी एक नया पैसा कांस्य धातूचा होता, तर 2, 5, 10 नये पैसे क्युप्रो-निकेलचे होते. 25, 50 नये पैसे आणि 1 रुपयाची नाणी निकेल या धातूंची होती.

1970 च्या दशकात 1, 2 आणि 3 पैशांची नाणी हळूहळू बंद करण्यात आली.

पाच पैसे, दहा पैसे व वीस पैशाची नाणी ही जर्मन या धातूची  होती.

सन 1988 मध्ये 10, 25 आणि 50 पैशांची नाणी स्टेनलेस स्टीलमध्ये सुरू करण्यात आली.

त्यानंतर 1992 मध्ये एक आणि पाच रुपयांची नाणीही स्टेनलेस स्टीलमध्ये आली.

सन 2011 मध्ये 25 पैशांची नाणी आणि त्यापेक्षा कमी मूल्याची सर्व पैशांची नाणी चलनातून काढून टाकण्यात आल

भारत स्वातंत्र्यानंतर ब्रिटिश राजे व राण्यांचे चित्र काढून टाकून भारतीय नोटांवर अशोक स्तंभाचे चित्र वापरले गेले.नवीन नाणी आणि नोटांमध्ये 'रुपया' हे नाव कायम ठेवण्यात आले.

सन 1957 नंतर भारताने दशमान पद्धती (Decimal System) स्वीकारली. यापूर्वी 1 रुपयाचे 16 आणे होते, ते बदलून 1 रुपयाचे 100 पैसे असे प्रमाण निश्चित करण्यात आले. यामुळे पैशांची गणना अधिक सोपी झाली.








नोटांच्या मूल्यांमध्ये आणि डिझाइनमध्ये बदल

सन 1950 मध्ये भारत सरकार च्या रिझर्व बँक ऑफ इंडियाने एक, दोन, पाच आणि दहा रुपयाच्या नोटा चलनात आणल्या.

न 1954 मध्ये एक हजार, पाच हजार आणि दहा हजार रुपयांच्या नोटा पुन्हा चलनात आणण्यात आल्या. या नोटा 1938 ते 1946 पर्यंत चलनात होत्या, परंतु इंग्रज राजे आणि राणी यांची चित्रे असलेल्या नोटा रद्द करून अशोक स्तंभाचे चित्र असलेल्या नवीन नोटा जारी करण्यात आल्या.

1954 मध्ये भारतीय नोटांचा कागद  हा कापसाच्या लगद्यापासून आणि लिनन च्या मिश्रणातून बनवला होता. हा कागद मजबूत आणि टिकाऊ असावा यासाठी विशेष काळजी घेतली गेली.

या नोटांमध्ये अनेक सुरक्षा वैशिष्ट्ये (security features) देखील समाविष्ट केलेली असत, जसे की वॉटरमार्क (watermark) आणि चमकदार शाई (fluorescent ink). त्या काळात मध्यप्रदेशातील होशंगाबाद आणि कर्नाटकातील म्हैसूर येथे नोटांसाठी कागद तयार केला जात असे.

 रुपये एक हजार, 5 हजार व दहा हजाराच्या नोटा


















 रुपये एक, दोन, पाच, दहा व शंभर च्या नोटा 


               









 रुपये वीस व पन्नास रुपयांच्या नोटा 
सन 1978: मध्ये एक हजार, पाच हजार आणि दहा हजार रुपयांच्या नोटा पुन्हा चलनातून रद्द करण्यात आल्या.काळ्या पैशांना (Black money) आळा घालण्यासाठीचा हा स्वातंत्र्यानंतरचा पहिला नोटा बदल होता.

वाढत्या अर्थव्यवस्थेमुळे आणि क्रयशक्ती कमी झाल्यामुळे उच्च मूल्याच्या नोटांची गरज भासू लागली. त्यामुळे सन 1987 मध्ये 500 रुपयांची नोट चलनात आणण्यात आली,

 रुपये पाचशेची नोट 



सन 1996: महात्मा गांधी मालिकेतील (Mahatma Gandhi Series) नोटा जारी करण्यास सुरुवात झाली. या नोटांवर महात्मा गांधींचे चित्र होते जे पूर्वीच्या डिझाइन ऐवजी वापरले गेले. यामध्ये दहा, वीस,पन्नास, शंभर, पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांवर महात्मा गांधी यांच्या चित्राचा समावेश होता. या नोटांमध्ये अनेक नवीन सुरक्षा वैशिष्ट्ये (Security Features) समाविष्ट करण्यात आली.
सन 2000 मध्ये एक हजार व पाचशे  रुपयांची नोटे मध्ये आवश्यक ते सुरक्षित बदल करून ही नोट नव्याने परत चलनात आणण्यात आली.
सन 2005: मध्ये महात्मा गांधी मालिकेतील जुन्या नोटा मध्ये बदल करून सुधारित सुरक्षेच्या वैशिष्ट्यासह त्या जारी करण्यात आल्या.

सन 2014: '₹' हे भारतीय रुपयाचे अधिकृत चिन्ह चलनात आणण्यात आले. हे चिन्ह भारतीय नोटांवर आणि नाण्यांवर वापरण्यात आले.

पुन्हा नोटाबंदी 

8 नोव्हेंबर 2016 रोजी भारत सरकारने 500 आणि 1,000 रुपयांच्या महात्मा गांधी मालिकेतील 2005 पर्यंतच्या नोटा चलनातून रद्द केल्या. हा एक मोठा नोटाबंदीचा निर्णय होता.
 
यानंतर 500 रुपयांची नवीन नोट आणि 2,000 रुपयांची नवीन नोट (महात्मा गांधी नवीन मालिका) चलनात आणण्यात आली. या नवीन नोटांचे डिझाइन आणि आकार पूर्वीपेक्षा वेगळे होते.या नोटांमध्ये नवीन सुरक्षा वैशिष्ट्ये होती, जसे की वॉटरमार्क, सुरक्षा धागा आणि दृष्टिहीनांसाठी विशिष्ट वैशिष्ट्ये
आहेत.

 रुपये 10, 20 50 व 100 रुपयाच्या आधुनिक नोटा 

 










रुपये दोनशे, पाचशे व दोन हजारांच्या आधुनिक नोटा 

सन 2017-18 मध्ये दोनशे रुपयांची नोट तसेच दहा, पन्नास आणि शंभर रुपयांच्या नवीन नोटा (महात्मा गांधी नवीन मालिका) जारी करण्यात आल्या. या नोटांचा आकार आणि रंग पूर्वीच्या नोटांपेक्षा वेगळा होता.

सन 2019: मध्ये RBI ने 19 मे 2023 रोजी दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाकण्याची घोषणा केली, परंतु त्या वैध चलन म्हणून राहतील असे सांगितले. नंतर एक ऑक्टोबर 2023 नंतर 2000 ची नोट पूर्णपणे चलनातून बंद झाली.

नोटांच्या डिझाइनमध्ये बदल:

भारतीय नोटांच्या डिझाइनमध्ये वेळोवेळी बदल होत गेले आहेत. सुरुवातीला अशोक स्तंभ आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या प्रतिमा होत्या. नंतर महात्मा गांधींचे चित्र नोटांवर मध्यभागी आले. नवीन मालिकेतील नोटांवर स्वच्छ भारत अभियान, मंगलयान, सांची स्तूप, राणी की वाव यांसारख्या भारतीय वारसा स्थळांचे आणि प्रगतीचे प्रतीक असलेल्या प्रतिमा दिसतात.

थोडक्यात, 1952 नंतर भारतीय चलनी नोटांनी ब्रिटिश राजवटीतील खुणा मागे टाकून, दशमान पद्धती स्वीकारली, विविध मूल्यांच्या नोटांचा समावेश केला, आणि सुरक्षा वैशिष्ट्ये वाढवून, भारतीय संस्कृती आणि प्रगतीचे दर्शन घडवले. निश्चलनीकरण आणि नवीन नोटांच्या मालिकेमुळे भारतीय चलनी नोटांच्या इतिहासाला एक वेगळी दिशा मिळाली आहे.
भारतात चलनी नोटा चार ठिकाणी छापल्या जातात.

भारतीय चलनाच्या करन्सी प्रिंटिंग प्रेस 

नाशिक (महाराष्ट्र): येथे इंग्रजांच्या काळापासून नोटा छापल्या जातात. त्यावेळी सबंध भारतात एकच नाशिक ही करन्सी प्रिंटिंग प्रेस होती.

देवास (मध्य प्रदेश) येथे सन 1947 नंतर भारत सरकारच्या मालकीची बँक नोट प्रेस आहे. देवासमध्ये नोटांसाठी आवश्यक शाईचे उत्पादन करणारा कारखाना देखील आहे.

म्हैसूर (कर्नाटक) ही प्रेस भारतीय रिझर्व्ह बँकेची उपकंपनी असलेल्या भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड द्वारे चालवली जाते.

साल्बोनी (पश्चिम बंगाल) ही प्रेस देखील भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड (BRBNMPL) द्वारे चालवली जाते.

नाण्यांच्या टाकसाळी 

या चार ठिकाणांव्यतिरिक्त, मध्य प्रदेशातील होशंगाबाद येथे नोटांसाठी लागणारा विशेष कागद तयार केला जातो. तसेच, काही प्रमाणात कागद आणि शाई परदेशातून देखील आयात केली जाते.

नाणी मुंबई, हैदराबाद, कोलकाता आणि नोएडा येथील चार टकसाळींमध्ये (मिंट्स) पाडली जातात.

रिझर्व बँक ऑफ इंडिया गव्हर्नरांची यादी

१ ऑस्बॉर्न स्मिथ १ एप्रिल १९३५ ते ३० जून १९३७

२ जेम्स ब्रेड टेलर १ जुलै १९३७ ते १७ फेब्रुवारी १९४३

३  सी. डी. देशमुख ११ ऑगस्ट १९४३ ते ३० जून १९४९

४  बेनेगल रामाराव १ जुलै १९४९ ते १४ जानेवारी १९५७

५  के.जी.आंबेगावकर १४ जाने. १९५७ ते २८फे. १९५७

६  एच व्ही.आर.आयंगर १ मार्च १९५७ ते २८ फेब्रु. १९६२

७  पी.सी. भट्टाचार्य १ मार्च १९६२ ते ३० जून १९६७

८  एल के झा १ जुलै १९६७ ते ३ मे १९७०

९  बी. एन. आडारकर ४ मे १९७० ते १५ जून १९७०

१० एस. जगन्नाथन १६ जून १९७० ते १९ मे १९७५

११ एन सी सेन गुप्ता १९ मे १९७५ ते १९ ऑगस्ट १९७५

१२ के आर पुरी २० ऑगस्ट १९७५ ते २ मे १९७७

१३ एम. नरसिंहन २ मे १९७७ ते ३० नोव्हेंबर १९७७

१४ डॉ. आय.जी. पटेल१ डिसे. १९७७ ते १५ सप्टें. १९८२

१५ डॉ. मनमोहन सिंग १६ सप्टें १९८२ ते १४ जाने. १९८५

१६ घोष १५ जानेवारी १९८५ ते ४ फेब्रुवारी १९८५

१७ आर. एन. मल्होत्रा ४ फेब्रु. १९८५ ते २२ डिसें. १९९०

१८ एस. वेंकट रमणन २२ डिसें १९९० ते २१ डिसें १९९२

१९ डॉ. सी. रंगराजन 22 डिसें. 1992 ते 22 नोव्हें. 1997

२० डॉ. बिमल जालान २२ नोव्हें. १९९७ ते ६ सप्टें. २००३

२१ डॉ. वाय.व्ही. रेड्डी ६ सप्टें २००३ ते ५ सप्टें. २००८

२२ डॉ. डी. सुब्बाराव ५ सप्टें २००८ ते ४ सप्टें. २०१३

२३ डॉ. रघुराम राजन ४ सप्टें. २०१३ ते ४ सप्टें. २०१६

२४ डॉ. उर्जित पटेल ४ सप्टें. २०१६ ते ११ डिसें. २०१८

२५ श्री.शक्तिकांत दास १२ डिसें. २०१८ पासुन

 लेखक :- रामदास तळपे 











गावाकडच्या आठवणी

काळाच्या ओघात आज जे नवीन आहे ते नंतर जुने होते. परंतु काही आठवणी मात्र अगदी आजही ताज्या असतात.

काळाच्या ओघात आज जे नवीन आहे ते नंतर जुने होते. परंतु काही आठवणी मात्र अगदी आजही ताज्या असतात.

 गावाकडच्या आठवणी 

पूर्वीच्या काळी लहान बाळ सतत रडत असेल, हे ओळखून त्याला काय झाले आहे हे लगेच तज्ञ असलेल्या फक्त आजीबाईंना कळत असे. शक्यतो बाळाला मुडशी झाली असेल किंवा त्याचे पोट दुखत असेल तर त्यावेळी प्रत्येकाच्या घरात मुरुड शेंग असायची. ही मुरुड शेंग सहानेवर उगाळून बाळाला छोटा चमचा पाजत असे. मुरुड शेंग हे त्यावेळी एक उत्तम आयुर्वेदिक रामबाण औषध होते. ओव्याने पोट शेकवण्याची सुद्धा एक पद्धत होती.

बाळ कधी कधी सतत रडत राही. त्यावेळी काही स्त्रियांना बाळाला झोपवून घरातील आणि शेतातील सर्व प्रकारची कामे करावी लागत.त्यासाठी अगदी सकाळी सकाळी बाळाला आंघोळ घालून दूध पाजून तज्ञ आजीबाई त्याला अगदी थोडीशी अफू देत असत.अफूच्या मात्रेमुळे बाळाला गुंगी येऊन  बाळू लवकरच झोपी जात असे.आणि पाच ते सात तास झोपेतून उठत नसे. त्यामुळे बाळाच्या आईला सर्व प्रकारची घरातील किंवा शेतातील कामे करता येत असत.

त्या काळात अगदी उघड उघड किराणा मालाच्या दुकानात  सर्रासपणे अफू विकली जायची.त्यानंतर मात्र सरकारने अफू हा अमली पदार्थ असल्यामुळे अफूवर बंदी आणली.आणि ग्राईप वॉटरचा जन्म झाला.

जीपला ग्राईप वॉटर

जीपला ग्राईप वॉटर आणि बॉन बॉन ग्राईप वॉटर त्यावेळी फार प्रसिद्ध झाले.200 मिलीच्या काचेच्या बाटलीत साध्या कागदाच्या वेस्टनात जिपला ग्राईप वॉटर मिळत असे. त्याची किंमतही अगदी कमी होती. बॉन बॉन ग्राईप वॉटर हा ब्रँड थोडा महाग होता. बॉन बॉन ग्राईप वॉटर हे 500 मिली काचेच्या बॉटलमध्ये रंगीत बॉक्समध्ये येत असे.

हे ग्राईप वॉटर बाळाला सकाळी सकाळी चमच्या भर पाजत असत. ग्राईप वॉटर मध्ये अल्कोहोलचे प्रमाण असल्यामुळे लवकरच गुंगी येऊन बाळ झोपी जात असे. अशाप्रकारे आफू जाऊन ग्राईप वॉटर आले एवढाच काय तो बदल. परंतु जाहिरात करताना "बाळाला द्या बॉन बॉन,बाळ होईल गुटगुटीत छान", अशा प्रकारच्या जाहिराती करायचे. वास्तविक त्याचा बाळाच्या तब्येतीशी काहीही संबंध नसायचा.

त्यावेळी एस टी महामंडळाच्या अनेक एसटीवर,एसटीच्या दरवाज्यावर बॉन बॉन ग्राईप वॉटर ची जाहिरात असायची.पुढे जीपला ग्राईप वॉटरला बॉन बॉन ने जाहिरातीच्या आणि आधुनिकतेच्या जोरावर मागे टाकले.आणि लवकर जिपला ग्राईप वॉटर बंद होण्याच्या मार्गावर आले. 

त्याचप्रमाणे ग्राईप वॉटर मध्ये अल्कोहोल असते व त्याचा भविष्यात मुलावर विपरीत परिणाम होतो. याचे महत्त्व कळल्यावर बॉन बॉन ग्राईप वॉटर चे महत्व पारच कमी झाले.

राजबिंदू

त्या काळात प्रत्येकाच्या घरी आयुर्वेदिक असलेले राजबिंदू हे औषध असायचे.राजबिंदू हे पोट दुखीवर व दाढ दुखीवर रामबाण औषध होते.कपभर कोमट पाण्यात राजबिंदूचे दोन थेंब टाकून प्यायले असता पोट दुखायचे थांबायचे.दाढ दुखायची थांबायची.अजूनही राजबिंदू अस्तित्व टिकवून आहे. आता थोडे काही दुखले की लोक लगेच दवाखान्यात जातात. डॉक्टर त्यांना ऍलोपॅथिक  व होमिओपॅथिक अशा वेगवेगळ्या औषधे व गोळ्या देतात. त्यामुळे राजबिंदू जरा दुर्लक्षित झाले आहे.

B Tex मलम
शेतकरी महिला भगिनी यांच्या घरी गाय,म्हशी व बैल अशी अनेक जनावरे असायची.पहाटे उठून त्यांना गोठ्यातले  शेण काढावी लागे.पावसाळ्यात तर फारच बिकट परिस्थिती असे. शेण काढून आणि शेतात सतत काम करून पाय आणि हात पाण्यात सतत असल्यामुळे पायांच्या आणि हाताच्या बोटाच्या फटीत कुहिली होत असे. सतत बोटांमधला भाग खाजवावा लागे. सतत खाजवून खाजवून पायांची बोटे सुजून जात. त्यावेळी प्रत्येकाच्या घरी  B Tex (बी टेक्स) मलम असलेले छोटे लोखंडी पत्र्याची डबी असे.त्यात हा मलम असे.हा मलम बोटांना चोळल्या वर बरे वाटत असे.

डोके दुखत असेल किंवा अर्धशिशी मुळे डोके व भुवईच्या वर दुखत असेल तर लोक कळीचा चुना दोन्ही डोळ्यांच्या कानाच्या वर चुण्याचा जाडसर ठिपका देत असत. त्यामुळे तात्काळ डोके दुखायचे बंद होत असे.

Anasin

त्यावेळी Anasin गोळी फारच लोकप्रिय होती. सर्दी, पडसे, अंगदुखी वर ही गोळी फारच रामबाण होती. लोक त्या गोळीचा सर्रास वापर करत असत. त्या खालो खाल Pawar 999 ही गोळी सुद्धा याच आजारावर नामी होती. या गोळ्यांच्या जाहिराती भिंतीवर, एसटी वर रंगवाल्या जात असत. पुढे या गोळ्या वापरणे कमी झाले.

Barnol

बोट कापल्यावर किंवा भाजल्यावर barnol मात्र अजूनही आपले अस्तित्व टिकउन आहे.

पावसाळा सुरु झाल्यावर अनेकांच्या घरात ढेकूण व पिसवा होत असत. लोक बाजारातून ढेकूण व पिसवांची पावडर आणून अंथरुणावर टाकून झोपत असत. त्यावेळी सरकारी माणसे दवा शिंपायला येत असत.लोखंडी बादलीत पाणी टाकून ही B S C पावडर मिसळून छोट्या पंपाच्या साहाय्याने फवारली जात असे. एक माणूस पंप मारायला व एक फवरायला असे. सर्व घर फवारून टाकत असत.खुप उग्र असा वास दरवळत राही. अगदी जेवण जात नसे.

काम करताना हात मोडला किंवा फ्रॅक्चर झाला तर भागात असा एखादा माणूस असायचा तो व्यवस्थित हात जोडून द्यायचा.त्याच्या नुसत्या स्पर्शाने बरे वाटायचे.हाताचा भाग व्यवस्थित बसऊन आंबी हळदीचा मलम करून त्यावर मेसाच्या लाकडी पट्ट्या बांधून देत असे. व पंधरा दिवसांनी तो सोडत असे. अगदी परफेक्ट हात जोडला जाई. ही त्या माणसाला दिलेली एक दैवी देणगी होती.

त्या काळात मोडलेला हात बसवणारा, चमक किंवा उसण काढणारा,विंचू उतरवणारा,जनावरांचे आजार बरे करणारा, बैलाच्या पायात रुतलेला काटा काढणारा, दाढ दुखी, मुतखडा, मुळव्याध, कावीळ अशा अनेक आजारावर औषध देणारे लोक भागात उपलब्ध असत. ते समाजाची निस्वार्थ सेवा करत असत. त्यांना निसर्गाने दिलेली ती देणगीच म्हणावी लागेल.

बिब्बा

बिब्बा हे सुद्धा एक उत्तम आयुर्वेदिक औषध होते. पायात मोडलेला काटा काढला की त्या ठिकाणी सुई तापऊन ती बिबव्यात खुपसून त्यामधील तेल जखमेच्या ठिकाणी लावली जाई. मुका मार लागला असेल तर हे बिबव्याचे तेल सुईच्या सहाय्याने मुका मार लागलेल्या ठिकाणी उभे आडवे पट्टे मारले जात. त्यामुळे दुखायचे थांबत असे.

शिकेकाई

पूर्वी लोक जंगलातून शिकेकाईच्या शेंगा आणत असत. त्या वाळवून उकळत कुठून त्याची पावडर करत असत. श्रीया पावडर आंघोळ करताना डोक्याला चोळत असे. त्यामुळे केस अगदी स्वच्छ होत असत. व अधिकच काळेभोर व चमकदार दिसत असत.

रामदास तळपे 

      

 शिवराज्याभिषेक सोहळा 








गावाकडचे दिवस बालमित्र मच्छिंद्र

मच्छिंद्र हा माझा बालमित्र. लहानपणा पासून जेव्हा कळायला लागले अगदी तेव्हापासूनचा. त्याचे जर नाव जरी मच्छिंद्रनाथ असले तरी सारा गाव त्याला मच...

विठू नांगरे कलंदर माणूस