सच्चा मित्र काशिनाथ जढर

गावातील एकमेव विश्वासू व्यक्तीमत्व कोणते असेल तर ते म्हणजे काशिनाथ जढर. हे गावातील एखादे लहान मुलसुद्धा सांगेल.

काशिनाथ हे आमच्या सबंध गावातील आदर्शवत व्यक्तीमत्व होते. गावात पुर्वी काशिनाथच्या शब्दाला खुप मान होता.व त्याच्या विषयी लोकांना आदर होता.

गावात कोणाचेही, कसलेही काम असो. लोक सल्ला घेण्यासाठीअथवा मदतीसाठी काशिनाथकडे धाव घेत. काशिनाथही त्यांना कधीच नाही म्हणत नसे.

गावात रात्री कोणत्यांना कोणत्या कारणास्तव मिटींग असे. एकेकजण बैठकीला येऊ लागे. परंतू अद्याप काशिनाथ आलेला नसे. लोक व जेष्ठ मंडळी काशिनाथची वाट पहात. प्रसंगी जेष्ठ मंडळी त्याला मिटिंगला येण्यासाठी एखाद्याला बोलवायला पिटाळत.

काशिनाथला मिटिंगला बोलावण्यासाठी मी कित्येक वेळा त्याच्या घरी गेलेलो आहे. त्यावेळी मला मोठे झाल्यावर गावात काशिनाथसारखे व्यक्तीमत्व व्हावे असे वाटत असे.

त्यावेळी मी दहावीत असेल. तेव्हा मी लहान मुलांमध्ये व माझ्या समकक्ष मुलांमध्ये खेळत व बागडत असे. एके दिवशी काशिनाथ मला येऊन म्हणाला रामभाऊ तु आता मोठा झालाय. मोठ्या माणसांमध्ये येऊन बसत जा. लहान पोरासोरांत खेळणे कमी कर. त्याचा हा सल्ला मी तात्काळ आमलात आणला.

मी जेव्हा आकरावीला राजगुरूनगरला प्रवेश घेतला तेव्हा मला काँलेजला जाण्यासाठी व्ववस्थीत असे कपडे नव्हते. हे जेव्हा काशिनाथच्या लक्षात आले तेव्हा तात्काळ त्याने त्याचा नविन ड्रेस मला देऊन टाकला.

गावात दुध डेअरी व्हावी, अशी तेव्हा अनेकांची इच्छा होती. त्यासाठी सगळ्यात मोठे योगदान काशिनाथचे होते. 

त्यावेळी काशिनाथच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण ग्रामस्थ धुओली येथे तत्कालीन सोसायटी मँनेजर श्री.चिंतामण जठार यांचे घरी गेलो. तेथे सर्व कागदपत्रांची पूर्तता करून प्रत्येक सभासद ११ रूपये या प्रमाणे शेअर्स जमा केले.

अनेकांचे शेअर्स काशिनाथने स्वतः भरले, व श्री.काळभैरवनाथ दुध उत्पादक संस्थेची मुहार्तमेढ तेथेच रोवली गेली. 

सर्व ग्रामस्थांची इच्छा अशी होती की या डेअरीचे चेअरमनपद काशिनाथने स्विकारावे...परंतू काशिनाथने या पदासाठी नम्रपणे नकार दिला. पुढे महिनाभरातच श्री.काळभैरवनाथ डेअरी सुरू झाली. याचे संपुर्ण श्रेय काशिनाथ कडेच जाते.

काशिनाथ मुळे गावगाड्याच्या मुख्य प्रवाहात मी ओढला गेलो. आणि सामाजिक, राजकीय कार्याचा भाग बनलो. काशिनाथचा प्रत्येक सल्ला हा अभ्यासपुर्वक असे व तो भविष्यात तंतोतंत खरा ठरायचा.

गावात कोणाचे लग्न जमवायचे असो, लग्नाचे नियोजन असो, गावातील भांडण तंटा मिटवायचा असो, रूसवा फुगवा काढायचा असो, कोणाला मोठ्या दवाखान्यात न्यायचे असो,किंवा कोणतेही काम असो, काशिनाथ स्वतःच्या कामावर पाणी सोडून ही लोकांची कामे आवडीने करायचा. अद्यापही ही त्याची परंपरा चालू आहे.

पुर्वी लोक सशाची, डुकरांची शिकार करायचे. डुकराची पारध कोणत्या रानात करायची. वाघुरी (जाळे) कोठे लावायच्या. पारध कोठून काढायची याचे संपुर्ण नियोजन काशिनाथ लिलया करायचा. 

त्याचप्रमाणे उन्हाळ्यात सकाळी लवकर रानाजवळ असलेल्या शेतात जाऊन काशिनाथ तेथे ससा येत असल्याचा माग काढे. सशाच्या लहान मोठ्या लेंड्यावरून ससा किती मोठा आहे याचा अचुक अंदाज काढे. 

त्याप्रमाणे संध्याकाळी दिवस बुडाल्यावर आम्ही त्याच्या बरोबर वाघुरी, करंड्या व घोंगड्या घेऊन रानातली वाट चालू लागायचो. वाघुरी कोठे मांडायच्या याचे संपुर्ण नियोजन काशिनाथ कडे असे. वाघुरी मांडून झाल्यावर प्रत्येकजण लहान झुडपाच्या जवळ घोंगडी पांघरूण बसायचा.

ससा आल्यावर वाघुरीच्या दिशेने ससा कसा पळवायचा व वाघुरीत पाडायचा हे काशिनाथ अचुक अंदाज व तितकीच चपळता दाखवत लिलया करायाचा.

पुर्वी मी काशिनाथ बरोबर मोहरी (कड्या कपारीत असलेले मधमाशांचे पोळे) काढण्यासाठी पहाटेच जायचो. पहाटे रानात जाताना एक वेगळाच गारवा व रानातील झाडांचा फुलांचा सुंगध दरवळत रहायचा. व मन मन प्रसन्न होऊन प्रफुल्लीत व्हायचे.

कोवळ्या उन्हाच्या तिरपेच्या सहाय्याने मधमाशी कोठे जाते हे तो अचुक ओळखायचा. व बरोबर आम्ही तेथे पोहचायचो.

एकदा आम्ही काशिनाथच्या मार्गदर्शना खाली व त्याच्या नियोजनानुसार झाडावरील आग्या मोहळ अगदी सुरक्षित पणे काढले होते.

एकदा असेच संध्याकाळी मी, काशिनाथ व धोंडू विष्णू तळपे सशाच्या शिकारीला गेलो. वाघुरी लावून सशाची वाट पाहत बसलो. रात्र असल्यामुळे काहीच दिसत नव्हते. आणि अचानक वाघुरीच्या करंड्या पडल्याचा आवाज झाला. वाघुरीत ससा पडला म्हणून काशिनाथ व धोंडू वाघुरीच्या दिशेने धावले. वाघुरीतला ससा काशिनाथ पकडणार तेवढ्यात वाघुरीत पडलेले रान मांजर जोरात त्याच्या अंगावर फिसकारले. तसाच काशिनाथ मागे सरला. 

अरे! रामभाऊ बॅटरी आण. वाघुरीत दुसरेच काहीतरी आहे. मी बॅटरी घेऊन गेलो तर वाघुरीत रानमांजर होते. त्याला वाघरीतून काढायचे कसे हा प्रश्न होता. तेवढ्यात धोंडू एक मोठा दगड घेऊन आला. आणि मांजराच्या डोक्यात टाकला. मांजर जागच्या जागी गप्पगार झाले. आणि हेच मांजर आम्ही कंबळ वाघ (कातकरी) यांना दिले.

लेव्ही बसलेय याचा फायदा घेऊन भाताची चोरटी ने-आण करणाऱ्यांची काशिनाथने एकदा अशीच पाचावर धारण बसविली.

होमगार्डचे खाकी कपडे घालून मी, धोंडू तळपे, अशोक सुतार, मारुती तळपे आणि काशिनाथ जढर नेहमीसारखे शिकारीला गेलो होतो. 

सावज हेरण्यासाठी काशिनाथ हातातील पॉवरबाज बॅटरी रानात चारीकडं फेकीत होता. त्या प्रकाशझोतात पोत्यांनी शिगोशिग भरलेली एक बैलगाडी आली. चोरटा भात व्यापार करणाऱ्या त्या गाडीतील व्यापाऱ्यांना वाटलं आपल्यावर ही पोलिसांची धाड आली. त्यांनी बैलांची मुस्कटं वळती केली आणि मागचा पुढचा विचार न करता दात ओठ खात बैल पिटाळायला सुरुवात केली.

क्षणात एक भयानक आवाज त्या शांत रानात उठला. दहा-वीस हात खोल असलेल्या एका दरीत बैल गाडीसह कोसळले होते. आम्ही दरडीत उतरून अगोदर जुपन्या ढिल्या करून बैलांना मोकळं केलं. 

सगळ्यांच्या मदतीनं गाडी दरडीबाहेर काढली. इकडं तिकडं विखुरलेली भाताची पोती पुन्हा गाडीत चढविली. बैलांना पाणी पाजून हुशार केलं. आम्हा शिकाऱ्यांचा तांडा घेऊन काशिनाथ गाडीत चढला. कासरे आपल्या हातात धरीत त्यानं ती भरलेली बैलगाडी सरळ गावात आणली.

बैल कुणाचे आहेत हे आम्ही ओळखलं होतं. त्या चोरट्याच्या दारात सरळ गाडी लावून काशिनाथने ललकारी दिली‚ अबे ओ बब्या बाहेर ये ! शिकार आव्या है रे! बबनराव बाहेर आला आणि आपली बैलं आणि गाडी बघताना त्याचा चेहरा खेटरानं मालिश केल्यासारखा झाला.

आयुष्यात मी काशिनाथ बरोबर खुप फिरलो कधी पायी तर कधी मोटारसायकवर तर कधी कारने.

एकदा आम्ही हिरडे गोळा करण्यासाठी पायीपायी पाभे, भोमाळे, खरपुड मार्गे तांबडेवाडीला गेलो. तेथे आम्ही पोहचलो २.३० वा. नंतर आम्हाला खुप भुक लागली. आता काय करायचे, असा विचार आला. आम्ही डोंगरावर होतो.

काशिनाथ म्हणाला काळजी करू नको. एक काम करू. 

खाली गाव आहे. तेथे लग्न आहे. कारण स्पिकरवरून लग्नाच्या गाण्यांचा, व आहेर पुकारल्याचा आवाज योतोय.

आपण खाली गावात जाऊ.

मी म्हटले अरे! तो अनोळखी गाव आपली तेथे ओळख ना पाळख कशाला तेथे जायचे त्या पेक्षा आपण घरी जाऊया.

काशिनाथ म्हणाला. 

नाही आपण जाऊच. त्याच्या पुढे काय बोलनार ? गेलो.

मला वाटते ते औंढे गाव असावे. तेथे गेलो तर सर्व लोक अनोळखी. कुणीच आमच्या ओळखीचे दिसेना. शिवाय लग्नाला अजुन खुप वेळ होता. तेव्हा लग्न झाल्यावर जेवण असायचे. 

आता काय करायचे. असा प्रश्न निर्माण झाला. इतक्यात आम्हाला आमच्याच गावातील श्री.शांताराम मोहन भेटले. ते आम्हाला पाहून अश्चर्यचकित झाले. ते त्यांच्या बहिनीच्या मुलीच्या लग्नाला आले होते. त्यांना सर्व हकिकत सांगीतल्यावर त्यांनी आम्हाला लगीनघरात नेऊन जेवायला वाढले. आम्ही भात आमटी व शाकभाजी व बुंदीवर ताव मारला. 

जेवण केल्यावर मग मात्र आम्ही परत घरच्या ओढीने चालू लागलो. 

काशिनाथ जढर एके दिवशी माझ्या कडे

आला व मला म्हणाला. रामभाऊ आज रात्री माझ्या बरोबर झोपायला रानात आमच्या गोठ्यावर यावे लागेल मी विचारले का रे ? 

तो म्हणाला अरे दादा व वहिनी लग्नाला गेले आहेत. ते येनार नाहीत व गोठ्यावर गायी बैल व म्हशी आहेत. तेव्हा जावं लागेल. मी त्याला होकार दिला.

रात्री आम्ही दोघे रानातील गोठ्यावर झोपायला गेलो. रात्री तेथे शांत झोप लागली. सकाळी अगदी पहाटेच जाग आली. नंतर झोप काही येईना.

चला बाहेर लगवीला जाऊ असा विचार करून काशिनाथला उठवले. आम्ही बाहेर आलो. नुकतेच उजाडत होते. गार वारा सुटला होता.

आमच्या गोठ्याच्या पुढे एक मोठा कडयासारखा डोंगर होता. तेथुन गावात येण्यासाठी पाउलवाट होती. ती वाट वळणावळणाची होती.आम्ही तेथेच लगवीला उभे होतो. 

मी अचानक वर समोर असलेल्या कड्याकडे पाहिले. तेथील पाउलवाटेने एक नउवारी लुगडे नेसलेली व डोक्यावर गाठोडे असलेली बाई चालली होती. मी काशिनाथला दाखविले.

तो म्हणाला अरे! ही तर चिंधाबाई आहे. आमच्या गावातील एक बाई जवळच असलेल्या नायफड या गावात दिली होती.आम्हाला वाटले तिच आहे. 

काशिनाथ म्हणाला 

अरे! ही इतक्या सकाळी कशाला आली असेल ? 

ही उठली असेल तरी कधी ? आणि निघाली असेल कधी ? 

कारण नायफड ते आमचे मंदोशी गाव सुमारे ५ कि.मी. असेल. 

शिवाय रानातून व डोंगरातून येणारी वाट.असे आम्ही बोलत होतो. चिंधाबाई वळणवळणाने असलेल्या पाउलवाटेने चालत होती. ती ज्या वळणावर आली, तेथे मोठे झाड होते. तेथे जवळच मोठा दगड होता.

आम्ही पहात असताना अचानक त्या झाडाचा कडकड आवाज झाला आणि झाड उन्मळून त्या बाईच्या अंगावर पडले. त्या बरोबर ते झाड व तो मोठा दगड खाली घरंगळत आला. एकच मोठा आवाज झाला. चिंधाबाईचे काय झाले असेल या विचारांनी आम्ही सुन्न झालो.

नंतर लगेचच गावात जाउन ही खबर लोकांना दिली. सर्व जण घटना घडली तेथे आलो. तर त्या ठिकाणी झाड, चिंधाबाई व दगड या पैकी काहीही दिसले नाही. लोकांनी आम्हांला वेडयात काढले. तुम्हाला भास झाला असेल असे म्हणून निघुन गेले.

परंतु एक कळले नाही. एकाच वेळी दोघांना कसा भास झाला. नव्हे ते भुतच होते याची पक्की खात्री झाली.

विशेष म्हणजे चिंधाबाई अजुनही हयात आहे

काशिनाथच्या कामाचे मुल्यमापन करायचे झाल्यास योग्य नियोजन, अचुक अंदाज, योग्य मार्गदर्शन, सतत दुस-याला मदत करण्याची भावना,कार्यतत्परता,अजातशत्रू इत्यादी गुण त्याच्याकडे होते व आजही आहेत.

परंतु येवढा गुणसंपन्न माणुस असुनही काशिनाथ नियतीच्या फेऱ्यात अडकला. मद्याच्या नशेत हरवून बसला. कोणत्याही प्रकारजी त्याच्यावर जबाबदारी नसताना, कोणताही दबाव, कर्ज, नसताना काशिनाथ नशेच्या आहारी गेलाय. हा नियतीचाच भोग म्हणावा लागेल.

खुपदा सांगुनही त्याच्यावर काहीच फरक पडत नाही. गावात अनेक गट-तट झाले परंतु काशिनाथ बद्दल सर्वांनाच आस्था व अपुलकी राहीली. कोणच त्याला वाईट बोलू शकले नाही. मग तो कोणत्याही गटात असो. गावातील सर्वांनाच वाटते की काशिनाथचे व्यसन सुटुन त्याने पुर्वी प्रमाणेच कार्य करत रहावे. व आपला भविष्यकाळ उज्वल करावा. अद्यापही वेळ गेलेली नाही हेच या लेखातुन सांगण्याचा मुख्य उद्देश.

रामदास तळपे 

गावाकडच्या पोहण्याच्या आठवणी

पूर्वी गावाकडे सर्वात जास्त आनंद कशाचा असायचा तर पोहणे. पोहणे म्हणजे सगळ्यांचा जीव की प्राण. पोहण्यासारखा आनंद दुसरा कोणताच नसे.

मी यावेळी साधारण दुसरीला असेल.  एकदा असेच मी माझ्या चुलत भाऊ गोटयाभाई बरोबर आंघोळीच्या डोहावर गेलो असता तेथे बरीच मुले ओढ्यामध्ये पोहत होती. परंतु मला पोहता येत नसल्यामुळे मी तसाच ओढ्याच्या काठावर बसून त्यांचे पोहणे पाहत होतो.

माझ्याच वयाचा दगडू जढर हा ओढ्यामध्ये अतिशय खोल पाणी असलेल्या ठिकाणी पोहत होता. ते पाहून मला सुद्धा पोहावेसे वाटले.

प्रथम मला माझ्या भावाने उथळ पाण्यामध्ये सोडले. मी तिथेच डुबुक डुबुक करत असे. परंतु खोल पाण्यात जाण्याची मला खूपच भीती वाटायची. तरीही दररोज मी मित्रांबरोबर ओढ्यावर पोहायला जात असे. हळूहळू दगडू जढर याने मला पोहायला शिकवले. त्यानंतर मात्र मग मी उत्तम पोहायला शिकलो. 

पावसाळ्यात आमच्या ओढ्याला खूप मोठा पूर यायचा.अगदी रस्त्याला पाणी लागायचे. ओढ्यातून पलीकडे जाणे दुरापास्त व्हायचे. रात्रंदिवस पावसाची मुसळ धार चालायची. रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे ओढे,नाले ओसांडून ताल सोडून वाहत असायचे. रात्री त्यांच्या आवाजाने भीती वाटायची. गावात जर पाणी घुसले तर? अशा विचाराने मनात धस्स व्हायचं.

दुसऱ्या दिवशी अगदी सकाळी सारा गाव पूर पाहण्यासाठी ओढ्याच्या काठावर जमा व्हायचे. त्यात मी सुद्धा असायचो. वरून तुफान पाऊस पडत असायचा.

दर पाच दहा मिनिटांनी ओढ्याचापुर सतत वाढत असायचा. ओढ्याच्या पुराबरोबर मोठमोठे ओंडके वाहत यायचे.

पलीकडे आमच्या गावातील दामू मोहन हे काच्या करून या महापुरात उडी मारण्यासाठी सज्ज असायचे. अनेक लोक त्यांना महापुरात उडी मारू नको असे विनंती करून सांगायचे. तरीही दामू मोहन हे आपल्या भूमिकेवर ठाम असायचे.

आणि अशाच एका क्षणी ते प्रचंड पूर आलेल्या महापुरात उडी मारायचे. आणि दिसेनासे व्हायचे. सगळ्यांच्या हृदयात धडकी भरायची. लोक श्वास रोखून बघत राहायचे. अचानक दूर कुठेतरी दामू मोहन यांचे डोके दिसायचे. आणि परत महापुरात गडप व्हायचे. सर्व लोक देवाचा धावा करायचे. आणि ओढ्याच्या काठाकाठाने पळत पुढे जात राहायचे.

आणि अचानक दामू मोहन त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी ओढ्याच्या अलीकडे पोहोत पोहोत यायचे. त्यांना पाहिल्यावर लोक एकच जल्लोष करायचे. दामू मोहन हे आमच्या गावात महापुरात पोहण्यासाठी खूपच प्रसिद्ध होते. 

मात्र एकदा दामू मोहन हे महापुरात असताना भोवऱ्यात अडकले. पाण्यातील भोवरा म्हणजे पाण्याच्या प्रवाहातून निर्माण होणारी एक गोलाकार फिरणारी स्थिती. सोप्या भाषेत सांगायचं तर, जेव्हा पाणी एखाद्या ठिकाणी वेगाने फिरू लागतं आणि एखाद्या चक्रासारखं दिसायला लागतं, तेव्हा त्याला भोवरा म्हणतात.

भोवऱ्याच्या मध्यभागी पाण्याचा दाब खूप कमी असतो. या कमी दाबामुळे भोवऱ्याच्या केंद्रात एक पोकळी किंवा गडगडासारखं दिसतं. या पोकळीमुळेच एखादी वस्तू भोवऱ्याच्या मध्यभागी ओढली जाते. भोवऱ्याचा वेग बाहेरच्या कडेपेक्षा मध्यभागी जास्त असतो. त्यामुळे भोवऱ्याच्या जवळची कोणतीही वस्तू वेगाने आत खेचली जाते. 

अशाप्रकारे भोवऱ्यात अडकल्यामुळे त्यांना बाहेर पडणे मुश्किल झाले. केवळ परमेश्वर कृपेमुळे आणि तिरक्या पद्धतीने पोहल्यामुळे आणि त्याचवेळी भोवऱ्याचा प्रवाह बदलल्यामुळे हे महाशय बाहेर आले. त्यानंतर पुन्हा मात्र त्यांनी कधीही महापुरात उडी मारली नाही.

24 जुलै 1976 चा दिवस. त्यादिवशी प्रचंड पाऊस झाला होता. भीमा नदीला प्रचंड महापूर आलेला. भात शेतीची अवनी चालू होती. परंतु पाऊसच इतका भयानक होता की अवनीची कामे सुद्धा खोळंबली होती. अनेक लोक पलीकडे मोरोशी गावच्या बाजूला अडकले होते. त्यांना इकडे धुओली गावच्या बाजूला यायचे होते. परंतु महापुरा मुळे ते शक्य नव्हते.

आणि अशातच महादेव जठार हे महापुरात उडी मारून पलीकडे यायला निघाले. त्यांना अनेक लोकांनी खूप अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु ते काही ऐकायला तयार नव्हते. कारण ते पट्टीचे पोहणारे होते. लोकांनी सांगूनही त्यांनी त्यांचे ना ऐकता महापुरात उडी घेतली आणि थोड्याच वेळात दिसेनासे झाले.

महापुराच्या भोवऱ्यात अडकल्यामुळे भोवऱ्यातून त्यांची काही सुटका झाली नाही. सुटका झाली ती त्यांचे प्राण घेऊनच. पुढे धामणगाव जवळ त्यांचे प्रेत पाण्याच्या कडेला लागले. तर असा हा महापूर आणि असे पोहणे जीवावर बेतले.

ओढ्यामध्ये होत असताना आमचा सगळ्यात आवडता खेळ म्हणजे शिवाशिवी. चार-पाच मुले पोहायला असायची. त्यापैकी एकावर राज्य असायचे. राज्य असलेल्या मुलाने पाण्यामध्ये सूर मारून कोणत्याही एका मुलाला शिवायचे म्हणजे त्याच्यावर राज्य.

राज्य असलेल्या मुलाला इतर मुले शिऊ द्यायची नाही. शिवायला आल्याबरोबर इतर मुले सूर मारून दुसरीकडे पोहोच जात असत त्यामुळे शिवायला आलेल्या मुलाचे पंचायत होत असे.

या शिवाशिवीच्या खेळामध्ये किती वेळ जात असे आम्हाला समजत नसे. पोरे अजून ओढ्यावरून का आली नाहीत म्हणून एखाद्याचा बाप किंवा आई ओढ्यावर दाखल होई. आणि येथेच्छ मार खावा लागे.

ओढ्याप्रमाणे विहिरीवर सुद्धा पोहणे हा एक आनंददायी क्षण असायचे. विहिरीच्या कठड्यावरून हात पायामध्ये अडकवून पाठीवर जोरात पाण्यात पडायचे. त्यामुळे विहिरीतील पाणी विहिरीच्या बाहेर सडा शिंपल्यागत पाडायचे. विहिरीमध्ये मोठमोठ्या लाटा तयार व्हायच्या. आणि या लाटावर पोहणे अतिशय सुखद वाटायचे. 

आमचा त्या वेळी हा प्रकार मोठा आवडता होता. संजय सुतार, दत्ता आंबवणे, आणि मी विहिरीमध्ये लाटा तयार करण्यात माहीर होतो. पोहता न येणाऱ्या मुलांना ही लाटा पाहण्यात मोठा आनंद वाटायचा. ती मुले केवळ लाटा पाहण्यासाठी विहिरीवर येत असत.

दिवाळीच्या सुट्टीत आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत तसेच शनिवार आणि रविवार आम्ही सदानकदा ओढ्यावर किंवा विहिरीमध्ये पोहत असायचो. 

सुभाष भोकटे (विस्तार अधिकारी) आणि मी गाडीची हवा भरलेली ट्यूब मुक्या कातकऱ्या कडून तीन रुपये भाड्याने घेऊन त्यावर बसून आम्ही धरणातील पाण्यामध्ये सफर करायचो. 

ट्यूब वर बसून नदीच्या अथांग धरणातील पाण्यात बसून सफर करणे हे अतिशय आल्हाददायक असे. परंतु बॅलन्स सांभाळणे हेही तितकीच महत्त्वाची असायचे. 

थोडा जरी बॅलन्स  ढळला की दोघांमधील एक किंवा कधीकधी दोघेही ट्यूब वरून डायरेक्ट धरणाच्या पाण्यात पडायचो. व ट्यूब आमच्यापासून दूर जायची. मग पोहोत पोहोच जाऊन आम्ही ट्यूबवर बसायची धडपड करायचो. नंतर नंतर मात्र आम्ही ट्यूबवर शांत बसण्याची कला आत्मसात केली.  

मी माझ्या आयुष्यात ओढ्यावर, नदीमध्ये आणि विहिरीमध्ये खुपदा पोहलो आहे. पोहणे हा लहानपणी आम्हा मुलांचा आवडता छंद होता. सुट्टीच्या दिवशी दिवसभर आम्ही पाच- सातजण ओढ्यावर (आंघोळीचा डोह), बोर्डाची किंवा चिखाळीच्या विहीरीवर पोहण्यासाठी असायचो. पोहून डोळे लाल व्हायचे. परंतू पोहणे मात्र चालूच असायचे.

मी नववीत असताना दिवाळीच्या सुट्टीत विहीरीवर पोहायला गेलो होतो. माझ्या बरोबर माझे मित्र पण होते. विहीरीच्या कठड्यावरून उडी मारून विहिरीच्या तळाशी जाऊन पुरावा म्हणुन दगड, माती किंवा जे काय असेल ते वर आणुन दाखवायचे असे ठरले. 

प्रत्येक जण कठड्यावरून उडी मारून विहिरीच्या तळाशी जाऊन जे मिळेल ते आणुन दाखवू लागला. मी पण कठड्या वरून विहिरीत एकदम सरळ उडी मारली. परंतु हातपाय न हालवल्यामुळे मी विहिरीच्या एका कोपऱ्यात भिंतीजवळ खाली जोरात गेलो. खाली खोल रुतुन बसलेल्या एका मोठ्या दगडाच्या कपारीत माझा डावा पाय अडकुन बसला. 

मी पाय बाहेर काढायचा खुप प्रयत्न करून सुद्धा पाय काही निघेना. पाण्याच्या तळाशी असल्यामुळे श्वास कोंडत चालला. मी अजुन वर का येत नाही म्हणून बरेच जण पळून गेले. व एकच मित्र माझी वाट पाहु लागला. 

माझा पाय काढण्याचा खटाटोप चालुच होता.पाय काही निघेना. श्वास बंद झाल्यावर नाकातोंडात पाणी जाऊन आपण मरणार हे स्पष्ट दिसू लागले. परंतू तशाही स्थितीत मृत्यूच्या दाढेतुन कसे सुटायचे याचे विचारचक्र वेगाने फिरू लागले.

मृत्यू माझ्यापासून काही सेकंद दुर होता. आणि अचानक दुसरा पाय मी सरळ केला. पायाला विहिरीची भिंत लागली. आणि क्षणातच मी उजवा पाय भिंतीला लाऊन डावा पाय जो दगडाच्या फटीत अडकला होता सर्व बळ एकवटून जोरात मागे खेचला आणि एका झटक्यात पाय फटीतून बाहेर निघाला.

पाय बाहेर निघाल्या बरोबर मी विहीरीच्या तळातुन वर आलो. विहीरीतुन बाहेर आल्यावर डाव्या पायाच्या घोट्याच्या दोन्ही बाजुने खरचटल्यामुळे रक्त वाहत होते. परंतु त्याचे मला काहीच वाटत नव्हते. फक्त आपण जिवंत बाहेर आलो याचेच समाधान वाटत होते.त्यामुळे एक क्षण सुद्धा अतिशय महत्त्वपुर्ण असतो हे सिद्ध झाले.

रामदास तळपे (मंदोशी)

गावाकडच्या जेवणावळी

गावाकडे पूर्वी अनेक श्रद्धा अंधश्रद्धा असत. अनेक गावांमध्ये काही ठराविक लोकांच्या अंगात यायचे. अनेक आजारी पाजारी लोक त्यांच्याकडे अंगारे धुपारे करण्यासाठी जात असत.

त्यावेळेस अशा अंगात वारे येणाऱ्या लोकांची फारच चलती असायची. त्यांना गावात खूपच मान सन्मान असायचा. त्यांची शेतीची कामे बिनबोभाट होत असत.

जशी त्यावेळेस त्यांची चलती होती तशीच आमची ही खाण्याची पिण्याची चंगळ असायची.

अंगात वारे आणणारे लोक हमखास एखाद्या वरून बोकड, कोंबडा किंवा मेंढा यांचा उतारा द्यायला लावायचे. तसेच सटवाईला, देवाला, वीराला किंवा शेतातील थडग्याला कोंबडा देण्याची रीत असायची. 

लग्नकार्याला जावळ, देवकार्य यासाठी खास बोकडाची व्यवस्था केलेली असायची. शिवाय वारे आणणारे लोक सोबतीला असायचेच.

त्यामुळे ग्रामीण भागात अशा जेवणावळीसाठी मी आणि माझा चुलत भाऊ मारुती हमखास जात असू. त्यावरून माझी आई आणि आमची चुलती तुळशीआई आम्हाला खूपच शिव्या देत असायच्या. परंतु आम्ही काही त्यांचे ऐकायचो नाही.

अशा जेवणावळीसाठी फारच थोडे लोक असत. त्यामुळे मटणाची कमतरता नसे. थोडक्यात खाण्यापिण्याची चांगली चंगळ होती.

एकदा असेच आम्ही खास आमंत्रणा वरून मोरोशी येथे जेवायला गेलो होतो. शक्यतो हा कार्यक्रम रात्री होत असायचा. जेवण हे रानात असायचे. 

आम्ही तिथे पोचलो तेव्हा भात शिजून झाला होता. मटन तीन दगड मांडलेल्या चुलीवर डेंगी मध्ये शिजत होते. थोड्याच वेळात पंगती बसणार होत्या. 

आणि अचानक एक जास्त दारू पिलेला माणूस तेथे आला आणि डेंगी मधील मटन शिजले आहे की नाही हे पाहण्यासाठी डेंगी मधील असलेला कलथा पकडून जोरा जोराने हलवू लागला. तेवढ्यात खालचा दगड सटकला आणि डेंग एका बाजूला कलंडली. 

डेंगी मधला बराचसा रस्सा खाली सांडला. कसेतरी आम्ही दोन-चार जणांनी डेंग सरळ केली. एक जणांचा राग इतका अनावर झाला की त्याने फडाफड दारुड्याच्या मुस्कटात लगावल्या.

आता ह्या समाजासाठी काय करायचे हा मोठा प्रश्न उभा राहिला. सर्व लोक विचार चक्रात बुडाले. परंतु आमचा भाऊ मारुतीचा अनुभव दांडगा होता. 

तो म्हणाला. काही काळजी करू नका आपण बरोबर करू.

तात्काळ दुसरी एक तीन दगडाची चूल तयार केली. दोन मोठे पातेली भरून पाणी गरम केले. आणि परत एकदा मसाला कांदा, मिरची पावडर यांची फोडणी देऊन डेंगीतले मटन त्यात टाकले. आणि एक उकळी आल्यानंतर हे गरम पाणी ओतले.

त्यानंतर मग आम्ही सर्वजण जेवलो. मोरोशी गावच्या लोकांनी आमच्या मारुतीची खूपच तारीफ केली. 

पाव्हणं तुम्ही होते म्हणून आम्ही जेवलो बर का! असे प्रशस्तीपत्रक दिले.

एकदा आमच्या गावात एका माणसाच्या शेतामध्ये भूत होते. आणि हे भूत त्या माणसाला खूप त्रास द्यायचे. घरातील माणसे सतत आजारी पडायची. त्यामुळे एका भगताने त्याला सांगितले की हे भूत आपण आपल्या गावच्या हद्दीतून बाहेर पाठवू यासाठी तुम्हाला मेंढ्याचा बळी द्यावा लागेल.

गावातला माणूस या गोष्टीला तयार झाला. दिवस ठरला वार ठरला. दिवस बुडताच आम्ही आमच्या गावच्या हद्दीच्या बाहेर म्हणजे नायफड गावच्या हद्दीत निघालो. गावातील दहा पंधरा माणसे होतीच. एकाच्या हातात मेंढा, एका जवळ पाण्याचा हंडा, एका जवळ तांदूळ आणि मसाले, एका जवळ इतर भांडी, आणि विशेष म्हणजे एका जवळ भूत..

आता हे भूत कसे होते? तर एका तांबड्या फडक्यात एक तीन धारी लिंबू बांधलेले होते. त्याला पाच-पन्नास टाचण्या खोचलेल्या होत्या. व त्यासोबत एक छोटा दगड होता. दगडाला भरपूर शेंदूर फासला होता. आणि हे सर्व फडक्यात बांधून एक माणूस काठीला बांधून चालला होता.

आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो तेव्हा पूर्ण अंधार झाला होता. पायाखाली काहीच दिसत नव्हते. रातकिड्यांची किरकिर  नुकतीच चालू झाली होती.

आम्ही तिथे गेल्यावर लगेच भगताच्या अंगात आले. काठीला लाल फडक्यात बांधलेले भूत भगताच्या समोर ठेवले. त्यानंतर त्या लिंबाच्या आणि दगडाच्या समोर मेंढ्याचा बळी दिला.

भागताने भुताला खूप शिवीगाळ केली. आता या हद्दीतून पुन्हा आमच्या हद्दीत यायचे नाही अशी तंबी दिली.

त्यानंतर पुढील कार्यक्रम सुरू झाला. परंतु आमच्या जवळील पाणी संपले. काही लोक सोबत आणलेले हंडे घेऊन पाणी आणण्यासाठी रानात असलेल्या झुरीला गेले. आणि अंधारात चाचपडत कसेतरी पाणी आणले.

जेवण तयार झाले तेव्हा खूपच उशीर झाला होता. आम्हाला सपाटून भुका लागल्या होत्या. पंधरा-वीस लोक असल्यामुळे खूपच मटन होते त्यामुळे खाण्याची चंगळ होती.

जेवण झाल्यानंतर आम्ही सर्वजण घरी आलो. परंतु दुसऱ्या दिवशी उजाडल्यावर आमच्या गावात खूपच गोंगाट ऐकायला आला. आम्ही तिथे गेल्यावर नायफड गावची बरेच लोक तिथे आले होते. व तुमचे भूत आमच्या हद्दीत का सोडले? याचा विचारत होते.

प्रसंग मोठा बाका उभा राहिला होता. आता काय होईल याचा आम्ही अंदाज बांधत असतानाच बघताना याच्यावर मार्ग काढला. 

आता जे भूत आहे ते अमुक अमुक यांच्या हद्दीत आहे, परंतु आपण असे करू हे भूत आपण फॉरेस्टच्या हद्दीत घालू. 

कारण त्या माणसाच्या हद्दीलगत फॉरेस्टचे रान होते. परंतु आता परत एकदा पहिल्यासारखाच मेंढ्याचा बळी द्यावा लागेल? काय करायचं बोला?

यावरून खर्च कोण करणार यावरून परत वादावादी झाली. पुढचा खर्च कोणी केलं हे माहित नाही परंतु पुढच्या वेळी सुद्धा आम्ही जेवायला तेथे गेलो होतो हे निश्चित. असे प्रसंग गावाकडे नेहमीच घडत असतात.

एकदा असेच आमच्या वरच्या वाडीच्या माणसाला एका भगताने दुसऱ्या गावच्या हद्दीत बोकड कापण्याचा उतारा सांगितला. त्याप्रमाणे तयारी सुद्धा करण्यात आली.

एके दिवशी या माणसाने दुसऱ्या गावच्या हद्दीत बोकड कापला. व तेथे सर्व कार्यक्रम केल्यावर बोकडाचे मटण परत आमच्या गावच्या हद्दीत आणले व तेथील पेटवून जेवणाचा कार्यक्रम करण्यात आला.

परंतु थोड्याच दिवसात हा माणूस आजारी पडला. आणि एके दिवशी इहलोक सोडून परलोकवासी झाला. सर्व लोक त्याला दुसऱ्या गावचे हद्दीतून बोकडाचे मटण आणून आपल्या हद्दीत शिजवून खाल्ले त्यामुळे हा प्रकार घडला असे म्हणू लागले.

एकदा असेच आम्ही एका ठिकाणी रानात जेवायला गेलो होतो. जेवण बनवणारे सुरुवातीपासूनच थोडी थोडी अधून मधून दारू पीत होते. जेवायला बरीच लोक आले होते.

एकदाचे जेवण झाल्यावर वाढण्याचे काम सुरू झाले. जेवण बनवणारेच वाढण्याचे काम करत होते. त्यांचे सतत वाढण्याचे काम सुरू होते. ते येवढे दारू पिलेले होते की, त्यांनी सर्व जेवण आलेल्या लोकांना वाढून टाकले. 

त्यांच्या स्वतःसाठी काहीच जेवण शिल्लक राहिले नाही. शेवटी त्यांना उपाशीच घरी यावे लागले व घरी आल्यावर बेसन भात खावा लागला.

पूर्वी गावात अनेक नवविवाहित स्त्रियांना मावलाया लागायच्या. एखादी नवविवाहित तरुणी अगदी खारकासारखी वाळुन जायची. सतत कोणत्या ना कोणत्या आजाराने त्रस्त असायची. शक्यतो हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्यामुळे हा आजार होत असावा.

स्त्रीच्या अंगात वारे आल्यावर एक साथ खूप वेळ घुमत राहायचे. हे वारे कधीही रात्री आपण रात्री दिवसाढवळ्या येत असेल. अगदी स्वयंपाक करताना सुद्धा वारे येई. त्यावेळी घरातल्या माणसांची चांगलीच पळापळ होत असे.

अशावेळी लोक लोक, गावात किंवा पंचक्रोशीत असणाऱ्या भगतीनीकडे जात असत. त्यावेळी अनेक गावामध्ये भगताप्रमाणेच भगतीनी देखील असत. भगतीन त्यांना या बाईला मावलयांनी पछाडले आहे असे सांगत असे.

ओढ्याच्या कडेला असलेल्या उंच दगडाच्या खोबनीत या मावलाया बसलेल्या असायच्या. काही आजारी स्त्रियांच्या अंगात वारे यायचे. हे वारे म्हणजेच मावलया असायच्या. 

त्यांना महानैवद्य म्हणून एका मोठ्या टोपलीत किंवा पाटीमध्ये पुरणपोळ्या, कुरडया,पापड्या,भजी,शेव पापडी, सारभात, फळे, नारळ, फुलांच्या वेण्या, गजरे, नऊवारी हिरवे लुगडे व चोळीचा खण आणि अगरबत्ती व पूजेचे साहित्य घेऊन गावातील स्रिया व इतर पाहुणे रावळे मावलाया असलेल्या ओढ्याच्या ठिकाणी जात असत. तेथे नैवेद्य अर्पण करून मग लोकांच्या जेवनावळी सुरू होत. हा कार्यक्रम साधारण दुपारी होत असे. 

असे हे जेवणाचे प्रकार गावाकडे सतत कुठे ना कुठेतरी असत. परंतु आता हे प्रकार कमी झाले आहेत.

रामदास तळपे (मंदोशी)

 



मंदोशी गावचे बारवेकर सुतार

पूर्वीपासून सुतार हा ग्रामीण संस्कृतीचा अविभाज्य घटक राहिला आहे. शेती, शेतकरी आणि सुतार हे समीकरणच म्हणावे लागेल.

आमच्या मंदोशी गावात बारवेकर सुतार खुप पूर्वीपासून म्हणजे सण 1846 पासुन वास्तव्य करून आहेत.आता सध्या त्यांची सहावी पिढी कार्यरत आहे.

सखाराम बारवेकर हे जुन्या लोकांना आठवतात. ते गावच्या शेतकऱ्यांना शेतीची औजारे बनउन देत. त्या बदल्यात त्यांना धान्यच्या स्वरूपात मोबदला मिळे. त्यालाच बलुते असे म्हटले जाई.

पावसाळा सुरु होण्या पूर्वी लोक सुताराकडून नांगर, हळस,जुकाड,रूमने, पेटारी, पाभर, लोड, कुळव अशा अनेक वस्तू सुताराकडून बनउन घेत असत. त्यामुळे मे, आणि जुन महिनात सुटरांच्या दारात लोकांचो सकाळ पासुन ते संध्याकाळ पर्यंत वर्दळ असे.

वरील दोन महिने सोडले तर सुताराला काही काम नसे. मंदोशी गाव मोठा असल्यामुळे सुताराला खंडी दोन खंडी धान्य जमा होई. एखाद्या मोठ्या तालेवार शेतकऱ्यांइतके ते धान्य असे. 

बरेचसे धान्य सुतार वाड्याच्या बाजारात विकत असे.शिवाय उर्वरित काळात सुतार घरांची बांधकामे करत असे.त्यामुळे सुताराला या कामाच्या मोबदल्यात पैसे मिळत असे. त्यामुळे त्याकाळात सुतार हा समाज साधन कुटुंब म्हणून ओळखला जात असे.

आमच्या गावावर बारवेकर सुतार घराचे खुप उपकार आहेत. पूर्वी प्रत्येक गावात ग्रामदेवतेची मंदिरे असत. पण ही मंदिरे अगदी साधी गवती छप्पराची असत. सन 1925 साली श्री. कालभैरवनाथ मंदिर दगडी चौथरा, डबरी वंधकाम व वर कौले असे बांधकाम करायचे ग्रामस्थानी ठरवले. त्यावेळी सखाराम सुतारांनी हे काम तीन थरांचा दगडी चौथारा त्यावर दगडी बांधकाम असे अतिशय सुंदर बांधकाम केले. 

हे मंदिर मला स्पष्ट आठवते. त्यानंतर हेच मंदिर पुन्हा सन 1983 साली नव्याने बांधण्यात आले. पूर्वीचे मंदिर ओबढघोबड डबरात होते. परंतू सखाराम सुतार यांचे नातू दत्तात्रय बारवेकर, सुदाम बारवेकर  व सोपान बारवेकर यांनी संपूर्ण दगडी काम हे घडीव स्वरूपात करण्याचे ठरवले. 

दगड घडवण्याचे काम हे तीन बंधू जवळजवळ दोन वर्ष करीत होते. पूर्वीचा मूळ चौथरा तसाच ठेवून घडीव दगडी बांधकामात पुढे सुसज्ज अशा गच्चीसह अतिशय सुंदर असे बांधकाम त्यांनी 1985 मध्ये पूर्ण केले.

हे बांधकाम पश्चिम भागात पाहण्यासारखे होते. त्यावेळी असे बांधकाम कुठेच नव्हते. ही आमच्या गावच्या सुतारांची अप्रतिम कला होती.

त्यानंतर पुन्हा सन 2014 मध्ये मंदिराचे बांधकाम करण्याचे ठरवले. व त्याप्रमाणे बांधकाम झाले देखील. परंतु आजही सखाराम सुतार यांनी बांधलेला मूळ चौथरा व दत्तात्रेय सुदाम व सोपान बारवेकर यांनी घडीव दगडाच्या बांधलेल्या भिंती तशाच ठेवून वर कळसाचे काम करण्यात आले आहे. म्हणजेच मंदिराचा चौथारा व दगडी भिंती आजही ऐतिहासिक वास्तुकलेची साक्ष देतात. ही कला सखाराम सुतार आणि त्यांच्या नातवांची आहे.

सन 2014 मध्ये बांधलेले हे काम सुद्धा गावाने बारवेकर कुटुंबांना देण्याची तयारी दर्शवली होती. त्याप्रमाणे बैठका सुद्धा घेण्यात आल्या. परंतु बारवेकर कुटुंब हे गावापासून खूपच अलिप्त राहिल्याने त्यांना हे काम मिळाले नाही.

सखाराम सुतार यांचे पुत्र कै.श्री विष्णू बारवेकर हे सुद्धा उत्तम पद्धतीने काम करायचे. विष्णू बारवेकर हा माणूस अतिशय साधा होता. मध्यम व सडपातळ  बांधा, साधी राहणी, धोतर,पैरण, गळ्यात उपरणे व टोपी असा त्यांचा वेश होता. त्यांनी सुद्धा गावची खूप सेवा केली.

विष्णू बारवेकर यांना कोऱ्या नोटा जमवण्याचा छंद होता. त्या काळात एक रुपया, दोन रुपये, पाच रुपये, दहा रुपये, वीस रुपये व 100 रुपये अशा त्या नोटा होत्या. विष्णू बारवेकर नोटांना कधीही घडी घालत नसत. या  कोऱ्या नोटा कागदी पिशवी अतिशय काळजीपूर्वक ठेवत. कुणाकडे कोरी नोट दिसली की ती हक्काने मागून घेत असत. मी त्यांना अनेक वेळा कोऱ्या नोटा दिलेल्या होत्या.

मी कधीकधी जाताना त्यांना दिसलो की ते माझी फार अस्थेंने माझी विचारपूस करत. मला घराकडे बोलवत. पेटीत जपून ठेवलेली कागदी पिशवी माझ्यापुढे आणून ठेवत व सोडून त्यातील कोऱ्या नोटा बाहेर काढत व माझ्याकडे देत असत.

रामजी! एवढ्या नोटा मोज बघू. किती आहेत मला सांग?

मी त्यांच्या सर्व नोटा मोजून त्याचा हिशोब त्यांना सांगत असे. या सर्व कोऱ्या नोटा काळजीपूर्वक पिशवीत ठेवून ती पिशवी पेटीत ठेवून देत असत.

विष्णू बारवेकर हे एकदा पाऊस सुरू झाला की शक्यतो घराच्या बाहेर निघत नसत. चिखलातून तर ते कधीच जात नसत. त्यांना पाण्या पावसाची चिखलाची खूप भीती वाटे. कधी कधी मी त्यांना दिसलो की ते मला हमखास बोलवून घेत असत.ख्याली खुशाली विचारत असत. माझ्याबरोबर भरपूर गप्पा मारत. त्यामुळे त्यांचे आणि माझे संबंध खूप चांगले होते. माझ्यावर तर त्यांचा खूपच विश्वास असायचा.

विष्णू बारवेकर यांचा मुलगा म्हणजे श्री सुदाम बारवेकर. सुदाम बारवेकर हे माझ्या वडिलांचे अतिशय जवळचे मित्र होते. सुदाम बारवेकर म्हणजे अतिशय कलाकार माणूस. त्यांच्या उमेदीच्या काळात माझ्या वडिलांनी सागाचा पलंग, सागाचे कपाट,टेबल व खुर्ची, सागाच्या पेट्या, लिहिण्याचा स्टूल, बसण्याचा स्टूल असे अनेक साहित्य बनवून घेतले होते.

सुदाम बारवेकर म्हणजे कलाकारित परफेक्ट माणूस. गावची बलुतेदारी करून त्यांनी या कलाक्षेत्रात त्या काळात खूपच सुंदर सुंदर अशी घरे बांधली, लाकडी फर्निचरच्या वस्तू बनवल्या. मंदिराची सुंदर अशी बांधकामे केली.

सुदाम बारवेकर यांचा आवाज हा अतिशय दैवी म्हणावा लागेल. श्रावण महिन्यात त्या काळात लोक श्री.नवनाथ, भक्ती विजय, राम विजय,पांडव प्रताप या अध्ययांचे पारायण करत. हे अध्याय वाचावे तर सुदाम बारवेकर यांनीच. 

सुदाम बारवेकर यांनी एकदा का अध्ययांच्या ओव्या वाचायला सुरुवात केली की एखादे उत्तम सुरावट असलेले  गाणे जसे आपण ऐकतो तसे लोक मन लावून ऐकत असत. सुदाम बारवेकर अध्याय वाचायला असतील तर अध्याय ऐकण्यासाठी लोकांची त्या काळात प्रचंड गर्दी होत असे.

सुदाम बारवेकर हे लग्नातील मंगलाष्टका सुद्धा अतिशय भारदस्त आवाजात म्हणत असत. त्यांच्या या मंगलाष्टका ऐकल्यावर अंगातून रोमांच उभे राहत. 

लोक विचारत कुठला माणूस आहे हा? त्यावर बाकीचे काही लोक सांगत, मंदोशीचे सुदाम बारवेकर आहेत ते.

त्यावर लोक म्हणत. काय सुंदर आवाज आहे या माणसाचा..

सुदाम बारवेकर हे  भजनात उत्तम अभंग सुद्धा म्हणायचे. काही काळ त्यांनी व धर्मा बुधाजी तळपे आणि चंद्रकांत मोहन यांनी मंदोशी गावचे नाव खेड आंबेगाव,जुन्नर आणि मावळ या  तालुक्यामध्ये अजरामर केले.

सुदाम बारवेकर यांनी भजनामध्ये पंडित भीमसेन जोशी, अजित कडकडे, सुरेश वाडकर, प्रल्हाद शिंदे यांची गायकी ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे लोकप्रिय अभंग स्वतः म्हणून ते अभंग मंदोशी गावच्या भजनात लोकप्रिय केले.

सुदाम बारवेकर हे 1995 ते 2000 या काळात शिरगाव मंदोशी या ग्रामपंचायतचे सदस्य देखील होते. 

सुदाम बारवेकर यांचा भाचा श्री.कैलास सुतार हे कुडे खुर्द या गावचे. ते सुद्धा काही काळ मंदोशीला असत. कैलास सुतार हे अतिशय उत्तम कलाकार होते. परंतु त्यांना त्याप्रमाणे साथ न मिळाल्यामुळे त्यांची कला विशेष बहरली  नाही. कैलास सुतार यांना आधुनिकतेची खूपच आवड होती. आणि त्याप्रमाणे कला जोपासली पाहिजे अशी त्यांची इच्छा असायची. परंतु आमचे गाव पडले अतिशय दुर्गम असे खेडेगाव. कैलासच्या नवीन कल्पनांचे खेडवळ लोक टिंगल, टवाळी करत.

कैलास सुतार यांनी मंदोशी गावच्या यात्रेत आलेल्या तमाशामध्ये दिवाना या चित्रपटातील गाणी फक्त पुरुष गायकांचा आवाज एडिट  करून व स्त्री कलाकाराचा आवाज व म्युझिक तसेच ठेवून स्वतःच्या आवाजात म्हणून सादर केली. त्यामुळे तमाशातील लोक सुद्धा अचिंबित झाले. ही किमया फक्त कैलास स्वतःच करू जाणे. 

1990 च्या दशकात अतिशय खेडेगाव असलेल्या दुर्गम भागात राहून सुद्धा एडिटिंगची कल्पना वास्तवात कैलास सुतार कसा करू शकला हे कोडेच आहे. ही त्यांच्या बुद्धीची किमयाच म्हणावी लागेल.

सुदाम बारवेकर यांच्याकडे त्या काळात लाऊड स्पीकर होता. सुदाम बारवेकर यांच्या घरावर दोन बाजूला दोन मोठी लाऊड स्पीकरची कर्ण कायमस्वरूपी लावलेली असत. 

रोज सकाळी सहा वाजता स्पीकरवर अभंग वाणी,श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेले लोकप्रिय अभंग, लता मंगेशकर, पंडित भीमसेन जोशी, अजित कडकडे, सुरेश वाडकर, प्रल्हाद शिंदे यांच्या आजारावर गायकीने लोकप्रिय झालेले अभंग त्या काळात आम्ही ऐकत असु. तर संध्याकाळी सहा वाजता बाबा महाराज सातारकर यांचे कीर्तन स्पीकरवर ऐकायला मिळे. त्यामुळे अनेक लोकांना भक्तिमार्गाची गोडी लागली.

त्या काळात भाताची पिठाची गिरणी गावात नसल्यामुळे आम्हा सर्व लोकांना धुओली किंवा डेहणे येथे जावे लागे. डोक्यावर भाताची किंवा दळणाची ओझी घेऊन आम्ही धुओली किंवा डेहणे जात असू.परंतू लवकरच श्री.सुदाम वारवेकर यांनी त्यांच्या घरात भाताची व पिठाची गिरणी सुरू केली. त्यामुळे गावकऱ्यांची समस्या मिटली.

पुढे श्री सुदाम बारवेकर गावापासून का काय माहित ? परंतु अलिप्त राहू लागले. गावच्या कोणत्याच कार्यक्रमात ते भाग घेत नाहीत.

आजही त्यांच्या आजोबांनी, वडिलांनी त्यांनी आणि त्यांच्या बंधूंनी केलेले कार्य गाव विसरलेला नाही. त्यांची कला आजही कलेच्या माध्यमातून चिरंतन टिकून आह

रामदास तळपे

आमच्या बैलांची गोष्ट

आज खेडे गावामध्ये ट्रॅक्टरला अनन्य साधारण महत्त्व आले आहे. शेतीची सर्व कामे आज ट्रॅक्टरने केले जातात. परंतु पूर्वी गावात प्रत्येक शेतकऱ्याकडे बैल जोडी असायचीच. काही मोठ्या शेतकऱ्यांकडे तर चार चार बैल जोड्या असायच्या. 

त्यावेळी सर्व लोक शेतीवर अवलंबून असायचे. पुणे मुंबईला असलेले गावचे लोक सुद्धा अवनी, येटाळणी व इतर शेतीच्या कामासाठी मुद्दामहुन सुट्टी काढून गावाला यायचे. व गावच्या भावाला मदतीचा हात द्यायचे.  

त्यावेळी प्रत्येक कुटुंबाकडे बैल जोडी असायची आणि ज्याच्याकडे नसायची त्या कुटुंबाला आपल्याकडे काही नसले तरी चालेल परंतु बैल जोडी असायलाच पाहिजे. हे त्यावेळी प्रत्येकाचे स्वप्न होते. 

पूर्वी गावामध्ये प्रत्येकाकडे आठ-दहा गावठी गाया असायच्या. बैल असायचे. काही काही लोकांकडे तर पंधरा-वीस गायी असायच्या. गावात जनावर नाही असा एकही माणूस आढळत नव्हता.

आमच्याकडे देखील पूर्वी बैल जोडी नव्हती. आपल्या घरी बैल जोडी असायला पाहिजे हे आमच्या नानाचे स्वप्न होते. परंतु घरी 18 विश्व दारिद्र्य असल्यामुळे बैल जोडी घेता येत नव्हती. त्यावेळी माझी आजी आणि माझा चुलता धोंडू तळपे हे बैल नसल्यामुळे कुडवण्याने शेती करायचे.

सन 1973 च्या जानेवारी महिन्यात माझे वडील शिक्षक म्हणून रुजू झाले. आणि हळूहळू घरच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होत चालली. प्रथम आपल्याला शेतीसाठी बैल पाहिजेत या विचाराने वडिलांनी आमच्या गावातीलच श्री विष्णू गोमा तळपे यांच्याकडून राजा नावाचा गोऱ्हा विकत घेतला. हा राजा बैल पावणे सहाशे रुपयाला विकत घेतला होता.

विष्णू गोमा तळपे  यांना बैलांची मोठी हौस होती व अजूनही आहे. त्यांच्या गाईला गोऱ्हा झाला की विष्णू तळपे यांना खूप आनंद होत असे. मग ते त्या वासराची खूप काळजी घेत. नेहमीच ते जनावरां साठी हिरव्या चाऱ्याची व्यवस्था करत. ऐन उन्हाळ्यात जेव्हा हिरवा चारा वाळून जाई तेव्हा ते अगदी कडे कपारीतून जिथे हिरवे गवत आहे तिथून ते आपल्या जनावरांसाठी आणत असत. उन्हाळ्यात देखील हिरवे गवत पाहून लोक चकित होत.

वासरू थोडे मोठे झाल्यावर त्यांची मुले दगडू दादा, धोंडू व मारती त्या गोऱ्ह्याला दुसऱ्या बैलाबरोबर कढवानाला जुंपत असत. कडवानावर थोडा जड दगड ठेवला जाई. सुरुवातीला गोऱ्हा इकडे तिकडे पळण्याचा खूप प्रयत्न करायचा. कढवान व दगड उलटे पालटे व्हायचे. कधी कधी हाता पायाला मार लागायचा. परंतु बैलाला शिकवायची प्रतिज्ञाच या तिघांनी केलेली असायची. 

दररोज दुपारनंतर या तिघांचे बैलाला शिकवण्याचे काम सुरू होत असे.  

तर आमच्या वडिलांनी विष्णू गोमा तळपे यांच्याकडून राजा हा गोऱ्हा विकत घेतला होता. त्यावेळी मंचर येथे बैलांचा मोठा बाजार भरत असे. मंचर येथे जाऊन वडिलांनी व नानांनी पारा नावाचा बैल विकत आणला. हा बैल आठशे रुपयाला आणला होता. या बैलाला आम्ही पाखऱ्या असे म्हणत असू.

राजा आणि पाखऱ्या या बैलांची जोडी काही जमली नाही कारण राजा हा गोऱ्हा होता तर पाखऱ्या हा मोठा बैल. त्यामुळे शेतीची नांगरणी करताना अडचण येत असे. मग आमच्या वडिलांनी आणि नानांनी राजा बैल म्हसा येथे रुपये 600 ला विकला.

नवीन बैल घेण्यासाठी खूप प्रयत्न करूनही बैल मिळाला नाही. त्यामुळे मग वडिलांनी आमचे आजोबा (आईचे वडील) लुमा ठोकळ यांच्याकडून हिरा नावाचा बैल विकत घेतला. हिरा व पाखऱ्या या बैलांची जोडी छान जमली. परंतु पुढे प्रॉब्लेम असा झाला की हिरा बैलाचा पुढचा पाय आपोआपच सांध्यातून निखळत असे. व थोडे प्रयत्न केल्यावर तो परत बसायचा.

दुसऱ्याच वर्षी वडिलांनी व नानाने ही बैल जोडी विकण्याचे ठरवले. त्यावेळी बैलांना खाण्यापिण्याची चांगली व्यवस्था केली व बैल तयार केले. म्हशाच्या बैल बाजाराला बैल घेऊन जायच्या आधी मंचर वरून आठशे रुपयाला आणलेला पाखऱ्या बैल आमच्याच गावातील चिंधु धोंडू तळपे व सिताराम दुलाजी तळपे यांनी तेराशे रुपयाला विकत घेतला. व म्हसा येथे सोळाशे रुपयाला विकला. 

गावातच बैल विकला गेल्यामुळे दुसरा बैल विकण्याचे रद्द केले व त्यालाच दुसरा जोडी बैल घेण्याचे ठरवले. डेहणे येथे  धोंडीभाऊ सुतार हे बैल विकणार आहेत हे कळल्यावर आमच्या वडिलांनी त्यांच्याकडून थैमण्या या नावाचा बैल विकत आणला. थैमण्या हा माझा अत्यंत आवडता बैल होता. थैमण्या हा रंगाने काळा होता आणि ठिकठिकाणी पांढरे मोठमोठे ठिपके त्यावर होते.

थैमण्या हा खूपच गरीब बैल होता. मी त्याच्या पोटाखालून जात येत असे. परंतु हा बैल खूपच वयस्कर होता. त्यामुळे पुढच्या वर्षी हे दोन्ही बैल विकण्यात आले.

थैमण्या हा म्हसा येथे अठराशे रुपयाला विकला. आणि दुसरा बैल हिरा हा शिरगावच्या किसन लांघी कोतवाल यांना 1200 रुपयाला विकला.

दोन्ही बैल विकल्यामुळे बैल जोडी विकत घेणे अतिशय आवश्यक होते.

त्यानंतर आमच्या वडिलांनी आणि नानाने म्हसा येथून नारायण जठार धुओली यांच्याकडून बैल जोडी विकत घेतली. एका बैलाचे नाव गुलब्या तर दुसऱ्या बैलाचे नाव पैठण्या असे होते. हे दोन्ही बैल तांबूस रंगाचे होते. त्यातील गुलब्या हा बैल लहान मुलांवर धावत असे. तर पैठण्या हा अतिशय गरीब बैल होता.

ही बैल जोडी आमच्या नानाने जवळजवळ दोन-तीन वर्ष वापरली. परंतु गुलब्या बैल हा लहान मुलावर धावत असल्यामुळे गुलब्या बैल विकण्याचा निर्णय घेतला. व म्हशाच्या यात्रेमध्ये हा बैल विकला.

त्यानंतर आमच्या वडिलांनी गावातीलच मोतीराम मोहन यांच्याकडून हौशा नावाचा बैल विकत घेतला. हा बैल रंगाने काळा होता.

ही बैल जोडी सुद्धा आमच्या नानाने जवळजवळ दोन वर्ष वापरली. त्यानंतर हे दोन्ही बैल म्हशाच्या बाजारात विकण्यात आले. 

आणि मग म्हशाच्या बाजारातूनच पंधराशे रुपयाला बबन्या नावाचा बैल विकत घेतला. व दुसरा पुतळा नावाचा बैल वांजळे गावच्या लक्ष्मण सोळसे यांच्याकडून सोळाशे रुपयाला विकत घेतला. आमच्या गोठ्यात ही बैलजोडी दीर्घकाळ राहिली. बबन्या बैलावर आमच्या घरातील सगळेच खूप प्रेम करायचे. बबन्या बैलाला देखील घरच्या माणसांचा खूपच लळा लागला होता.

आमच्या घराचे वेगळी झाल्यानंतर पुतळा बैल आमच्याकडे आला व बबन्या बैल आमच्या नानाकडे गेला पुढे काही दिवसांनी आमच्या नानांनी हा बैल म्हसा येथील बाजारात तीन हजार रुपयाला विकला. त्यावेळी सर्वात जास्त दुःख आम्हाला झाले होते.

बबन्या व पुतळा ही बैल जोडी सुद्धा खूप वर्ष आमच्याकडे होती. पुतळा बैल विकून डेहणे येथील श्री नामदेव कशाळे यांच्याकडून पक्षा नावाचा बैल एकवीसशे रुपयाला विकत घेतला. ही आमची शेवटचीच बैल जोडी असावी.

त्यानंतर वडिलांनी डेहणे येथील हरिश्चंद्र कोरडे यांच्याकडून मच्या आणि जेल्या नावाचे दोन खिल्लारी बैल ( गाड्याचे) केवळ हौसे खातर विकत घेतले होते. ते केवळ गाड्याचे बैल होते. सन 1989 साली माझ्या नानाने आमच्या चुलत भावाच्या (गोटयाभाई) लग्नाला खटार गाडीला हे बैल जुपले. व त्यामध्ये लग्नाचे नवरदेवा सह वऱ्हाड बसवले. शिरगावच्या खिंडीमध्ये वऱ्हाड गेल्यावर बैल जे उधळले की ज्याला म्हणतात ते.

खटार गाडी मधील सर्व वऱ्हाडाच्या लोकांनी जीव वाचवण्यासाठी खटार गाडीतून उड्या मारल्या. व आपला जीव वाचवला. नंतर ही खटार गाडी सटवाई मंदिराच्या पुढे जाऊन लोकांनी पकडली.

त्यानंतर मच्या हा बैल आमच्याच गावातील गंगाराम हुरसाळे यांना विकला व जेल्या बैल आमच्याच गावातील जयराम आंबेकर गुरुजी यांना विकला.

सन 1992 रोजी वडिलांचे निधन झाल्यावर परत मात्र कधीही बैल घेतले नाही किंवा घेण्याचा प्रसंग आला नाही.

वेगळे झाल्यावर आमच्या नानांनी बरेच बैल घेतले व विकले.

त्यावेळी बैल म्हणजे शेतकऱ्यांचा जीव की प्राण होता. आता जसे लोक गाड्या, मोटरसायकली घेतात तसेच त्यावेळी लोक बैल घ्यायचे. एकच बैल ते सतत वापरत नसत. हा बैल विकून लगेच दुसरा घ्यायचा. तो विकून लगेच तिसरा घ्यायचा असे रहाटगाडगे सतत चालू असायचे.

बैलाच्या शिंगांना त्यावेळी विशेष महत्त्व होते. बैलांची शिंगे टोकदार असली पाहिजेत. बैलाला जास्त कांबळ (गळ्याखालचा भाग) नसली पाहिजे. वशिंद, बैलाचे दात, बैलाची चाल इत्यादी सर्व पारख करूनच बैल विकत घेतले जात असत.

गावात एखाद्या माणसाने बैल विकत घेतल्यावर गावातील अनेक लोकांची तिथे गर्दी जमत असे. काही जण त्यावेळी बैलांमध्ये आनेक उणीवा काढत असत. बैलाच्या किमतीवरून सुद्धा चर्चा झडत.

दरवर्षी कोकणा मधून बैलाची शिंगे फोडण्यासाठी माणूस येत असे. तो बैलाची शिंगे टोकदार बनवून देत असे. अनेक लोक त्याच्याकडून बैलाची शिंगे टोकदार करून घेत असत.

एखाद्या छोट्या झाडाला बैल बांधला जाई दोन-चार जण बैलाचे मुंडके घट्ट पकडत. त्यानंतर हा शिंगे टोकदार करणारा माणूस त्याच्याकडील कानशीने बैलाची शिंगे लाकडासारखी घोळत राही. त्यामधून खूप रक्त येत असे. मला हा प्रकार अजिबात आवडत नसायचा.

बैलाची शिंगे टोकदार झाल्यावर त्यावर लोक वेगवेगळे झाडपाल्याचे औषध बैलाच्या शिंगाला चोळायचे. परंतु दोन-चार दिवसातच बैलाच्या शिंगांच्या जखमा बर्‍या व्हायच्या. त्यानंतर बैल मात्र मोठे रुबाबदार व डौलदार दिसायचे.

बैलाची शिंगे जशी टोकदार करत तसेच बैल बडवण्याचा कार्यक्रम सुद्धा अतिशय आघोरी होता.

बैलाची वय त्याच्या दातावरून ठरत असे. दुस,चौसा, गोरा, भादवा असे प्रकार होते. त्यावेळी खिल्लारी बैल हे अतिशय महाग असायचे. त्यामुळे हे बैल लोक विकत घेत नसत. गावठी बैलच अनेक लोकांकडे असायचे.

त्यावेळी गावातील ठराविक लोकांकडे बैलगाड्या असायच्या. या बैलगाड्यातून लोक शेतीसाठी शेणखत वाहने, जनावरांसाठी पेंढा, वाळलेल्या गवताच्या पेंढ्या, सरपण, भाताची पोती, पाण्याची पिंपे, यात्रा, लग्न व देवदर्शन इत्यादी कामासाठी बैलगाडीचा स्तरास उपयोग होत असे. लग्नाचा नवरदेव वऱ्हाड बैलगाडीतून जात असे. त्यासाठी बैल गाडी अतिशय छान सजवली जायची. बैलाच्या अंगावर झोली बांधल्या जात.

आमच्या वडिलांनी सुद्धा भिवेगावच्या पांडुरंग वनघरे यांच्याकडून बैलगाडी विकत आणली होती. या बैलगाडी मध्ये मी रात्री अंगणात झोपत असे. ही बैलगाडी चालवण्याचा आनंद सुद्धा मी अनेक वेळा घ्यायचो.

मी लहान असताना माझे आजोबा आईचे वडील लुमा ठोकळ यांनी दुधासाठी एक गाय दिली होती. या गायीचे नाव सारंगी असे होते. सारंगी गाय खूपच गरीब होती. व ती चांगले दूधही देत असे. ही गाय खूप वर्ष आमच्याकडे होती.

परंतु त्यावेळी जनावरांना खरकुताची साथ यायची. जनावरांच्या पायातील खुरामध्ये छोटे छोटे किडे पाडायचे. त्यावेळी आता सारखी औषधी उपलब्ध नसायची. आमची आजी व मी रानातून कुंभा या वनस्पतीची पाने आणत असू. ती दगडावर वाटून त्याचा रस व लगदा गायीच्या पायाच्या खुरामध्ये घालत असू.

परंतु थोड्याच दिवसात पावसाळा सुरू झाला. व खरकुत या आजाराने जास्त जोर धरला. आम्ही सकाळी पाहायचं त्यावेळी गोठ्यामध्ये सगळीकडे खरकुताचे किडे दिसायचे. आणि अशातच एके दिवशी आमची गाय आम्हाला सोडून गेली.

त्यानंतर आमच्या वडिलांनी डेहणे येथील श्री तुकाराम कोरडे यांच्याकडून एक गाय विकत आणली.

त्यावेळी मी दुसरीला होतो. श्रावण महिना होता. आम्ही सर्व मुले शाळेत होतो. वेळ साधरण दुपारनंतर साडेचारची असेल, गुरुजी पाढे शिकवत होते आणि अचानक कुणीतरी शाळेत सांगायला आले की की आमच्या घरी गाय आणली आहे. मला खूप आनंद झाला.

काही मुलांनी गाय पाहण्यासाठी गुरुजींची परवानगी मागितली. तनपुरे गुरुजीं सह आम्ही मुले आमच्या वडिलांनी नवीन आणलेली गाय पाहण्यासाठी गेलो. तर काय अंगणात पांढरीशुभ्र गाय उभी होती, तिच्याबरोबर छोटे वासरू होते. चार-पाच लोक उभे होते. आई गाईची पुजा करून औक्षण करीत होती. तेवढ्यात आम्ही तेथे गेलो.

माणसे गप्पा मारत होती. सर्वांना माझ्या हस्ते गुळ वाटप करण्यात आला. गुळ वाटल्यावर बाकीची मुले शाळेत गेली. मी तेथेच थांबलो. त्यानंतर मोठ्या माणसांना चहापाणी झाला घरातील सर्वांना त्यावेळी खूपच आनंद झाला होता. घरात दूध दूभते आले होते.

त्यावेळी गावात "चाहूर"  हा एक परावलीचा शब्द होता. चाहूर म्हणजे एखाद्या शेतकऱ्याच्या शेतात गावातील सर्व बैल जोड्या घेऊन त्या शेतकऱ्याच्या शेताची दुरुस्ती करावयाची. त्या बदल्यात तो शेतकरी दोन वेळचे जेवण व ठराविक रक्कम द्यायचा. यालाच चाहूर असे म्हणत असत.

कुणाचा पावसाळ्यात बांध गेला असेल. कुणाच्या शेतात जास्त माती धुवून आलेली असेल. किंवा कोणाला नवीन भाताची खाचरे तयार करायची असतील. तर अगदी सकाळी सकाळी आपापली बैल घेऊन अशा शेतकऱ्यांच्या शेतात घेऊन जावयाचे.

संध्याकाळपर्यंत शेतीची कामे करायची. वीस बावीस बैल जोड्या असत. चाहूल असेल त्या दिवशी घरातील बाया माणसाची खूपच धावपळ असे. दिवसभर त्यांना खूप काम असायचे. 

शेतातील माणसांना दुपारचे जेवण म्हणजे नाचणीच्या किंवा तांदळाच्या भाकरी, मसुराची आमटी, कांद्याच्या फोडी, पापड हा बेत असायचा. त्यासाठी शेजारच्या बाया मदतीला यायच्या.

भल्या पहाटेपासून स्वयंपाकाची तयारी करावी लागायची. तेव्हा कुठे दुपारचे जेवण तयार व्हायचे.

दुपारी गर्द झाडीच्या छायेत जेवण झाल्यानंतर थंडगार पाणी पिऊन लोक वामकुक्षी घेत असत. तर सावलीमध्ये बांधलेल्या बैलांना वैरण काडी केली जात असे.

दोन-चार अति उत्साही लोक जवळच्याच रानात जाऊन आंब्यावर चढून पिवळे धमक पाड घेऊन येत असत. पाटी दोन पाट्या पिवळे धमक पाड खाण्यासाठी लोक त्यावर तुटून पडत.

आंबे खाऊन झाल्यावर पुन्हा शेतीचे काम सुरू होई.

संध्याकाळी पुरणपोळीचे जेवण असे. लोक चावडीच्या दारात बसून गप्पा मारत असत व जेवणाची वाट पाहत असत. जेवणाचे एकदा बोलावणे आले की लोक सार पोळीवर तुटून पडत. एक एक माणूस पाच पाच सहा पोळ्या खात असे. 

त्यावेळी कोणताही कार्यक्रम असो जेवण म्हणजे पुरणपोळी हा सर्रास लोकप्रिय प्रकार होता. मुलगी बघण्याचा कार्यक्रम, पाहुणे आल्यावर, शेतीच्या कामानिमित्त, यात्रा, सण व उत्सव, लग्न कार्य या सर्वांसाठी पुरणपोळी हा बेत ठरलेला असे.

आता मात्र पुरणपोळ्या हा प्रकार बंद होत चालला आहे. त्यावेळी चाहूर हा प्रकार अतिशय लोकप्रिय होता. अख्या गावाची औते एकच शेतकऱ्याकडे जात असत. एकच शेतकऱ्याच्या शेतामध्ये 25, 30 बैल जोड्या पाहून बैलांचा बाजार भरला आहे की काय असे वाटत असे. चाहूर हा एकमेकांना मदत करण्यासाठीचा प्रकार होता. परंतु आता चाहूर हा शब्द मदत करणे सोडाच परंतु ऐकायला देखील मिळत नाही. आताच्या पिढीला त्याचा शब्दही समजणार नाही.

परंतु त्यानंतर मात्र काळ बदलला पुरणपोळीची जागा चिकन,मटण आणि दारूने घेतली. दिवसाढवळ्या सुद्धा दारू पिऊन मगच शेतीच्या कामाला लोक सुरुवात करू लागले.

चाहूर या शब्दासारखाच दुसरा प्रकार म्हणजे "इर्जिक" होय. या प्रकारामध्ये गावातील ठराविक लोक एखाद्या शेतकऱ्याला शेतीच्या कामासाठी मदत करत असत. त्या बदल्यात तो शेतकरी मदत करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन वेळचे जेवण देत असे. संध्याकाळचा स्वयंपाक मात्र पुरणपोळीचा असे. थोडक्यात इर्जिक प्रकार म्हणजे एखाद्या शेतकऱ्याला विनामोबदला केलेली मदत.

आता तर हे सर्वच बंद झाले आहे. कारण कुणाकडेच बैल नाहीत. ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल.

रामदास तळपे 


शाई व पेन

शाळेत असताना ज्या साहित्याची खूपच मदत झाली आणि प्रसंगी त्रास खूपच झाला अश्या गोष्टी म्हणजे शाई व शाईपेन. अक्षर चांगलं येतं या गैरसमजातून तसेच हुशार विद्यार्थी वापरतात म्हणून खरं तर याचा वापर करायचो आम्ही. शेवट पर्यंत अक्षर सुधारले नाही हा भाग वेगळा.

साधारण पाचवी पासून पाचवीलाच पुजलेला हा शाई पेन आता फारसा दिसत नाही, परंतु ८० च्या दशकात याची खूप चलती होती.

त्यावेळी पन्नास पैश्याची निब व २-३ रुपयचा शाईपेन दुकानात मिळे. त्यावेळेस किराणा दुकान म्हणजे लोकल मॉलच. किराणा कापड शालोपयोगी वस्तू इतकंच काय लग्नाचं वाण सामान व मयताचं सामान ते ही ऊधारीवर सहज उपलब्ध होणारं हक्काच ठिकाण म्हणजे किराणा दुकान. 

त्यामुळे वह्या कंपास पुस्तके शाईपेन, बॉल (पॉईंट) पेन, शाई, रिफीलच्या चाराण्याच्या कांड्या, जॉटर रिफील किराणा दुकानात सहज उपलब्ध होत असे. 

स्टेशनरीचे स्वतंत्र दुकान असते हे माहित नव्हते आम्हा बालकांना.

एकदा घरी शाईची अख्खी बाटली वडिलांनी आणलेली, पण आमच्या कुशल हाताळणीमुळे महिनाभर सुद्धा टिकली नाही. 😅 नेमकी कोणी फोडली याचा शोधही लागला नाही. परिणाम एकच झाला. किराणा दुकानदाराला पाच पैसे देऊन पेनात शाई भरुन घेण्याची उज्वल परंपरा पुन्हा सुरु झाली.

शाई पेन वापरायची हौस व अक्कल यामध्ये काहीतरी अंतर असते किंवा असावे हे आम्हास अर्थातच मान्य नव्हते. सर सांगतात म्हणून आम्ही शाईपेन वापरायचो.

वडिलांनी निब असणारे शाई पेन आणून दिले की निब रुळावी (नवीन सुनेला जसे सासरचे रुळवतात) त्याहून अधिक मायेने आम्ही त्या निबला रुळवायचो.त्या निबला उमटवण्यासाठी तिच्यावर अत्याचारही खूप करायचो.

म्हणून आम्ही दिसेल त्या वहीवर लेखनाचा सराव करायचो. आपले संपुर्ण नाव वहीच्या समोरील पृष्ठांवर तर लिहायचोच. पण मध्ये शेवटीही टाकायचो.

शाईपेन त्यावेळचे तांत्रिकदृष्टया परिपूर्ण नसत. म्हणजे शाई भरताना व प्रत्यक्षात लिहिताना शाई पेनाशी फारकत व आमच्याशी जवळीक साधण्याचा हमखास प्रयत्न करायची. त्यामुळे अंगठा तर्जनी व मध्यमा यापैकी कोणत्या तरी वा सर्वच बोटाबरोबर हमखास व रोजच रंगपंचमी खेळे.

त्यावेळेस शाई एकतर साधारणतः निळी (सर्व छटा मिळून) व काळी या दोनच रंगात उपलब्ध असे. सुटया स्वरूपात हिरवी लाल जांभळी शाई अजिबात मिळत नसे. 

ती कमतरता नंतर विविध रंगांच्या स्केचपेनने भरून काढली.पण लोचा असा की ते रंगीत स्केच एकटे यायला घाबरत क्रेयॉन कांड्या असोत की स्केच पेन पूर्ण सेटच खरेदी करावा लागे. ज्यासाठी घरचे अनुदान देताना नेहमी खळखळ करत.

आमचे स्केच पेनचे खेळ म्हणजे खोलून आतली रिफील चेक करणे सुकली आहे असे वाटल्यास पाणी टाकणे. ते करताना हात गिरबडून घेणे. 

अंदाज चुकून पाणी जास्त टाकले गेले मूळ शाई खालून वाहून गेल्यावर तोच गिरबडलेला हात कपाळावर मारून घेणे.

स्केचपेन मध्ये कांडी टाकून त्याचे बॉल पेन मध्ये रुपांतर करणे. यात रिफील कांडी थोडी कट करावी लागत असे. नेमकी कट झालेली नसेल तर लिहिताना कांडीचे टोक आत गायब होई मग त्यावर उपाय काय तर नळीच्या मागच्या टोकाला कागदाचा बारीक बोळा टाकून कांडीचे कायम बाहेर राहील अशी व्यवस्था करायची. 

पण बऱ्याचदा मागची बाजू हवाबंद होऊन कांडी काम करायचे थांबवी मग बाहेर काढून मागून फूक मारून पुन्हा तिला लिहायला तयार करावं लागे. अशा बऱ्याच गमती जमती सुरु असत.

त्यावेळच्या वह्या ह्या शाईपेन वापराकरिता अजिबात सुसह्य नसत. त्यांचे शाईशी व निबशी काय वाकडे होते देव जाणे. पण कागदाचा धागा वा तशाच प्रकारचा भाग हमखास निबमध्ये अडके. त्यामुळे शब्द कागदावर कसेतरी उमटत किंवा कॅलोग्राफी प्रमाणे उमटत. 

त्यातही एखाद्याच शब्दास ठळक रूप देत. बऱ्याचदा टायटल साधे तर इतर लिखान बोल्ड स्वरूपात येई. काही वेळा पुढील सगळेच काही शब्द बोल्ड तर काही सामान्य उमटत. 

आम्ही निबची साफसफाई जमेल तशी करायचो पण त्या नादात निबच्या दोन टोकांपैकी एक हमखास तुटे. व ते वहीवर अक्षरे उमटवण्यास असहकार्य करी. तरीही बळजबरी केल्यास उरलेले दुसरे टोक ही मोडे व आमचा खोळंबा होई. 

सर डिक्टेशन देताना लिहिण्याची कितीही भारी Acting केली तरी सरांच्या बाकामधल्या राऊंडला ती उघडकीस येऊन एखादा रट्टा चुकी नसतानाही बसे. कारण सरांचा आमच्यापेक्षा निबवर जास्त भरोसा.

तूच काहीतरी उद्योग (आताच्या भाषेत उंगल्या) केले असणार म्हणून निब मोडली असा पुराव्याशिवाय सर निष्कर्ष काढून मोकळे होत. 

पण घरी जाताना खिशात पैसे नसल्याने व दुकानदार आम्हास ऊधार द्यायला तयार नसल्याने तसेच घरी यावे लागे. 

दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना निब घेऊन शाळेत गेलो तरी गृहपाठ अपूर्ण म्हणून पुन्हा उत्तरपूजा ठरलेली.

खराब क्वॉलीटीमुळे वहीवर एकाच पृष्ठांवर लिहिले की ते पाठीमागे स्पष्ट उमटे. त्यामुळे Affidavit प्रमाणे एकाच पृष्ठावर लिहिण्याचा प्रसंग वारंवार येई . . 

ह्या शाई पेनाची निब मुद्दामच उघडी ठेवून जर पुढील बाकावरील विद्यार्थी मागे टेकला तर त्याचा मांजरपाटाचा शर्ट हमखास रंगे त्यावरून पुन्हा भांडणे मारामाऱ्या होत असत. 

अशा गंमती जमती होत असल्यतरी शाई पेनाने लिहायची आवड होती निदान दहावीपर्यंत तरी. नंतर बॉलपेन व जेलपेन यांचा जमाना आला. शाईपेनाचे अस्तित्व धोक्यात आले. पण जुन्या आठवणी अजूनही ताज्याच आहेत 

विवेक देशमुख


आदिवासी क्रांतिकारक होनाजी केंगले

थोर क्रांतिकारक होनाजी केंगले यांचा जन्म १८३५ साली जांभोरी ता.आंबेगांव जि.पुणे येथै भरपुर शेतीभाती व दुधदुभते असलेल्या सधन अशा कुटुंबात झाला.

घरी दुधदुभते असल्यामुळे होनाजीचे शरिर चांगलेच मजबुत व पिळदार होते.त्यांनी खेड,आंबेगांव, जुन्नर व अकोले भागात अनेक नामांकित कुस्त्या केल्या होत्या. 

त्यामुळे होनाजीचे नाव सगळीकडेच चांगलेच दुमदुमत होते. आणि याचाच रोष त्यांच्या चुलतभावांना होता.

त्यावेळी अनेक शेतकऱ्यांच्या जमीनी सावकारांनी बळकावल्या होत्या. सावकार आदिवासी समाजावर प्रचंड जुलूम जबरदस्ती करत होते.

होनाजीच्या चुलत भावांनी खोट्या गुन्ह्याखाली होनाजीला अटक करायला भाग पाडले. आणि होनाजींच्या मनात तेथेच अन्यायाविरूद्ध लढण्याचे बीज रोवले गेले.

सन १८५६ साली भयानक असा दुष्काळ पडला होता. लोकांनी वेळेवर पेरण्या करूनही पाऊस वेळेवर पडला नाही. सुरूवातीला पावसाचे वातावरण तयार व्हायचे. 

आकाशात काळे ढग जमायचे. आता थोड्याच वेळात जोरदार पाऊस होणार असे वाटायचे. परंतू थोड्याच वेळात भ्रमनिरास व्हायचा. आभाळातील ढग विरळ व्हायचे. पाऊस काही पडायचा नाही. जुन गेला जुलै महिना संपायला आला. परंतू पावसाचा एक टिपुस देखील पडला नाही.

आँगाष्ट महिन्यात तर चक्क कडक ऊन पडू लागले. दिवसामागून दिवस जात होते. पाऊस काही पडत नव्हता. घरातील अन्नधान्य केव्हाच संपले होते. चारापाणी नसल्यामुळे जनावरांनी केव्हाच माना टाकल्या होत्या.

त्यावेळी इंग्रजांचे राज्य असल्यामुळे माणसे जगवण्यासाठी ज्या काही उपाययोजना सरकार करत होते. त्या अत्यंत तुटपुंज्या होत्या.

दुर अरण्यात, रानावनात व डोंगरद-यामध्ये राहणाऱ्या आदिवासी महादेव कोळी, ठाकर समाजाच्या लोकांकडे सरकारचे साफ दुर्लक्ष होते.

गुरे ढोरे तर केव्हाच पशुपक्ष्यांच्या भक्षस्थानी पडली होती. लोक आपल्या कुटुंबाचा जीव मोठ्या मुश्कीलीने जगवत होते.

सुरूवातीला लोक भाताच्या कोंड्यात पिठ घालून भाकरी करून आपल्या कडील धान्य पुरवत. परंतू काही दिवसांनी घरातील धान्य देखील संपले. उपासमार होऊ लागली. लोक जंगलातील कंदमुळे, झाडाची पाने खाऊन दिवस ढकलू लागली. अनेक लहानमुले,म्हातारी माणसे भुकेमुळे मेली.

आदिवासी समाजापुढे कुटुंबातील माणसे जगतील कशी हा मुख्य प्रश्न होता. मुलाबाळांचे उपासमारीमुळे होणारे हाल लोकांना उघड्या डोळ्यांनी पहावत नव्हते. त्यामुळे अनेक लोकांनी आपल्या जमिनी आंबेगांव, घोडेगाव, जुन्नर, राजुर येथील सधन असलेल्या मारवाडी, गुजर, मुसलमान, तेली, ब्राम्हण आणि लिंगायत यांचेकडे गहाण ठेवुन त्याबदल्यात काही पैसे घेऊन धनधान्य खरेदी केले.

ते धान्य काही दिवसच पुरले.नंतर पुन्हा उपासमार सुरू झाली.

उन्हाळा सुरू झाला. जंगलातील अनेक आंब्यांच्या झाडांना मोहर आला. लोकांच्या जगण्याच्या आशा पल्लवीत झाल्या. लोक आंबे, करवंदे, आवळे व जांभळे खाऊन आपली भुक भागवू लागली व आजचे मरण उद्यावर ढकलू लागले.

थोड्याच दिवसात जुन महिना सुरू झाला.आकाशात ढग जमू लागले. व नियमित पाऊस पडू लागला.

शेतक-यांना जमीन गहान ठेऊन घेतलेल्या सावकांरानी बी बियाणे दिले.

या वर्षी खुप पाऊस पडला शेते पीकांनी तरारून गेली. शेतकरी खुश झाला.

परंतू पिके निघताच सावकारांच्या झुंडीच्या झुंडी गावागावात येऊन पिकलेले धान्य घेऊन जाऊ लागले. हाता तोंडचा घास सावकारांनी नेला. शिवाय २०० ते ३०० पट कर्जाचे व्याज शेतकऱ्यांच्या माथी मारले.

दरवर्षी सावकार धनधान्य, हिरडा, डिंक, गवताच्या पेंढ्या व फळे घेऊन जाऊ लागले. तरीही त्यांचे कर्ज फिटत नव्हते.

काही दिवसांनी आदिवासी शेतकऱ्यांच्या जमीनी सावकांरानी स्वतःच्या नावावर करून घेतल्या. अशा प्रकारे आपल्याच शेतामध्ये आपल्यावरच मजूर म्हणून काम करण्याची नामुष्की आदिवासी व इतर शेतक-यांवर आली होती. या पेक्षा दुष्काळ बरा असे लोक म्हणू लागले.

कष्ट करणारा एक आणि त्याच्या कष्टावर फुकट जगनारा दुसरा असा नवा वर्ग निर्माण झाला. या दुष्टचक्रात सापडल्या मुळे महादेव कोळी जमातीचे दिवसेंदिवस हाल वाढत गेले. 

हा सर्व प्रकार ह्दय पिळवटुन टाकनारा होता. हा आत्याचार हा जुलुम संपुर्ण आदिवासी समाज मोठ्या जुलुमाने सहन करत होता.

हा अत्याचार हा जुलुम होनाजीला सहन होईना. आता सावकारांविरूद्ध काहीतरी करायला हवे. असे होनाजी लोकांना बोलू लागले.

आणि अशातच होनाजीच्या चुलत भावांनी हा सर्व प्रकार जुन्नर येथे जाऊन पोलीस स्टेशनला जाऊन सांगीतले. आणि होनाजीला खोट्या गुन्ह्याखाली अटक करायला भाग पाडले. होनाजींच्या मनात तेथेच अन्यायाविरूद्ध लढण्याचे बीज रोवले गेले.

यातुनच क्रांतीची ज्वाला भडकली ती होनाजी केंगले यांच्यात. त्यांना हा तोंड दाबुन बुक्यांचा मार सहन होईना.

होनाजींनी आजुबाजूचे तरूण गोळा केले. त्यांच्यामध्ये क्रांतीची ठिणगी पेटवली. आणि याच ठिणगीचे पुढे मशालीमध्ये रूपांतर झाले.

लोक होनाजीच्या नेतृत्वाखाली बंडामध्ये सामील झाले. समाज यांना 'बंडकरी' म्हणुन ओळखु लागला.

होनाजी आणि त्यांच्या सहका-यांनी प्रथमतः सावकारांच्या वाड्यांवर रात्री हल्ला करून त्यांच्या ताब्यातील बळकावलेल्या जमीनींचे दस्त ताब्यात घेतले. व मिळेल तशी लुट करू लागले. नंतर हे सर्व बळकावलेल्या आदिवासी समाजाच्या जमीनींचे दस्त अक्षरशः जाळून टाकले. मिळालेल्या लुटीतुन बंदुका व दारूगोळा खरेदी केला. व उर्वरीत लुटीतील पैसे गोरगरीब लोकांना वाटू लागले.

होनाजी केंगले यांनी सावकारांच्या कृष्णकृत्याविरूद्ध लोकजागृतीचे हे लोण त्यांनी भिमाशंकर पासुन शिरूर पर्यंत, खेड, आंबेगाव, जुन्नर घोटी, इगतपुरी, राजुर, नाशिकचा काही भाग, कोकणचा कर्जत, खांडस, सरळगाव, टोकावडे, मुरबाड पर्यंत पसरवले. व बंडाचे निशाण फडकवले.

त्यांचे नाव सगळीकडे दुमदुमू लागले. 

याच वेळी इंग्रजाविरूद्ध प्रसिद्ध असा १८५७ चा राष्ट्रीय ऊठाव सुरू झाला होता. देश इंग्रजांविरूद्ध पेटुन उठला होता. 

या उठावामध्ये होनाजीने उडी घेतली. हा उठाव दुर्दैवाने अयशस्वी झाला. अनेक स्वातंत्र्यवीरांना अटक झाली. १० मार्च १८५८ रोजी होनाजीला पकडण्यात आले. होनाजीला अतीदुर अशा अंदमानातील तुरूंगात ठेवले. होनाजीला पुढे १० वर्षाची सक्त मजुरीची काळ्यापाण्याची शिक्षा झाली.

दहा वर्षाची शिक्षा भोगल्यावर एप्रिल १८६८ रोजी होनाजी पुन्हा गावी जांभोरीला आले. गावी आल्यावर सर्वांना आनंद झाला. होनाजी गेल्यावर सुद्धा सावकांराविरूद्ध लढा मंदगतीने का होईना चालूच होता.

होनाजीने पुढे या लढ्याची सुत्रे हाती घेतली. आणि सावकारांविरूद्धचा लढा अधिक तिव्र केला.

होनाजी आणि त्यांच्या सहका-यांनी अहमदनगर, नाशिक, जुन्नर, आंबेगांव, घोडेगाव, ओतुर, येथे छापे टाकले व प्रचंड लुट केली. अत्याचार करणाऱ्या सावकारांची तलावारींनी नाके कापुन त्यांची घरेदारे पेटवुन दिली.

त्यांच्या या भितीने सावकांरानी इंग्रज सरकारचा आश्रय घेतला. होनाजी केंगले व त्यांच्या साथीदारांना पकडण्यासाठी सरकारी कुमुक मागवली गेली.

ब्रिटिश सरकारने होन्या भागोजी केंगले मृत किंवा जिवंत पकडण्यासाठी १०,०००/- रुपयांचे बक्षीस जाहीर केले. त्याचे पोस्टर्स मोस्ट वॉन्टेड म्हणून ठिकठिकाणी लावले. आणि त्यांच्या बंडातील इतरांना २०० ते ६०० रुपयांचे इनाम लावले.

पण याचा काहीही परिणाम झाला नाही.

म्हणून १८७४ मध्ये ब्रिटिश सरकारने होनाजीच्या अटकेसाठी कर्नल स्कॉट आणि मिस्टर डब्ल्यूएफ सिंक्लेअरसीएस यांच्या नेतृत्वाखाली १७५ सशस्त्र विशेष पोलिस दल तैनात केले. परंतु विशेष पोलिस दल देखील अयशस्वी झाले. होनाजी त्यांच्या टोळीसह निसटले.

होनाजी कोकणातील नांदगाव येथे येत असल्याची पक्की खबर मेजर एच. डँनियलला मिळाली.

होनाजीना पकडायचे असेल तर फितुरीनेच पकडले पाहिजे हे मेजर डँनियलने ओळखले. आणि त्याने त्याचे काही साध्या वेशातील हेर नांदगावला पाठवले. दिमतीला सैन्य व फौजफाटा होताच.

होनाजी ज्यांच्या घरी जातात त्यांच्या घरातील जनाबाई मेंगाळ नावाच्या स्रीला पैशाचे अमिश दाखवून फितुर केले.

जवळजवळ तीन आठवड्यांनी होनाजी नांदगाव येथे मेंगाळ यांच्या घरी आले. आणि लगेचच ही बातमी जनाबाईने हेरगीरीवर असणाऱ्याला सांगीतली. थोड्याच वेळात तेथील मेंगाळाच्या घराला पोलीसांनी वेढा घातला. व १५ आँगष्ट १८७६ साली नांदगाव येथे होनाजीला पकडण्यात आले.

दुसऱ्या दिवशी ही बातमी वा-यासारखी सर्वदुर पसरली. लोक हळहळले. गरीब लोकांना अतीव दुःख झाले. आपला कैवारी व तारणहार पकडला गेल्याचे दुःख लोकांच्या जिव्हारी लागले.

होनाजीला पकडल्यावर पुण्याला आनले. त्याच्यावर सावकारांना लुटने, गहान खते जाळने, सरकारी मालमत्तेचे नुकसान करने, दरोडा घालने असे आरोप ठेवले.

पुढे हा खटला सहा महिने चालला. व होनाजीला सन १८७६ साली फाशीची शिक्षा फर्मावण्यात आली. व ठाणे येथील तुरूंगात फाशी देण्यात आले.

थोर आदिवासी क्रांतिकारक    

होन्या भागोजी केंगले यांचे स्मारक त्यांच्या जन्मभूमीत म्हणजे जांभोरीमध्ये व्हावे, अशी इच्छा तमाम आदिवासी बांधवांची असताना शासनाने हे स्मारक दुर्लक्षितच ठेवले आहे.

या स्मारकासाठी हेमंत काळू केंगले व मारुती धोंडू केंगले व माजी उपआयुक्त लक्ष्मण डामसे यांनी पुढाकार घेऊन २००२ मध्ये कर्ज काढून जांभोरी येथे छोटेसे स्मारक उभारले आहे. शासनाने यामध्ये दुरुस्ती करून भव्य स्मारक उभारावे, अशी मागणी होन्या केंगले स्मारक समितीचे अध्यक्ष हेमंत केंगले यांनी केली आहे. 

सन १८५५ ते १८७६ मध्ये क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या समकालीन असणारा आंबेगाव जांभोरी येथील होन्या भागोजी केंगले हे क्रांतिकारक होते. 

होन्या केंगले यांचे नाव बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या श्रीक्षेत्र भीमाशंकर येथील बसस्थानकाला देण्यात यावे अशीही मागणी आहे. या पैकी पंचायत समिती आंबेगांव (घोडेगाव) येथील ध्वजस्तंभावर होनाजी केंगले यांचे नाव कोरण्यात आले आहे.

केंगले यांनी सावकार आणि ब्रिटिशांच्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला. गरीब शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या सावकारांचा बंदोबस्त त्यांनी केला. त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र चळवळ उभी केली आणि त्यांच्या अटकेसाठी ब्रिटिशांनी मोठे बक्षीस जाहीर केले होते. 

होनाजी केंगले यांच्या कामामुळे स्थानिक लोकांमध्ये त्यांना आदराचे स्थान होते.आणि आहे. त्यांच्या कार्याची दखल इतिहासाने फारशी घेतली नाही, परंतु त्यांच्या शौर्यामुळे ते आजही स्मरणात आहेत.

रामदास तळपे 

रामायण महाकाव्य नव्हे वास्तव इतिहासच

लेखकाचे मनोगत

पूर्वी ग्रामीण भागात प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यात पोत्यापुराणांचे पारायण केले जात असे. त्यावेळी राम विजय, पांडव प्रताप, हरि विजय, नवनाथ, शिवलीलामृत अशा अनेक ग्रंथांचे पारायण गावागावांमध्ये होत असे.

आमच्या घरी माझे वडील मी लहान होतो तेव्हा राम विजय आणि नवनाथ या ग्रंथांचे सर्रास पारायण केले जात असे. एक जण वाचायला आणि दुसरा त्याचा मराठीत अर्थ सांगायला असे दोन जण असायचे.

त्या काळात ग्रंथांचे पारायण ऐकण्यासाठी गावातील आबाल वृद्ध लोक, स्त्रिया आमच्या घरात गर्दी करत असत. त्यावेळी रामायणा मधल्या सुरस कथा ऐकायला खूपच मजा येत असे.

त्यावेळी श्रीरामाबद्दल प्रचंड आपुलकी प्रेम आणि भक्ती दाटून येत असे. लोक श्रीरामाच्या भक्ती रसात बुडून जात असत 

नंतरच्या काळात मी रामायणाचा कथासार आणून त्याचे वाचन केले, परंतु रामायणातील या कथा वाचत असताना अनेक प्रश्न उपस्थित होत असत. रामायणामध्ये अनेक अनाकलनीय कथा होत्या. त्यांचा संदर्भ जुळत नसे.

आयोध्या ते श्रीलंका ही साधारण अडीच हजार किलोमीटरचे अंतर असताना व रामेश्वर ते श्रीलंका समुद्रातील अंतर 48 किलोमीटर असताना रावणाला सीतामाईच्या स्वयंवराचे आमंत्रण देण्यासाठी कोण गेले असेल? व कसे गेले असेल? हा प्रश्न नेहमीच पडत असे.

त्याचप्रमाणे श्रीलंकेच्या रावणाची सासुरवाडी उत्तर प्रदेश मधील मेरठ येथे असल्याचे रामायणात नमूद आहे. हे अंतर साधारण 24 हजार किलोमीटर आहे. मग हा सोयरसंबंध इतक्या लांबचा कसा निर्माण झाला असेल?

रामायणातील सर्व घटना नाशिक जवळील पंचवटी येथे घडल्या असताना व हनुमानाचा जन्म सुद्धा नाशिक मधील अंजनेरी येथे झाला असताना हनुमान दूर अशा मध्य प्रदेशातील किष्किंधा येथे सुग्रीवाकडे कशासाठी गेला असेल?

राम-लक्ष्मण सितेच्या शोधासाठी श्रीलंकेला न जाता पंचवटी पासून 800 किलोमीटर दूर असलेल्या मध्य प्रदेशातील किष्किंधा येथे कशासाठी गेले असतील?

रामेश्वर ते श्रीलंका हा वानराने पूल निर्माण करणे, पुष्पक विमान, शिवाय इंग्रजीताचे आकाशातून बाण मारणे, रावणाचे 72 कोटी सैन्य, तेथील जनता ही एवढ्या छोट्या बेटावर कसे मावत असेल?

असे नानाविध प्रश्न मनात येत असत. असे असतानाही श्रीरामावर व रामायणावर असलेला भक्तिभाव तो तसुभरही कमी झालेला नाही.

पुढे हे सर्व प्रश्न शोधण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्याचे उत्तर काही कुठे भेटले नाही.

यासाठी खूप संशोधन करून हे पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये रामायणातील सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे.

हे पुस्तक लिहीत असताना मला सतत हनुमंताचे दर्शन होत होते. यावरून श्रीराम कथा म्हणजेच रामायण हे केवळ महाकाव्य नसून वास्तव इतिहास आहे याची प्रचिती आली. मी रामायणावर हे पुस्तक लिहू शकलो हे माझे परम भाग्यच म्हणावे लागेल. 

जय श्रीराम, जय श्रीराम 

रामदास तळपे 

भगवान श्री. प्रभू रामचंद्राचा कालावधी हा नेमका केव्हाचा? यामध्ये अनेक मत मतांतरे आहेत. काहीजण तर रामायण हे घडलेच नसून ते महाकाव्य आहे असे सांगून मोकळे होतात. त्यामुळे श्री प्रभू रामचंद्राचा कालावधी हा केव्हाचा होता आणि खरोखरच रामायण घडले होते का? याबाबत अनेक समज गैरसमज आहेत. 

श्री. प्रभू रामचंद्र यांच्या कार्य कालाची माहिती जाणून घेण्यासाठी भारतातील अनेक लोक प्रचंड उत्सुक आहेत.

रामायण व पुराणेही राम हा त्रेतायुगाच्या उत्तरार्धात झाला असे म्हणतात. सत्ययुगानंतर त्रेतायुग येते. त्रेतायुगाचा उत्तरार्ध धरला तरी हा काळ 8 लाख 69 हजार वर्षे इतका जुना येतो. या काळात पृथ्वीवर माणूसच नव्हता, मग राम कसा असेल, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

रामेश्वरम पासून श्रीलंकेला जोडणारा व रामायण काळात वानरसेनेने बांधला अशी श्रद्धा असलेला तरंगत्या पाषाणांच्या सेतूचेे वय, कार्बन डेटिंंगनुसार साडेसतरा लाख वर्ष इतके जुने येते. रामसेनेनेच सेतू बांधला हे म्हणणे मग जसे अतार्किक ठरते तसेच रामकाळही तेवढा मागे नेणे अतार्किक ठरते.


रामायणाची मूळ कथा:

राजा दशरथ हे आयोध्येचे राजे होते. त्यांना तीन पत्नी होत्या. कौसल्या सुमित्रा व कैकेयी. परंतु एक त्यांना एकही मूलबाळ नव्हते.

त्यासाठी राजा दशरथाने शृंगी ऋषींनी सांगितल्यानुसार व पुत्रकामेष्टी यज्ञ केला.

त्यानंतर दशरथ राजाच्या कौसल्या या पत्नीस श्रीराम, कैकेयी या पत्नीस भरत व सुमित्रा या पत्नीस लक्ष्मण आणि शत्रुघ्न अशी जुळी मुले झाली.

या सर्व मुलांना राजा दशरथाने वशिष्ठ ऋषी यांच्या गुरुकलात शिक्षणासाठी पाठवले.

वशिष्ठ ऋषींच्या गुरुकुलात शिक्षण पूर्ण होत असतानाच मिथिला नगरीचा राजा जनकाने त्यांची मुलगी जानकीचे स्वयंवर होणार असल्याचा निरोप मिळाला.

जानकीच्या स्वयंवरांसाठी गुरु वशिष्ठसह राम, भरत, लक्ष्मण व शत्रुघ्न जनकाच्या मिथिला नगरीत गेले. तेथे अनेक नगरींचे राजे महाराजे उपस्थित होते.

अत्यंत जड अशा शिव धनुष्यास जो कोणी वीर दोरी लावेल त्यास जानकी माळ घालेल असा तो पण होता. परंतु प्रचंड जड असलेल्या शिव धनुष्य कोणच उचलू शकले नाही. 

लंकेचा राजा रावणाने प्रयत्न केला परंतु ते शिव धनुष्य इतके जड होते की, ते रावणाच्या अंगावर पडले व रावण त्याखाली चिरडला गेला.

परंतु या शिवधनुष्याला श्री रामाने सहज उचलले व दोरी लावली त्यामुळे जानकीने श्रीरामाला माळ घातली.

अशा तऱ्हेने श्रीरामाचे जानकी बरोबर लग्न लागले.

त्याचप्रमाणे भारताचे लग्न गौतमी, लक्ष्मणाचे लग्न उर्मिला तर शत्रुघ्नचे लग्न श्रुतकीर्ती बरोबर झाले.

पुढे दशरथाने श्रीरामाला अयोध्येचा राजा करण्याचा निर्णय घेतला. परंतु दशरथाची पत्नी कैकयीची दासी मंथरा हिने कैकेयी ला तिच्या पुत्राला म्हणजेच भरताला राजा करण्या बाबत सल्ला दिला.

त्यानुसार कैकेयीने राजा दशरथा कडून पूर्वी दोन वचने घेतली होती. त्या वचनांची परतफेड म्हणून राजा दशरथाला श्रीरामाला 14 वर्षे वनवासास पाठवावे व माझा पुत्र भरत यास अयोध्येचा राजा करावे असे सांगितले.

राजा दशरथाचे श्रीरामावर खूप प्रेम होते परंतु वचनात अडकल्यामुळे राजा दशरथाला श्रीरामाला वनवासास पाठवणे भाग पडले.

श्रीराम हे पितृभक्त असल्यामुळे व आदर्श राजपूत्र असल्यामुळे वनवासात जाण्यासाठी निघाले. त्यांच्याबरोबर जानकी आणि लक्ष्मण हेही निघाले. भरत सुद्धा श्रीराम बरोबर वनवासासाठी निघाला.

परंतु राज्याची काळजी घेण्यासाठी कुणीतरी आयोध्या मध्ये राहिले पाहिजे. असे श्रीरामाने भरतास सांगितले. परंतु भारताचे श्रीरामावर अलोट प्रेम होते. त्याने राजगादीवर बसण्यास स्पष्ट नकार दिला. त्या ऐवजी राजगादीवर श्रीरामाच्या पादुका ठेवून श्रीराम परत येईपर्यंत राज्यकारभार करीन असे श्रीरामाला सांगितले.

श्रीराम, जानकी व लक्ष्मण वनवासाला गेल्यानंतर इकडे दशरथ राजाचा श्रीरामाच्या वियोगाने मृत्यू झाला.

श्रीराम, जानकी व लक्ष्मण चित्रकूट पर्वतावर आले आणि तेथून दंडकारण्यात आले. तेथे अनेक ऋषीमुनी यांचे आश्रम होते. तेथे त्यांना अगस्ती ऋषी भेटले. अगस्ती ऋषींनी श्रीरामाचे अदरातीथ्य केले. व त्यांना आपल्या आश्रमात ठेवून घेतले. अगस्ती ऋषी यांनी श्रीरामाला नाशिक जवळील पंचवटी या ठिकाणी आश्रम बांधून राहण्याचा सल्ला दिला.

त्यानुसार श्रीरामाने पंचवटी येथे आश्रम बांधला व तेथे राहू लागले. पंचवटी येथे श्रीराम जानकी आणि लक्ष्मण तेरा वर्षे वास्तव्यास होते.

अजूनही पंचवटी येथे रामकुंड लक्ष्मण कुंड आणि जानकी कुंड प्रसिद्ध आहे तेथे ते दररोज स्नान करीत असत. आजही दर बारा वर्षांनी पंचवटी येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो.

पंचवटी येथील आरण्यात राहणाऱ्या शुर्पनखा हिने लक्ष्मणाला मोहित करण्याचा प्रयत्न केला असता लक्ष्मणाने तिचे नाक आणि कान कापले.

शुर्पनखा ही रावणाची सावत्र बहीण होती. रावणाला हा वृत्तांत कळल्यावर रावणाने सीतेचे अपहरण करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी रावणाने त्याचा मामा मारीच याला बरोबर घेतले.

पंचवटी येथे आल्यावर मारीच याने हरिणाचे रूप घेऊन जानकीच्या आश्रमाजवळून फिरू लागले. जानकीने हरिण पाहिल्यावर श्रीरामाला हरीण मारून त्याच्या कातड्याची चोळी शिवण्यासाठी हरिणाला मारण्यास सांगितले.

श्री रामाने आपले धनुष्यबाण घेऊन हरिणाच्या दिशेने धाव घेतली. पुढे गेल्यावर एकच मोठा आवाज झाला. जानकीने हे ऐकल्यावर तिने लक्ष्मणाला कसला आवाज झाला हे पाहण्यासाठी पाठवले.

ही संधी साधून रावणाने भिक्षुकाचे रूप घेऊन जानकीच्या आश्रमाच्या दारात जाऊन भिक्षा मागितली. जानकी रावणाला भिक्षा घालित असतानाच रावणाने जानकीचे अपहरण केले. 

रावण जानकीला घेऊन जात असताना गिधाडांचा राजा जटायु याने पाहिले आणि रावणाला तीव्र प्रतिकार केला. परंतु रावणाने जटायूचे दोन्ही पंख कापून टाकले व पुढे निघून गेला. ही घटना इगतपुरी जिल्हा नाशिक येथील टाकेद येथे घडली. 

श्रीराम सीतेला शोधत शोधत तिथे आले असता जटायूचा ओरडण्याचा आवाज ऐकला आणि त्या ठिकाणी आले. जटायूचे रक्तबंबळ अवस्था पाहून श्री रामाने जटायुला विचारले तुझी ही अवस्था कोणी केली.

यावर जटायूंनी सर्व वृत्तांत श्रीरामांना सांगितला. रावण हा सीतेला घेऊन लंकेच्या दिशेने गेला आहे हेही सांगितले. जटायुनी श्रीरामांना पाणी मागितले. श्री रामाने धनुष्याला बाण लावून जमिनीमध्ये बाण मारून त्यातून पाणी बाहेर काढले. आणि हेच पाणी श्रीरामांनी जटायूला पाजले. जटायुनी त्यानंतर श्रीरामाच्या मांडीवर प्राण सोडला.

श्रीरामाने जटायूचे अंत्यसंस्कार केले. आणि त्यानंतर सीतेच्या शोधार्थ पुढे निघाले.

त्याचवेळी सुग्रीव याला त्याचा भाऊ वालीने किश्किंधे मधून हुसुकून लावले होते. सुग्रीव हा ऋषमुक पर्वतावर त्याच्या मंत्र्यासह राहत होता. सुग्रीवाने दोन तरुण राजकुमार ऋषमुक पर्वताच्या दिशेने येत आहे हे पाहिले. 

सुग्रीवाला वाटले. बालीनेच या तरुणांना मला ठार मारण्यासाठी पाठवले आहे की काय? यासाठी सुग्रीवाने हनुमंत आणि जांभवन यांना त्या ठिकाणी चौकशीसाठी पाठवले.

हनुमंताने हे दुसरेच राजकुमार असून ते जानकीच्या शोधार्थ निघाले आहेत हे पाहून त्यांनी या दोघांना सुग्रीवाकडे आणले. रामाने सर्व प्रकार सुग्रीवाला कथन केला.

त्यावर सुग्रीव म्हणाला आम्ही जानकीला शोधण्यासाठी तुम्हाला मदत करू परंतु माझी पत्नी माझा भाऊ बाली याने हिसकावून घेतली असून मला राज्याबाहेर हुसकावून लावले आहे. यासाठी मला मदत करा.

श्रीरामाने सुग्रीवाला मदत करण्याचे वचन दिले व सुग्रीवने देखील श्रीरामाला जानकीचा शोध लावण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. अशाप्रकारे दोघांची मैत्री झाली.

त्यानंतर श्रीरामाने बालीला सुग्रीवाची पत्नी परत देण्याचे सांगितले. परंतु बाली तयार झाला नाही. बाली हा अत्यंत शूर होता. तो कुणालाच ऐकत नव्हता.

श्रीराम आणि बाली यांच्यामध्ये युद्ध झाले. शेवटी श्रीरामाने एका बाणाने बालीचा प्राण घेतला.

त्यानंतर श्रीरामाने सुग्रीवाला किस्किंदेचा राजा बनवली आणि बालीच्या मुलगा अंगद याला युवराज केले.

त्यानंतर सुग्रीव, हनुमान, अंगद, जांबुवान, सुमेध, नळ आणि निळ या प्रमुख युद्ध्यांना आणि वानर सैन्यांना घेऊन लंकेच्या दिशेने निघाले.

मजल दरमजल करीत असताना ते समुद्राच्या किनारी आले. लंका बेट हे समुद्राने वेढले असल्यामुळे तेथे कुणालाही जाता येत नव्हते. कुणीच लंकेला जायला तयार होईना.

शेवटी जामुवंताने हनुमानाला त्याच्या ताकदीची आठवण करून दिली. आणि मग हनुमान लंकेला जाण्यासाठी निघाला. पाण्यातून जात असताना हनुमानावर मगरीने हल्ला केला. परंतु  हनुमंताने सूक्ष्म रूप धारण करून मगरीच्या पोटातून तोंडातून बाहेर पडले. त्याही संकटातून वाचून हनुमान लंकेला पोहोचला. 

श्रीलंकेला जाऊन अनेक ठिकाणी जानकीचा शोध घेतला. शेवटी हनुमंताने अशोक वनामध्ये जाऊन सीतेचा शोध घेतला. व ओळख म्हणून हनुमानाने सीतेला रामाची अंगठी दाखवली. व थोड्याच दिवसात जानकीची सुटका करण्याचे आश्वासन दिले. 

त्याचवेळी काही लंका वासियांनी हनुमंताला पाहिले व पकडून रावणापुढे हजर केले. रावणाने हनुमंताच्या शेपटीला कपडे बांधून तेल ओतून पेटवून दिले परंतु हनुमंताने शेपटीला लागलेल्या आगीच्या सहाय्याने लंकेतील घरी पेटवून दिली. व परत श्री रामाकडे आले.

सीतेचा शोध लागल्यावर सर्व वानरसेना लंकेला जाण्यासाठी सिद्ध झाली. समुद्रातून जाण्यासाठी त्यांनी दगडाचा पूल बांधला. आणि त्यावरून प्रवास करून श्रीरामासह वानरसेना लंकेला पोहोचली.

श्रीरामाने वाली पुत्र अंगद याला सीतेला सोडून देण्यासाठी रावणाकडे पाठवले. अंगदाने रावणाला सीतेला सोडून देण्याची विनंती केली. रावणाची पत्नी मंदोदरी हिने सुद्धा रावणाला सीतेला सोडून देण्याचा सल्ला दिला. परंतु रावणाने अंगद आणि मंदोदरी यांची विनंती धुडकावून लावली.

निराश होऊन अंगद परत श्रीरामाकडे आला. याच वेळी रावणाचा भाऊ बिभीषण हा सुद्धा श्रीरामांना येऊन मिळाला. बिभीषणाने श्रीरामांना रावणाचे सर्व कच्चे दुवे सांगितले.

त्यानंतर श्रीरामाच्या सेनेने रावणाला युद्धाचे आमंत्रण दिले. आणि थोड्याच दिवसात प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात झाली.

श्रीरामाच्या सेनेने रावणाचे अनेक सेनापती यमसादनाला पाठवले. 

रावणाचा भाऊ कुंभकर्ण हा रात्रंदिवस झोपत असे. व भूक लागल्यावर जेवण करून पुन्हा झोपत असे.सहा - सहा तो महिने झोपत असे. इतकी त्याला झोप प्रिय होती.

रावणाने कुंभकर्णाला मोठमोठे नगारे वाजवून उठवले व युद्धासाठी पाठवले. कुंभकर्ण हा जरी झोपाळू असला तरी खूप शूर होता. त्याने रणांगणावर खूप पराक्रम केला. परंतु श्रीरामाच्या एका बाणाने त्याचा प्राण घेतला.

रावणाचा भाऊ कुंभकर्ण हा रणांगणामध्ये दारातील ती पडला हे कळतच रावणाला प्रचंड दुःख झाले.

रावणाचे अनेक मोठे मोठे सेनापती व सैनिक मारल्यानंतर रावणाने त्याचा मुलगा इंद्रजीत याला युद्धास पाठवले. 

इंद्रजीताने आकाशात जाऊन ढगांच्या आडून लक्ष्मणावर बाण मारण्यास सुरुवात केली. लक्ष्मण आणि इंद्रजीत यांचे घनघोर युद्ध झाले.

इंद्रजीतचा एक बाण लक्ष्मणाच्या छातीत घुसला आणि लक्ष्मण खाली कोसळला. हे पाहून श्रीरामांना अतिव दुःख झाले. हे पाहून श्रीरामाच्या वानर सैन्याने लक्ष्मणाला सुरक्षित स्थळी नेले. 

वानर सेनेचा वैद्य सुसेन याने संजीवनी वनस्पती मिळाली तर लक्ष्मण वाचण्याची दाट शक्यता आहे. परंतु संजीवनी वनस्पतीही पृथ्वीवर फक्त द्रोणागिरी पर्वतावर आहे. आणि द्रोणागिरी पर्वत इथून खूप लांब आहे. त्यामुळे ही औषधी वनस्पती कशी आणायची हा मोठा प्रश्न उभा राहिला.

संजीवनी वनस्पती आणायला जांभुवंताने हनुमानाला पाचारण केले. आणि थोड्याच वेळात हनुमानाने द्रोनागिरी पर्वताकडे पलायन केले. तिथून हनुमानाने संजीवनी वनस्पतीच्या मुळ्या आणल्या. 

सुशेनाने संजीवनी वनस्पतींच्या मुळ्यांचा  काढा करून लक्ष्मणाला त्याचा रस पाजला व उर्वरित चोथा वाळवून कुटून त्याचा लेप जखमेच्या ठिकाणी लावला.

थोड्याच दिवसात लक्ष्मण शुद्धीवर आला. सर्व सैन्याला प्रचंड आनंद झाला. पुन्हा युद्ध सुरू झाले. लक्ष्मणाने आपल्या एका बाणाने इंद्रजीताचा शिरच्छेद केला. इंद्रजीत धरणीवर पडल्यावर रावणाला आणि मंदोदरीला अतिव दुःख झाले. मंदोदरीने रावणाला खूपच दुशणे दिली. व जानकीला सोडून देण्याचा पुन्हा सल्ला दिला.

तरीही रावणाने मंदोदरीचे ऐकले नाही.

शेवटी रावण एकटाच राहिला आणि तो स्वतः युद्धला जाण्यासाठी सज्ज झाला. श्रीरामाचे आणि रावणाचे तुंबळ युद्ध झाले. कोणीच कुणाला साठत नव्हता.

रावणाचा जीव त्याच्या बेंबी मध्ये आहे हे बिभीषणाने रामाला सांगितले. आणि श्रीरामाने एकाच बाणात बिभीषणाच्या बेंबीवर हल्ला केला. बरोबर बेंबीत बाण घुसल्याने रावण धरणीवर कोसळला. आणि राम राम म्हणत प्राण सोडला.

श्रीरामाने लंकेचे राज्य बिभीषणाला दिले आणि सितेला घेऊन अयोध्येकडे प्रयान  केले. अशी साधी आणि सरळ कथा रामायणामध्ये वर्णन केलेली आहे.

रामायण कथेचे विश्लेषण:

रामायणामध्ये एकूण सात कांड (भाग) आहेत. ही कांडे खालीलप्रमाणे आहेत:

बालकांड: 

बालकांडामध्ये भगवान राम,भरत लक्ष्मण व शत्रुघ्न यांचा जन्म, बालपण, शिक्षण, विश्वामित्रांसोबत राक्षसांचा वध करणे आणि सीतेशी विवाह या घटनांचा समावेश आहे.

अयोध्याकांड: 

या कांडात कैकेयीच्या हट्टामुळे रामाला वनवासात जावे लागते, श्रीरामांच्या वडिलांचा म्हणजेच दशरथाचा पुत्रवियोगाने मृत्यू होतो. भरत रामाला परत अयोध्येला आणण्यासाठी प्रयत्न करतो, इत्यादी वर्णन आहे.

अरण्यकांड: 

राम, जानकी व लक्ष्मण यांचे  वनवासातील जीवन, शूर्पणखा प्रकरण आणि रावणाने सीतेचे केलेले अपहरण या घटनांचा समावेश या कांडात आहे.

किष्किंधाकांड: 

जानकीला शोध घेत असताना राम आणि लक्ष्मणाची किष्किंधेच्या वानर साम्राज्यात सुग्रीव आणि हनुमानाशी भेट होते. सुग्रीवाचा भाऊ वालीचा वध करून सुग्रीवाला राजेपद मिळवून देणे आणि त्या बदल्यात जानकीला शोधण्यासाठी सर्व वानराने मदत करणे इत्यादी या घटना इथे घडतात.

सुंदरकांड: 

हनुमानाचा लंकेचा प्रवास, अशोकवनात सीतेची भेट, लंकादहन आणि रामाला सीतेच्या ठिकाणाबद्दल माहिती देणे, या सर्व महत्त्वाच्या घटना सुंदरकांडात आहेत. हनुमानाला 'सुंदर' असेही म्हटले जाते, म्हणून या कांडाला सुंदरकांड असे नाव मिळाले.

युद्धकांड : 

या कांडात राम आणि रावणादरम्यानच्या युद्धाचे विस्तृत वर्णन आहे, ज्यात रावणाचा वध आणि रामाचा विजय दाखवला आहे.

उत्तरकांड: 

रावणाच्या वधानंतर राम, लक्ष्मण आणि सीता यांचे अयोध्येला परतणे, रामाचे राज्याभिषेक, लव-कुश यांचा जन्म, सीतेचा पृथ्वीत प्रवेश आणि रामाचे स्वर्गारोहण या घटनांचा समावेश उत्तरकांडात आहे.

बालकांड हे सर्वात मोठे कांड आहे, तर किष्किंधाकांड हे सर्वात लहान कांड आहे.

रामायणामधील श्रीराम कसा होता.

आदर्श विद्यार्थी:

श्रीराम व त्यांचे बंधू गुरु वशिष्ठ यांच्या गुरुकुलमध्ये शिक्षण घेत होते. त्यावेळी श्री रामाने आणि त्यांच्या बंधूंनी गुरु वशिष्ठ यांच्या गुरुकुलात शिक्षण घेतले. शिवाय याच काळात ऋषीमुनींना त्रास देणाऱ्या वाईट शक्तींचे पारिपत्य देखील त्यांनी गुरूंच्या आज्ञाने केले.

आदर्श पुत्र:

श्रीरामाला दुसऱ्याच दिवशी अयोध्येचा राजा करण्याचा राज्याभिषेक करण्याचे ठरवले तेव्हा श्रीरामाच्या सावत्र आईने म्हणजेच कैकयीने राजा दशरथाकडे श्रीरामाला 14 वर्षे वनवास तिचा पुत्र भरत यास राजपद द्यावे. अशा दोन मागण्या केल्या. राजा दशरथाचे श्रीरामावर निस्सीम प्रेम असूनही वचनामध्ये अडकल्यामुळे राजा दशरथाची कोंडी झाली.

श्रीरामांना ह्या गोष्टी कळताच त्यांनी तात्काळ वनवासाला जाण्याची तयारी केली. यावरून श्रीरामाचे पितृप्रेम दिसून येते. म्हणजेच मुलगा कसा असावा तर श्रीरामासारखा पितृभक्त असावा.

आदर्श बंधू:

श्रीराम वनवासात निघून गेल्यावर आजोळी असलेल्या भरताला जेव्हा ही गोष्ट कळते. तेव्हा भरत हा श्रीरामाला तात्काळ भेटण्यासाठी अरण्यामध्ये जातो. आणि परत अयोध्येला येण्याविषयी विनवणी करतो. परंतु श्रीरामाने आपले पिताश्री राजे दशरथ हे वचनात अडकले असून त्यांचे वचन पूर्ण करणे कसे आवश्यक आहे हे भरताना पटवून दिले.

यावर भरतानेही मी परत आयोध्याला जातो परंतु श्रीरामा तुझ्या चरण पादुका सिंहासनावर ठेवून राज्यकारभार करीन. व 14 वर्षाने तू परत आल्यावर अयोध्येचे राज्य तुझ्या हवाली करीन असे सांगून भरत परत अयोध्येला आला.

यावरून एकमेकांचे बंधुप्रेम दिसून येते. म्हणजेच भाऊ कसे असावे तर श्रीराम भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न सारखे असावेत.

आदर्श मैत्री:

श्रीराम जेव्हा सीतामाईचे शोधात जात असतात तेव्हा त्यांना हनुमान व सुग्रीव आणि त्यांचे मंत्री भेटतात. राजा सुग्रीव याला श्रीराम मदत करण्याचे वचन देतात. व सुग्रीव देखील श्रीरामाला सीतामाईच्या शोधात मदत करण्याचे वचन देतात.

वचन दिल्याप्रमाणे श्रीराम हे सुग्रीवाला त्याचे राज्य मिळवून देण्यास मदत करतात व सुग्रीव देखील अखेरपर्यंत सीतामाईच्या शोधासाठी श्रीरामांना त्यांच्या सैन्यासह मदत करतात. ही मैत्री अगदी शेवटपर्यंत टिकवून राहते. श्री रामाच्या प्रेमळ, त्यागी वृत्तीने हनुमान प्रभावित होतात. व शेवटपर्यंत व आजही श्रीरामाचे निस्सिम भक्त होतात.

त्याचप्रमाणे श्रीलंकेत रावणाचा भाऊ बिभीषण हे सुद्धा श्रीरामांना येऊन मिळतात व मैत्रीचा हात पुढे करतात. आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा करतात. श्रीराम सुद्धा रावणानंतर बिभीषणाला श्रीलंकेचे राज्य देतात.

मैत्री कशी असावी तर श्रीराम,सुग्रीव, हनुमान व बिबीशन यांच्यासारखी.

आदर्श पती:

वनवासात असताना ज्यावेळेस सीतामाई चे हरण केले जाते. आणि श्रीरामांनाही बाब समजते त्यावेळी श्रीराम हे खूप व्याकुळ होतात व रडू लागतात, सीतामाईच्या आठवणीने ते झाडांना आणि वेलींना तसेच दगडांना आलिंगन देतात. इतके अतिव दुःख त्यांना होते.

नुसतेच दुःख करत न बसता ते सीतामाईच्या शोधार्थ ते जातात. पुढे हनुमान आणि सुग्रीवांच्या मदतीने महापराक्रमी अशा रावणाचा पराभव करून त्यांचा वध करतात.

म्हणजेच पती कसा असावा तर श्रीरामासारखा.

त्यागी वृत्ती:

श्रीराम हे राजपुत्र असूनही व दुसऱ्या दिवशी राज्याभिषेक होणार हे माहीत असू नये, 14 वर्ष राज्याचा त्याग करून वनवासात राहण्याचा निर्णय घेतात. व त्याप्रमाणे अरण्यात राहून फळे आणि कंदमुळे, खाऊन व वल्कले परिधान करून चरीतार्थ चालवतात. हे श्रीरामाकडे खूप मोठी त्यागी वृत्ती होती हे दिसून येते.

दयाळू वृत्ती:

श्री रामाने ज्यावेळी जटायू हा पक्षी रक्ताच्या थारोळ्यात व पंख कापलेल्या अवस्थेत पाहिला त्यावेळी त्यांनी अवस्था कोणी केली असे विचारले तेव्हा जटायू ने सांगितले की आताच रावणाने एका स्त्रीचे हरण करून जाताना मी पाहिले. मी रावणाला पुष्कळ अडवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी माझे पंख छाटले.

त्यावेळी श्रीरामाने मोठ्या प्रेमाने जटायूला मांडीवर घेतले. जटायूने श्रीरामाकडे पाणी मागितले. त्यावेळी श्री रामाने जमिनीत बाण मारून पाणी बाहेर काढले व जटायूला पाजले. आणि त्यानंतर जटायूनी श्रीरामाच्या मांडीवर प्राण सोडला. त्यानंतर जटायू चे सर्व क्रिया कर्म श्रीरामाने पार पाडले. यावरून श्रीरामाचे दयाळू वृत्ती दिसून येते.

प्रेमळ वृत्ती :

पंचवटी येथे असताना मातंग ऋषी यांच्या आश्रमात राहत असलेल्या शबरी नावाच्या भिल्ल कन्येने श्रीरामाला मोठ्या प्रेमाने तिने खाल्लेली उष्टी बोरे दिली. आणि श्रीरामांनी देखील ती बोरे मोठ्या आवडीने खाल्ली. यावरून श्रीरामाचे प्रेमळ वृत्ती दिसून येते.

आदर्श व्यक्तिमत्व:

श्रीराम हे आदर्श व्यक्ती पुरुष होते. ज्यावेळेस श्रीराम वनवासात होते तेव्हा तेथील सर्व आश्रमातील ऋषीमुनीनी श्रीमरामाचे अतिशय चांगल्या प्रकारे आगत स्वागत केले. उत्तम असे मार्गदर्शन केले. श्रीरामांनी सुद्धा त्यांना खूप मदत केली. त्यांना त्रास देणाऱ्या वाईट शक्तींचा बंदोबस्त केला.

त्यामुळे सर्व ऋषीमुनी त्यांना आदर्श व्यक्ती पुरुष तथा देवत्व बहाल केले. हेच श्रीरामाचे श्रेष्ठत्व होय.

त्यामुळेच श्रीरामांचे रामायण हे केवळ महाकाव्य नसून हिंदू धर्माचा पाया मानला जातो.

श्री रामाच्या कालखंडानंतर मौर्यकालीन भारत, गुप्तकालीन भारत त्यानंतर इसवी सनाच्या नंतरच्या राजेशाहया मध्ये श्रीरामांचा इतिहास वर्णिला गेला. व आदर्श राज्य कसे असावे याचा पाया घातला गेला.

परंतु खंडप्राय असलेल्या या भारत देशात  त्यावेळी अनेक राज्य होती. 2800 वर्षाच्या कालखंडात भारतामध्ये अनेक राजेशाही अस्तित्वात आल्या. त्यामुळे या राजेशाहया मधील कवी आणि लेखकांनी मूळ रामायणामध्ये आपापल्या परीने बदल करून ज्याच्या त्याच्या संस्कृतीप्रमाणे रामायणामध्ये भर घातली. 

रामायणामध्ये आदर्श पिता, आदर्श पुत्र, आदर्श बंधू, आदर्श पती व आदर्श राजा कसा असावा याबद्दल भगवान श्रीरामाचे गुण वर्णिले आहेत. त्याचप्रमाणे श्रीरामाचे राज पदाचा यत्किंचितही मोह नसणे, त्यागी वृत्ती, राजा असूनही साधे राहणीमान, आदर्श मैत्री, गरजवंताला सतत मदत करणे, दयाळू वृत्ती,

श्रीराम भगवान महाविष्णूचे अवतार असून ते प्रत्यक्ष परमेश्वरच आहेत. यावर भर देण्यात आलेला आहे.

त्यामुळे हिंदू धर्मात साधारणपणे रामायणामध्ये वर्णन केल्याप्रमाणे प्रत्येकाने स्वतःच्या जीवनामध्ये श्रीरामाचे अनुकरण केले पाहिजे हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. यालाच धर्माचे पालन करणे असेही म्हटले जाते. आणि यावरच हिंदू धर्म आधारलेला आहे.

अर्थात श्रीराम हा महाविष्णूचा अवतार असून परमेश्वर आहे. सर्वसामान्याने श्रीरामा प्रमाणे आचरण केले पाहिजे. हेच यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

रामायण साधारण 2800 वर्षांपूर्वी घडले आहे. रामायणाचा इतिहास हा महर्षी वाल्मिकी यांनी पद्यरूपात म्हणजेच काव्यात्मक लिखाणा मधून केला आहे. त्या काळात काव्यात्मक लिखाण करण्याची पद्धत होती.

2800 वर्षांपूर्वी म्हणजेच इसवी सन पूर्व आठव्या शतकात महर्षी वाल्मिकी यांनी लिहिलेल्या या ग्रंथाची मूळ प्रत मिळणे तसे अशक्यच.

त्यानंतर गुप्तकाळांच्या राज्यात म्हणजेच इसवी सन पूर्व सहाव्या शतकात कालिदासानी लिहिलेल्या रघुवंश या महाकाव्यात श्रीरामाचे चरित्र पुन्हा वर्णन केले आहे.

आजचे रामायण: 

आज जे रामायण आहे त्यामध्ये 2800 वर्षापासून ते आतापर्यंत अनेक कवींनी आणि लेखकांनी अनेक नवीन संदर्भ घालून मोठ्या स्वरूपात बदल केले आहेत. 

भारत हा खंडप्राय देश असल्यामुळे प्रत्येक प्रदेशानुसार मुळ रामायणात ज्याच्या त्याच्या पद्धतीप्रमाणे अनेक बदल केले. त्यामध्ये प्रादेशिक भर टाकून स्वतःचे लिखाण त्यामध्ये घुसडले.

धार्मिक भावनांवर अधिक भर देण्यासाठी, किंवा रामायण कथा अधिक सुरस करण्यासाठी अतिरंजीत, कपोलकल्पित, विविध कल्पना करून त्यामध्ये खूप मोठ्या स्वरूपात भर घातली.

त्याचे उदाहरण द्यायचे तर ज्याने त्याने रामायण हे आपल्या प्रदेशात घडले आहे हे मांडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे रामायण नेमके कोठे घडले याबाबत संभ्रमता निर्माण झाली.

रामाची राजधानी अयोध्या होती. तर रावणाची राजधानी ही श्रीलंका होती. आता अयोध्या ते श्रीलंका हे अंतर सर्वसाधारण दोन हजार किलोमीटर आहे. 

श्रीराम ज्या वेळेस लंकेला गेले. त्यावेळेस ते अयोध्या, चित्रकूट पर्वत, नाशिक जवळील दंडकारण्य, पंचवटी, मध्य प्रदेशातील किष्किंधा म्हणजेच आताची हम्पी या मार्गे ते श्रीलंकेला गेले. या मार्गाने श्रीराम जर गेले असतील तर हा साधारण चार हजार किलोमीटर इतक्या लांबीचा प्रदेश आहे.

दुसरे असे की रावण हा श्रीलंकेत राहत होता. रावणाची सासरवाडी मध्य प्रदेशातील मेरठ या ठिकाणी होती. आता मेरठ ते श्रीलंका हे अंतर सुद्धा साधारण 3500 किलोमीटर इतके येते.

त्याचप्रमाणे रामाची पत्नी जानकी ही मिथिला नगरीच्या जनक राजाची मुलगी होती. मिथिला नगरी हे ठिकाण नेपाळ मध्ये आहे. हे ठिकाण सुद्धा अयोध्येपासून 800 किलोमीटर इतके दूर आहे. 

गुरु वशिष्ठ हे श्रीरामांना घेऊन सीता स्वयंवरासाठी 800 किलोमीटर इतके दूर असलेल्या मिथिलेला गेले असतील का ?

त्याचप्रमाणे सीतेचे हरण करण्यासाठी रावणाने मारीच राक्षसाला हरणाचे रूप घ्यायला सांगितले. असे खरेच घडले असेल का ?

रावणाकडे 72 हजार सैनिक होते. तर मग त्याची जनता किती असेल? ही एवढी लोकसंख्या श्रीलंकेसारख्या बेटावर असणे हेही मनाला पटत नाही. कारण त्यावेळी शून्याचा शोध जर लागला नव्हता तर मग ही गणना कशी केली असेल?

शिवाय रावणाच्या या पुष्पक विमानात रावणाचे 72 हजार कोटी सैनिक बसून हे विमान उड्डाण करीत होते असेही म्हटले आहे.

त्याचप्रमाणे रावणाचा पुत्र इंद्रजीत हा आकाशात उडून ढगांच्या आडून लक्ष्मणाला बाण मारतो असेही सांगितले आहे.

अशा अनेक कित्येक अविश्वसनीय गोष्टी मूळ रामायणामध्ये दरम्यानच्या काळात विविध कवी आणि लेखकांनी त्यांच्या परीने घुसडल्या आहेत. आणि मूळ रामायण अतिरंजीत करण्याचा प्रयत्न केला आहे.

रामायणामध्ये रावणाचे पुष्पक विमान, आक्राळ, विक्राळ राक्षस, त्यांनी प्रचंड मोठे रूप धारण करणे, श्रीरामाने मारलेला बाण 300 योजने दूर जाणे, रावणाचे सैन्य 72 कोटी होते असे सांगणे. रामेश्वर ते श्रीलंका हा 48 किलोमीटरचा पूल बांधणे, पुष्पक विमानात रावणाचे सर्व सैन्य म्हणजेच 72 कोटी बसून प्रवास करणे. अशा अनेक अनाकलनीय, कपोलकल्पित, भ्रामक कल्पना विशद केल्यामुळे रामायण खरंच घडले होते काय असा प्रश्न निर्माण झाला.

त्यामुळे अलीकडचे लोक रामायण हे महाकाव्य आहे प्रत्यक्ष घडलेले नाही असे छातीठोकपणे सांगत असतात व त्यासाठी ही उदाहरणे देत असतात.

रामायण आतापर्यंत 300 भाषांमध्ये प्रकाशित झाले आहे. अनेक कवींनी आणि लेखकांनी त्यांच्या भाषेत रामायण लिहिले आहे. काही ठिकाणी रावणाला लक्ष्मणाने मारले असेही म्हटले गेले आहे.

तथापि, रामायण हे एक अतिशय लोकप्रिय आणि प्रेरणादायी काव्य असल्याने, भारताच्या विविध भाषांमध्ये आणि वेगवेगळ्या काळात अनेक लेखकांनी रामायणावर आधारित स्वतःच्या आवृत्त्या किंवा रूपांतरणे लिहिली आहेत. त्यामुळे "किती लेखकांनी लिहिले" हे सांगणे थोडे कठीण आहे, कारण मूळ रामायण वाल्मीकींनी लिहिले असले तरी नंतर अनेकांनी त्यावर आधारित रचना केल्या आहेत.

काही प्रमुख रामायण आणि त्यांचे लेखक (मूळ वाल्मीकी रामायणाव्यतिरिक्त) खालीलप्रमाणे आहेत:

तुलसीदास: 

यांनी हिंदी भाषेत 'रामचरितमानस' लिहिले, जे उत्तर भारतात खूप लोकप्रिय आहे.

कंबन: यांनी १२ व्या शतकात तमिळ भाषेत 'रामावतारम्' किंवा 'कंब रामायण' लिहिले.

कुमार वाल्मीकी: 

यांनी १४-१५ व्या शतकात कानडीत 'तोरवे रामायण' नावाने रूपांतर केले.

एकनाथ: 

यांनी मराठी भाषेत 'भावार्थ रामायण' हा काव्यग्रंथ लिहिला.

श्रीधरपंत: 

यांनी १८ व्या शतकात मराठी भाषेत रामायण रचले.

कुवेंपु: 

यांनी कानडीत 'श्री रामायण दर्शनम्' लिहिले.

रंगनाथ शर्मा: 

यांनी कानडीत 'कन्नड वाल्मीकि रामायण' लिहिले.

कृत्तिवास ओझा: 

यांनी १४ व्या शतकात बंगाली भाषेत 'कृत्तिवासी रामायण' लिहिले.

बलराम दास: 

यांनी १६ व्या शतकात उडिया भाषेत रामायण लिहिले.

गोविंदसिंग (शिखांचे दहावे गुरू): 

यांनी 'रामावतार' नावाने एक रामायण लिहिले.

याव्यतिरिक्त, मंजुळ रामायण (सुतीक्ष्ण ऋषी), सौपद्य रामायण (अत्री ऋषी), महामाली रामायण (शिव-पार्वती संवाद), सौहाद्र् रामायण (शरभंग ऋषी), मणिरत्न रामायण (वसिष्ठ-अरुंधती संवाद), सौय्य रामायण (हनुमान आणि सूर्य) यांसारखी अनेक रामायणे अस्तित्वात आहेत.

थोडक्यात, मूळ रामायण महर्षी वाल्मीकी यांनी लिहिले असले तरी, रामकथेच्या लोकप्रियतेमुळे आणि सांस्कृतिक प्रभावामुळे अनेक कवी आणि लेखकांनी वेगवेगळ्या भाषांमध्ये आणि त्यांच्या दृष्टिकोनातून रामायणावर आधारित रचना केल्या आहेत.

परंतु रामायण हे खरेच घडले आहे. श्रीरामाच्या पाऊलखुणा आजही ठिकठिकाणी दिसून येतात. हेच या पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

महर्षी वाल्मिकी:

महर्षी वाल्मिकी यांनी लिहिलेले रामायण हे भगवान श्रीरामांच्या जीवनावर आधारित सर्वात महत्त्वाचे आणि प्राचीन महाकाव्य आहे. या महाकाव्यामध्ये श्रीरामांच्या जन्माविषयी सविस्तर वर्णन आले आहे

महर्षी वाल्मीकि यांनी लिहिलेल्या मूळ रामायणामध्ये काळाच्या ओघात मोठ्या प्रमाणात बदल झाले असावेत, असे अनेक संशोधक आणि अभ्यासक मानतात. या बदलांना प्रक्षिप्त भाग असे म्हटले जाते, म्हणजे जे अंश मूळ ग्रंथात नंतरच्या काळात जोडले गेले.

या बदलांची काही मुख्य कारणे आणि स्वरूपे खालीलप्रमाणे आहेत:

मौखिक परंपरा आणि हस्तलिखिते:

रामायण हे सुरुवातीला मौखिक परंपरेतून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेले. या प्रक्रियेत आणि नंतर हस्तलिखितांच्या नकला करताना काही बदल, भर किंवा वगळणे झाले असण्याची शक्यता आहे.

उत्तरकांडाचा समावेश: 

अनेक विद्वानांच्या मते, रामायणाचे सातवे कांड, म्हणजेच उत्तरकांड, हे मूळ रामायणाचा भाग नव्हते. ते नंतरच्या काळात जोडले गेले आहे. उत्तरकांडातील काही कथा, विशेषतः सीतेचा त्याग आणि लव-कुश यांच्या कथा, मूळ रामायणातील रामाच्या चारित्र्याशी काही प्रमाणात विसंगत वाटतात, असे अभ्यासकांचे मत आहे.

धार्मिक आणि तात्विक भर: 

रामायणाला केवळ एक महाकाव्य म्हणून न पाहता, एक धर्मग्रंथ म्हणून महत्त्व प्राप्त झाले. त्यामुळे त्यात धार्मिक उपदेश, तात्विक चर्चा आणि चमत्कारांची भर पडली असावी.

प्रादेशिक आणि सांस्कृतिक प्रभाव:

भारताच्या विविध भागांमध्ये आणि इतर आशियाई देशांमध्ये रामायणाच्या अनेक स्थानिक आवृत्त्या विकसित झाल्या. या आवृत्त्यांमध्ये स्थानिक संस्कृती, चालीरीती आणि श्रद्धा यांचा प्रभाव दिसून येतो, ज्यामुळे मूळ कथानकात बदल झाले.

आलोचनात्मक संस्करण: 

भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट (BORI), पुणे यांनी वाल्मीकि रामायणाचे एक आलोचनात्मक संस्करण तयार केले आहे. या संशोधनात विविध हस्तलिखितांचा अभ्यास करून मूळ पाठ शोधण्याचा प्रयत्न केला गेला आहे. यातून असे दिसून येते की, मूळ रामायणात नंतरच्या काळात अनेक भाग जोडले गेले आहेत.

यामुळे, आज आपल्याला जे वाल्मीकी रामायण उपलब्ध आहे, त्यात मूळ वाल्मीकिंनी लिहिलेला भाग आणि नंतरच्या काळात जोडले गेलेले अंश दोन्ही समाविष्ट आहेत. 

मूळ वाल्मिकी रामायणामध्ये साधारण नऊ हजार श्लोक आहेत. परंतु आता आपण जे रामायण वाचतो त्यामध्ये 24 हजार श्लोक आहेत. म्हणजेच पंधरा हजार अतिरिक्त श्लोकांची मूळ रामायणा मध्ये भर पडल्यामुळे ते अतिरंजीत झाले आहे.

श्री.प्रभू रामचंद्र यांचा कार्यकाल जाणून घेण्यासाठी प्रथम आपणास हडप्पा संस्कृतीचा अभ्यास करावा लागेल.

हडप्पा संस्कृती:

हडप्पा संस्कृतीचा कालखंड लिबी यांच्या कार्बन 14 या शास्त्रीय पद्धतीनुसार इ.स.पू. 2700 ते इ.स.पूर्व 1500 असा मानला जातो.

हडप्पा संस्कृतीत उत्खननात सापडलेल्या विविध मुद्रा, मूर्ती, अग्निकुंड, मृतांना पुरण्याची पद्धत यावरून त्यांच्या धार्मिक कल्पनेची माहिती मिळते. लोकांची प्रामुख्याने शेतीवरती उपजीविका असल्याने लोक भूमातेस मातृदेवता मानत. त्यांच्या धार्मिक जीवनात निसर्ग शक्तीस महत्त्वाचे स्थान होते. सूर्य, जल, अग्नी, वृक्ष यांची ते पूजा करत. कालिबंगन येथे सापडलेल्या अग्निकुंडा वरून ते अग्निपूजा करत असल्याचे दिसते.

निसर्गदेवतेप्रमाणेच पशुपती म्हणजेच शिव, नाग, वृषभ म्हणजे बैल यांचीही ते पूजा करत होते. लोक मूर्तिपूजक होते, मात्र हडप्पा संस्कृतीत मंदिरे आढळली नाहीत.

हडप्पा येथे सापडलेल्या पशुपती आणि बैलांच्या मूर्ती पाहता सिंधू संस्कृतीची लोक शिवाची पूजा करत होते असे अनुमान काढता येते. म्हणजेच भगवान शिव हे देवता किती प्राचीन आहे याची कल्पना येते.

हडप्पा आणि मोहेंजोदडो येथे सापडलेल्या अवशेषांमध्ये प्रभू रामचंद्राची मूर्ती अथवा मंदिर किंवा इतर कोणतेही वस्तू अथवा अवशेष सापडलेले नाही. हडप्पा येथे सापडलेल्या अवशेषांमध्ये गाय, बैल, शेळी या प्राण्यांचे अवशेष सापडले आहेत. 

परंतु घोड्याची कोणतेही अवशेष सापडले नाही. त्या काळात जी शिल्प सापडली. त्यावर घोड्याचे कोणतेही चित्र आढळले नाही. याचा अर्थ हडप्पा काळातील लोकांना घोडा माहीत नव्हता. 

परंतु रामायण काळात घोड्याचा उल्लेख आहे. याचा अर्थ हडप्पा संस्कृतीच्या नंतर रामायण काळ झाला असावा असे स्पष्ट होते.

हडप्पा संस्कृतीचा शेवटचा काळ जर इसवी स.पू. 2000 ते 1500 चा जर मानला तर मग रामायण काळ केव्हाचा असेल याचे अनुमान काढूया.

ऋग्वेद:

ऋग्वेदात अश्वमेध वगेरे यज्ञाचा उल्लेख आहे. यावरून असे सांगता येते की ऋग्वेद हा, घोडा आपल्याकडे आल्या नंतरचाच असावा. घोडा हा आर्याचा अत्यंत लाडका प्राणी. परंतु हडप्पा काळात घोडा नव्हता हे उत्खननांमधून सिद्ध झाले आहे. त्यामुळे हडप्पा काळातील संस्कृतीमध्ये ऋग्वेद देखील नव्हता. म्हणजेच ऋग्वेद हा ग्रंथ हडप्पा संस्कृतीच्या नंतरच्या काळातील आहे.

लोखंड:

ऋग्वेदात लोखंडाचा उल्लेख नाही. मग आपल्याकडे लोखंड केव्हा आले याचा अगदी अलीकडचा पुरावा म्हणजे इसवी सन पूर्व 1500 च्या सुमारास भारतात लोखंड सापडते. अलाहाबाद, बिहार या भागात तशा खाणीही सापडल्या आहेत. 

निष्कर्ष:

त्यावरून हा काळ काढता येतो. म्हणजे ऋग्वेद हा इसवी सन पूर्व 1500 च्या आधीचा आहे, हे सांगता येते. घोडा आपल्या कडे कधी आला, याचे उत्तर इसवी सन पूर्व 1500 च्या नंतर असे सांगता येते, कारण त्यापूर्वी त्याचा उल्लेख कुठेही सापडत नाही.

त्यावरून इसवी सन पूर्व 2000 ते 1500 याच्या मधला काळ साधारणपणे ऋग्वेदाचा सांगता येईल.

रामायण काळात कपडे होते, दागिने होते, लोखंडाचे धनुष्यबाण होते, घोडे होते, रथ होते, ज्या अर्थी रामायणामध्ये लोखंडाच्या वस्तू होत्या, त्याअर्थी लोखंडाचा शोध लागून त्याची विविध हत्यारे बनवली जात होती.

इसवी सन पूर्व 1500 च्या आसपास जर लोखंड अस्तित्वात होते. त्या अर्थी तेव्हा लोखंडाच्या वस्तू बनवल्या जात असाव्यात. परंतु इसवी सन पूर्व 1600 मध्ये लोखंडाचा कुठेही उल्लेख नाही.

म्हणजेच रामायण काळ हा इसवी सन 

पूर्व 1500 च्या नंतरचा मानायला काहीच हरकत नाही.

जातिव्यवस्था:

आर्यांच्या काळात वर्ण व्यवस्था अस्तित्वात होत्या. ब्राह्मण, वैश्य आणि शूद्र परंतु रामायण काळ जर पाहिला तर त्या काळात लोखंडाच्या वस्तू बनवणारे लोहार होते. 

रथ बनवणारे किंवा लाकडी राजवाडा यांचे खांब बनवणारे आणि लाकडी वस्तू बनवणारे सुतार होते.

मडकी किंवा मातीची भांडी बनवणारे कुंभार होते.

त्याचप्रमाणे रामायणामध्ये धोब्याचाही उल्लेख आलेला आहे. याचा अर्थ असा होतो. आर्यानंतर हळूहळू वर्णव्यवस्थेचे जातीव्यवस्थेमध्ये रूपांतर झाले होते. म्हणजेच रामायण काळ हा सिंधू संस्कृती नंतरचा असावा हेही सिद्ध होते.

रामायण खरे घडले आहे की केवळ महाकाव्य:

आपण आज अनेक काव्य रचना वाचतो. या काव्यरचना बहुधा एकांगी असतात. कुठल्यातरी एकाच विषयावर प्रकाश टाकला जातो. आणि त्यावरच काव्य फुलवत फुलवत नेऊन त्याचा शेवट केला जातो. 

महाकवी कालिदासांनी आपली महाकाव्ये साधारणपणे इसवी सनाच्या चौथ्या किंवा पाचव्या शतकात, म्हणजेच गुप्त काळात लिहिली असावीत असे मानले जाते. 

परंतु गुप्तकाळ हा भारतीय इतिहासातील सुवर्णयुग' मानला जातो आणि कालिदासांच्या साहित्यात गुप्तकालीन वैशिष्ट्ये दिसून येतात.

त्यांची प्रमुख महाकाव्ये आणि त्यांचे विषय खालीलप्रमाणे आहेत: 

याव्यतिरिक्त, कालिदासांनी खंडकाव्ये, लघुकाव्ये आणि नाटके देखील लिहिली आहेत. त्यांची काही इतर प्रसिद्ध काव्ये अशी आहेत:

कुमारसंभव

हे महाकाव्य भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा विवाह आणि त्यांचा पुत्र कार्तिकेय याच्या जन्मावर आधारित आहे. तारकासुर नावाच्या राक्षसाला मारण्या साठी कार्तिकेयाचा जन्म कसा आवश्यक होता आणि शिव-पार्वतीच्या प्रेमकथेचा प्रवास यात वर्णन केला आहे.

रघुवंश:

हे एक मोठे महाकाव्य आहे ज्यात रघू वंशातील अनेक महान राजांचे, विशेषतः श्रीराम आणि त्यांच्या पूर्वजांचे तसेच वंशजांचे विस्तृत वर्णन केले आहे. यात दिलीप राजापासून सुरू होऊन अनेक पिढ्यांचा आदर्शवाद आणि सत्यता दर्शविली आहे.

याव्यतिरिक्त, कालिदासांनी खंडकाव्ये, लघुकाव्ये आणि नाटके देखील लिहिली आहेत. त्यांची काही इतर प्रसिद्ध कामे अशी आहेत:

मेघदूत

हे एक खंडकाव्य आहे. यात कुबेराने शाप दिलेल्या एका यक्षाची कथा आहे, जो आपल्या पत्नीला (अलका नगरीत) मेघाला दूत बनवून प्रेम संदेश पाठवतो. यात यक्ष मेघाला आपल्या प्रवासाचा मार्ग आणि वाटेत येणाऱ्या निसर्गाचे सुंदर वर्णन करतो.

ऋतुसंहार

या खंडकाव्यात वर्षातील सहा ऋतूंचे आणि त्यांच्या बदलांचे सुंदर वर्णन आहे.

अभिज्ञानशाकुंतलम

हे कालिदासांचे सर्वात प्रसिद्ध नाटक आहे. यात दुष्यंत राजा आणि शकुंतला यांच्या प्रेमकथेचे आणि त्यांच्या विरहाचे मार्मिक वर्णन आहे.

मालविकाग्निमित्रम

हे कालिदासांचे पहिले नाटक मानले जाते, ज्यात राजा अग्निमित्र आणि मालविका यांच्या प्रेमकथेचे वर्णन आहे.

विक्रमोर्वशीयम

हे राजा पुरुरवा आणि अप्सरा उर्वशी यांच्या प्रेमकथेवर आधारित नाटक आहे.

कालिदासांच्या साहित्यात निसर्ग वर्णन, मानवी भावना आणि भारतीय संस्कृतीचे सुंदर चित्रण आढळते.

निष्कर्ष:

महर्षी वाल्मिकी आणि महर्षी व्यास यांना जरी महाकाव्याचे जनक मानले जात असले तरी त्यानंतर कालिदास यांनी अनेक महाकाव्य व नाटकांची रचना केली. 

आपल्याकडे एक पद्धत असते. सर्वसाधारण मागील साहित्याची रचना कशी केली आहे त्यावरून आपण पुढे चालत असतो.

महर्षी वाल्मिकी आणि महर्षी व्यास यांची खंड काव्य आणि कालिदास यांची महाकाव्य रचना यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. 

कालिदासांच्या खंडकाव्यात एकच कथा फुलवत फुलवत नेली आहे. व त्या कथेचा शेवट केला आहे.

कालिदासांना गुप्तकालीन राजांचे पाठबळ होते. राजकीय वरदहस्त होता. म्हणूनच त्यांनी या सर्व काव्यरचना केल्या. त्या काळात अशिक्षित असलेला समाज या काव्यरचना वाचू शकत नव्हता. 

रामायण महाभारत हे महाकाव्य नसून दैदीप्यमान इतिहासच:

परंतु रामायण आणि महाभारत यांचा जर विचार केला तर सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत अनेक बारीक सारीक माहितीचे वर्णन केले आहे. 

कालिदासांना जसा गुप्तकालीन राजांचे पाठबळ होते, तर मग महर्षी वाल्मिकी आणि महर्षी व्यास यांनी एवढी मोठी खंड काव्य कुणाच्या आधारावर लिहिली. कारण तेव्हा वाचक वर्ग कोण होता? याचाही विचार करावा लागेल. 

रामायण आणि महाभारताचे टीकाकार, आणि इतिहासकार किंवा अभ्यासक रामायण आणि महाभारत हे महाकाव्य आहे. प्रत्यक्ष इतिहास नाही असे म्हणून रामायण घडलेच नाही असे सांगून मोकळे होतात. 

मग ही महाकाव्य लिहिण्यासाठी वाल्मिकी आणि व्यास यांना कोणत्या राजाने पाठबळ दिले. आणि ही काव्य वाचायला भारतामध्ये त्यावेळी कोणता वाचक वर्ग होता, शिक्षणाच्या कोणत्या सुविधा होत्या हे मात्र सांगत नाहीत. 

मुघलांचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासा पासून अगदी अलीकडील काळापर्यंत इतिहासाच्या सर्व नोंदी आपल्याकडे नोंदविलेल्या आहेत. या सर्व नोंदी विस्तृत आणि बारीकसारीक माहितीच्या नोंदी केलेल्या आहेत. त्यामुळे आपण हा इतिहास खोटा अथवा चुकीचा मानू शकत नाही.

आणि रामायणामध्ये अगदी भगवान श्रीरामाच्या चाळीस पिढ्यापासून प्रत्येक राजाच्या नावानिशी माहितीचे वर्णन केले आहे. शिवाय ते वनवासात जाण्यापासून ते परत येईपर्यंतचा सर्व बारकाव्यांशी माहिती वर्णन केली आहे. शिवाय यासाठी अनेक संदर्भ दिले आहेत. 

आपण पाहतो नवव्या आणि दहाव्या शतकात नाथ संप्रदाय अस्तित्वात होता. या शतकातील नाथांच्या घडलेल्या घटना मालूकवी यांनी नवनाथ ग्रंथात इसवी सन सतराशे मध्ये केलेल्या आहेत.

याचाच अर्थ रामायण काळ घडून गेल्या नंतर अनेक वर्षांनी ऐकीव माहितीच्या आधारे रामायण लिहिले असावे. 

त्या काळामध्ये संस्कृत ही भाषा यशाच्या शिखरावर होते त्यामुळे कोणतेही लेखन हे अनुष्टूप छंदामध्ये लिहिले जात असे. म्हणूनच रामायण हा ग्रंथ सुद्धा किंवा इतिहास म्हणा हवं तर.

हे अनुष्टूप छंदामध्ये संस्कृत भाषेत श्लोकांमधून लिहिले गेले. गद्य प्रकार हा नंतर अस्तित्वात आला. आता इतिहास हा गद्य स्वरूपात लिहिला जातो. असे असताना रामायण काळाला महाकाव्य म्हणून तो इतिहास नाही हे म्हणणे वेडेपणाच नाही काय?

एक हात काकडी नऊ हात बी:

आपल्याकडे एक म्हण आहे एक हात काकडी नऊ हात बी. म्हणजे एखादी गोष्ट छोटी असली तर शेवटच्या व्यक्तीपर्यंत ती मोठी मोठी होत जाते.

भारतीय खंडप्राय देशांमध्ये इसवी सन पूर्व सहाव्या शतकापासून ते इसवी सन सोळाव्या शतकापर्यंत अनेक राजघराणी उदयास आली. त्यांच्या कार्यकाळात अनेक कवी आणि लेखक यांनी प्रादेशिक भाषेमध्ये मूळ रामायण ग्रंथांचे आपापल्या भाषेमध्ये आपापल्या पद्धतीनुसार भाषांतर केले त्यामध्ये त्यांनी अनेक प्रादेशिक दंतकथा घुसडल्या गेल्या.

प्रभू रामचंद्रांच्या चाळीस पिढ्या:

प्रभु श्रीरामांची वंशावळ

०० - ब्रह्मा

०१ - मरीची.

०२ - कश्यप.

०३ - विवस्वान.

०४ - वैवस्वत मनु.याच्याच काळात जलप्रलय झाला.

०५ - इक्ष्वाकु याने अयोध्याला इक्ष्वाकु कुळाची स्थापना केली

०६ - कुक्षी.

०७ - विकुक्षी.

०८ - बाण.

०९ - अनरण्य.

१० - पृथु.

११ - त्रिशंकु.

१२ - धुंधुमार.

१३ - युवनाश्व.

१४ - मान्धाता.

१५ - सुसंधी.

१६ - ध्रुवसंधी व प्रसेनजित.

१७ - भरत.

१८ - असित.

१९ - सगर.

२० - असमंज.

21 अंशुमान.

२२ - दिलीप.

२३ - भगीरथ.यानेच गंगा पृथ्वीवर आणली.

२४ - ककुत्स्थ.

२५ - रघु. हा अत्यंत तेजस्वी, न्यायनिपुण, पृथ्वीवरचा पहिला ज्ञात चक्रवर्ती होता. म्हणूनच इक्ष्वाकू कुळ हे रघुकुळ म्हणुन प्रसिद्ध झाले

२६ - प्रवृद्ध.

२७ - शंखण.

२८ - सुदर्शन.

२९ - अग्निवर्ण.

३० - शीघ्रग.

३१ - मरु. 

याच्या सत्तेने आताचे अरब स्तान मरुधर, मरुस्थान किंवा मरू भूमी म्हणून ओळखले जायचे

३२ - प्रशुश्रुक.

३३ - अम्बरीष.या राजाने कायम संन्यस्त असावे याचा परिपाठ घातला.

३४ - नहुष.यांच्यापासुन कुरुवंश सुरू होतो

३५ - ययाति.

३६ - नाभाग.

३७ - अज.

३८ - दशरथ.

३९ - दशरथचे चार पुत्र

३९ - दशरथचे चार पुत्र

राम, भरत, लक्ष्मण व शत्रुघ्न.

ब्रह्माच्या ४० व्या पीढ़ीत श्रीराम जन्मले.

अयोध्या नगरी :

श्री प्रभू रामचंद्राच्या इक्ष्वाकु पूर्वजांनी या नगराची स्थापना केली. या नगरीचे सुरुवातीचे नाव कोसल असे होते. 

पाणिनीची अष्टाध्यायी आणि त्यावर पतंजली यांचे भाष्य यासारख्या प्राचीन संस्कृत ग्रंथांमध्ये मात्र साकेत असा उल्लेख आहे. 

महर्षी व्यास लिखित ब्रह्मांड पुराणातील एका श्लोकात अयोध्याचे नाव सर्वात पवित्र आणि सर्वात महत्वाचे अयोध्या नगर असा आला आहे. 

येथे मोठ्या प्रमाणात गुप्त साम्राज्याची नाणी सापडली आहेत. म्हणजेच पूर्वीच्या काळात अयोध्या ही गुप्त साम्राज्याची राजधानी होती हेही मान्य करावे लागेल.

पाणिनी ऋषी:

पाणिनी ऋषींचा काळ हा निश्चितपणे सांगणे थोडे कठीण आहे, कारण विद्वानांमध्ये याबाबत मतभेद आहेत. मात्र, बहुतांश विद्वानांच्या मते इ. स. पूर्व ५ वे किंवा ६ वे शतक हा त्यांचा काळ मानला जातो. काही संशोधकांनी त्यांचा काळ इ.स. पूर्व ८ व्या शतकापर्यंत मागे नेला आहे. 

त्यांच्या "अष्टाध्यायी" या संस्कृत व्याकरणावरील ग्रंथावरून, ते एका अत्यंत प्रगत भाषिक परंपरेचे प्रतिनिधित्व करत होते हे स्पष्ट होते. त्यांच्या कार्यामुळे संस्कृत भाषेला एक निश्चित आणि सुव्यवस्थित व्याकरण मिळाले, जे आजही प्रामाणिक मानले जाते.

निष्कर्ष:

पाणीनी ऋषींनी लिहिलेल्या अष्टाध्यायी या संस्कृत व्याकरणातील ग्रंथांमध्ये अयोध्येचे नाव साकेत असे आहे. म्हणजेच कोसल हे नाव बदलून या नगरीचे नाव साकेत असे ठेवले गेले.

पाणीणी ऋषींचा कार्यकाल जर इसवी सन पूर्व आठवे शतक मानला तर हा आयोध्या नावाच्या आधीचा कार्यकाल आहे. 

म्हणजेच साकेत या नगरीचे नाव नंतरच्या काळात आयोध्या असे ठेवले गेले आहे. याचाच अर्थ रामायणाचा काळ हा इसवी सन पूर्व आठव्या शतकाच्या नंतरचा असू शकतो.

दुसरा निष्कर्ष असा काढू जर श्री प्रभू रामचंद्राच्या पाचव्या वंशजाने म्हणजेच इक्ष्वाकुने जर कोसल येथे नगर वसवले. त्यानंतर. पुढील काळात कोसलचे साकेत आणि साकेतचे आयोध्या असे नाव बदलले गेले.

श्री.रामाचा अचूक कालावधी:

आपण सर्वसाधारणपणे वीस वर्षाची एक पिढी मानूया.100 वर्षात साधारण पाच पिढ्या आपण समजूया. जर इक्ष्वाकुने इसवी सन पूर्व 1500 मध्ये कोसल येथे राजधानी स्थापन केली असेल तर आपण साधारण पस्तीस पिढ्या मागे येऊया. कारण 40 पैकी पाच पिढ्या आधीच घडून गेल्या होत्या.

35 भागिले 5 म्हणजेच 700 वर्षे मागे आलो. म्हणजेच इसवीसन पूर्व 1500 - 700 = 800 म्हणजेच इसवी सन पूर्व आठवे शतक. म्हणजेच श्रीराम प्रभूचा अचूक कालावधी होय. 

कारण पाणीणी ऋषी हे आठव्या शतकात होऊन गेले. त्यावेळेस अयोध्येचे नाव साकेत असे होते. आणि त्यानंतर अयोध्या हे नाव बदलले गेले आहे. म्हणजेच हा बदल इसवी सन पूर्व आठव्या शतकाच्या उत्तरार्धात झाला असावा. आणि त्यानंतर रामायणाचा काळ म्हणजेच आठव्या शतकाचा उत्तरार्ध होय.

इसवी सन पूर्व आठव्या शतकात भारतात अनेक छोटी-मोठी राज्ये, आणि गणराज्ये अस्तित्वात होती. त्यानंतर पुढच्या दोन शतकात म्हणजेच सातव्या आणि सहाव्या शतकात महाजनपदे उदयास येऊ लागली, जी मोठ्या आणि शक्तिशाली राज्यांची सुरुवात होती.

इसवी सन पूर्व सहाव्या शतकातील भारतातील राज्य :

मगध

हे सर्वात महत्त्वाचे आणि शक्तिशाली महाजनपद होते. त्याची राजधानी पाटलीपुत्र होती.

कोसल

हे देखील एक मोठे महाजनपद होते, जे नंतर मगधमध्ये विलीन झाले.

वत्स

हे एक महत्त्वाचे राज्य होते.

अवंती

उज्जैन ही त्याची राजधानी होती.

वृज्जी (लिच्छवींसह): 

हे एक गणराज्य होते, ज्याची राजधानी वैशाली होती. नंतर मगधचा राजा अजातशत्रूने हे राज्य जिंकले.

गांधार

सिंधू नदीच्या परिसरात असलेले हे राज्य होते आणि त्याची राजधानी तक्षशिला होती.

कुरु

महाभारतात उल्लेख केलेले एक प्रसिद्ध आर्य जमातीचे राज्य.

पांचाल

हे देखील एक आर्य जमातीचे राज्य होते.

मत्स्य

हे एक गणराज्य होते.

अंग

बिंबिसाराने अंग जिंकून मगधमध्ये विलीन केले.

कंबोज

हे देखील एक महत्त्वाचे राज्य होते.

शाक्य गणराज्य: 

गौतम बुद्धांचे जन्मस्थान असलेले हे एक गणराज्य होते.

अश्मक

हे गोदावरी नदीजवळचे एक राज्य होते.

सूरसेन

मथुरा ही त्याची राजधानी होती.

या काळात भारतातील राजकीय आणि सांस्कृतिक केंद्र पंजाबमधून गंगा नदीच्या खोऱ्यात सरकत होते. लोह उत्पादन आणि सुपीक जमीन यामुळे या प्रदेशात मोठ्या राज्यांचा उदय झाला.

या शतकात प्रमुख राजकीय सत्ता म्हणजेच महाजनपदे उदयास आली. बौद्ध आणि जैन ग्रंथांमध्ये सोळा महाजनपदांचा उल्लेख आढळतो. ही महाजनपदे खालीलप्रमाणे होती:

मगध:

हे सर्वात शक्तिशाली महाजनपद होते. सध्याच्या बिहार राज्यातील पाटणा आणि गया जिल्ह्यांचा प्रमुख भाग यात समाविष्ट होता. त्याची सुरुवातीची राजधानी राजगृह होती. 

मगध मध्ये शेती मोठ्या प्रमाणात उत्पादन क्षम होती आणि लोह-समृद्ध प्रदेशांशी त्याची जवळीक होती, ज्यामुळे त्यांना चांगली शस्त्रे तयार करण्यास मदत झाली.

कृषी आणि व्यापार: या काळात शेतीचा विकास झाला आणि व्यापार वाढला, ज्यामुळे राज्यांची आर्थिक स्थिती सुधारली.

लोखंडाचा वापर: 

लोखंडाचा वापर शेती आणि युद्धात मोठ्या प्रमाणात होऊ लागला, ज्यामुळे मोठ्या राज्यांच्या विस्ताराला मदत झाली.

राजधानीचे शहर आणि किल्ले: 

अनेक राज्यांमध्ये राजधानीची शहरे होती जी किल्लेबंद होती.

एकंदरीत, इसवी सन पूर्व सातवे आणि सहावे शतक हे प्राचीन भारतातील राजकीय आणि सामाजिक परिवर्तनाचे महत्त्वपूर्ण शतक होते, ज्यामध्ये लहान राज्यांमधून मोठ्या महाजनपदांचा उदय झाला आणि पुढे मगधने प्रमुख सत्ता म्हणून आपले वर्चस्व स्थापित केले

राजा दशरथ:

राजा दशरथ हे अयोध्येचे इक्ष्वाकू कुलोत्पन्न (सूर्यवंशी) राजा होते आणि भगवान श्रीरामाचे वडील म्हणून ओळखले जातात. त्यांच्याबद्दलची काही प्रमुख माहिती खालीलप्रमाणे:

वंश आणि जन्म:

राजा दशरथ हे राजा अज आणि राणी इंदुमती यांचे पुत्र होते.

ते इक्ष्वाकू वंशातील होते, ज्याची स्थापना वैवस्वत मनुने केली होती.

राज्य आणि राजधानी:

दशरथांच्या राज्याचे नाव कोसल होते आणि त्याची राजधानी अयोध्या होती, जी पवित्र शरयू नदीच्या काठी वसलेली होती.

अयोध्या नगरी सुंदर आणि समृद्ध होती.

गुण आणि स्वभाव:

राजा दशरथ हे अत्यंत पराक्रमी योद्धा होते आणि त्यांना 'शब्दभेदी बाण' चालवण्याचे ज्ञान होते.

ते वेद जाणणारे, धर्मनिष्ठ, दयाळू, रणकुशल आणि आपल्या प्रजेचे मुलांप्रमाणे पालन करणारे होते.

ते आपल्या वचनांचे पालन करणारे आणि सत्यप्रतिज्ञ होते.

पत्नी आणि पुत्र:

राजा दशरथांना तीन मुख्य पत्नी होत्या:

कौसल्या

या कोशल नरेश सुकौशल माहराज यांची कन्या होत्या.

सुमित्रा

या काशी नरेश यांची कन्या होत्या.

कैकेयी

या कैकय नरेश अश्वपती सम्राट यांची कन्या होत्या.

पुत्रप्राप्तीसाठी त्यांनी अश्वमेध यज्ञ आणि पुत्रकामेष्टी यज्ञ केले. या यज्ञांमुळे त्यांना चार पुत्ररत्ने प्राप्त झाली:

राम

कौसल्याचे पुत्र, जे भगवान विष्णूंचे अवतार मानले जातात.

भरत

कैकेयीचे पुत्र.

लक्ष्मण आणि शत्रुघ्न: 

सुमित्रेचे पुत्र.

काही मतांनुसार, महर्षी ऋष्यशृंग यांची पत्नी शांता ही राजा दशरथांची दत्तक कन्या होती, जी अंग देशाचे राजा रोमपाद यांना दत्तक दिली गेली होती.

श्रावणकुमाराचा शाप:

राजा दशरथ तरुण असताना, 'शब्दभेदी बाणा'मुळे त्यांच्या हातून श्रावणकुमारचा वध झाला होता.

श्रावणकुमाराच्या आई-वडिलांनी दशरथांना जसे आम्हाला पुत्रवियोगाने दुःख भोगावे लागत आहे, तसेच तुलाही पुत्रवियोगाने मरण येईल असा शाप दिला होता. हा शाप पुढे श्रीरामांच्या वनवासामुळे दशरथांच्या मृत्यूचे कारण ठरला.

श्रीरामांच्या वनवासाचे कारण आणि दशरथांचा मृत्यू:

कैकेयीने आपल्या दासी मंथरेच्या सांगण्यावरून राजा दशरथांकडून दोन वर मागितले: भरताला राज्याभिषेक आणि रामाला चौदा वर्षांचा वनवास.

वचनबद्ध असल्याने, राजा दशरथांना नाईलाजाने श्रीरामाला वनवासात पाठवावे लागले.

श्रीरामांच्या विरहाने दशरथ अत्यंत दुःखी झाले आणि शेवटी त्यांनी 'राम-राम' म्हणत आपल्या प्राणांचा त्याग केला.

राजा दशरथांचे जीवन हे वचनबद्धता, पुत्रप्रेम आणि नियतीच्या अटळतेचे एक मोठे उदाहरण मानले जाते.

श्री रामाचा जन्म चैत्र शुद्ध नवमीला झाला हे अनेक हिंदू धर्मग्रंथ, परंपरा आणि ऐतिहासिक नोंदींच्या आधारे सांगितले जाते. यामध्ये प्रामुख्याने खालील गोष्टींचा समावेश होतो.

श्रीराम,भरत, लक्ष्मण व शत्रुघ्न यांचा जन्म :

वाल्मिकी रामायण हा भगवान श्रीरामांच्या जीवनावर आधारित सर्वात महत्त्वाचा आणि प्राचीन ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये श्रीरामांच्या जन्माविषयी सविस्तर वर्णन आले आहे. विशेषतः बालकांडातील १८ व्या सर्गात श्रीरामांच्या जन्माच्या वेळी ग्रह-नक्षत्रांची स्थिती आणि तिथीचे वर्णन केले आहे.

ततो यज्ञे समाप्ते तु ऋतूनां षट् समत्ययुः | ततश्च द्वादशे मासे चैत्रे नावमिके तिथौ || १-१८-८"

या श्लोकानुसार, पुत्रकामेष्टी यज्ञ समाप्त झाल्यानंतर सहा ऋतू उलटले आणि बाराव्या महिन्यात, म्हणजेच चैत्र महिन्यात, नवमी तिथीला श्रीरामांचा जन्म झाला.

याशिवाय, वाल्मिकींनी पुनर्वसू नक्षत्रात आणि कर्क राशीत श्रीरामांचा जन्म झाल्याचे नमूद केले आहे. जन्माच्या वेळी पाच ग्रह उच्च स्थानी होते असेही सांगितले आहे.

मूळ वाल्मिकी रामायणानुसार, भगवान श्री रामांच्या जन्मानंतर लवकरच भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांचा जन्म झाला.

त्यानंतर लगेचच भरत यांचा जन्म पुष्य नक्षत्रावर झाला. काही ठिकाणी हे श्री रामांच्या जन्माच्या दुसऱ्या दिवशी (दशमी) झाल्याचे नमूद आहे.

लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांचा जन्म आश्लेषा नक्षत्रावर (कर्क लग्न) झाला.

म्हणजेच,चारही भावांचा जन्म काही दिवसांच्या अंतराने झाला होता. श्री राम ज्येष्ठ असून त्यानंतर भरत, आणि त्यानंतर लक्ष्मण व शत्रुघ्न (जुळे भाऊ) असे त्यांचा क्रम होता.

त्याशिवाय श्रीरामाच्या पत्नीचे नाव सीता भरताच्या पत्नीचे नाव गौतमी, लक्ष्मणाच्या पत्नीचे नाव उर्मिला,आणि शत्रुघ्नच्या पत्नीचे नाव श्रुतीकीर्ती असे होते.

इतक्या अचूक माहितीचे वर्णन वाल्मिकी रामायणामध्ये नमूद केले आहे.

पुराणे आणि अन्य धर्मग्रंथ:

स्कंद पुराण, पद्म पुराण, कालिका पुराण यांसारख्या अनेक पुराणांमध्ये आणि अन्य धार्मिक ग्रंथांमध्ये श्रीरामांच्या जन्माचे वर्णन चैत्र शुद्ध नवमीला झाल्याचे सांगितले आहे. हे ग्रंथ शतकानुशतके या मान्यतेला पुष्टी देत आहेत.

ज्योतिषशास्त्रीय विश्लेषण:

आधुनिक काळात अनेक संशोधकांनी वाल्मिकी रामायणातील ग्रहां आणि नक्षत्रांच्या स्थितीच्या वर्णनाचा अभ्यास करून, श्रीरामांच्या जन्माची अचूक तारीख शोधण्याचा प्रयत्न केला आहे. जरी यामध्ये काही मतभेद असले तरी, चैत्र शुद्ध नवमी या तिथीलाच त्यांचा जन्म झाला होता, यावर बहुतांश ज्योतिषशास्त्रीय विश्लेषक सहमत आहेत.

थोडक्यात, वाल्मिकी रामायणातील स्पष्ट उल्लेख, रामनवमी उत्सवाची अखंड परंपरा आणि विविध धर्मग्रंथांमधील वर्णने या सर्वांच्या आधारे श्री रामाचा जन्म चैत्र शुद्ध नवमीला झाला असे सांगितले जाते.

रामायण काळ हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा आणि प्राचीन काळ मानला जातो. या काळात आणि त्यापूर्वी अनेक महान ऋषीमुनी होऊन गेले, ज्यांनी समाजात ज्ञान, धर्म आणि नैतिकतेचा प्रसार केला. त्यांची तपश्चर्या, ज्ञान आणि दूरदृष्टी आजही प्रेरणादायी आहे.

रामायण काळातील प्रमुख ऋषीमुनी:

विश्वामित्र

विश्वामित्र हे अत्यंत पराक्रमी आणि तेजस्वी ऋषी होते. ते पूर्वी एक राजा होते, परंतु वसिष्ठांशी झालेल्या संघर्षानंतर त्यांनी कठोर तपश्चर्या करून ब्रह्मर्षी पद प्राप्त केले. भगवान रामाला आणि लक्ष्मणाला त्यांनी अनेक दिव्य अस्त्रांचे ज्ञान दिले आणि ताटका राक्षसिणीचा वध करण्यासाठी मार्गदर्शन केले. श्रीरामाला 'बला' आणि 'अतिबला' हे मंत्र विश्वामित्रांनीच दिले होते.

वसिष्ठ

वसिष्ठ हे रघुवंशाचे (प्रभू रामांचे कुटुंब) कुलगुरू होते. ते अत्यंत ज्ञानी, शांत आणि धर्मनिष्ठ ऋषी म्हणून ओळखले जातात. त्यांनी रामाला आणि त्यांच्या बंधूंना राजधर्म, शस्त्रविद्या आणि वेद-वेदांगांचे शिक्षण दिले. वसिष्ठ आणि विश्वामित्र यांच्यातील संबंध हे ज्ञान आणि तपश्चर्येच्या श्रेष्ठत्वाचे प्रतीक मानले जाते.

अगस्त्य

अगस्त्य ऋषी हे दक्षिण भारतातून जाऊन संस्कृतीचा प्रसार करणारे महान ऋषी होते. त्यांनी विंध्य पर्वताला खाली वाकवले अशी आख्यायिका आहे. रावणाच्या त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी त्यांनी श्रीरामाला 'आदित्य हृदय स्तोत्र' दिले होते, ज्यामुळे रामाला रावणावर विजय मिळवण्यात मदत झाली.

शृंगी ऋषी: 

दशरथ राजाला पुत्रप्राप्तीसाठी त्यांनी 'पुत्रकामेष्टी यज्ञ' करवला होता. त्यांच्या तपश्चर्येमुळे आणि यज्ञाच्या प्रभावाने दशरथांना राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न असे चार पुत्र प्राप्त झाले.

भारद्वाज

भारद्वाज ऋषी हे अत्री ऋषींचे पुत्र आणि द्रोणाचार्य यांचे वडील होते. ते महान तपस्वी आणि ज्ञानी होते. वनवासात असताना श्रीराम आणि सीता त्यांच्या आश्रमात थांबले होते. त्यांनी रामाला विविध ठिकाणांची माहिती दिली आणि त्यांना चित्रकूटला जाण्याचा सल्ला दिला.

अत्री

अत्री ऋषी हे सप्तर्षींपैकी एक होते आणि अनसूया यांचे पती होते. ते महान तपस्वी आणि धर्मज्ञानी होते. चित्रकूट येथील त्यांचा आश्रम रामायण काळात महत्त्वाचे स्थान होते. भगवान राम आणि सीता यांनी त्यांच्या आश्रमाला भेट दिली होती.

शरभंग

शरभंग ऋषी हे दंडकारण्यात राहत होते. त्यांनी श्रीरामांना त्यांच्या तपस्येचे फल दिले आणि स्वर्गात गमन केले.

सुतीक्ष्ण

सुतीक्ष्ण ऋषी हे अगस्त्य ऋषींचे शिष्य होते. त्यांनी श्रीरामांना विविध ऋषींच्या आश्रमांबद्दल माहिती दिली आणि त्यांना राक्षसांच्या त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी मार्गदर्शन केले.

रामायण काळापूर्वीचे प्रमुख ऋषीमुनी (ज्यांचा प्रभाव रामायण काळातही होता):

ब्रह्मदेव (प्रजापती): 

ब्रह्मदेव हे सृष्टीचे निर्माते मानले जातात आणि ते सर्व ज्ञानाचे उगमस्थान आहेत. अनेक ऋषीमुनींनी त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त केले.

अंगिरा

अंगिरा हे ब्रह्मादेवांच्या मानसपुत्रांपैकी एक आणि महान वैदिक ऋषी होते. ते अग्निचे उपासक म्हणून ओळखले जातात आणि अनेक वैदिक सूक्ते त्यांच्याशी संबंधित आहेत.

भृगू

भृगू ऋषी हे ब्रह्मादेवांच्या मानसपुत्रांपैकी एक होते. ते ज्योतिष, आयुर्वेद आणि धर्मशास्त्र यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये पारंगत होते. भृगू संहिता हे त्यांचे प्रसिद्ध कार्य आहे.

कश्यप

कश्यप ऋषी हे प्रजापती दक्ष आणि अदितीचे पुत्र होते. अनेक देवता, राक्षस, मानव आणि इतर जीवसृष्टीचे ते जनक मानले जातात.

अथर्वन

अथर्वन ऋषी हे अथर्ववेदाचे प्रमुख रचनाकार मानले जातात. ते मंत्रविद्या आणि आयुर्वेद यांमध्ये निपुण होते.

च्यवन

च्यवन ऋषी हे भृगू ऋषींचे पुत्र होते. त्यांनी कठोर तपश्चर्या केली आणि त्यांना च्यवनप्राश  या आयुर्वेदिक औषधाच्या शोधाचे श्रेय दिले जाते.

जमदग्नी

जमदग्नी ऋषी हे परशुरामांचे वडील होते आणि भृगू कुळातील एक महान ऋषी होते. ते कठोर तपस्या आणि ब्रह्मतेज यासाठी ओळखले जात होते.

दुर्वास

दुर्वास ऋषी हे अत्री आणि अनसूया यांचे पुत्र होते. ते त्यांच्या तीव्र स्वभावासाठी आणि शाप देण्याच्या शक्तीसाठी ओळखले जात होते, परंतु ते महान तपस्वी होते.

हे सर्व ऋषीमुनी त्यांच्या ज्ञान, तपश्चर्या, दूरदृष्टी आणि परोपकारी वृत्तीसाठी आजही स्मरणात आहेत. त्यांनी भारतीय संस्कृती आणि धर्म यांच्या विकासात महत्त्वाचे योगदान दिले आहे.

या सर्व ऋषीमुनींचे श्रीराम विषयी असलेले मत :

आपण आजच्या काळात पाहतो कुणी ना कुणीतरी अनेक संत, महात्मे यांचे भक्त आहेत. श्री स्वामी समर्थ, साईबाबा, श्री दत्त अशा अनेक देवादिकांच्या पूजाअर्चा करतो नामस्मरण करतो.

श्रीराम हे इतके तेजपुंज आणि प्रसन्न चेहऱ्याचे होते की त्या काळातील अतिशय श्रेष्ठ स्थान असलेल्या सर्व ऋषीमुनींचे ते अत्यंत प्रिय होते.

सर्व ऋषीमुनी श्रीरामांचे अदरातिथ्य करत असल्याचे आपण वाल्मिकी रामायणामध्ये वाचले आहे. व या सर्व ऋषीमुनींनी श्रीरामांना महाविष्णूचा अवतार  असल्याचे वाल्मीकी रामायण मध्ये सांगितले आहे.

याचा अर्थ श्रीराम हे सर्वसामान्य माणूस नव्हते तर ते खरोखरच दैवी शक्ती असण्याची शक्यता आहे. कारण त्यांनी त्यांच्या तरुण वयात अनेक वाईट शक्ती असलेल्या व युद्धात पारंगत असलेल्या लोकांना नामोहरण केल्याचे पाहायला मिळते. 

त्यांच्या या तेजपुंज आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्वाने भविष्यात सुग्रीव, हनुमान, नळ, निळ, जांबवंत आणि अंगद असे मित्र मिळाले. शिवाय श्रीलंकेला श्रीरामाची कीर्ती ऐकून रावणाचा भाऊ बिभीषण सुद्धा श्रीरामांना येऊन मिळाला.

रावणाची श्रीलंका :

रावणाची जी श्रीलंका आता आपण म्हणत आहोत. ते एक समुद्री बेट असून त्याचे प्राचीन नाव सिंहल किंवा सिंहलद्वीप होते. ब्रिटिश राजवटीत याला सिलोन (Ceylon) असे नाव पडले आणि १९७२ पर्यंत ते याच नावाने ओळखले जात होते. त्यानंतर त्याचे नाव लंका ठेवले गेले आणि १९७८ मध्ये त्याला श्रीलंका असे नाव देण्यात आले.

रामेश्वरम पासून श्रीलंकेला जोडणारा व रामकाळी वानरसेनेने बांधला अशी श्रद्धा असलेला तरंगत्या पाषाणांच्या सेतूचेे वय, कार्बन डेटिंंगनुसार साडेसतरा लाख वर्ष इतके जुने येते. रामसेनेनेच सेतू बांधला हे म्हणणे मग जसे अतार्किक ठरते तसेच रामकाळही तेवढा मागे नेणे अतार्किक ठरते. कारण साडे सतरा लाख वर्षापूर्वी  रामायणच काय परंतु पृथ्वीवर माणूस सुद्धा जन्माला आला नव्हता.

ऐतिहासिक आणि धार्मिक संदर्भ:

रामायणामध्ये, रावणाची लंका भारताच्या मुख्य भूमीपासून सुमारे 1213 किलोमीटर (753.72 मैल) दूर असल्याचे म्हटले आहे. 

प्रवासाचा मार्ग:

जर आपण भगवान रामाच्या प्रवासाचा विचार केला, तर अयोध्येहून लंकेपर्यंतचा प्रवास अनेक राज्यांतून जातो आणि सुमारे 5000 किलोमीटरचा असू शकतो, असे काही संदर्भ सांगतात. शिवाय त्या काळात रस्ते नव्हते हा सुद्धा विचार करावा लागेल.

सध्याचे अंतर:

जर आपण प्रत्यक्ष प्रवासाचा विचार केला, तर विमानाने किंवा रेल्वेने श्रीलंका ते अयोध्या असा प्रवास करण्यासाठी सुमारे 2000 किलोमीटरचे अंतर पार करावे लागते.  

श्रीलंका ते जनक राजाची राजधानी मिथिला हे अंतर साधारणपणे 5000 कि. मि. इतके दूर आहे. तर मग रावणाला सीतेच्या स्वयंवराचे आमंत्रण देण्यासाठी श्रीलंकेला समुद्रामधून इतक्या दूर कोण गेले असेल. तेव्हा तर रामसेतू नव्हता. कारण भारत ते श्रीलंका हा रामसेतू नंतरच्या काळात वानर सेनेने बांधला होता. हे मनाला न पटणारे आहे. 

मंदोदरी :

मंदोदरी ही लंकेचा राजा रावणाची पत्नी होती. ती असुर राजा मायासुर आणि अप्सरा हेमा यांची कन्या होती.

मंदोदरीला रामायणात एक सुंदर, धार्मिक आणि नीतिमान स्त्री म्हणून वर्णन केले आहे. तिला पंचकन्यांपैकी एक मानले जाते, ज्यांच्या नावाचे पठण केल्याने पाप दूर होते असे मानले जाते.

रावणाने सीतेचे हरण केल्यावर मंदोदरीने रावणाला अनेकदा सीतेला परत पाठवण्याचा आणि धर्माच्या मार्गावर चालण्याचा सल्ला दिला, परंतु रावणाने तिच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले. 

मंदोदरी आणि रावणाला मेघनाद (इंद्रजित), अतिकाया आणि अक्षयकुमार हे तीन पुत्र होते. 

पौराणिक कथेनुसार, मंदोदरीचे वडील मायासुर हे त्रिपुरा नावाच्या तीन शहरांचे  शासक होते, जे त्यांनी स्वतः आपल्या स्थापत्यकलेने निर्माण केले होते. हे शहर इतके भव्य आणि शक्तिशाली होते की देवतांनाही त्याची भीती वाटत होती.

याव्यतिरिक्त, मायासुर हे मेरठ (आजचे मेरठ शहर, उत्तर प्रदेश, भारत) या प्राचीन "माया राष्ट्र" चे शासक मानले जातात, जिथे मंदोदरीचा जन्म झाला असे म्हटले जाते.

रावणाची सासरवाडी जर मेरठ असेल म्हणजेच आजचा उत्तर प्रदेश. त्यावेळेस प्रवासाची कोणती वाहने उपलब्ध नव्हती. तर मग मंदोदरीचे वडील मयासूर यांनी त्यांची मुलगी अत्यंत दूर असलेल्या श्रीलंके मध्ये कशी दिली असेल? हाही एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे. याचा अर्थ रावण तिथल्याच इतर प्रदेशात राहत असला पाहिजे.

आपण समजतो ती रावणाची लंका दुसरीच कोठेतरी असली पाहिजे. कारण भारतामध्ये एकाच नावाची अनेक गावे आणि शहरे आपणास पहावयास मिळतात. त्याचप्रमाणे श्रीलंका नावाची दोन नगरे असू शकतात.

रावणाची खरी लंका :

गुजरातमधील द्वारकेजवळ बेट होतं ज्याला 'लंका' म्हटलं जायचं. हे बेट सध्याच्या गुजरातमधील द्वारकेजवळ होतं आणि हे 'बेट द्वारका' म्हणून ओळखलं जात होतं. पूर्वी हे बेट समुद्राने वेढलेले असल्यामुळे त्याला 'लंका' असं नाव मिळालं होतं. 

ऐतिहासिक संदर्भ:

'लंका' या बेटाचा उल्लेख काही प्राचीन आणि मध्ययुगीन साहित्यात आढळतो. हे बेट व्यापारी आणि नौदल हालचालींसाठी महत्त्वाचं होतं.

भौगोलिकदृष्ट्या महत्त्व:

कच्छचं वाळवंट आणि अरबी समुद्राच्या सीमेवर असलेलं हे बेट, त्याकाळी एक महत्त्वाचं व्यापारी केंद्र होतं.

समुद्री व्यापार:

या बंदराचा उपयोग व्यापारी जहाजांसाठी थांबा म्हणून केला जात होता, ज्यामुळे तेथील व्यापार आणि दळणवळण वाढले.

ऐतिहासिक महत्त्व:

या बंदराचा उल्लेख काही ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आणि लोककथांमध्ये आढळतो, ज्यामुळे त्यावेळच्या इतिहासाची माहिती मिळते.

अधिक माहिती: 

ऐतिहासिक आणि पौराणिक संदर्भ: 

या बेटाचा उल्लेख 'लंका' असा पुराणांमध्ये आढळतो, जिथे भगवान कृष्णाने या बेटावर राज्य केल्याचं सांगितलं आहे. 

भौगोलिक वैशिष्ट्ये: 

बेट द्वारका समुद्राने वेढलेले असल्यामुळे त्याला 'लंका' असं संबोधलं जात होतं. 

आज हे बेट मुख्य भूभागाशी जोडलेलं आहे आणि येथे अनेक प्राचीन मंदिरे आणि धार्मिक स्थळे आहेत. 

म्हणजेच पूर्वीचे लंका हे नाव असलेल्या या बेटाचे पुढे द्वारका असे नामकरण करण्यात आले. 

म्हणजेच पूर्वीची रावणाची लंका ही श्रीकृष्णाची द्वारका असू शकते.

भगवान श्री प्रभू रामचंद्र हे वनवासाच्या काळात अरण्यामधून प्रवास करताना मजल दरमजल करीत ते महाराष्ट्रातील पंचवटी या ठिकाणी आले. त्या ठिकाणी ते तेरा वर्ष वास्तव्यास होते असे मूळ वाल्मिकी रामायणामध्ये नमूद आहे.

तिथून ते सीतेच्या शोधासाठी गुजरात जवळील रावणाच्या लंका बेटावर गेले असावेत. हे सर्व आंतर साधारण 1700 ते 1800 किलोमीटर इतके येते.

म्हणजेच हे अंतर फारसे जास्त नाही. शिवाय या 1700 ते 2000 किलोमीटरच्या प्रदेशामध्ये अनेक छोटी मोठी राज्य अस्तित्वात होती. आणि त्यांचा एकमेकांशी उत्तम प्रकारे संपर्क होता. म्हणजेच एकमेकांच्या माहितीची देवाण-घेवाण, व्यापार चालत होता.

त्या काळात प्रामुख्याने नागर संस्कृती आणि जंगल संस्कृती अस्तित्वात असावी.

श्री रामाचा अयोध्या ते पंचवटी हा प्रवास त्यांच्या वनवासाचा एक महत्त्वाचा टप्पा होता. हा प्रवास अनेक राज्यांमधून आणि घनदाट जंगलातून झाला. वाल्मिकी रामायणाच्या संदर्भानुसार, हा प्रवास खालीलप्रमाणे होता:

राजा जनक यांची मिथिला नगरी:

जनकपुरी ही सध्याच्या नेपाळमध्ये आहे. हे शहर नेपाळमधील धनुषा जिल्ह्यामध्ये येते. असे मानले जाते.

मिथिला राज्याच्या सीमांचा विस्तार पूर्वी बिहारच्या काही भागांपर्यंत होता, 

त्याचबरोबर, बिहारमधील सीतामढी जिल्ह्यालाही रामायणाशी संबंधित मानले जाते, जिथे माता सीता राजा जनकांना नांगराच्या फाळाखाली सापडली होती अशी आख्यायिका आहे. आणि तेथेच मिथिला नगरी होते असे तेथील लोक मानतात. 

त्यामुळे नेपाळमधील मिथिलनगरी ऐवजी बिहारमधील मिथिलनगरी अयोध्येच्या जास्त जवळ असल्याने हीच मिथिला नगरी असावी.

अयोध्या ते चित्रकूट:

वनवासाला निघाल्यावर श्रीराम, सीता आणि लक्ष्मण सुमंत्राच्या रथातून अयोध्येतून निघाले.

त्यांनी तमसा नदी पार केली.

यानंतर ते शृंगवेरपूर येथे पोहोचले, जिथे निषादराज गुहने त्यांना गंगा नदी पार करण्यास मदत केली.

गंगा नदी पार करून ते प्रयागराज (आजचे अलाहाबाद) येथे पोहोचले, जिथे गंगा, यमुना आणि सरस्वतीचा संगम होतो. येथे त्यांनी भारद्वाज ऋषींच्या आश्रमात काही काळ वास्तव्य केले.

भारद्वाज ऋषींच्या सल्ल्याने ते चित्रकूट पर्वताकडे निघाले. येथे त्यांनी काही काळ निवास केला.

चित्रकूट ते दंडकारण्य:

चित्रकूटहून ते दंडकारण्याकडे निघाले. दंडकारण्य हे मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पसरलेले एक विशाल आणि घनदाट जंगल होते.

या प्रवासात त्यांनी अनेक ऋषी-मुनींच्या आश्रमांना भेटी दिल्या. यामध्ये शिरभंग, सुतीक्ष्ण, अगस्त्य यांसारख्या ऋषींचा समावेश होता. त्यांनी ऋषींकडून ज्ञान, उपदेश आणि आवश्यक शस्त्रे आणि अश्रे  प्राप्त केली. या काळात त्यांनी राक्षसांचा संहार करून ऋषींना त्रासमुक्त केले.

दंडकारण्य ते पंचवटी:

दंडकारण्यातून प्रवास करत श्रीराम, सीता आणि लक्ष्मण गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या पंचवटी येथे पोहोचले. आजचे नाशिक हेच पंचवटी मानले जाते.

येथे लक्ष्मणाने बांबू आणि इतर वनस्पतींपासून एक सुंदर कुटीर (झोपडी) बांधली. पंचवटी हे ठिकाण पाच वटवृक्षांमुळे ओळखले जाते.

पंचवटीचे महत्त्व:

पंचवटी हे ठिकाण रामायणातील अनेक महत्त्वाच्या घटनांसाठी ओळखले जाते.

शूर्पणखेचे नाक लक्ष्मणाने येथेच कापले.

याच घटनेचा सूड घेण्यासाठी रावणाने मारीच राक्षसाच्या मदतीने सीतेचे हरण केले.

येथेच श्रीरामांची गिधाडराज जटायुशी भेट झाली होती, ज्याने सीतेचे हरण पाहिले होते आणि रावणाशी युद्ध केले होते.

थोडक्यात, श्रीरामांचा अयोध्या ते पंचवटी हा प्रवास वनवासाचा एक मोठा भाग होता, जो अनेक पवित्र स्थळे, ऋषींचे आश्रम आणि घनदाट जंगलातून झाला. या प्रवासात त्यांनी अनेक संकटांचा सामना केला आणि अनेक महत्त्वाच्या घटना येथे घडल्या, ज्यामुळे पुढील रामायणाची कथा पुढे सरकली.

वाल्मिकी रामायणानुसार पंचवटी हे प्रभू राम, सीता आणि लक्ष्मणाच्या वनवासातील एक अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. दंडकारण्यात राहिल्यानंतर, अनेक ऋषीमुनींचे आशीर्वाद घेत आणि असुरांपासून त्यांचे संरक्षण करत, श्रीराम नाशिक येथील अगस्ती मुनींच्या आश्रमात आले. 

अगस्ती मुनींनीच त्यांना गोदावरी नदीच्या काठी असलेल्या पंचवटीत निवास करण्यास सांगितले.

सीतेचे हरण याच ठिकाणी झाले, त्यामुळे रामायणातील हा एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट मानला जातो.

अगस्ती ऋषींचा सल्ला: 

प्रभू राम, सीता आणि लक्ष्मण यांनी अगस्ती ऋषींच्या सांगण्यावरून पंचवटीमध्ये वास्तव्य केले. अगस्ती मुनींनी श्रीरामांना त्यांची स्वतःच्या अग्निशाळेत निर्माण केलेली आयुधे आणि शस्त्रे भेट दिली, असा उल्लेख वाल्मिकी रामायणात आहे.

नैसर्गिक सौंदर्य: 

वाल्मिकी रामायणात पंचवटीचे रमणीय वर्णन आढळते. हे ठिकाण सुंदर आणि शांत होते, जे वनवासासाठी योग्य होते. येथे पाच वडांच्या झाडांचा समूह असल्याने या जागेला 'पंचवटी' असे नाव मिळाले असे मानले जाते.

रामकुंड

गोदावरी नदीच्या काठी असलेले हे पवित्र कुंड आहे. वनवासात प्रभू राम येथे स्नान करत असत अशी मान्यता आहे. येथेच दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो.

लक्ष्मण कुंड: 

रामकुंडाजवळच लक्ष्मण कुंड देखील आहे.

तापोवन

गोदावरी आणि कपिला नद्यांच्या संगमावर असलेले हे ठिकाण आहे. इथे अनेक ऋषीमुनी तपश्चर्या करत असत. 

लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक याच ठिकाणी कापले होते.

थोडक्यात, वाल्मिकी रामायणानुसार, पंचवटी हे केवळ एक भौगोलिक स्थान नसून, प्रभू रामचंद्रांच्या वनवासातील अनेक महत्त्वाच्या घटनांचा साक्षीदार आहे, ज्यात धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे.

सीता हरण :

राम लक्ष्मण सीता हे नाशिक जवळील पंचवटी येथे वास्तव्यास असताना पंचवटी येथून रावणाने सीतेचे हरण केले. व लंकेला जात असताना टाकेद तालुका इगतपुरी येथे जटायू ने रावणाच्या तावडीतून सीतेला सोडवण्यासाठी प्रयत्न केला असे मूळ वाल्मिकी रामायणामध्ये लिहिले आहे.

टाकेद जिल्हा नाशिक 

रावणाने जटायूची पंख कापल्यानंतर, जटायू जमिनीवर कोसळला आणि श्रीरामाची वाट पाहत राहिला. 

जेव्हा श्रीराम सीतेच्या शोधात त्या भागातून जात होते, तेव्हा त्यांना जटायूचा आवाज ऐकू आला. जटायूला रक्तबंबाळ अवस्थेत पाहून श्रीरामांनी त्याला विचारले की काय झाले ?

तेव्हा जटायूने श्रीरामांना सीतेच्या अपहरणाची संपूर्ण घटना सविस्तर सांगितली. रावणाने सीतेला कसे पळवून नेले आणि त्याने रावणाशी कसे युद्ध केले, हे सर्व जटायूने सांगितले. जटायूने श्रीरामांना लंकेची दिशाही सांगितली.

जटायूने श्रीरामांच्या हातून पाणी मिळावे अशी अंतिम इच्छा व्यक्त केली. तेव्हा श्रीरामांनी बाणाद्वारे भूगर्भातून पाणी काढले आणि ते पाणी जटायूला पाजले. पाणी प्यायल्यानंतर जटायूने श्रीरामांच्या मांडीवरच आपले प्राण सोडले. 

श्रीरामांनी जटायूचे अंतिम संस्कार केले आणि त्याला मोक्ष दिला.

त्यामुळे टाकेद हे जटायू मोक्षस्थान म्हणून ओळखले जाते. आजही टाकेद येथे हे मोक्ष कुंड पहावयास मिळते. हा रामायणाचा पुरावाच नव्हे काय?

म्हणजेच जटायू किंवा तेथील स्थानिक लोकांना रावणाची चांगल्या प्रकारे ओळख असली पाहिजे. किंवा रावण कुठला आहे हे ही माहीत असलं पाहिजे.

राम-लक्ष्मण जेव्हा सीतेचा शोध घेण्या साठी जात होते, तेव्हा सीतेला वाचवणा ऱ्या जखमी जटायुने सीतेला रावणाने नेलं आहे. आणि रावण कुठे राहतो हे ठिकाण सांगितले होते. आणि त्या प्रमाणे राम आणि लक्ष्मण हे सीतेच्या शोधार्थ लंकेला निघाले.

आणि पुढे जात असताना त्यांना इगतपुरी जवळील किष्किंधा येथील सुग्रीवाशी आणि मारुतीरायाची ओळख झाली.

आता पंचवटी आणि टाकेद ही दोनही स्थाने नाशिक जिल्ह्यात येतात. आणि तिथून गुजरात जवळील बेट असलेले लंका हेही जवळ आहे. म्हणजेच रावणाची लंका ही गुजरात जवळील बेटावरच असली पाहिजे हा ही निष्कर्ष निघतो.

हनुमानाचे जन्मस्थान :

नाशिकमध्ये अंजनेरी (Anjaneri) हा पर्वत आहे, जो नाशिक-त्र्यंबकेश्वर डोंगररांगेतील एक महत्त्वाचा किल्ला आहे.

अंजनेरी हे हनुमानजींचे जन्मस्थान मानले जाते, जिथे त्यांची आई अंजनी मातेने तपश्चर्या केली होती. याच कारणामुळे या किल्ल्याला 'अंजनेरी' हे नाव मिळाले आहे.

अंजनेरी पर्वताचे स्थान:

हा पर्वत नाशिकपासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर, नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर आहे.

त्र्यंबकेश्वरपासून सुमारे ११ किलोमीटर अंतरावर आहे.

या पर्वतावर अंजनी मातेचे मंदिर आणि हनुमानाचे बालरूप दाखवणारे मंदिर देखील आहे. 

निष्कर्ष :

हनुमानजीचे जन्मस्थान जर नाशिक जवळील त्र्यंबकेश्वर येथील अंजनेरी पर्वतावर आहे तर नाशिक पासून दूर कर्नाटकातील हम्पी येथे असलेल्या किष्किंधा येथील सुग्रीवा कडे हनुमानजी कशासाठी गेले असावेत.? 

हनुमानजीचे जन्मस्थान जर नाशिक येथील त्रिंबकेश्वर जवळील अंजनेरी येथे असेल तर किष्किंधा सुद्धा तेथेच आसपास कुठेतरी असली पाहिजे हा तार्किक सिद्धांत आहे. म्हणजेच इगतपुरी तालुक्यातील कुसेगावचा परिसर हाच किष्किंधा असला पाहिजे.

त्याचप्रमाणे अंजनेर, पंचवटी, टाकेद, किष्किंधा ही ठिकाणे जर नाशिक जिल्ह्यातील असतील तर सीतेच्या शोधासाठी राम, लक्ष्मण प्रचंड दूर असलेल्या कर्नाटकातील हम्पी येथे कशासाठी जातील ? म्हणजेच हम्पी येथील किष्किंधा ही कवी कल्पना आहे. असेच म्हणावे लागेल. 

सुग्रीव:

रामायणामध्ये सुग्रीवाने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तो किष्किंधेचा वानरराज होता आणि त्याने श्रीरामांना त्यांची पत्नी सीतामाईला रावणाच्या तावडीतून सोडवण्यासाठी खूप मदत केली.

त्याच्या भूमिकेचे मुख्य टप्पे खालीलप्रमाणे आहेत:

वालीशी वैर आणि श्रीरामांची भेट: 

सुग्रीव हा त्याचा मोठा भाऊ वाळी याच्यामुळे किष्किंधेतून हाकलून दिला गेला होता आणि वाळीने त्याची पत्नी रुमा हिलाही आपल्या ताब्यात घेतले होते. याच काळात, सीतामाईच्या शोधात असलेले श्रीराम आणि लक्ष्मण यांच्याशी त्याची भेट हनुमानामुळे झाली.

मैत्री आणि वचन: 

श्रीरामांनी सुग्रीवाला वाळीला मारून त्याचे राज्य परत मिळवून देण्याचे वचन दिले. या बदल्यात सुग्रीवाने श्रीरामांना सीतामाईचा शोध घेण्यासाठी आणि तिला परत आणण्यासाठी मदत करण्याचे वचन दिले.

वालीचा वध आणि राज्याभिषेक:

श्रीरामांनी वाळीचा वध करून सुग्रीवाला किष्किंधेचा राजा बनवले. यानंतर सुग्रीवाने आपले वचन पाळले.

सीतामाईचा शोध: 

राजा झाल्यावर सुग्रीवाने आपल्या वानरसेनेला सीतामाईचा शोध घेण्यासाठी चारही दिशांना पाठवले. या शोधमोहिमेत हनुमानाने लंका गाठून सीतामाईचा ठावठिकाणा शोधला.

लंका युद्धात सहभाग: 

सीतामाई लंकेत आहे हे समजल्यावर, सुग्रीवाने आपल्या विशाल वानरसेनेसोबत श्रीरामांना लंका युद्धात सक्रिय सहभाग दिला. या युद्धात त्याने अनेक राक्षस योद्ध्यांना पराभूत केले आणि लंकेवर विजय मिळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

वचनबद्धता आणि निष्ठा: 

सुग्रीव हा श्रीरामांप्रती अत्यंत वचनबद्ध आणि निष्ठावान होता. त्याने श्रीरामांना दिलेले प्रत्येक वचन पूर्ण केले आणि त्यांच्या कार्यात खांद्याला खांदा लावून उभा राहिला.

थोडक्यात, सुग्रीव हा केवळ एक वानरराज नव्हता, तर तो श्रीरामांचा एक महान मित्र, निष्ठावान सहकारी आणि सीतामाईच्या शोधातील व लंका विजयातील एक आधारस्तंभ होता.

अंगद:

अंगद हा रामायणातील एक महत्त्वाचा आणि पराक्रमी वानर योद्धा होता. त्यांच्याबद्दल काही प्रमुख गोष्टी:

वालीचा पुत्र:

अंगद हा किष्किंधेचा शक्तिशाली राजा वाली (किंवा बालि) आणि त्याची पत्नी तारा यांचा पुत्र होता.

सुग्रीवाचा पुतण्या: 

वालीचा धाकटा भाऊ सुग्रीव हा अंगदचा काका (पुतण्या) होता.

किष्किंधेचा युवराज: 

वालीच्या मृत्यूनंतर, श्रीरामांनी सुग्रीवाला किष्किंधेचा राजा बनवले आणि अंगदाला युवराज (राजपुत्र) म्हणून घोषित केले.

बुद्धिमान आणि पराक्रमी योद्धा: 

अंगद हा केवळ बलवानच नव्हता, तर तो अत्यंत बुद्धिमान आणि मुत्सद्दी देखील होता. त्याला गुरु (बृहस्पति) चा आशीर्वाद प्राप्त होता आणि तो संभाषण कलेत निपुण होता.

श्रीरामांचा दूत: 

रामायणात, रावणाशी युद्ध सुरू करण्या पूर्वी श्रीरामांनी अंगदाला रावणाच्या दरबारात आपला दूत म्हणून पाठवले होते. रावणाला सीतेला सन्मानपूर्वक परत करण्याची शेवटची संधी देण्यासाठी ही शिष्टाई होती. रावणाच्या दरबारात अंगदाने आपला पराक्रम आणि बुद्धिमत्ता दाखवली, जिथे त्याने आपला पाय इतका घट्ट रोवला की रावणासह कोणताही राक्षस त्याचा पाय हलू शकला नाही.

सीता शोधात महत्त्वाची भूमिका: 

सीता हरण झाल्यावर, श्रीरामांनी सीतेच्या शोधासाठी वानर सेना पाठवली होती. दक्षिण दिशेकडील सीता शोधाच्या चमूचे नेतृत्व अंगदनेच केले होते, ज्यात हनुमान आणि जांबुवंत सारखे महत्त्वाचे वीर होते.

युद्धात सहभाग: 

लंकेच्या युद्धात अंगदाने खूप पराक्रम गाजवला. त्याने रावणाच्या अनेक सेनापतींना आणि पुत्रांना (जसे की नरांतक) ठार केले.

थोडक्यात, अंगद हा केवळ वालीचा पुत्रच नव्हता, तर तो श्रीरामांच्या सैन्यातील एक महत्त्वाचा, पराक्रमी, बुद्धिमान आणि निष्ठावान योद्धा होता, ज्याने रामायणातील अनेक महत्त्वाच्या प्रसंगांमध्ये निर्णायक भूमिका बजावली.

शबरी :

श्री प्रभू रामाने शबरीची उष्टी बोरे खाल्ल्याचे वाल्मिकी रामायणामध्ये आहे. ऋष्यमूक पर्वतावर असलेल्या मातंग ऋषीच्या आश्रमात शबरी ही राहत होती. शबरी ही भिल्ल जातीची होती.

ऋष्यमूक पर्वत हा जर कर्नाटक मधील हम्पी जवळील पंपा येथे आहे असे सध्या मानले जाते. कर्नाटकातील हम्पी जवळ भिल्ल समाजाचे कोणतेही लोक राहत नाहीत. परंतु नाशिक, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात मात्र भिल्ल समाजाची लोकवस्ती अद्यापही आहे. 

त्यामुळे शबरी ही कर्नाटक मधील हम्पी येथील नसून नाशिक जवळील ऋष्यमूक पर्वतावरील असली पाहिजे याला दुजोरा मिळतो.

किष्किंधा:

महर्षी वाल्मिकी यांनी लिहिलेल्या मूळ रामायणामध्ये सुग्रीव याला त्याचा भाऊ बाली याने किष्किंधा येथून पळवून लावले होते. त्यामुळे सुग्रीव हा ऋष्यमूक या पर्वतावर राहत होता. 

वाल्मिकी रामायणात किष्किंधा कांडाचे वर्णन :

किष्किंधा कांड हे वाल्मिकी रामायणातील चौथे कांड आहे. हे कांड प्रामुख्याने श्रीराम आणि सुग्रीव यांच्या मैत्रीवर आणि त्यातून सीतेच्या शोधासाठी झालेल्या प्रयत्नांवर केंद्रित आहे.

या कांडातील प्रमुख घटना खालीलप्रमाणे आहेत:

राम आणि लक्ष्मणाचे ऋष्यमूक पर्वतावर आगमन: 

सीतेच्या विरहाने व्याकूळ झालेले राम आणि लक्ष्मण सीतेचा शोध घेत ऋष्यमूक पर्वताजवळ येतात. या पर्वतावर सुग्रीव आपल्या मंत्र्यांसोबत राहत असतो, कारण त्याला त्याचा भाऊ बालिपासून धोका असतो.

हनुमानाची राम-लक्ष्मणाशी भेट:

सुग्रीवाला वाटते की बालिनेच या दोन वीरांना त्याला मारण्यासाठी पाठवले असावे. म्हणून तो हनुमानाला त्यांची माहिती घेण्यासाठी ब्राह्मण वेशात पाठवतो. हनुमान राम आणि लक्ष्मणाशी संवाद साधून त्यांची खरी ओळख पटवतो.

राम आणि सुग्रीव यांची मैत्री: 

हनुमानामुळे राम आणि सुग्रीव यांची भेट होते आणि त्यांच्यात मैत्री होते. सुग्रीव रामाला वचन देतो की तो सीतेला शोधण्यात मदत करेल.

बालिचा वध: 

सुग्रीव रामाला आपल्या दुःखद कथेबद्दल सांगतो. त्याचा मोठा भाऊ बालिने त्याला किष्किंधेच्या राज्याबाहेर काढले होते आणि त्याची पत्नीही हिसकावून घेतली होती. राम सुग्रीवाला बालिचा वध करून त्याला त्याचे राज्य परत मिळवून देण्याचे वचन देतात. 

त्यानंतर, राम बालिचा वध करतात आणि सुग्रीवाला किष्किंधेचे राज्य मिळते, तसेच बालिचा पुत्र अंगदला युवराज बनवले जाते.

सीतेच्या शोधासाठी वानरसेनेची तयारी:

सुग्रीव राजा झाल्यावर, तो रामाच्या आज्ञेने सीतेचा शोध घेण्यासाठी वानरसेनेला सर्व दिशांना पाठवतो.

हनुमानाला बळ आठवून देणे: 

या शोधादरम्यान, सर्व वानर निराश होतात, पण जाम्बवंत हनुमानाला त्याच्या सामर्थ्याची आठवण करून देतात. हनुमान समुद्रावरून लंकेला जाण्यासाठी तयार होतो.

थोडक्यात, किष्किंधा कांड हे मैत्री, वचनपूर्ती आणि सीतेच्या शोधासाठीच्या तयारीचे वर्णन करणारे एक महत्त्वाचे कांड आहे. या कांडाने रामायणातील पुढील घटनाक्रमासाठी, विशेषतः सुंदरकांड आणि युद्धकांडासाठी, मजबूत पाया घातला आहे.

आता आपण वास्तवाकडे येऊया :

रामायण काळातील किष्किंधा ही कर्नाटक राज्यातील हम्पी जवळ आहे.असे मानले जाते. त्यासाठी तेथील भौगोलिक परिस्थिती म्हणजेच डोंगर, गुहा यांचा अंदाज लावला जातो. व रामायणा मध्ये जे वर्णन केले आहे ते अगदी भौगोलिक दृष्ट्या मिळते जुळते आहे म्हणून हम्पी येथील परिसर हा किष्किंधा आहे असे मानले जाते. परंतु याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. किंवा पुरातत्त्व खात्याने मान्यता दिली नाही.

रामायण काळातली किष्किंधा नगरी आजच्या काळात कर्नाटक राज्यातील हम्पी शहराच्या आसपास तुंगभद्रा नदीच्या काठावर मानली जाते.

काही ठिकाणी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील कुशेगाव हे देखील किष्किंधा नगरी असल्याचा दावा केला जातो. तशा कागदपत्रे नोंदी सुद्धा आढळतात.

परंतु गुजरात जवळील द्वारका नगरी ही जर पूर्वीची लंका असेल तर मात्र नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील कुसेगाव ही किष्किंधा नगरी असण्याची दाट शक्यता आहे. नव्हे हीच ती किष्किंधा नगरी असावी.

परंतु सारासार विचार जर केला तर अयोध्या जशी नगरी होती तशी किष्किंधा ही नगरी नव्हती. कारण मूळ वाल्मिकी रामायणामध्ये बाली आणि सुग्रीव हे गुहेत राहत होते असे नमूद केले आहे.

याचाच अर्थ बाली किंवा सुग्रीव हे जंगल आणि दर्या खोऱ्यातील आदिवासी राजे होते. असे अनुमान काढता येईल.  

इंद्रजीताचा ढगाआडून बाणांचा वर्षाव :

इंद्रजीत आणि लक्ष्मण यांचे ज्यावेळी युद्ध झाले त्यावेळी इंद्रजीताने आकाशात जाऊन ढगांच्या आडून लक्ष्मणावर बाणांचा वर्षाव केला असे म्हटले आहे.

परंतु युद्धाच्या एका तंत्रानुसार इंद्रजीताच्या सैन्याने तेथे प्रचंड मोठा धूर करून धुराचे लोट आकाशात भिडल्यावर त्या धुरांच्या लोटांच्या आडून लक्ष्मणावर बाणांचा वर्षाव केला असावा. 

कुंभकर्ण :

रामायणातील कथेनुसार, कुंभकर्णाला दीर्घकाळ झोपण्याचा एक अनोखा वरदान किंवा शाप होता, ज्यामुळे तो सहा महिने झोपायचा आणि फक्त एक दिवस जागा राहायचा.

आधुनिक वैद्यकीय दृष्टिकोनातून काही संशोधकांनी कुंभकर्णाच्या या झोपेचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या मते, त्याला Kleine-Levin Syndrome (KLS) किंवा Hypothalamic Syndrome सारखा दुर्मिळ झोपेचा विकार असू शकतो.

Kleine-Levin Syndrome (KLS) ची लक्षणे:

या आजारात व्यक्तीला खूप दीर्घकाळ झोप येते.

जागे झाल्यावर प्रचंड भूक लागते.

असह्य राग किंवा मानसिक गोंधळ जाणवतो.

कुंभकर्णाच्या कथेत दिसणारी लक्षणे - जसे की दीर्घ झोप घेणे, फक्त भुकेमुळे जागे होणे आणि नंतर पुन्हा झोपेत जाणे - ही KLS च्या लक्षणांशी जुळतात असे काही तज्ञांचे म्हणणे आहे. 

याचाच अर्थ त्या काळात सुद्धा Kleine-Levin Syndrome (KLS) हा आजार अस्तित्वात होता. याचा अर्थ कुंभकर्ण हा अस्तित्वात होता. ज्या अर्थी कुंभकर्ण अस्तित्वात होता त्या अर्थी रावण राम हे अस्तित्वात असलेच पाहिजेत.

पुष्पक विमान :

पुष्पक विमानाबद्दल पुराणांमध्ये तीन वेगवेगळ्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे 

पुष्पक विमान हे कुबेरासाठी बनवले होते. ती नंतर रावणाने कुबेराकडून हिसकावून नेले. वाल्मिकी रामायणामध्ये असाही उल्लेख आहे. या विमानामध्ये रावण त्याचे सर्व सैनिक घेऊन जात असे. म्हणजे हे विमान केवढे असले पाहिजे?

दुसरा उल्लेख नवनाथ ग्रंथामध्ये मैनावती  ही नुकतीच आंघोळ करून तिच्या घराच्या गच्चीवर केस विंचरत उभी होती. आणि त्याच वेळी मच्छिंद्रनाथाचे पूर्व जन्माचे पिताश्री वसु हे विमाना मधून जात असताना त्यांचे वस्त्र वाऱ्याने उडाले असता त्यांचे भोंगळे रूप मैनावतीने पाहिले व ती हसू लागली.

तिचे ते हास्य पाहून वसूने तिला शाप दिला. तू जरी आता हसत असेल तरी पुढच्या जन्मात माझा पुत्र असलेला मच्छिंद्रनाथ हा तुझा भोग घेईल. 

तिसरा उल्लेख महाभारतामध्ये आहे

वाल्मिकी रामायणात पुष्पक विमानाचा उल्लेख प्रामुख्याने उत्तरकाण्डात आढळतो, जेव्हा रावण सीतेला हरण करून लंकेला घेऊन जातो आणि नंतर राम रावणाचा वध करून सीतेसह अयोध्येला परत येतात. 

येथे उत्तरकांडातील काही महत्त्वाच्या ओव्या दिल्या आहेत ज्या पुष्पक विमानाचे आकाशगमन दर्शवतात.

उत्तरकाण्ड, सर्ग 75 रावणाने कुबेराकडून पुष्पक विमान घेतले.

या सर्गात रावण कुबेरावर विजय मिळवतो आणि त्याचे पुष्पक विमान हस्तगत करतो.

त्तरकाण्ड, सर्ग 81 (राम, सीता आणि लक्ष्मणासह अयोध्येकडे परत येतात):

या सर्गात, रावणवधानंतर राम, सीता आणि लक्ष्मणासह पुष्पक विमानातून अयोध्येकडे परत येतात.

श्लोक राम विमानातून प्रवास करताना:

ततो रामः समारुह्य पुष्पकं कामगं शुभम्।

सीतया सह वैदेही लक्ष्मणेन च वीर्यवान्॥

मुहूर्तमिव सञ्चिन्त्य मनसा च पुनः पुनः।

आर्यपुत्रो यथापूर्वम् आरुरोह विमानं तत्॥

अर्थ

त्यानंतर बलवान राम, सीतेसह आणि लक्ष्मणासह, शुभ आणि इच्छेनुसार गमन करणाऱ्या पुष्पक विमानात चढले. क्षणभर विचार करून, मनात पुन्हा पुन्हा निश्चय करून, आर्यपुत्रांनी त्या विमानात आरोहण केले.

श्लोक (विमानाचे आकाशगमन आणि राम सीतेला मार्ग दाखवताना):

तद् विमानं प्रज्वलदभ्रं शुभं च

प्रययौ सर्वतो वायुवेगानुसारी।

प्रज्वलद्भिर्वसुधां दीप्तमानं

प्रहसन्तीव च चारुचन्द्रप्रभम्॥

अर्थ

ते विमान,आकाशात तेजस्वी ढगाप्रमाणे शुभ्र दिसत होते आणि ते वायूच्या वेगाने सर्वत्र जात होते. ते तेजस्वीपणे पृथ्वीला प्रकाशित करत होते आणि हसणाऱ्या सुंदर चंद्राच्या प्रकाशाप्रमाणे दिसत होते.

श्लोक पुढे राम सीतेला विविध ठिकाणे दाखवताना :

विमानस्थो विदेहेन्द्रः सीतां प्राहिणोन्मुहुः।

पश्य सीते विशालाक्षि लङ्कां रम्यां मनोरमाम्॥

अर्थ

विमानात बसलेले विदेहाचे राजा (राम), सीतेला वारंवार म्हणाले, हे विशालाक्षि सीते, ही रमणीय आणि मनोहर लंका पहा.

सारांश:

पुष्पक विमानाचे आकाशगमन वाल्मिकी रामायणाच्या उत्तरकाण्डात विस्तृतपणे वर्णन केलेले आहे, विशेषतः जेव्हा रावण ते कुबेराकडून घेतो आणि नंतर राम त्याचा उपयोग अयोध्येला परत येण्यासाठी करतात. या ओव्यांमध्ये विमानाचे सौंदर्य, गती आणि आकाशात उडण्याची क्षमता स्पष्टपणे दर्शविली आहे.

निष्कर्ष :

वाल्मीकी रामायणातील अतिशयोक्ती: (Hyperbole)

वाल्मीकी रामायण हे एक महाकाव्य असून, त्यात कवीने विविध अलंकारांचा आणि साहित्यिक तंत्रांचा वापर केला आहे, ज्यात अतिशयोक्ती (Hyperbole) हा एक महत्त्वाचा भाग आहे. अतिशयोक्ती म्हणजे एखाद्या गोष्टीचे वर्णन इतके वाढवून सांगणे की ती अशक्य किंवा अविश्वसनीय वाटावी, परंतु तिचा उद्देश कथेतील घटनांचे महत्त्व, पात्रांचे सामर्थ्य किंवा भावनिक तीव्रतेवर भर देणे हा असतो.

रामायणात अतिशयोक्तीची अनेक उदाहरणे आढळतात. येथे काही प्रमुख उदाहरणे दिली आहेत:

हनुमानाचे सामर्थ्य: 

हनुमानाचे सामर्थ्य आणि पराक्रम वर्णन करताना अनेक ठिकाणी अतिशयोक्तीचा वापर केला आहे.

समुद्र लंघन: 

हनुमानाने एका झेपेत शंभर योजनांचा (सुमारे ८०० मैल) विशाल समुद्र ओलांडला. हे वाचताना अविश्वसनीय वाटत असले तरी, ते हनुमानाची प्रचंड शक्ती आणि दृढनिश्चय दर्शवते.

संजीवनी पर्वत उचलणे: 

लक्ष्मणाला वाचवण्यासाठी हनुमान संपूर्ण संजीवनी पर्वतच उचलून आणतो. हे देखील त्यांच्या अफाट सामर्थ्याचे अतिशयोक्तीपूर्ण वर्णन आहे, जे त्यांच्या भक्ती आणि कर्तव्यासाठी काहीही करण्याची तयारी दर्शवते.

लंका दहन: 

हनुमानाने आपल्या शेपटीने संपूर्ण लंका जाळली, असे वर्णन आहे. जरी एका व्यक्तीने पूर्ण शहर जाळणे शक्य नसले तरी, हे रावणाच्या साम्राज्याला हनुमानाने पोहोचवलेले मोठे नुकसान आणि त्याची प्रचंड शक्ती अधोरेखित करते.

युद्धाचे वर्णन: 

रामायण युद्धात अनेक प्रसंगी अतिशयोक्तीचा वापर केला आहे, ज्यामुळे युद्धाची भीषणता आणि योद्ध्यांचा पराक्रम अधिक प्रभावीपणे समोर येतो.

बाणांचा वर्षाव: 

युद्धात एकाच वेळी हजारो बाणांचा वर्षाव झाल्याचे वर्णन असते, ज्यामुळे आकाश अंधारून जाते किंवा बाणांचे ढिगारे साचतात. हे युद्धाची तीव्रता आणि प्रचंड मनुष्यबळाचे प्रतीक आहे.

राक्षसांचे विशाल रूप: 

काही राक्षसांचे वर्णन इतके विशाल आणि भयानक केले आहे की ते पर्वत किंवा ढगांसारखे दिसतात. हे त्यांच्या ताकदीवर आणि भीतिदायक स्वरूपावर भर देते.

दुःख आणि भावनांची तीव्रता: 

पात्रांच्या भावनांची, विशेषतः दुःखाची किंवा क्रोधाची तीव्रता दर्शवण्यासाठी अतिशयोक्तीचा वापर केला जातो.

सीतेचा विरह: 

रामाचा सीतेच्या विरहातील शोक इतका तीव्र होता की जणू पृथ्वी आणि आकाशही त्याच्या दुःखात सहभागी झाले होते. हे रामाच्या सीतेवरील असीम प्रेमाची खोली दर्शवते.

अतिशयोक्तीचा उद्देश:

रामायणातील अतिशयोक्तीचा मुख्य उद्देश केवळ वाचकांना आश्चर्यचकित करणे हा नाही, तर कथेतील नैतिकता, शौर्य, भक्ती आणि धर्म या मूल्यांना अधिक प्रभावीपणे मांडणे हा आहे. यामुळे पात्रांची भव्यता आणि अलौकिक शक्ती दर्शवली जाते, ज्यामुळे त्यांना आदर्श म्हणून पाहिले जाते आणि त्यांची कृत्ये चिरस्मरणीय बनतात.

विश्लेषण:

वरील सर्व बाबींचे विवेचन केले असता रामायण हे खरंच घडले आहे हे सिद्ध होते. मूळ वाल्मिकीने जे रामायण लिहिले ते रामायण घडून गेल्यानंतर अनेक शतकानंतर ऐकीव माहितीच्या आधारे लिहिले असावे. 

इसवी सन पूर्व आठव्या शतकानंतर मौर्यकालीन राजे, गुप्तकालीन राजे यांच्या काळात कालिदासांसारखे अनेक कवी नावारूपाला आले. त्या काळात भारतामध्ये विविध प्रदेशांमध्ये अनेक राजेशाह्या अस्तित्वात आल्या. त्यांची छोटी मोठी राज्य होती.

त्या काळात तेथील प्रादेशिक कवींनी मूळ  त्यांच्या प्रदेशातील चालीरीती, कथा, वाल्मिकी लिहिलेल्या मूळ रामायणामध्ये घुसडल्या गेल्या. त्यामुळे आता आपण जे रामायण वाचतो त्यामध्ये अनेक काल्पनिक व आतर्क्य वाटणाऱ्या गोष्टी नमूद आहेत.

मूळ वाल्मीक की रामायणामध्ये सीतेच्या स्वयंवरापासून ते लंकेच्या रावणाला मारून व वनवासाचा शेवट करून श्रीराम अयोध्येला परत येतात व राज्यकारभाराचे सूत्रे हातात घेतात. एवढेच वाल्मिकी रामायणामध्ये लिहिले आहे.

परंतु आपण आज जे रामायण वाचतो त्यामध्ये बालकांड आणि उत्तर कांड याचा प्रभावी वापर केला आहे जे मूळ वाल्मिकी रामायणामध्ये नाही.

वाल्मिकी रामायणामध्ये श्रीराम हे महाविष्णूचा अवतार असल्याचे ऋषीमुनींनी नमूद केले आहे. कारण भारताला ऋषीमुनींची फार मोठी परंपरा लाभलेली आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. त्यामुळे रामायणात उल्लेख केलेल्या सर्व ऋषीमुनींनी श्रीरामाचा आदरपूर्वक सन्मान केलेला आहे. व वेगवेगळ्या स्वरूपात मदत देखील केली आहे.

श्रीराम हा जर सर्वसाधारण माणूस असता तर वनवासासाठी इतक्या दूर आलेल्या माणसाला इतक्या ऋषीमुनींनी इतका मानसन्मान केला नसता.

अनेक ऋषीमुनी हे त्यावेळी अरण्यात राहत असत व ज्ञानार्जनाचे कार्य करत असत. त्यांना भविष्यात घडणाऱ्या घटनांचे अचूक ज्ञान होते. त्यामुळे त्यांना सर्व गोष्टीचे ज्ञान प्राप्त होते.

आजही आपल्याला नैसर्गिक शक्तीचे प्रत्यंतर येते. परंतु माणूस फार खोलात शिरत नाही. एखाद्या कुटुंबावर संकट येणार असेल तर रात्री कुत्रे रडतात, कावळे ओरडतात, शरीराचा कोणताही भाग स्फुरण पावतो, वाईट प्रकारची स्वप्न पडतात, 

हे येणाऱ्या संकटांची चाहूल असते. नैसर्गिक शक्ती आपल्याला त्याची जाणीव करून देतात. म्हणजेच निसर्गात एक प्रकारची अज्ञात शक्ती कार्यरत आहे याची आपल्याला प्रचिती येते. परंतु आपण मात्र त्याकडे दुर्लक्ष करत राहतो.

रामायण घडल्याचे पुरावे:

रामायण हे आज पासून 2800 वर्षापूर्वी घडले आहे. ज्यावेळेस रामायण घडले त्यावेळेस मंदिरे बांधण्याची कला विकसित झाली नव्हती. आज जी मंदिरे आहेत त्यांची संकल्पना इसवी सन पूर्व सहाव्या शतकापासून सुरू होते. आणि रामायण इसवी सन पूर्व आठव्या शतकात घडले होते. त्यामुळे मंदिरे, शिलालेख इत्यादी मिळणे कठीण आहे.

श्रीरामाच्या वनवासाच्या काळात ते पंचवटी या ठिकाणी अरण्यामध्ये नदीच्या किनाऱ्यावर राहत होते. ते झाडांपासून आणि लाकडापासून बनवलेल्या पर्णकुटी मध्ये राहत होते.

त्या ठिकाणी त्यांची वास्तव्य जवळजवळ आकरा वर्षे होते. ते जर वनवासात पर्णकुटी मध्ये राहत होते. तर तेथे कोणता पुरावा असणार आहे? तेथे कोणताच पुरावा काळाच्या ओघात सापडू शकत नाही.

परंतु पंचवटी येथील रामकुंड, लक्ष्मण कुंड ज्या ठिकाणी राम लक्ष्मण स्नान करीत असत. ती ठिकाणे आजही पंचवटी  जवळ आहेत.

ज्या ठिकाणी रावण आणि जटायूंचे युद्ध झाले. आणि रावणाने जटायूचे पंख कापून रक्तबंबाळ केले. त्या ठिकाणी जटायूला पाणी पाजण्यासाठी श्री रामाने जमिनीत बाण मारून पाणी काढले व जटायूला पाजले. ते कुंड अजूनही टाकेद जि. नाशिक येथे पाहायला मिळते. 

हनुमानाचा जन्म झालेले अंजनेर हे ठिकाणही नाशिक येथे आहे. मूळ वाल्मिकी रामायणा मध्ये वर्णन केल्या प्रमाणे हे ठिकाण तंतोतंत असल्याची खात्री पटते.

अयोध्येतील रामजन्मभूमी ठिकाणी पुरातत्व खात्याला (Archaeological Survey of India - ASI) उत्खननादरम्यान अनेक महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत, जे येथे पूर्वी एक मोठे हिंदू मंदिर होते या दाव्याला पुष्टी देतात.

प्रमुख पुरावे:

विष्णू-हरी शिलालेख: 

बाबरी मशीदीच्या ढिगाऱ्याखाली सापडलेला एक संस्कृत शिलालेख हा एक महत्त्वाचा पुरावा मानला जातो. या शिलालेखात बालीचा वध करणारा आणि दहा तोंडांचा (रावण) वध करणारा विष्णू' यांना समर्पित असलेल्या मंदिराचा उल्लेख आहे, ज्याचा अर्थ प्रभू राम असा लावला जातो. अनेक इतिहासकारांनी या शिलालेखाची सत्यता आणि पूर्वी मंदिराचे अस्तित्व असल्याचे समर्थन केले आहे.

खांबांचे अवशेष आणि पाया: 

उत्खननात 12 व्या शतकातील एका मोठ्या मंदिराच्या रचनेचे संकेत देणारे 50 हून अधिक खांब सापडले आहेत. बाबरी मशीद ज्या ठिकाणी होती, तेथे मंदिराचे खांब वापरले गेले होते, असेही काही पुराव्यांवरून दिसून आले आहे. या खांबांवर हिंदू देवतांची चित्रे आणि नक्षीकाम होते.

टेराकोटा मूर्ती आणि वास्तू अवशेष:

उत्खननादरम्यान 263 टेराकोटा मूर्ती सापडल्या आहेत, ज्यात देवता, मानवी आकृत्या आणि प्राणी यांचा समावेश आहे. हे अवशेष प्राचीन हिंदू मंदिरांच्या कलाशैलीशी सुसंगत आहेत. तसेच, मंदिराच्या छताचे आणि शिखराचे काही अवशेषही सापडले आहेत, ज्यामुळे येथे पूर्वी एक हिंदू मंदिर होते या सिद्धांताला बळकटी मिळते.

पुरातन वसाहतीचे पुरावे: 

उत्खननात असेही दिसून आले आहे की, या ठिकाणी इसवी सन पूर्व 9 व्या शतकापासून वसाहत होती, म्हणजेच सुमारे 3000 वर्षांपासून येथे मानवी वस्ती होती.

मंदिरासारखी रचना: 

ASI च्या अहवालानुसार, उत्खननात मिळालेले पुरावे हे स्पष्टपणे मशीदीपेक्षा वेगळ्या, मोठ्या इमारतीचे संकेत देतात आणि त्यात खांबांचे पाय नक्षीदार विटा आणि कोरीव वास्तुशिल्पाचे तुकडे' सापडले आहेत, जे मंदिराच्या अस्तित्वाकडे निर्देश करतात.

या पुराव्यांवरून पुरातत्व खात्याने (ASI) असा निष्कर्ष काढला आहे की, वादग्रस्त जागेवर बाबरी मशीद बांधण्यापूर्वी एक मोठी हिंदू वास्तू, कदाचित एक मंदिर, अस्तित्वात होते.

रामायण काळात अनेक प्रकारची शस्त्रे आणि अस्त्रे वापरली जात होती. ही शस्त्रे केवळ सर्वसामान्य नसून, मंत्रशक्तीने प्रेरित केलेली "अस्त्रे" देखील होती, ज्यांना देवांचे सामर्थ्य प्राप्त होते. काही प्रमुख शस्त्रे आणि अस्त्रे खालीलप्रमाणे:

प्रमुख शस्त्रे:

धनुष्यबाण: 

रामायणातील सर्वात प्रमुख शस्त्र. श्रीराम स्वतः 'कोदंड' नावाचे धनुष्य वापरत होते. हे बांबूपासून बनलेले असले तरी अत्यंत प्रभावी होते.

गदा: 

रामायण आणि महाभारतातही गदेचा उल्लेख आढळतो. हनुमान गदा वापरण्यासाठी प्रसिद्ध होते.

तलवार: 

विविध प्रकारच्या तलवारी वापरल्या जात असत. रावणाकडे 'चंद्रहास' नावाची शिवशंकरांनी दिलेली दिव्य तलवार होती.

त्रिशूळ: 

भगवान शंकराचे शस्त्र, जे काही प्रसंगी इतर देवांनी किंवा राक्षसांनीही वापरले.

भाला/शूळ: 

लढाईत वापरले जाणारे आणखी एक सामान्य शस्त्र.

चक्र: 

विष्णूचे सुदर्शन चक्र हे एक अत्यंत शक्तिशाली अस्त्र होते.

प्रमुख अस्त्रे:

अस्त्रे ही मंत्रांनी सक्रिय केली जाणारी किंवा विशिष्ट देवतांच्या शक्तीने युक्त असलेली शस्त्रे होती. त्यांचे परिणाम अत्यंत विनाशकारी असू शकत होते.

ब्रह्मास्त्र: 

हे ब्रह्मदेवाचे अस्त्र होते आणि ते अत्यंत शक्तिशाली मानले जात असे. याचा वापर केल्यास मोठ्या प्रमाणावर विनाश होत असे. इंद्राजितने याचा वापर हनुमानावर केला होता, परंतु हनुमानाला मिळालेल्या वरदानामुळे ते निष्प्रभ ठरले. श्रीरामानेही जयंतावर आणि रावणावर याचा वापर केला होता.

ब्रह्मशीर्ष अस्त्र: 

हे ब्रह्मास्त्रापेक्षाही चारपट अधिक शक्तिशाली मानले जाते. ज्या ठिकाणी याचा वापर केला जात असे, ती जागा 200 वर्षांपर्यंत ओसाड होत असे. तिथे काहीच झाड अथवा गवत उगवत नसे.

नारायणास्त्र: 

हे भगवान विष्णूचे अस्त्र होते. एकदा वापरले की ते एकाच वेळी अनेक शत्रूंना लक्ष्य करू शकत असे.

पशुपतास्त्र: 

हे भगवान शिवाने दिलेले एक शक्तिशाली अस्त्र होते.

आग्नेयास्त्र: 

अग्नी देवाशी संबंधित हे अस्त्र भयंकर आग निर्माण करत असे. लंकेला जाळण्यासाठी हनुमानाने याचा उपयोग केला होता असे काही ठिकाणी सांगितले जाते (तरी मुख्यत्वे हनुमानाने स्वतःच्या शेपटीला आग लावली होती).

वायव्यास्त्र: 

वायू देवाशी संबंधित हे अस्त्र भयानक वादळे आणि वायू निर्माण करत असे.

वरुणास्त्र: 

वरुण देवाशी संबंधित हे अस्त्र प्रचंड प्रमाणात पाणी निर्माण करत असे आणि आग्नेयास्त्राचा प्रभाव कमी करण्यासाठी याचा वापर केला जात असे.

नागास्त्र: 

हे अस्त्र सापाचे रूप घेऊन शत्रूंना लक्ष्य करत असे. इंद्राजितने रामा-लक्ष्मणावर याचा प्रयोग केला होता, ज्यामुळे ते बेशुद्ध झाले होते.

नागपाश: 

याचा वापर केल्यास शत्रू सापांच्या वेटोळ्यात बांधले जात असे. इंद्राजितने रामा-लक्ष्मणांना बांधण्यासाठी याचा वापर केला होता.

ऐन्द्रास्त्र: 

इंद्र देवाचे हे अस्त्र बाणांचा वर्षाव करत असे.

वज्रास्त्र: 

हे इंद्रदेवाच्या वज्रासारखे होते आणि विजेचा धक्का देत असे.

मोहिनी अस्त्र: 

हे अस्त्र शत्रूंना मोहित करून गोंधळात पाडत असे.

भार्गवास्त्र: 

परशुरामाचे हे अस्त्र अत्यंत शक्तिशाली शस्त्रांचा वर्षाव करत असे.

धर्मास्त्र, कालास्त्र, विष्णुचक्र, इंद्रचक्र अशी अनेक अन्य अस्त्रे आणि चक्रे यांचाही उल्लेख रामायणात आढळतो.

रामायणातील युद्ध केवळ शारीरिक सामर्थ्यावर आधारित नसून, या दिव्य शस्त्रे आणि अस्त्रांच्या वापरावरही अवलंबून होते, ज्यामुळे त्यांची भीषणता आणि परिणाम प्रचंड होते.

रामायण काळातील जीवनशैली: 

रामायण काळात सामान्य जनतेचा पेहराव हा मुख्यत्वे साधे आणि न शिवलेले कपडे असायचा. त्या काळात शिवलेले कपडे फारसे प्रचलित नव्हते, त्यामुळे लोक मुख्यत्वे खालील प्रकारचे वस्त्र परिधान करत असत:

पुरुषांचा पेहराव:

पुरुष धोती सारखे वस्त्र नेसत असत, जे कमरेला गुंडाळून पायांच्या मधून घेऊन मागे खोचले जात असे.

अंगावर ते उत्तरीया नावाचे वस्त्र (शाल किंवा एक साधा कपडा) खांद्यावर किंवा गळ्यात टाकत असत. हे वस्त्र अंगाच्या वरच्या भागाला झाकण्यासाठी वापरले जात असे.

काही प्रसंगी उष्णीष म्हणजेच पगडी किंवा फेटा डोक्यावर बांधला जात असे, विशेषतः सैनिक किंवा महत्त्वाचे पुरुष.

महिलांचा पेहराव:

स्त्रिया सामान्यतः एकच लांब कापड परिधान करत असत, जे आजच्या साडीसारखे कमरेभोवती गुंडाळले जात असे आणि त्याचा काही भाग वरच्या शरीरावर किंवा खांद्यावर घेतला जात असे. याला अंतायिरिया आणि उत्तरीया असेही म्हटले जाते.

कमी कपड्यांमध्ये स्त्रिया फक्त कमरेभोवती एक वस्त्र गुंडाळत असत, विशेषतः घरात असताना किंवा कमी महत्त्वाच्या कामांसाठी.

दागिन्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असे, जरी सामान्य जनता राजघराण्याइतके महागडे दागिने वापरत नसेल.

वस्त्राचे प्रकार आणि रंग:

कापूस Cotton: 

सामान्य जनता प्रामुख्याने सुती कपडे वापरत असे, कारण ते उष्ण हवामानासाठी आरामदायक होते.

रेशीम Silk: 

रेशीम वस्त्रे राजघराण्यातील लोक किंवा धनाढ्य लोक विशेष प्रसंगी वापरत असत. पण रामायणात असे उल्लेख आहेत की रेशीम सामान्य लोकांसाठीही उपलब्ध होते, त्यांना "कौशेय" असे म्हटले जायचे.

क्षौम Linan: 

क्षौम हे एक प्रकारचे तलम वस्त्र होते, जे पवित्र मानले जात असे आणि पूजा-अर्चेसाठी वापरले जात असे.

रंग: 

त्या काळात तेजस्वी आणि नैसर्गिक रंगांचे कपडे वापरले जात असत. वाल्मिकी रामायणात विविध रंगांचे सुंदर वर्णन आढळते.

भरतकाम आणि किनारी: 

रामायण काळात भरतकाम केलेले आणि किनारी असलेले वस्त्र बनवण्याची कला प्रगत होती.

लक्षात घेण्यासारख्या गोष्टी:

वनवासात राम, सीता आणि लक्ष्मण यांनी ऋषीमुनींसारखे वल्कले (झाडांच्या सालीपासून बनवलेले कपडे) परिधान केले होते, जे त्यांच्या त्यागी जीवनाचे प्रतीक होते.

एकूणच, रामायण काळातील सामान्य जनतेचा पेहराव हा साधा, सुती, न शिवलेला आणि हवामानाला अनुकूल असा होता, ज्यात नैसर्गिक रंगांचा आणि मर्यादित दागिन्यांचा वापर केला जात असे.

प्रमुख अन्नपदार्थ:

रामायण काळामध्ये लोकांचे प्रमुख अन्नपदार्थ विविध प्रकारचे होते, जे त्यांच्या सामाजिक स्थितीवर आणि ते कोणत्या ठिकाणी राहत होते यावर अवलंबून होते

धान्य:

भात (तांदूळ): हा एक महत्त्वाचा अन्नपदार्थ होता आणि तो दैनंदिन आहारात तसेच धार्मिक विधींमध्ये वापरला जात असे.

ज्वारी (बार्ली): हे एक प्राचीन धान्य मानले जाते आणि ते यज्ञात तसेच सामान्य आहारातही वापरले जात असे.

गहू: गव्हाचा उल्लेख देखील आढळतो, विशेषतः समृद्ध आणि शहरी भागांमध्ये.

तीळ: तिळाचा वापर स्वयंपाकात आणि धार्मिक विधींमध्ये केला जात असे.

फळे आणि कंदमुळे:

वनवासात असताना राम, लक्ष्मण आणि सीता मुख्यत्वे फळे आणि कंदमुळे खाऊन राहत असत. यामध्ये आंबे, केळी, फणस, बोर आणि विविध कंदमुळांचा समावेश होता.

फळे ही पवित्र मानली जात असत आणि देवांना अर्पण केली जात असत.

मध: मध हा एक मौल्यवान आणि शुद्ध अन्नपदार्थ मानला जात असे, जो आरोग्य आणि गोडवा दोन्हीसाठी महत्त्वाचा होता.

दूध आणि दुग्धजन्य पदार्थ: दूध, दही, लोणी आणि तूप हे आहाराचा एक महत्त्वाचा भाग होते.

मसाले: 

जेवणात विविध मसाल्यांचा वापर केला जात असे, जसे की लवंग, जिरे, आले आणि इतर सुगंधी मसाले.

थोडक्यात, रामायण काळातील लोकांचा आहार त्यांच्या जीवनशैलीनुसार (उदा. राजा किंवा वनवासी) आणि उपलब्धतेनुसार वैविध्यपूर्ण होता. धान्य, फळे, कंदमुळे,आणि दुध हे प्रमुख घटक होते.

रामायणाचे अनेक भाषांमध्ये आणि वेगवेगळ्या धर्मांमध्ये भाषांतर झाले आहे. हे केवळ एकाच धर्मापुरते मर्यादित नसून, त्याचा प्रभाव विविध संस्कृती आणि धार्मिक परंपरांवर दिसून येतो.

मुख्यतः, रामायणाचे खालील धर्मांमध्ये भाषांतर झाले आहे किंवा त्या धर्मांच्या ग्रंथांमध्ये रामायणासारख्या कथा आढळतात:

हिंदू धर्म: 

मूळ वाल्मिकी रामायण संस्कृतमध्ये आहे आणि हिंदू धर्माचा तो एक महत्त्वाचा आधारग्रंथ आहे. याशिवाय, भारतात वेगवेगळ्या प्रादेशिक भाषांमध्ये (उदा. हिंदीमध्ये तुलसीदासांचे रामचरितमानस, मराठीत श्रीधरपंतांचे रामायण, कन्नडमध्ये तोरवे रामायण, बंगाली, ओडिया, मणिपुरी, असमिया इत्यादी) रामायणाची अनेक रूपे आहेत.

जैन धर्म: 

जैन धर्मातही रामायणाच्या अनेक कथा आढळतात. त्यांना "पउमचरिउ" (पद्म चरित) असे म्हणतात. प्राकृत भाषेत लिहिलेली विमलसूरिची "पउमचरिउ" ही सर्वात जुनी जैन रामायण मानली जाते. जैन रामायणात हिंदू रामायणापेक्षा काही प्रमाणात फरक आढळतात, उदा. रावणाला एक सुंदर आणि गुणवान व्यक्ती म्हणून चित्रित केले आहे आणि रावणाचा वध लक्ष्मणाने केल्याचे दाखवले आहे.

बौद्ध धर्म: 

बौद्ध धर्मातही रामायणाशी संबंधित कथा आहेत, ज्यांना "दशरथ जातक" या नावाने ओळखले जाते. या जातकांतही रामायणाच्या मूळ कथेमध्ये काही बदल दिसून येतात. उदा. यात सीता ही रामाची बहीण असल्याचे दर्शवले आहे आणि त्यांचे लग्न झाल्याचेही काही कथांमध्ये आढळते. तसेच, रावणाचा उल्लेख किंवा लंकेचा उल्लेख नसतो.

शीख धर्म: 

शीख धर्मामध्येही प्रभू रामांना एक श्रेष्ठ व्यक्तिमत्व आणि अवतार म्हणून मान्यता आहे. जरी त्यांचा स्वतंत्र रामायण ग्रंथ नसला तरी, शीख धर्माच्या शिकवणींमध्ये रामाचा आदर केला जातो.

याशिवाय, रामायणाचा प्रभाव केवळ भारतापुरता मर्यादित नसून, आग्नेय आशियातील अनेक देशांवर म्हणजेच  इंडोनेशिया, कंबोडिया, लाओस, फिलिपिन्स, श्रीलंका, नेपाळ, थायलंड, मलेशिया, जपान, म्यानमार इत्यादी तो दिसून येतो. या देशांमध्येही त्यांच्या संस्कृतीनुसार रामायणाची विविध रूपांतरे आणि कथा प्रचलित आहेत.

थोडक्यात, रामायणाचे केवळ भाषांतरच नव्हे, तर विविध धर्मांच्या आणि संस्कृतींच्या दृष्टिकोनातून त्याचे अनेक रूपांतरे आणि आवृत्त्या जगभरात आढळतात.

मुघल सम्राट अकबर याला सुद्धा रामायण ग्रंथाबद्दल प्रचंड कुतूहल होते. व राजा कसा असावा तर श्रीरामा सारखा अशी त्याची धारणा झाली होती. सम्राट अकबर हा नेहमीच हिंदू धर्माचा आदर करीत असे. हिंदू धर्माच्या सण समारंभांना त्याने मान्यता दिली होती. 

व आपणही श्रीरामासारखे लोकप्रिय व्हावे यासाठी त्यांने अल्ला ऐवजी मलाच अल्ला म्हणा असा फतवादेखील काढला होता. अकबराने त्याच्या राज्यात श्रीरामाचे नाणे सुद्धा छापले होते.

महाराष्ट्रा मध्ये रामदास स्वामींनी सुद्धा श्रीरामाविषयी दासबोध या ग्रंथांमध्ये लेखन केले आहे व श्रीरामाचा महिमा वर्णन केला आहे.

रामदास स्वामींनी ठीक ठिकाणी गावामध्ये श्रीरामाची आणि हनुमानाची मंदिरे उभारली व तेथील लोकांना भक्ती मार्गाला प्रवृत्त केले.

भारतामध्ये श्रीरामाची अनेक मंदिरे आहेत आणि ती देशभरात पसरलेली आहेत. काही प्रमुख आणि प्रसिद्ध मंदिरे खालीलप्रमाणे आहेत:

उत्तर प्रदेश:

अयोध्या राम मंदिर: 

हे श्रीरामाचे जन्मस्थान मानले जाते आणि शरयू नदीच्या काठी वसलेले एक अत्यंत महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. अलीकडेच या भव्य मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

कनक भवन, अयोध्या:

हे मंदिर भगवान राम आणि सीतेला समर्पित आहे.

महाराष्ट्र:

काळाराम मंदिर, नाशिक: पंचवटी परिसरात असलेले हे मंदिर त्याच्या काळ्या पाषाणातील श्रीरामाच्या मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे. वनवासाच्या काळात भगवान रामाने काही काळ येथे वास्तव्य केले होते.

राम राजा मंदिर, रामटेक (नागपूर): हे एक प्राचीन आणि प्रसिद्ध राम मंदिर आहे.

चाफळचे राम मंदिर (सातारा): समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेले हे एक महत्त्वाचे राम मंदिर आहे.

श्रीराम मंदिर, पंढरपूर: पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी चंद्रभागा घाटावर स्थापित केलेले हे राम मंदिर आहे.

तुळशीबाग श्रीराम मंदिर, पुणे: पुण्यात असलेले हे मंदिर देखील प्रसिद्ध आहे.

श्री पोद्दारेश्वर राम मंदिर, नागपूर: हे मंदिर देखील नागपूरमधील एक महत्त्वाचे राम मंदिर आहे.

मध्य प्रदेश:

राम राजा मंदिर, ओरछा: हे भारतातील एकमेव मंदिर आहे जिथे श्रीरामाची पूजा राजा म्हणून केली जाते आणि त्यांना रोज गार्ड ऑफ ऑनर दिला जातो.

तेलंगणा:

सीता रामचंद्रस्वामी मंदिर, भद्राचलम: गोदावरी नदीच्या काठी असलेले हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे. रामनवमीला येथे मोठा उत्सव साजरा केला जातो.

तामिळनाडू:

रामास्वामी मंदिर, कुंभकोणम: हे सुमारे 400 वर्षांपूर्वी राजा रघुनाथ नायकर यांनी बांधले होते आणि या मंदिरात रामायणातील अनेक प्रसंग कोरलेले आहेत.

कोठंडारामस्वामी मंदिर, रामेश्वरम: रामेश्वरममधील हे मंदिरही प्रसिद्ध आहे.

केरळ:

त्रिप्रयार श्री राम मंदिर, त्रिशूर: या मंदिरात भगवान श्रीकृष्ण एकेकाळी ज्या मूर्तीची पूजा करत होते, ती मूर्ती स्थापित केली आहे असे मानले जाते.

कर्नाटक:

कोदंडराम मंदिर, हिरेमागळूर (चिकमंगळूर जिल्हा): या मंदिरात भगवान राम आणि लक्ष्मण धनुष्यबाणासह दाखवले आहेत.

ओडिशा:

राम मंदिर, भुवनेश्वर: हे भुवनेश्वरच्या मध्यभागी असलेले एक प्रसिद्ध मंदिर आहे.

जम्मू आणि काश्मीर:

रघुनाथ मंदिर, जम्मू: हे उत्तर भारतातील सर्वात मोठ्या मंदिर संकुलांपैकी एक आहे.

पंजाब:

श्री राम तीरथ मंदिर, अमृतसर: हे ते ठिकाण आहे जिथे सीतेला वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात आश्रय मिळाला होता आणि लव-कुश यांचा जन्म झाला होता.

याव्यतिरिक्त, भारताच्या विविध राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये अनेक लहान-मोठी राम मंदिरे आहेत, जी स्थानिक पातळीवर पूजनीय आहेत.

परदेशात अनेक देशांमध्ये श्रीरामाची मंदिरे आहेत, विशेषतः जिथे भारतीय वंशाचे लोक मोठ्या संख्येने स्थायिक झाले आहेत. काही प्रमुख देशांमध्ये असलेली राम मंदिरे खालीलप्रमाणे आहेत:

नेपाळ: 

नेपाळमध्ये, विशेषतः जनकपूर धाममध्ये, माता सीतेचे एक महत्त्वाचे मंदिर आहे, ज्याला जानकी मंदिर असेही म्हणतात. हे मंदिर भगवान राम आणि सीतेच्या विवाहाशी संबंधित मानले जाते.

मॉरिशस: 

पोर्ट लुईसमध्ये एक प्रसिद्ध राम मंदिर आहे, जे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्वाचे केंद्र आहे.

फ्रान्स: 

पॅरिसमध्ये राम मंदिर आहे, जे राम नवमी, दसरा आणि दिवाळीसारखे सण मोठ्या उत्साहात साजरे करते.

कॅनडा: 

टोरंटोमध्ये राम मंदिर आहे, जे उत्तर अमेरिकेतील सर्वात मोठ्या मंदिरांपैकी एक आहे.

अमेरिका (USA): 

न्यूयॉर्कमधील फ्लशिंग, क्वीन्समध्ये राम मंदिर आहे. अमेरिकेच्या इतर राज्यांमध्येही (उदा. कॅलिफोर्निया, इलिनॉय) अनेक हिंदू मंदिरे आहेत ज्यात श्रीरामाची पूजा केली जाते.

ऑस्ट्रेलिया: 

ऑस्ट्रेलियामध्येही राम मंदिराच्या निर्मितीची माहिती समोर आली आहे.

थायलंड: 

थायलंडचा रामायणाशी (रामकियन) ऐतिहासिक संबंध आहे आणि तिथेही रामाची श्रद्धा आहे, त्यामुळे तिथेही काही मंदिरे असू शकतात.

याव्यतिरिक्त, फिजी, गयाना, मलेशिया, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, सुरीनाम, त्रिनिदाद आणि टोबॅगो यांसारख्या देशांमध्ये जिथे मोठ्या प्रमाणात भारतीय लोकसंख्या आहे, तिथेही हिंदू मंदिरे आहेत आणि त्यापैकी अनेकांमध्ये भगवान रामाची मूर्ती आणि पूजा केली जाते.

आतापर्यंत झालेल्या घडामोडी:

अयोध्या येथील राम मंदिराचा इतिहास खूप जुना आणि गुंतागुंतीचा आहे. याची सुरुवात अनेक शतकांपूर्वी झाली, पण या वादाला खरी गती मुघल शासक बाबरच्या काळात मिळाली. हिंदूंच्या श्रद्धेनुसार, अयोध्या हे भगवान रामाचे जन्मस्थान आहे आणि तिथे एक भव्य मंदिर होते.

बाबरच्या काळापासूनचा इतिहास

1528:  मुघल शासक बाबर याच्या  आदेशानुसार, सेनापती मीर बाकीने राम मंदिराच्या जागेवर मंदिर पाडून मशीद बांधली. या मशिदीचे नाव बाबरी असे ठेवले गेले.

1853: बाबरी मशिदीवरून अयोध्येत पहिल्यांदा जातीय दंगली उसळल्या.

1859: ब्रिटिश शासकांनी या वादग्रस्त जागेभोवती कुंपण घालून आतील भाग मुस्लिमांसाठी नमाज पढण्यासाठी आणि बाहेरील भाग हिंदूंना पूजा करण्यासाठी वेगळा केला.

1885: महंत रघुबीर दास यांनी फैजाबादच्या जिल्हा न्यायालयात मंदिर बांधण्याची परवानगी मिळावी यासाठी याचिका दाखल केली, परंतु ती फेटाळण्यात आली.

स्वातंत्र्यानंतर आणि वाद चिघळू लागला

1949: बाबरी मशिदीच्या आत भगवान रामाची मूर्ती अचानक प्रकट झाली. हिंदूंनी दावा केला की ही मूर्ती भगवान रामाचे रूप आहे, तर मुस्लिमांनी मूर्ती शांतपणे आत ठेवल्याचा आरोप केला. या घटनेनंतर दोन्ही बाजूंनी गुन्हे दाखल करण्यात आले आणि सरकारने वाद टाळण्यासाठी ती जागा वादग्रस्त म्हणून बंद केली.

1950: गोपाल सिंह विशारद यांनी रामलल्लाच्या मूर्तीची पूजा करण्याची परवानगी मिळावी, यासाठी फैजाबाद जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली. त्याच वर्षी परमहंस रामचंद्र दास यांनीही मूर्ती त्याच जागेवर राहावी आणि पूजा सुरू ठेवावी यासाठी याचिका दाखल केली.

1959: निर्मोही आखाड्याने या भूमीवर मालकी हक्कासाठी याचिका दाखल केली.

1961: उत्तर प्रदेश सुन्नी वक्फ बोर्डाने मशिदीच्या जमिनीवर हक्क मागणारा अर्ज दाखल केला.

1984: विश्व हिंदू परिषदेने राम मंदिरासाठी देशव्यापी आंदोलन सुरू केले. लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली राम जन्मभूमी मुक्ती यज्ञाची स्थापना झाली.

1986: फैजाबाद जिल्हा न्यायालयाने हिंदू भाविकांना वादग्रस्त जागेचे कुलूप उघडून प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्याची परवानगी दिली.

1988: विश्व हिंदू परिषदेने वादग्रस्त जागेजवळ राम मंदिराचा पाया रचला.

1990: भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी भव्य रथयात्रा काढली. या आंदोलनाने मोठा जोर पकडला.

6 डिसेंबर 1992: विश्व हिंदू परिषद आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांच्या लाखो कार्यकर्त्यांनी बाबरी मशीद पाडली. या घटनेनंतर देशभरात जातीय दंगली उसळल्या. 

तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेशची सरकारे बरखास्त केली. त्यानंतर न्यायमूर्ती एम. एस. लिब्रहान यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग स्थापन करण्यात आला.

न्यायालयीन लढा आणि अंतिम निकाल

2002: वादग्रस्त जागेच्या मालकी बाबतच्या खटल्याची अलाहाबाद उच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली.

2003: भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) विभागाने वादग्रस्त जागेखाली मंदिराचे अवशेष असल्याचा पुरावा मिळाल्याचा दावा केला. मुस्लिम पक्षाने मात्र याला विरोध केला.

2010: अलाहाबाद उच्च न्यायालयाने या खटल्याचा निकाल दिला. न्यायालयाने वादग्रस्त जमिनीचे तीन भाग करून ते सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही आखाडा आणि रामलल्ला विराजमान यांच्यात समान वाटून देण्याचे आदेश दिले. या निर्णयाला आव्हान देणारे अनेक अर्ज सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आले.

9 नोव्हेंबर 2019: सर्वोच्च न्यायालयाने 500 वर्षांहून अधिक जुन्या या वादावर अंतिम निकाल दिला. 

सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायधीशांच्या खंडपीठाने एकमताने राम मंदिराच्या बाजूने निर्णय दिला. तसेच, मुस्लिमांना अयोध्येच्या बाहेर पाच एकर स्वतंत्र जमीन मशीद उभारण्यासाठी देण्याचे आदेश दिले.

5 ऑगस्ट 2020: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भव्य राम मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन झाले.

22 जानेवारी 2024: प्रभू श्रीरामाच्या बालस्वरूपातील मूर्तीची (रामलल्ला) भव्य राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

या संपूर्ण प्रक्रियेत अनेक कायदेशीर लढे, राजकीय घडामोडी आणि सामाजिक संघर्ष झाले. 

अखेर, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आणि त्यानंतर मंदिराच्या उभारणीने या दीर्घकाळ चाललेल्या वादाचा शेवट झाला.

तुम्ही अयोध्या मंदिराविषयी माहिती विचारली आहे. खालील माहिती तुम्हाला मंदिराची रचना, इतिहास आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरेल.

मंदिराची वास्तुकला आणि रचना

अयोध्या राम मंदिर हे पारंपारिक नागर शैलीमध्ये बांधले आहे. या शैलीमध्ये बांधलेली मंदिरे भव्यता आणि कलात्मकतेसाठी ओळखली जातात.

लांबी आणि रुंदी: मंदिराची पूर्व-पश्चिम लांबी 380 फूट, रुंदी 250 फूट आणि उंची 161 फूट आहे.

मजले आणि मंडप: हे मंदिर तीन मजली आहे. प्रत्येक मजल्याची उंची 20 फूट आहे. मंदिरात एकूण 5 मंडप आहेत:

नृत्य मंडप

रंग मंडप

सभा मंडप

प्रार्थना मंडप

कीर्तन मंडप

स्तंभ आणि दरवाजे: मंदिरामध्ये एकूण 392 स्तंभ (खांब) आणि 44 दरवाजे आहेत.

गर्भगृह: मंदिराच्या तळमजल्यावर असलेल्या गर्भगृहात प्रभू श्रीरामाची बालमूर्ती (रामलल्ला) स्थापित केली आहे. पहिल्या मजल्यावर श्रीराम दरबार आहे.

विशेष सुविधा: दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी रॅम्प आणि लिफ्टची सोय करण्यात आली आहे.

मंदिराचा परिसर

संपूर्ण मंदिराचा परिसर सुमारे 71 एकरमध्ये पसरलेला आहे. मुख्य मंदिराच्या भोवती एक आयताकृती '' परिक्रमा मार्ग आहे. या प्राकाराच्या चारही कोपऱ्यांमध्ये चार मंदिरे आहेत, ज्यात भगवान सूर्य, भगवान शंकर, गणपती आणि देवी भगवती यांच्या मूर्ती आहेत. 

याशिवाय, परिसरात महर्षी वाल्मिकी, महर्षी वसिष्ठ, महर्षी विश्वामित्र, महर्षी अगस्त्य, निषादराज गुह, माता शबरी आणि देवी अहिल्या यांची मंदिरेही आहेत.

मंदिराचा इतिहास

या जागेला राम जन्मभूमी मानले जाते, कारण पौराणिक कथांनुसार भगवान श्रीरामांचा जन्म इथेच झाला होता. 15 व्या शतकात मुघलांनी इथे बाबरी मशीद बांधली, असा दावा हिंदू धर्मीय करतात. त्यानंतर, अनेक दशके हा वाद न्यायालयात सुरू होता. अखेरीस, 9 नोव्हेंबर 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आणि वादग्रस्त जमीन राम मंदिराच्या उभारणीसाठी देण्याचा निर्णय घेतला. 5 ऑगस्ट 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचे भूमिपूजन झाले.

मंदिर कसे पोहोचाल?

विमानाने: महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ, अयोध्या धाम (Maharishi Valmiki International Airport, Ayodhya Dham) हे मंदिरापासून सर्वात जवळचे आहे.

रेल्वेने: अयोध्या धाम रेल्वे स्टेशन आणि अयोध्या कॅन्टोन्मेंट रेल्वे स्टेशन येथे देशाच्या अनेक प्रमुख शहरांमधून ट्रेन येतात.

रस्त्याने: अयोध्या हे उत्तर प्रदेश आणि आसपासच्या राज्यांतील प्रमुख शहरांशी रस्त्याने जोडलेले आहे. तुम्ही बस, टॅक्सी किंवा स्वतःच्या गाडीने इथे येऊ शकता.

मंदिरात प्रवेशासाठी वेळ सकाळी 6.30 पासून रात्री 9.30 पर्यंत आहे. दर्शन घेण्यासाठी तुम्ही श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या वेबसाइटवरून मोफत प्रवेश पास मिळवू शकता.

श्रीरामाची मूर्ती: 

अयोध्येतील राम लल्लाची मूर्ती काळ्या दगडापासून घडवण्यात आली आहे. या दगडाला 'कृष्ण शिला' किंवा 'श्यामला' शिला असेही म्हणतात. 

हा दगड कर्नाटक राज्यातील म्हैसूर येथील खाणीतून आणला गेला आहे. या दगडाचे वैशिष्ट्य म्हणजे तो 2.5 अब्ज वर्षांपेक्षा जुना आहे आणि पाणी किंवा इतर गोष्टींचा त्यावर परिणाम होत नाही.

ही मूर्ती अरुण योगीराज यांनी घडवली आहे. अरुण योगीराज हे कर्नाटक राज्यातील म्हैसूरचे प्रसिद्ध शिल्पकार आहेत.

त्यांच्या कुटुंबातील पाच पिढ्यांपासून मूर्ती बनवण्याची परंपरा आहे. त्यांनी 51 इंच उंचीची आणि सुमारे 200 किलो वजनाची ही मूर्ती एकाच अखंड दगडापासून तयार केली आहे, ज्यामध्ये कोणताही दुसरा दगड जोडलेला नाही.

मंदिराचे बांधकाम:

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या बांधकामासाठी प्रामुख्याने गुलाबी वालुकामय दगड (पिंक सँडस्टोन) वापरला आहे. हा दगड राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्याच्या बन्सी पहारपूर येथील खाणीतून आणला आहे.

याशिवाय मंदिराच्या बांधकामासाठी आणखी काही विशेष दगड वापरले आहेत:

पांढरा संगमरवरी दगड: 

हा राजस्थानच्या मकराना येथील प्रसिद्ध संगमरवरी दगड आहे, जो मंदिराच्या मुख्य भागाला सौंदर्य देतो.

ग्रॅनाईट दगड: 

मंदिराचा पाया (फाउंडेशन) मजबूत करण्यासाठी सुमारे 17,000 ग्रॅनाईट ब्लॉक वापरले आहेत, ज्यामुळे मंदिर अधिक टिकाऊ होईल.

या सर्व दगडांची निवड विशेष काळजीपूर्वक केली आहे जेणेकरून मंदिर 800 ते 1000 वर्षांपर्यंत टिकेल. 

श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, अयोध्या येथील राम मंदिराच्या बांधकामावर आतापर्यंत ₹2150 कोटी खर्च झाले आहेत.

मंदिर अजून पूर्णपणे तयार झालेले नाही, त्यामुळे भविष्यात आणखी खर्च अपेक्षित आहे. 

लेखक :- रामदास तळपे

                रामरक्षा 

अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य ।

बुधकौशिकऋषिः ।

श्रीसीतारामचन्द्रो देवता ।

अनुष्टुप् छ्न्दः । सीता शक्तिः ।

श्रीमद् हनुमान् कीलकम् ।

श्रीरामचन्द्रप्रीत्यर्थे जपे विनियोगः ।

अर्थ :-  या रामरक्षास्तोत्ररूपी मंत्राचा ऋषि (रचणारा) बुधकौशिक असून छंद (वृत्त?) अनुष्टुभ् आहे, सीता आणि श्रीरामचंद्र या देवता आहेत, सीता शक्ती आहे, हनुमान आधारस्तंभ आहे आणि श्रीरामचंद्राच्या प्रेमाने जपासाठी वापरला जावा म्हणून हा स्तोत्ररूप मंत्र निर्माण केला आहे.

अथ ध्यानम् ।

ध्यायेदाजानुबाहुम् धृतशरधनुषम् ।बद्धपद्मासनस्थम् ।

पीतं वासो वसानम् नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नम् ।

वामाङ्कारूढसीतामुखकमलमिलल्लोचनं नीरदाभम् ।

नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटामण्डनं रामचन्द्रम् ॥

इति ध्यानम् ।

अर्थ – आता ध्यानाची सुरुवात करू या. गुडघ्यापर्यंत हात असलेल्या, धनुष्यबाण धारण केलेल्या, बद्धपद्मासनात बसलेल्या, पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेल्या, नुकत्याच उमललेल्या कमळाच्या पाकळीशी स्पर्धा करणाऱ्या प्रसन्न अशा श्रीरामांचे ध्यान करू या. त्याच्या डाव्या मांडीवर सीता बसलेली आहे, श्रीरामाची नजर तिच्या मुखकमलाकडे लागलेली आहे. श्रीरामांची कांती मेघश्याम आहे. शरीर निरनिराळ्या अलंकारांच्या शोभेने झळकत आहे. मोठ्या जटांमुळे त्यांचा चेहरा सुशोभीत झालेला आहे.

चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् ।

एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् ॥ १

अर्थ – श्रीरामाचे चरित्र शंभर कोटी श्लोकांइतके विस्तृत आहे. त्याचे केवळ एक अक्षरसुद्धा पुरुषाची मोठी पापे नष्ट करण्यास समर्थ आहे.

ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनम् ।

जानकीलक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितम् ॥ २ ॥

अर्थ – नीलकमळासारखा सावळा रंग असलेल्या आणि कमळासारखे नेत्र असलेल्या रामाचे ध्यान करावे. सीता आणि लक्ष्मण ज्याच्या सन्निध असून ज्याचे मस्तक जटारूपी मुकुटाने सुशोभित आहे

सासितूणधनुर्बाणपाणिं नक्तंचरान्तकम् 

स्वलीलया जगत्त्रातुमाविर्भूतमजं विभुम् ॥ ३॥

अर्थ – आणखी एक म्हणजे मूलत: जन्मरहित व सर्वव्यापक असूनही त्याने जगाच्या रक्षणासाठी स्वतःस मर्यादित स्वरूपात सहज लीलेने प्रकट केले आहे. बाकी अर्थ सहज स्पष्ट होईल

रामरक्षाम् पठेत् प्राज्ञः पापघ्नीं सर्वकामदाम् ।

शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः ॥ ४ ॥

अर्थ – रामरक्षा पापांचा नाश करणारी व सर्व इच्छा पूर्ण करणारी असल्याने सूज्ञ लोकांनी तिचे पठण करावे.(दुसऱ्या ओळीपासून कवच सुरू होते) रघूच्या कुळात उत्पन्न झालेला राम माझ्या कपाळाचे रक्षण करो. दशरथाचा पुत्र कपाळाचे रक्षण करो.

कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियः श्रुती ।

घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः ॥ ५ ॥

अर्थ – कौसल्येचा पुत्र माझ्या दृष्टीचे रक्षण करो, विश्वामित्राला प्रिय (असलेले श्रीराम) माझ्या कानांचे रक्षण करोत, इथे विशेषणाची चपखलता लक्षात घेण्यासारखी आहे. श्रुतींसाठी विश्वामित्राशी संबंधित विशेषणच का, कारण विश्वामित्राने श्रुतींद्वारे म्हणजे कानांद्वारे विद्येचे संस्कार रामावर केले. यज्ञाचे रक्षण करणारे (श्रीराम) माझ्या नाकाचे रक्षण करोत तर सुमित्रेचे ज्यांच्यावर प्रेम आहे (श्रीराम) माझ्या मुखाचे रक्षण करोत.

जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दितः ।

स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः ॥ ६ ॥

अर्थ – विद्येचा खजिना असलेले माझ्या जिभेचे रक्षण करोत (जीभ कारण तिच्या टोकावरच विद्या नर्तन करते असे मानतात) तर भरताला वंदनीय असलेले माझ्या कंठाचे रक्षण करोत. दिव्य शस्त्रास्त्रे असलेले माझ्या खांद्यांचे रक्षण करोत (खांद्यांचे कारण कदाचित काही अस्त्रे चालवण्यासाठी खांद्यांचा आधार घ्यावा लागत असावा). तर शिवधनुष्याचा भंग करणारे माझ्या भुजांचे रक्षण करोत (ज्या हातांनी शिवधनुष्य भंगले म्हणून हात).

करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजित् ।

मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः ॥ ७ ॥

अर्थ – सीतेचे पती माझ्या हातांचे रक्षण करोत (पतीचा एक अर्थ रक्षणकर्ता. सीतेचे रक्षण करणारा माझेही रक्षण करो असे काहीसे) तर परशुरामाला जिंकणारे माझ्या हृदयाचे रक्षण करोत. खर नावाच्या राक्षसाचा नाश करणारे माझ्या मध्यभागाचे रक्षण करोत तर जांबुवंताला आश्रय देणारे माझ्या नाभिचे रक्षण करोत.

सुग्रीवेशः कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभुः ।

ऊरू रघूत्तमः पातु रक्षःकुलविनाशकृत् ॥ ८ ॥

अर्थ – सुग्रीवाचे देव माझ्या कंबरेचे रक्षण करोत तर हनुमंताचे प्रभु माझ्या दोन्ही जांघांचे रक्षण करोत. रघुकुळातले उत्तम (पुरुष) व राक्षसांच्या कुळांचा नाश करणारे माझ्या मांड्यांचे रक्षण करोत

जानुनी सेतुकृत् पातु जङ्घे दशमुखान्तकः ।

पादौ विभीषणश्रीदः पातु रामोऽखिलं वपुः ॥ ९ ॥

अर्थ – सेतु बांधणारे माझ्या गुडघ्यांचे रक्षण करोत तर दोन्ही पोटऱ्यांचे रक्षण दशमुख रावणाचा अंत करणारे करोत. बिभीषणाला राज्य व संपत्ती देणारे माझ्या पावलांचे रक्षण करोत तर श्रीराम माझ्या सर्व शरीराचे रक्षण करोत.

एतां रामबलोपेतां रक्षां यः सुकृती पठेत् ।

स चिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् ॥ १० ॥

अर्थ -(इथे कवच संपून फलश्रुति सुरू होते) जो पुण्यवान मनुष्य रामबलाने युक्त असा रक्षेचे (कवचाचे) पठण करेल तो दीर्घायु, सुखी, पुत्रवान, विजयी आणि विनयी होईल

पातालभूतलव्योम चारिणश्छद्मचारिणः ।

न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः ॥ ११ ॥

पातालभूतलव्योम चारिणश्छद्मचारिणः – याची फोड पातालभूतलव्योमचारिण: + छद्मचारिणः अशी आहे. पातालभूतलव्योमचारिण: – पाताळ, भूमी आणि आकाश या तिन्ही लोकांत संचार करणारे, छद्मचारिणः – कपटी, मायावी खोटे सोंग घेणारे (राक्षस)

दुसऱ्या ओळीचा अर्थ – रामनामाने रक्षिलेल्या लोकांकडे असे (पहिल्या ओळीत वर्णन केलेले) मायावी आणि कपटी राक्षस नजर वर उचलून पण पाहू शकत नाहीत

रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् ।

नरो न लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्दति ।। १२ ॥

अर्थ – राम अथवा रामभद्र अथवा रामचंद्र या नावाने जो स्मरण करतो तो मनुष्य कधीही पापाने लिप्त होत नाही व त्याला सुखोपभोग आणि मुक्ति मिळतात.

जगज्जैत्रेकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितम् ।

यः कन्ठे धारयेत्तस्य करस्थाः सर्वसिध्दयः ॥ १३ ॥

अर्थ – सर्व जग जिंकणाऱ्या या रामनामरूपी एका मंत्राने मनुष्याचे सर्व बाजूंनी रक्षण होते. जो हा मंत्र कंठात धारण करतो (पाठ करतो) त्याच्या हातात सर्व सिद्धी येतात.

वज्रपञ्जरनामेदमं यो रामकवचं स्मरेत् ।

अव्याहताज्ञः सर्वत्र लभते जयमङ्गलम् ॥ १४ ॥

अर्थ – हे कवच वज्राचा पिंजऱ्यासारखे अत्यंत संरक्षक असल्याने याला वज्रपंजर असे नाव आहे. ह्या कवचाचे जो नित्य स्मरण करतो त्याची आज्ञा अबाधित राहते आणि त्याला सर्वत्र मंगलमय विजय मिळतो

आदिष्टवान् यथा स्वप्ने रामरक्षामिमां हरः ।

तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः ॥ १५ ॥

अर्थ – भगवान शंकरांनी ज्याप्रमाणे स्वप्नात येऊन ही रामरक्षा सांगितली त्याप्रमाणे सकाळी उठून बुधकौशिक ऋषींनी ती लिहिली.

आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम् ।

अभिरामस्त्रिलोकानां रामः श्रीमान् स नः प्रभुः ॥ १६ ॥

यापुढील (२०व्या श्लोकापर्यंतचे)वर्णन श्रीराम व लक्ष्मण या दोघांचे आहे.

तरुणौ रूपसंपन्नौ सुकुमारौ महाबलौ ।

पुण्डरीक विशालाक्षौ चीरकृष्णाजिनाम्बरौ ॥ १७ ॥

फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ ।

पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ ॥ १८ ॥

फलमूलाशिनौ – फल + मूल + अशिनौ, म्हणजे फळे व कंदमुळे भक्षण करून राहणारे, दान्तौ – इंद्रिये दमन करणारे, जितेंद्रिय

अर्थ – फळे व कंदमुळे भक्षण करून राहणारे, जितेंद्रिय, तपस्वी, ब्रह्मचारी असे हे दशरथाचे दोन पुत्र व एकमेकांचे भाऊ म्हणजे राम व लक्ष्मण.

शरण्यौ सर्वसत्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मताम् ।

रक्षः कुलनिहन्तारौ त्रायेतां नो रघूत्तमौ ॥ १९ ॥

अर्थ- सर्व प्राण्यांचे आश्रयस्थान असलेले, सर्व धनुर्धारी योद्ध्यांमध्ये श्रेष्ठ, राक्षसांच्या कुळांचा वध करणारे रघुकुळातले श्रेष्ठ वीर, म्हणजे राम व लक्ष्मण, आमचे एअक्षण करोत.

आत्तसज्जधनुषाविषुस्पृशावक्षयाशुगनिषङ्गसङ्गिनौ ।

रक्षणाय मम् रामलक्ष्मणावग्रतः पथि सदैव गच्छताम् ॥ २० ॥

अर्थ – बाण लावून सज्ज केलेले धनुष्य धारण केलेले तसेच पुढे जाणाऱ्या बाणांचा कधीही न संपणारा अक्षय भाता जवळ असलेले(श्रीराम व लक्ष्मण) माझ्या रक्षणाकरता मार्गामध्ये नेहमी माझापुढे चालोत.

संनद्धः कवची खड्गी चापबाणधरो युवा ।

गच्छन् मनोरथोऽस्माकं रामः पातु सलक्ष्मणः ॥ २१ ॥

अर्थ – चिलखत घातलेल्या व धनुष्य, बाण व तलवार यांनी निरंतर सज्ज असलेल्या तरूण श्रीरामामुळे आमचे मनोरथ सिद्धीस जावोत आणी लक्ष्मणासह श्रीराम आमचे रक्षण करोत. 

रामो दाशरथिः शूरो लक्ष्मणानुचरो बली ।

काकुत्स्थः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघूत्तमः ॥ २२ ॥

अर्थ – दशरथपुत्र श्रीराम शूर आहे, लक्ष्मणासारखा बलवान मनुष्यही ज्याच्या पावलावर पाऊल ठेऊन चालतो असा (महान) आहे. ककुत्स्थ कुळातला हा पूर्ण पुरुष असलेला कौसल्येचा पुत्र रघुकुळात श्रेष्ठ आहे.

वेदान्तवेद्यो यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः ।

जानकीवल्लभः श्रीमानप्रमेयपराक्रमः ॥ २३ ॥

अश्वमेधाधिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः ॥ २४ ॥

अर्थ – ह्या स्तोत्राचा जप जे माझे भक्त श्रद्धायुक्त मनाने करतील त्यांना अश्वमेध यज्ञापेक्षाही जास्त पुण्य प्राप्त होईल यात शंका नाही.

रामंदूर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससम् ।

स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर्न ते संसारिणो नरः ॥ २५ ॥

अर्थ – दूर्वादलासारखे सावळ्या वर्णाच्या, कमळासारखे डोळे असलेल्या, पिवळे वस्त्र परिधान केलेल्या (अशा) श्रीरामांचे दिव्य नाव घेऊन जे स्तुति करतात ते पुरुष संसाराच्या/ जन्ममरणाच्या जाळ्यातून मुक्त होतात.

रामं लक्ष्मणपूर्वजम् रघुवरं सीतापतिं सुन्दरम् ।

काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकम् ॥ २६ ॥

राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिम् ।

वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकम् राघवं रावणारिम् ॥ २७ ॥

२६ व २७ श्लोकांचा एकत्र अर्थ -श्रीराम लक्ष्मणाग्रज, रघुकुळातले श्रेष्ठ, सीतेचे पती, व सुंदर आहेत. तसेच ककुत्स्थ कुळातले, करूणेचे सागर, गुणांचा खजिना, ब्राह्मणांना प्रिय असलेले व धार्मिक आहेत. राजांमध्ये श्रेष्ठ, सत्याशी कायम जोडलेले, दशरथपुत्र, सावळे व शांततेची मूर्ती आहेत. लोकांना प्रिय असणाऱ्या, रघुकुळात तिलकाप्रमाणे शोभणाऱ्या, रावणाच्या शत्रू आहेत. अशा (गुणांनी युक्त) श्रीरामांना मी वंदन करतो.

रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे ।

रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः ॥ २८ ॥

अर्थ – मी रामाला, रामभद्राला, रामचंद्राला, प्रजापतीला, रघुनाथाला, नाथाला, सीतेच्या पतीला वंदन करतो.

श्रीराम राम रघुनन्दन राम राम ।

श्रीराम राम भरताग्रज राम राम ॥

श्रीराम राम रणकर्कश राम राम ।

श्रीराम राम शरणं भव राम राम ॥ २९ ॥

अर्थ – श्रीराम हे रघुकुळातले श्रेष्ठ आहेत, भरताचे थोरले बंधु आहेत, रणांगणावर शूरवीर आहेत. अशा श्रीरामांना मी शरण आहे.

श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि ।

श्रीरामचन्द्रचरणौ वचसा गृणामि ॥

श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि ।

श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये ॥ ३० ॥

अर्थ – मी श्रीरामांच्या चरणांचे मनाने स्मरण करतो, वाणीने गुणवर्णन करतो, शिरसाष्टांग नमस्कार करतो व शरण जातो.

माता रामो मत्पिता रामचन्द्रः ।

स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः ॥

सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुः ।

नान्यं जाने नैव जाने न जाने ॥ ३१॥

अर्थ – श्रीराम माझी माता आहेत, पिता आहेत, स्वामी आहेत, मित्र आहेत. दयाळू असे श्रीराम माझे सर्वस्व आहेत. मी त्यांच्याशिवाय अन्य कोणालाही जाणत नाही.

दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा ।

पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम् ॥ ३२ ॥

अर्थ – ज्याच्या उजव्या बाजूस लक्ष्मण आहे तसेच डाव्या बाजूस सीता आहे पुढे मारुती आहे अशा श्रीरामांना मी वंदन करतो.

लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथम् ।

कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये ॥ ३३ ॥

अर्थ – लोकांना प्रिय असलेल्या, रणांगणावर धीरगंभीर असलेल्या, कमळाप्रमाने नेत्र असलेल्या, रघुवंशात श्रेष्ठ असलेल्या, कारुण्याची मूर्ति असलेल्या, दया करणाऱ्या अशा श्रीरामांना मी वंदन करतो

मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् ।

वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ॥ ३४ ॥

अर्थ – मनाप्रमाणे, वाऱ्यासारखा वेग असलेल्या, जितेंद्रिय, बुद्धिमान लोकांमध्ये श्रेष्ठ, पवनपुत्र, वानरांच्या सेनेचा मुख्य असलेल्या (हनुमानाला) मी शरण आहे.

कूजन्तं रामरामेति मधुरं मधुराक्षरम् ।

आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम् ॥ ३५ ॥

अर्थ – कवितेच्या शाखेवर बसून वाल्मिकीरूपी कोकिळ राम राम अशा मधुर अक्षरांचे कूजन करत आहे, त्या वाल्मिकीरूपी कोकिळाला मी वंदन करतो.

आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदाम् ।

लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् ॥ ३६ ॥

अर्थ – दु:खसंकटांचा नाश करणाऱ्या, सुखसमृद्धी देणाऱ्या, लोकांना प्रिय असणाऱ्या श्रीरामांना मी पुनः पुनः नमन करतो.

भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसंपदाम् ।

तर्जनं यमदूतानां रामरामेति गर्जनम् ॥ ३७ ॥

अर्थ – संसारवृक्षाची बीजे जाळून टाकण्यासाठी, सुखसमृद्धी मिळवण्यासाठी, यमदूतांना घाबरवण्यासाठी राम राम अशी गर्जना (जप) करावा.

रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे ।

रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः ॥ ३८ ॥

अर्थ – (या आणि पुढच्या श्लोकात राम शब्दाच्या सातही विभक्ति वापरलेल्या आहेत). राजांमध्ये श्रेष्ठ रामाचा सदा विजय होतो. मी रामाला, रमेशाला म्हणजेच रमेच्या पतीला- विष्णुला भजतो. रामाने राक्षसांचे समुदाय नष्ट केले. त्या रामाला वंदन असो.

रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम् ।

रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर ॥ ३९ ॥

अर्थ – रामापेक्षा अधिक कुशल कोणी नाही. मी रामाचा दास आहे. रामामध्ये माझा चित्तवृत्तीचा लय होवो आणि हे राम माझा उद्धार कर.

रामरामेति रामेति रमे रामे मनोरमे ।

सहस्त्रनामतत्तुल्यं रामनाम वरानने ॥ ४० ॥

अर्थ – (शंकर पार्वतीला सांगतात) हे सुमुखी, मनाला आनंद देणाऱ्या रामाच्या ठिकाणी मी रममाण होतो. रामाचे एक नाव (विष्णूच्या) हजार नावांच्या बरोबरीचे आहे.

इति श्रीबुधकौशिकविरचितं श्रीरामरक्षास्त्रोत्रं सम्पूर्णम् ।

अर्थ – श्रीबुधकौशिकऋषींनी रचलेले श्रीरामरक्षा नावाचे स्तोत्र इथे संपले.

॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु ॥

अर्थ – हे स्तोत्र श्रीराम व सीतेला अर्पण असो.

॥ शुभं भवतु ॥




































सच्चा मित्र काशिनाथ जढर

गावातील एकमेव विश्वासू व्यक्तीमत्व कोणते असेल तर ते म्हणजे काशिनाथ जढर. हे गावातील एखादे लहान मुलसुद्धा सांगेल. काशिनाथ हे आमच्या सबंध गावात...

विठू नांगरे कलंदर माणूस