श्री गणेश हुरसाळे यांचा यशस्वी प्रवास


 श्री गणेश हुरसाळे यांचा यशस्वी प्रवास 

जमीनीमध्ये अनेक प्रकारचे धातू असतात रत्ने असतात. जमीनीमध्ये ती सुप्त अवस्थेत असतात.जेव्हा आपण त्यांच्या सानिध्यात येतो तेव्हाच आपणास त्यांचे महत्त्व पटते.अशाच प्रकारे  ग्रामीण भागात असे अनेक व्यक्ती आहेत की आपण जेव्हा त्यांच्या सानिध्यात जातो तेव्हा आपणास त्यांचे महत्त्व कळते.

प्रत्येक धातू हा ज्या वेळी जमीनीतुन प्रथम आपण बाहेर काढतो त्यावेळी तो खुपच ओबडधोबड असतो.त्या धातुला अनेक कष्टप्राय प्रक्रियेला सामोरे जावे लागते तेव्हाच तो लोकांच्या पसंतीला प्राप्त होतो.

ग्रामीण भागात सुद्धा अशी अनेक धातू व रत्ने आहेत की जे  या धातू प्रमाणे अनेक ठेचा खाऊन शुन्यातुन त्यांनी स्वतःचे अस्तीत्व निर्माण केले आहे. त्यापैकी एक म्हणजेच प्राध्यापक श्री.गणेश हुरसाळे.

श्री गणेश हे मंदोशी गावचे.ग्रामीण भागातील अत्यंत हलाखीची परिस्थिती असलेला तरुण.अनेकांची जशी हालाकीची परिस्थिती असते.तशीच गणेशाची सुद्धा. 

त्यावेळी शिक्षणाबद्दल अनास्था असायची.पुर्वी लोक दहावी पास होऊ अथवा नापास द्यायचे मुंबईला पाठवून.अशी स्थीती होती. 

१९९६ साली मी पंचायत समिती घोडेगांव येथे असताना गणेश सर तेव्हा जनता विद्या मंदीर घोडेगांव येथे दहावी किंवा आकरावीला शिकत असतील.ते तेव्हा होस्टेल मध्ये होते.ज्या लोकांनी होस्टेलमध्ये राहुन शिक्षण घेतले आहे त्यांना होस्टेल हे ठिकाण काय चिज असते याची जाणिव असेलच.

मला आठवतेय मी तेव्हा मंदोशी ते घोडेगांव असा दररोज आँफिसला जाण्यासाठी प्रवास करायचो.प्रत्येक सणावाराला किंवा कधी एखादा विशिष्ट पदार्थ गावाला गणेशजींच्या घरी बनवला तर त्यांचे वडिल श्री.केशव हुरसाळे सकाळी सकाळीच जेवणाचे गाठोडे घेऊन यायचे. त्यामध्ये पाच - सात जण सहज जेऊ शकतील असे जेवण असायचे. हा प्रकार १९९६ ते २००२ पर्यत चालू होता. 

परिस्थिती नुसार व शिक्षणाचा खर्च व घरची जबाबदारी अशी तिहेरी जबाबदारी मुळे त्यांना पार्टटाईम जाँब करावा लागला. शेतात काम करणे, आँईलमील मध्ये गरम पेंड पोत्यात भरण्याचे काम केले. तसेच कमवा व शिका या योजनेतुन सुद्धा काम केले. 

डाँ.काळे यांच्या दवाखान्यात त्यांनी अर्धवेळ नोकरी पत्करली. डाँ.काळे यांच्या दवाखान्यात त्यांनी चोकशी कक्ष.पेशंटचे केसपेपर काढणे, दवाखान्याची सफाई व स्वच्छता ,बेडशिट धुणे अशी अनेक कामे केली. हे सर्व पहाताना खुप वाईट वाटायचे,जीव गलबलून जायचा.परंतू त्यांनी शिक्षणासाठी हे सर्व आनंदाने केले.

आपला महिन्याचा  शिक्षणाचा व इतर खर्च भागवून गणेशजी दर महिन्याला माझ्याकडे त्यांच्या घरी देण्यासाठी ३००-४०० रूपये द्यायचे.

एकदा त्यांनी त्यांच्या दवाखान्याच्या पगारातुन एक लांबनळी असलेली ट्यूब घेतली.तो शुक्रवार असावा.ही ट्युब घेऊन साडेपाचच्या दरम्यान आमच्या आँफिसमध्ये आले.आमच्या आँफिसमधील सर्व अधिकारी गणेशजींना चांगले ओळखायचे. त्या पैकी वैद्य नावाचे कृषि विस्तार अधिकारी होते.ते कौतुकाने म्हणायचे. 
काय हा पोरगा आहे? घरच्यांनी शिक्षणासाठी याला पैसे पुरवायचे सोडून हाच घरी पैसे देतो. नक्कीच पुढे काहीतरी हा करून दाखवनार.गणेशजींना गावी यायचे होते.ती ट्यूब घेंऊन.

आमचा गावच्या दिशेने प्रवास सुरू झाला.त्यांनी आणलेली ट्युब ही आजच लागली पाहीजे अशी त्यांची जिद्द होती. घरी जाताच ते म्हणाले.दादा, तुम्ही घरी चला आपण ट्युब लावू, त्यांचा उत्साह मला मोडवेना.मग मी माझा भाऊ मारूती जो आता वायरमन आहे त्याला घेऊन गेलो. त्यांने ती ट्युब लावुन दिली.तेव्हा त्या ट्युबच्या उजेडापेक्षा शतपटीने मला गणेशजींच्या चेह-यावरील समाधान दिसले.

त्यानंतर त्यांनी सन २००१ साली शाळा शिकत असताना त्यांनी घोडेगांव येथे उसाचे गु-हाळ सुरू केले होते.व त्यातुन शिक्षण व घरखर्चाची सांगड घालता होते.

श्री गणेशजी यांचे करियर घडवण्यासाठी  मा.श्री रमेश काळे अधीक्षक जनता वस्तीगृह घोडेगाव यांचे मोलाचे योगदान लाभले, बारावीनंतर वस्तीगृहात राहण्यासाठी परवानगी नसताना सुद्धा धडपड करून मा.श्री काळे यांनी नियम शिथिल केले व श्री गणेशजी यांना ग्रॅज्युएट पर्यंत वस्तीगृहात राहण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. 

त्याच प्रमाणे पुढील आयुष्यात मा.श्री संजय नाईकरे सर यांचेही मोठे योगदान लाभले त्यामुळे त्यांच्या भावी आयुष्यात स्थिरता निर्माण झाली.

काँलेज संपल्यावर त्यांनी पुण्यात P,G,D,B,M हा कोर्स पुर्ण केला.त्याचा खर्च भागविण्यासाठी त्यांच्या वडिलांना शेतीचा आँईल ईजीन पंप विकावा लागला. बैल विकावे लागले.

कोर्स पुर्ण केल्यावर मग सुरू झाली नोकरीसाठी धडपड ,सर्व ठिकाणी प्रयत्न करूनही ना नोकरी ना काही.नोकरीच्या भानगडीत पडण्यापेक्षा काहीतरी व्यावसाय करावा.असे त्यांना वाटले.

आपण पुण्यात क्लासेस सुरू करावेत व गरीब मुलांना अल्पदरात ज्ञानार्जनाचे काम करावे असे त्यानी ठरवले. सन २००४ साली मला साल आठवत नाही.त्यांनी ज्ञानज्योत क्लासेस सुरू करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अतिशय धाडसी व हस्यास्पद होता. पुण्यात खाजगी क्लासेसला काही तोटा नाही. 

त्यात सगळीकडे हाय-फाय क्लास.आणि हा खेड तालुक्यातील पश्चिम ग्रामीण भागातील मुलगा.याच्याकडे ना भांडवल ना अनुभव. पुण्यातले बोलणे व ग्रामीण भागातील बोली.ही तफावत. त्यात स्पर्धेला तोंड द्यावे लागणार ते वेगळेच. आणि अशाही परिस्थितीत त्यांचे सहकारी प्रध्यापक विजयकुमार कौदरे यांना सोबत घेऊन ज्ञानज्योत क्लासेसची निर्मिती केली.

त्यावेळी गणेशजी माझ्याकडे आले.आणि म्हणाले दादा, मी क्लास सुरू करतोय, मला पंचवीस हजार रूपये भांडवल उपलब्ध करून द्या. मी महिन्याला जो काही हप्ता असेल तो भरील.
मी क्षणाचाही विलंब न करता स्वामी विवेकानंद पतसंस्थेत पंचवीस हजार रूपयांचे कर्ज प्रकरण करून श्री गणेशजींना पंचवीस हजार रुपये दिले.व त्यांनी सुद्धा वेळेत ते कर्ज फेडले.

त्यांनी त्यावेळी लावलेल्या ज्ञानज्योत क्लासेसच्या रोपट्याचे आज वटवृक्षामध्ये रूपांतर झाले आहे.ही नक्कीच समाधानाची बाब आहे.सुरूवातीला १३ विद्यार्थ्यांचे १८० विद्यार्थी कधी झाले हे कळलेच नाही. 

२०१२ साली सिंहगड रोड भागात त्यांनी अद्ययावत विशेष सोयी-सुविधा असलेले सुसज्ज असलेल्या वास्तूमध्ये प्रोफेशनल ज्ञानज्योत अकॅडमी ची स्थापना केली आहे. त्यांना त्यांचे सहभागीदार प्राध्यापक विजय कुमार कौदरे हे लक्ष्मणा सारखे उत्तम साथ देत आहेत.
सामाजीक बांधिलकीच्या दृष्टीने ते आजही त्यांचे सामाजीक काम सुरु आहे.ग्रामीण भागातील शाळांमधील दहावी व बारावीच्या मुलांना विशेष मार्गदर्शन करणे.पायी प्रवास करणा-या विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप करणे,गरीब विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्य वाटप करणे आदिवासी कातकरी समाजासाठी दिवाळीमध्ये फराळ वाटप, स्वामी विवेकानंद जीवन ज्योत संस्थेच्या माध्यमातून गरजू होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप. सर्वरोग निदान आरोग्य शिबिर व औषधोपचार. डोळे तपासणी व चष्मे वाटप. यासाठी शिबिरे आयोजित केली आहेत. त्याच प्रमाणे शेतकऱ्यांसाठी वृक्षारोपण व कलमी रोपांचे वाटप असे विविध उपक्रम राबवले आहेत. अशी सामाजीक कामे ते सतत करत असतात.
त्यांचे चला करूया मैत्री अभ्यासाशी.अशी जिंकूया लढाई दहावीची. तयारी दहावीची झेप यशाची व व्यक्तिमत्व विकास. ही व्याख्याने ते गेली 13 वर्ष ग्रामीण भागातील शाळांमधून देत आहेत. 

त्यांना आतापर्यंत विश्व माता फाउंडेशन पुणे या संस्थेने इनोव्हेटिव्ह टीचर्स ऑफ इंडिया नॅशनल अवॉर्ड या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्याच प्रमाणे सकाळ वृत्तपत्र समूहाने त्यांना संघर्ष यशोगाथा या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ते सध्या ज्ञानज्योत क्लासेसचे संचालक आहेत. तसेच दे आई प्रतिष्ठान मंदोशी दोशी ता. खेडचे सचिव आहेत व स्वामी विवेकानंद जीवन ज्योत संस्था पुणे या संस्थेचे सहसचिव आहेत.
त्यांनी आता शालेय आणि माध्यमिक क्लासेस बरोबर, अद्ययावत असे  एम.पी.एस.सी. आणि यू.पी.एस.सी. ची अकॅडमी सुरु आली आहे. त्यांच्या या संस्थेत जवळजवळ शंभर लोक काम करत आहेत.
त्यांचे शैक्षणिक सामाजिक कार्य असेच बहरत राहो व त्याचा फायदा ग्रामीण भागातील सर्व जनतेला लाभो अशी सदिच्छा व्यक्त करतो .व अशा या ग्रामीण भागातील ऊगवत्या ताऱ्याला ग्रामीण संस्कृती कडून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो.🖊️💐💐🏆


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सच्चा मित्र काशिनाथ जढर

गावातील एकमेव विश्वासू व्यक्तीमत्व कोणते असेल तर ते म्हणजे काशिनाथ जढर. हे गावातील एखादे लहान मुलसुद्धा सांगेल. काशिनाथ हे आमच्या सबंध गावात...

विठू नांगरे कलंदर माणूस