खेड/ शिरूरचे आतापर्यंतचे खासदार

खेड/ शिरूरचे आतापर्यंतचे खासदार 

१९४७ रोजी भारत स्वातंत्र्य झाला.व नेहरू पंतप्रधान जरी झाले असले तरी १९५२ पासुन ख-या अर्थाने प्रत्येक पाच वर्षासाठी लोकसभेच्या निवडणूका घेण्यात आल्या. १९६२ साली खेड लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला.

 आर के खाडिलकर 

या मतदारसंघात जुन्नर,आंबेगाव,खेड,मावळ,मुळशी हे तालुके होते. १९६२ साली तिसऱ्या लोकसभेच्या निवडणूका घेण्यात आल्या. या निवडणूकी मध्ये पहिले खेडचे खासदार झाले श्री आर.के.खाडिलकर.ते नारिंगा ता.देवगड जि.रत्नागिरीचे होते. ते निष्णांत वकील होते. १९६२ -१९६७ व १९६७-१९७१ पर्यत खेडचे व त्यानंतर १९७१-१९७७ मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातुन ते खासदार झाले.

त्यांनी त्यांच्या कार्यकाळात लोकसभेचे उपसभापती ,पुरवठा, कामगार व पुनर्वसन मंत्री ही पदे भूषवली. ते मूळचे कोकणातील होते त्यांचे निधन १९७९ मध्ये झाले.

अनंतराव पाटील 

१९७१ - १९७७ या पाचव्या  व्या लोकसभेचे श्री.अनंतराव पाटील हे खेडचे खासदार होते.



१९७७ ते १९८० या सहाव्या लोकसभेचे खासदार कै. श्री अण्णासाहेब मगर हे खेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते.

अण्णासाहेब मगर

अण्णासाहेब मगर हे पिंपरी-चिंचवड शहराचे शिल्पकार व पहिले नगराध्यक्ष देखील होते. त्यांनी सामाजिक सांस्कृतिक राजकीय शैक्षणिक सहकार क्षेत्रात भरीव कार्य केले ते 1952 पासून हवेली विधानसभेचे आमदार देखील होते.

 रामकृष्ण मोरे

19८०-१९८४ या या सातव्या लोकसभेचे खेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार कै.श्री. रामकृष्ण मोरे हे होते. ते 1984 ते 1989 पर्यंत खेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. नंतर ते विलासराव देशमुख यांच्या मंत्रीमंडळात शालेय शिक्षणमंत्री होते. त्यांचे पिंपरी चिंचवड या महानगरपालिकेवर  निर्विवाद वर्चस्व होते.ते हवेली तालुक्यातील देहू या गावचे होते.

1984  स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर लोकसभेच्या निवडणुका घेण्यात आल्या.त्यावेळी श्री शरद पवार हे समाजवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. समाजवादी काँग्रेस आणि जनता दल यांची युती झाली होती. श्री शरद पवार हे बारामती मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवणार होते. त्यावेळी बारामती लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी श्री.संभाजीराव काकडे हे इच्छुक होते.

परंतु समाजवादी काँग्रेस आणि जनता दल यांची युती झाल्यामुळे संभाजीराव काकडे यांना खेड लोकसभेची जागा सोडण्यात आली. श्री संभाजीराव काकडे यांना खेड आंबेगाव जुन्नर या भागात मानणारा समाज होता. श्री संभाजीराव काकडे यांना सर्वजण लाला म्हणायचे.श्री.शरदराव पवार साहेब यांच्या कार्यकर्त्यांनी त्यावेळी मंचर येथे शरद बँकेची स्थापना केली.तर मंचर येथेच श्री संभाजीराव काकडे यांच्या समर्थकांनी कै. श्री. किसनराव बाणखेले यांच्या नेतृत्वाखाली लाला अर्बन बँकेची स्थापना केली होती.किसनराव बाणखेले हे श्री संभाजीराव काकडे यांना गुरु मानत.

 किसनराव वानखेले

या निवडणुकीत रामकृष्ण मोरे विरुद्ध संभाजीराव काकडे यांची निवडणूक प्रचंड चुरशीची झाली. शेवटच्या फेरीपर्यंत कोण जिंकणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. परंतु अवघ्या सोळा हजार मतांनी रामकृष्ण मोरे विजयी झाले. रामकृष्ण मोरे हे याआधी खासदार होते. त्यांच्याकडे पैसा होता. परंतु संभाजीराव काकडे यांच्याकडे या दोन्ही बाबी नव्हत्या.हे प्रामुख्याने लक्षात घ्यावे लागेल.

पुढे नवव्या लोकसभेची निवडणूक घेण्यात आली. खेड लोकसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचे रामकृष्ण मोरे व जनता दलाचे श्री संभाजीराव काकडे यांचे पट्टशिष्य कै.श्री. किसनराव बाणखेले हे निवडणुकीसाठी उभे होते. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा तो सामना होता.

त्यावेळी किसनराव बाणखेले यांची ही निवडणूकीसाठी अक्षरशः लोकांनी वर्गणी काढून प्रचार केला. त्यावेळी श्री शरद पवार साहेब हे काँग्रेसमध्ये होते. त्यांनी जाणीवपूर्वक काँग्रेसचे उमेदवार रामकृष्ण मोरे यांच्याकडे दुर्लक्ष केले. या निवडणुकीत कै.किसनराव बाणखेले यांनी त्यांचे गुरु संभाजीराव काकडे यांच्या पराभवाचा वचपा काढला. व नवव्या खेड लोकसभा मतदार संघाचे खासदार झाले.

श्री किसनराव बाणखेले हे आंबेगाव तालुक्यातील मंचर या गावचे होते ते पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य देखील होते. त्यांनी तीन वेळा आंबेगाव विधानसभेचे नेतृत्व केले. त्यावेळी सगळी कडे धोतर गेलं दिल्लीला असे जिकडेतिकडे म्हटले जायचे. पहिल्यांदाच खेड लोकसभा मतदारसंघ काँग्रेस कडून जनता दला कडे गेला. किसनराव बाणखेले १९८९-१९९१ पर्यंत खासदार होते.

 विदुरा नवले 

दहाव्या लोकसभा मतदारसंघाचे १९९१-१९९६ या काळात थेट लोकसभा मतदारसंघाचे श्री विदुरा उर्फ नानासाहेब नवले हे खासदार होते. ते संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी खूप वर्ष होते. ते मुळशी तालुक्यातील होते.

 निवृत्ती शेठ शेरकर 

त्यानंतर १९९६ ते १९९८ या कालावधीत खेड लोकसभा मतदारसंघाचे श्री निवृत्तीशेठ शेरकर खासदार होते. ते जुन्नर तालुक्यातील शिरोली गावचे होते. ते बरेच वर्ष विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष होते.

अशोकराव मोहोळ 

त्यानंतर १९९८ ते १९९९ पर्यंत खेड लोकसभा मतदार संघाचे श्री.अशोकराव मोहोळ खासदार झाले. ते देखील मुळशी तालुक्यातील होते. 

१९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. त्यानंतर लगेच लोकसभेच्या व विधानसभेच्या निवडणूका घेण्यात आल्या. १९९९ ते २००४ पर्यंत खेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार पुन्हा श्री अशोकराव मोहोळ विजयी झाले. 

त्यानंतर २००४ ते २००९ मध्ये शिवसेनेचे श्री शिवाजीराव आढळराव पाटील हे खेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार झाले.ते आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथील आहेत. त्यांचे  प्रतिस्पर्धी  उमेदवार श्री अशोक मोहोळ हे होते.

सन २००९ नंतर खेड लोकसभा मतदार संघ संपुष्टात आला. व शिरूर लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. या मतदारसंघात जुन्नर, आंबेगाव, खेड ,शिरूर, भोसरी व हडपसर इत्यादी भाग सामाविष्ट करण्यात आला, 

 शिवाजीराव आढळराव 

सन २००९ ते २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत श्री शिवाजीराव आढळराव पाटील हे दुसऱ्यांदा विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी होते राष्ट्रवादी काँग्रेसचे श्री विलास लांडे. 

त्यानंतर २०१४ ते २०१९ साठी पुन्हा लोकसभेच्या निवडणुका घेण्यात आल्या. या निवडणुकीत पुन्हा तिसऱ्यांदा शिवसेनेचे श्री शिवाजीराव आढळराव पाटील हे शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार पदावर निवडून आले. त्यांचे प्रतिस्पर्धी होते राष्ट्रवादी काँग्रेसचे श्री देवदत्त निकम. 

संपूर्ण मतदारसंघात प्रत्येक गाव आणि गाव पिंजून काढणारे महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील ते एकमेव खासदार असावेत. त्यांच्या काळात खूपच विकास कामे झाली. त्यांनी अगदी वैयक्तिक निधी देऊन विकास कामे केली.

अमोल कोल्हे

सन २०१९ ते २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत श्री अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस हे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार झाले, त्यांनी विद्यमान लोकसभेचे खासदार श्री शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला.

 त्यानंतर पुन्हा 2024 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या शिवाजीराव आढळराव पाटलांचा पराभव करून पुन्हा लोकसभेचे खासदार झाले.

 रामदास तळपे 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सच्चा मित्र काशिनाथ जढर

गावातील एकमेव विश्वासू व्यक्तीमत्व कोणते असेल तर ते म्हणजे काशिनाथ जढर. हे गावातील एखादे लहान मुलसुद्धा सांगेल. काशिनाथ हे आमच्या सबंध गावात...

विठू नांगरे कलंदर माणूस