ग्रामीण भागातील कलेची आवड
महाराष्ट्रातील ग्रामीण भागाला तमाशा कलावंतांची फार मोठी परंपरा लाभली आहे.
पूर्वी ग्रामीण भागात कलेला अत्यंत मोठे महत्त्व होते. लोकांना कलेची खरी जाण होती आणि कलेची कदर करणारी माणसेही होती.
कलेची जोपासना
त्या काळात कलेच्या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी कोणत्याही सुविधा उपलब्ध नव्हत्या. अंगभूत कला हीच कलाकाराची खरी शिदोरी होती. ग्रामीण भागातील कलाकारांवर रसिकांनी मनस्वी प्रेम केले, कलेला दाद दिली आणि प्रसंगी वर्गण्या काढून कलाकारांना मदतही केली.
यामुळे अनेक कलाकार पुढे आले, लोकप्रिय झाले आणि ग्रामीण भागाचे नाव उज्ज्वल केले. अशा कलाकारांच्या कलेचा इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहिला जावा आणि आपण सर्वांनी तो वाचावा, हीच अपेक्षा.
लोककलेचे शिलेदार
भागातील तमाशा क्षेत्राला खऱ्या अर्थाने वैभव मिळवून देणाऱ्यांत प्रामुख्याने शंकरराव कोकाटे (टोकावडे), विष्णू चासकर, रामचंद्र वाडेकर, राम पोखरकर आणि भोकटे परिवाराचा मोठा वाटा आहे. तसेच, विठू नांगरे यांच्यासारख्या 'भारूड सम्राटांनी' अध्यात्म आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम घडवून आणला.
ग्रामीण भागात अनेक कलाकारांनी कलेची सेवा केली आहे. त्यापैकी खालील कलाकार
तमाशा सम्राट शंकरराव कोकाटे (टोकावडे),
विष्णू चासकर (चास)
रामचंद्र वाडेकर (सुरकुंडी)
राम पोखरकर (वाळद)
मारुती भोकटे, नंदा भोकटे, दत्ता भोकटे (साकुर्डी)
शंकरराव आहिलू तळपे,
मोतीराम मोहन, संपत जढर,
विष्णू हुरसाळे (मंदोशी),
चिंधू वनघरे, बापू साबळे (भिवेगाव),
सखाराम उगले, विठ्ठल उगले (कारकुडी),
नारायण गायकवाड (डेहणे) यांनी तमाशाची सेवा केली.
प्रसादिक भारुडाची परंपरा
प्रासादिक भजनी भारुडाची सेवा देखील अनेक मान्यवरांनी केली.
विठू नांगरे (मोरोशी) हे प्रसादिक भजनी भारूड मंडळाचे अनभिषिक्त सम्राट होते.
तसेच बाबुराव गुंजाळ, काशिनाथ गुंजाळ, कै. शेळके मामा (पोखरी),सिताराम मुऱ्हे, रामू न्हावी (टोकावडे), दत्तात्रय मिलखे गुरुजी, मुरलीधर माळी गुरुजी,
शंकर मारुती ठोकळ, मारुती सावळेराम ठोकळ, शंकर माळी (स्रीपात्र), कोथेबुवा,
सुदाम उर्फ वाळकू माळी, मारुती वडेकर, गीताराम डवणे (नायफड) यांनी ग्रामीण भागातील भारूड संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवले.
आताची परिस्थिती
भारूडांचे खेळ आता शेवटची घटका मोजत आहेत. गावागावातील प्रासादिक भजने काही अपवाद वगळता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
तरीही काळाच्या ओघात या कला मागे पडल्या असल्या तरी या मातीतून कलाकारांचा ओघ अजूनही सुरू आहे.
त्यापैकी –
विकास सोनवणे (शेंदुर्ली),
दत्तात्रय तिटकारे (नायफड),
दत्ता उबाळे,(मिसेस मुख्यमंत्री)
बाबूराव भोर (पिपाणी) यांचा उल्लेख करावा लागेल.
मास्टर कै. शंकरराव कोकाटे
ते सुरंगी नाटकात दरोडेखोराची भूमिका करत असत. त्यांची कला पाहून तमाशा सम्राट कै. तुकाराम खेडकर यांनी त्यांना तमाशात काम करण्याची संधी दिली.
त्यांनी तमाशात अनेक नकारात्मक भूमिका केल्या.
कालीमातेची भूमिका
एका वगनाट्यात त्यांनी कालीमातेची भूमिका केली होती. प्रथेप्रमाणे तमाशातील महिला कालीमातेची पूजा करत असताना त्यांची स्टेजवर एंट्री झाली. त्यांच्या प्रभावी रूपामुळे एक महिला अक्षरशः बेशुद्ध पडली.
स्वतःचा तमाशा
त्या काळी सुमारे १५,००० रुपयांची मदत जमा झाली जी त्या काळात मोठी रक्कम होती.
तमाशाची लोकप्रियता
त्यांच्या तमाशात ७०–८० लोकांचा मोठा ताफा होता.
स्टेज, लाईट, स्पीकरसाठी स्वतंत्र दोन ट्रक असत.
त्यांनी सिद्दी जोहर, अफजलखान, औरंगजेब यांसारख्या भूमिका अत्यंत प्रभावीपणे साकारल्या.
त्या काळात कलाकार होणे सोपे नव्हते. गावोगावी बैलगाडीने किंवा पायी प्रवास, रात्र-रात्र जागून केलेले प्रयोग आणि तुटपुंज्या मानधनावर चालणारा संसार... तरीही या कलावंतांनी कधी कलेशी तडजोड केली नाही. अंगात ताप असतानाही घुंगरू बांधून स्टेजवर उभे राहणारे हे 'कलेचे वारकरी' होते."
मी एकदा जालन्याला गेलो होतो.तेव्हा एका वृद्ध माणसाबरोभर चर्चा करत असताना त्यांनी कै.शंकरराव कोकाटे यांनी केलेल्या भुमीकांविषयी आठवणी सांगीतल्या.
ते ज्या वेळी सांगत होते त्या वेळी मी रोमांचीत झालो व नकळत अभिमानाने डोळे पाणावले व उर भरून आला.
आजही कधी कोकणात जा. अनेक वृद्ध लोक आजही कै.शंकरराव कोकाटे यांच्या आठवणी सांगतील.
कोकाटे यांचा हा तमाशा साधारण ९ ते १० वर्ष चालू होता. त्यांनी त्यांचा तमाशा संपुर्ण महाराष्ट्रातील विविध भागात केला कै. कोकाटे यांनी. ख-या अर्थाने आपल्या पश्चिम भागाचे नाव संपुर्ण महाराष्ट्रात मोठे केले.
अपघात आणि उतरती कळा
या धक्क्यामुळे ते आजारी पडले. पुण्याला उपचारासाठी नेत असताना डेहणे येथे त्यांचे निधन झाले. त्यावेळी त्यांचे वय अवघे ४८ वर्ष होते.
निष्कर्ष
कै. शंकरराव कोकाटे यांनी ग्रामीण भागाचे नाव महाराष्ट्रभर उज्ज्वल केले. त्यांची कला आणि योगदान सदैव स्मरणात राहील.
रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञान)



अद्भुत
उत्तर द्याहटवाकै.शंकरराव कोकाटे टोकावडेकर या महान कलावंताच्या भुमिका आजही आठवतात. मी वाडा या ठिकाणी शांताबाईंच्या बोर्डींगला असतांना त्यांचा तमाशा व नाटक पाहिलं आहे.
उत्तर द्याहटवाआमच्या जांभोरी गावच्या यात्रेत अनेकदा त्यांचा तमाशा असायचा. लहानपणी मी त्यांचा लोकनाट्य तमाशा अनेकदा पाहिलेला आहे.असा कलाकार पुन्हा होणे नाही.