Translate

मंदोशी गावचे मोहन पाटील घराणे

मोहन घराणे परिचय

मंदोशी गावचे मोहन घराणे हे पश्चिम भागात मोठे जमीनदार म्हणून प्रख्यात होते. रामजी मोहन, भाऊ मोहन  व शिवराम मोहन हे मंदोशी गावचे मुलकी पाटील होते. गावातील लग्नसमारंभ असो की कुठलाही सण पाटलाचा मान पहिला असायचा. पोलिस, न्यायाधीश अशा सर्वच भूमिकांत पाटलाचे महत्त्व होते. त्यांच्या घरात एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे त्यांच्या घरी 30 ते 40 माणसे असायची.

मुख्य पुरुष मानाचे मोहन 

मानाजी मोहन हे मोहन घराण्याचे मुख्य पुरुष होते.

img src="..." alt=" एकत्र कुटुंब">
मोहन घराण्यामध्ये
मानाजी, रामजी, हरी, चिंगाजी, मारुती, मानाजी, भाऊ, गेनुजी, बाळाजी, नाना, सिताराम, शिवराम, गंगाराम, खंडू, मोतीराम, भगवंता, यशवंता, शंकर, असे अनेक वीर पुरुष होऊन गेले.

मोहन घराणे एकत्र कुटुंब पद्धती 

मोहन पाटील यांच्या घरात रोज एका वेळेस तीन पायल्यांचा म्हणजे एकावेळी (पंधरा किलो तांदूळ) भात शिजायचा. 70 - 80 भाकरी लागायच्या. भात शिजवण्यासाठी डेंगीचा उपयोग केला जात असे.

त्यांच्या घरात अगंतूक आलेला पाहुणा अगदी महिना, महिना राहत असे. कधी कधी काही अगंतुक बाहेर गावचे लोक अगदी महिना महिनाभर फुकट रहायचे. घरात मानसेच एवढी असायची की प्रत्येकाला वाटायचं असेल दुसऱ्या भावाचा किंवा भावजईचा पाहुणा. त्यामुळे पाहुण्यांना किंवा अगंतुक असलेल्या एक दोघांना मोहन घराणे पाहुणेच समजून त्यांची सरबराई करायचे.

शेतीची मशागत

मोहन घराण्याकडे शेतीची मशागत करण्यासाठी त्यावेळी बैलांच्या चार जोड्या होत्या. म्हणजे एकूण आठ बैल.

गावातील रोकडे वस्ती मधील लिंबाजी पाटोळे हे त्यांच्याकडे चाकरी होते. ते कायम शेत नांगरणी आणि अवनीच्या वेळेस गाळ करण्यासाठी प्रसिद्ध होते. अवणीचा गाळ करावा तर लिंबाजी पाटोळे यांनीच अशी त्यांची ख्याती होती.

लिंबाजी पाटोळे सारखेच चार-पाच गडी देखील त्यांच्याकडे चाकरी होते.

मोहन घराणे पाटीलकी 

पूर्वी पेशव्यांच्या काळात पाटीलकी मोठ्या गावापुरती मर्यादित होती.पण इंग्रजांनी लहानातल्या लहान गावासाठीसुद्धा “मुलकी पाटील” नेमले.

उद्देश:

1. प्रत्येक गावाचा महसूल (कर) वेळेवर मिळावा.

2. गावशिस्त आणि पोलिसी कामकाज पाहण्यासाठी स्थानिक जबाबदार व्यक्ती असावी.

3. सरकारच्या आदेशांची थेट गावात अंमलबजावणी होण्यासाठी मध्यस्थ.

इंग्रजांच्या काळात मोहन घराण्याला  मुलकी पाटीलकी बहाल करण्यात आली होती. 

सुरुवातीला रामजी मोहन हे मुलकी पाटील होते. सन 1876 साली पहिल्यांदा रामजी मोहन हे मुलकी पाटील झाले. ते सन 1876 ते सन 1927 पर्यंत पाटील होते.

त्यानंतर सन 1927 ते सन 1933 पर्यंत भाऊ मोहन हे मुलकी पाटील होते. त्यांनी सन 1933 मध्ये पाटील या पदाचा राजीनामा दिला. व त्यांच्या सुशिक्षित पुतण्याला म्हणजेच शिवराम मानाजी पाटील यांना पाटीलकी बहाल केली.

सन 1933 ते सन 1978 पर्यंत म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत प्रदीर्घकाळ शिवराम मोहन हे त्यावेळी मंदोशी गावचे मुलकी पाटील होते. त्यानंतर लक्ष्मण मोहन यांना पाटील होण्याची संधी होती. परंतु ऐनवेळी ते मुंबईला निघून गेल्यामुळे त्यांना पाटील काही होता आले नाही.

आणि पुढे मोहन घराण्याकडे असलेली पाटीलकी लक्ष्मण मारुती तळपे यांच्याकडे गेली. 

इंग्रज सरकारकडून त्यांना खास पाटील  इनाम व पासोडीचे वतन ह्या जमिनी देण्यात आल्या होत्या. मालकी जमिनी तर वेगळ्याच होत्या. शिवाय गवताचे रान, आडवं व विविध झाडे झुडपे असलेली राने अशा अनेक जमिनी होत्या. 

पाटलांची पाण्याची मोट आणि शेती

पिपळडहाळ येथे ओढ्याच्या कडेला  मोहन पाटील यांची मोट होती. चार बैलांच्या सहाय्याने ओढ्यातील पाणी पखाली मधून शेताला दिले जात असे. लिंबाजी पाटोळे हे मोट चालवत असत.

लिंबाजी पाटोळे हे मोटे वरची गाणी, मोट चालवताना असे काही म्हणत की नुसते ऐकत रहावे. असे लोक सांगायचे.

स्वातंत्र्य पूर्वीच्या त्या काळात मोहन पाटील हे भात निघाल्यावर रब्बीच्या हंगामात कांदे बटाट्याचे पीक घेत असत. त्यांच्याकडे गावातील अनेक लोक कामाला जात असत.

त्या काळात मंदोशीच्या ओढ्यावर सुलपाजवळ मोहनांची खूप मोठी बांधण होती. या बांधणीचा बांध घडीव दगडामध्ये आणि कमावलेल्या चुन्यामध्ये त्या बांधाचे बांधकाम केले होते.

या बांधणीला 25 खंड्या भात होत असे. म्हणजे 250 पोती भात. नुसत्या बांधणीलाच एवढे भात. तर इतर वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या शेतीतून किती उत्पन्न मिळत असेल विचार करा.

त्यावेळेस भात खरेदी करण्यासाठी व्यापारी खटार गाड्या घेऊन मोहनांकडे येत असत. व भात विकत घेऊन जात असत. भात खरेदीच्या बदल्यात काही रक्कम रोख असे तर काही वस्तूच्या स्वरूपात असे. व्यापारी येताना खटार गाड्या मधून बाजरीची पोती, गुळाच्या ढेपी (एक गुळाची ढेप वीस किलोची असायची.) व असे अनेक जीवनावश्यक वस्तू घेऊन येत असत.

भात शेती बरोबरच ते नाचणी, सावा, वरई व खुरासणी यांची पिके घेत असत. त्याबरोबरच भुईमूग, उडीद, मसूर, हरभरा, हुलगा, वाटाणा इत्यादी पिके सुद्धा मुबलक काढत असत.

गरीब शेतकऱ्यांना मदत 

गावातील गरीब शेतकऱ्यांचे धान्य श्रावण भाद्रपद महिन्यात संपत असे. त्यामुळे लेकरा बाळांची आबाळ होई. अशावेळी लोक सिताराम मोहन पाटील यांच्याकडे जात असत. व त्यांच्याकडून सात-आठ पायल्या भात घेऊन येत असत. या भाताच्या बदल्यात लोक त्यांच्याकडे भात कापणी करत असत.

लिंबाजी पाटोळे 

लिंबाजी पाटोळे हे खास औत हाकण्यासाठी त्यांच्याकडे होते. तर शंकर अहिलू तळपे हे सकाळी उठून हिरव्यागार  गवताच्या पेंढ्यांचा एक भारा त्यांच्या दारात टाकत असत. त्या बदल्यात एक वेळचे जेवण व महिन्याभराचा गुळ आणि चहा पावडर मिळत असे.

शिवराम मोहन पाटील 

शिवराम मानाजी मोहन यांच्याकडे मंदोशी गावची मुलकी पाटीलकी होती. ही पाटीलकी अगदी इंग्रज काळापासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत सन 1978 पर्यंत त्यांच्याकडे होती.

शिवराम पाटील यांना त्यावेळी इंग्रज सरकारने अमर्याद अधिकार दिले होते. शिवराम पाटील यांचे शिक्षण व्ह.फा. म्हणजे (Vernacular final) म्हणजेच सातवीपर्यंत झाले होते. त्यामुळेच त्यांना पाटीलकी मिळाली होती.

गावातील जमिनीच्या नोंदी बाबत तलाठ्याला मार्गदर्शन करणे, गावचा न्याय निवडा करणे. महसुलाच्या नोंदी ठेवणे, महसूल गोळा करणे अशी विविध कामे त्यांना करावी लागत असत. त्या बदल्यात त्यांना इंग्रज सरकारने पाटील ईनाम म्हणून जमिनी दिल्या होत्या. पाटीलकी गेल्यानंतरही स्वातंत्र्योत्तर काळात या जमिनी त्यांच्याकडेच राहिल्या.

पूर्वी महाराष्ट्रात पेंढार म्हणून एक जात होती. ते लोक झुंडीने गावात प्रवेश करत असत. व झुंडीने गावावर हल्ला करून घरातील मालमत्तेची लूट करायचे. गावातील गरीब लोकांनी लहान मुलांना ठेवलेले भाजी भाकरी घरात घुसून घेऊन जायचे.

एकदा मंदोशी गावात असेच हे पेंढार लोक झुंडीने आले होते. एकट्या शिवराम पाटील यांनी त्यांना पिटाळुन लावले. 

गंमत अशी की त्यावेळेस नेमका अचानक पाऊस होऊन ओढ्याला महापूर आला होता. हे पेंढार लोक माराच्या भीतीने गावडोहामध्ये उड्या मारून पोहत पोहत पळून गेले.

मोतीराम मोहन पाटील

मोतीराम मोहन पाटील हे जास्त कडक व आडदांड स्वभावाचे होते. त्यांनी शेतात कधी काम केले नाही. परंतु त्यांना तमाशाची जास्त आवड होती.

त्यावेळेस मंदोशी गावचा तमाशा होता. विष्णू कमाजी हुरसाळे हे तमाशा मालक होते. त्यांच्या तमाशात मोतीराम मोहन पाटील व संपत कृष्णा जढर नाच्याचे काम करायचे. या तमाशामध्ये शंकर अहिलु तळपे, कुशाबा दगडू बांगर, ढोलकी पटू ज्ञानदेव तळपे असे अनेक कलाकार होते.

मंदोशी गावचा तमाशा कोकणामध्ये फारच प्रख्यात होता.

सिताराम मोहन पाटील

सिताराम मोहन पाटील हे अतिशय शांत संयमी व मनमिळाऊ स्वभावाचे गृहस्थ होते. परंतु गावात त्यांच्या शब्दाला किंमत होती. ते आडल्या नडलेल्याला नेहमीच सढळ हाताने मदत करत असत. त्यांना खेड तालुक्याच्या पश्चिम भागात खूप मान सन्मान होता. बय आणि बाबा हे त्यांच्या तोंडात नेहमी येणारे शब्द होते.

शंकर मोहन पाटील 

img src="..." alt=" कै.शंकर मोहन">
हे कावीळ उतरण्यासाठी खास रामबाण औषध देत असत. शिवाय विंचू, साप डसल्यावर ते उतरवत असत. शिवाय ते बाहेरचे (भुत बाधा) देखील पाहत असत.

गावची यात्रा ठरल्यावर प्रसादिक भारुड आणण्यासाठी गाव शंकर मोहन यांच्यावर जबाबदारी सोपवत असे.

मोहन पाटलांची ख्याती 

मोहन पाटलांचे कुणीही पुरुष माणूस  रस्त्याने चालले की स्त्रिया पायातल्या चपला हातात घ्यायच्या व पदर डोक्यावर घेऊन चालायच्या. पायातील जोडव्यांचा किंवा हातातील बांगड्यांचा आवाज सुद्धा करत नसत. लहान मुले खेळत असल्यास त्यांना पाहताच आपला खेळ थांबवत असत. व ते निघून गेल्यावर पुन्हा खेळत असत.

वर्षातून एकदा गावातील त्यांच्याकडे काम धंदा करणाऱ्या लोकांना ते बोलावत असत व तांदळाच्या पिठाचे गुळ व डाळीच्या पुरणाचे उंडे बनवून ते खायला देत असत. हे उंडे तेव्हा फारच प्रसिद्ध होते.

शिमग्याच्या सणाला घरातील प्रत्येक सदस्याला कपड्याचे दोन जोड घेतले जात. स्त्रियांसाठी लुगडी व चोळीचे खण, पुरुषांसाठी धोतर जोड व पटका, पूर्वीचे पटके नऊ हात लांब असत. मुलांसाठी अंगात घालण्यासाठी बंडी असे. चड्डी नसे. त्यावेळी मुलांनी लंगोटी लावण्याची प्रथा होती.

सर्व प्रकारचे धार्मिक सण साजरे केले जात. सण समारंभासाठी पुरणपोळीचा स्वयंपाक असे.

दिवाळीला उकडलेल्या डांगराचा गर  तांदळाच्या पिठात गुळ घालून त्याचे वडे बनवले जात असत. त्यांना भोकाचे वडे असे म्हणत. तसेच काकडीच्या गरात गुळ व तांदळाचे पीठ घालून ते हळदीच्या पानावर थापून पातेल्यामध्ये वाफेवर शिजवले जाई. त्याला पातोळ्या म्हटले जात असे. हे दोन पदार्थ दिवाळीला अतिशय सगळीकडेच प्रसिद्ध होते.

दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी गावातील झाडून सारे लोक मोहन पाटलांच्या घरी भेटायला येत असत. 

गुढीपाडवा व वीर नाचवने

गुढीपाडव्याला मोहन पाटलांची गुढी ही सर्वात उंच असे. त्याच्या खालोखाल इतर लोकांच्या गुढ्या असत.

गुढीपाडव्याच्या दिवशी दुपारी मोहन घराण्यांचा वीर नाचवण्याचा कार्यक्रम व्हायचा. या कार्यक्रमासाठी वाड्या वस्त्यांमधून लोक जमायचे. ढोल ताशे, व सनई चौघडे यांच्या गजरात मिरवणूक निघत असे.

उंच काठी घेऊन मिरवणूकीचा कार्यक्रम सुरू व्हायचा. त्यानंतर प्रसाद वाटप केला जात असे. (आता करतात का नाही काही माहीत नाही.) त्यानंतर आलेल्या पाहुण्यांना चहा पाणी व्हायचे.

शिकार करणे हा त्यावेळी लोकांचा खूप मोठा छंद होता. गावामध्ये मोहन पाटलाकडे व दुलाजी देवळा तळपे यांच्याकडे बंदूका होत्या. अजून दोन जणांकडे अशा गाव मिळून चार बंदुका होत्या.

जंगलात शिकारीला जाण्याची पद्धत

गावकरी वर्षातून दोनदा शिकारीला निघायचे. सबंध राने, वने तुडवीत मोठ्या रानात हे लोक भयभीत होऊन शिरायचे. एकमेकांचे हात धरून झुंडीने रान तुडवायचे. कुठून सशाने जरी उडी मारली तरी वाघ आला अशा भीतीने ओरडायचे.

लाठ्या काठ्या आपटीत, आरडाओरडा करीत सारे रान उठवीत. कुठून तरी आठ दहा रानडुकरांचा कळप दौडू लागे. मग डुक्करे आपल्या अंगावर येतील या भीतीने बंदुका रोखल्या जात. काही लोक झाडावर चढून बसत.

लाठ्या, काठ्या घेऊन पळणारे लोक'अरे लवकर बार काढा, लवकर बार काढा असे ओरडत सुटत. आणि मग जीवाच्या आकांताने चाप ओढून ढमा ढमा बार काढले जात. त्यातला एखादा रानडुक्कर आडवा होई. त्याच्यावर पुन्हा दोन गोळ्या घालून तो मेलेलाच आहे याची खात्री करून घेतली जाई.

तथापि डुक्कर कोणाच्या गोळीने मेले याची चर्चा होऊन पुढे भांडणे माजण्या पर्यंत पाळी येई. पहिली गोळी कुणी मारली हे कुणीच सिद्ध करू शकत नसे. तरी पण पहिली गोळी माझीच असे प्रत्येक बंदूकवाला म्हणायचा. आणि भांडणे व्हायची.

सत्यनारायण पूजा व करमणुकीचे साधने  

उन्हाळ्याच्या दिवसात सत्यनारायणाच्या पूजेचे आयोजन केले जायचे. संध्याकाळी करमणुकीसाठी प्रसादिक नाट्यरूपी भजनी भारुड यांचा कार्यक्रम असायचा. 

दरवर्षी मोहन घराण्यांकडे सत्यनारायणाची पूजा असायची. संध्याकाळी जेवणाच्या पंगती बसायच्या. आमटी, भात, शाकभाजी हे जेवण असायचे. त्यानंतर भारुडाचा कार्यक्रम असायचा.

ही परंपरा पुढे गणपत मोहन यांनीही काही काळ चालू ठेवली होती.

पांजी 

दर तीन वर्षांनी मंदिराकडे मोहन घराणे पावसाळ्याच्या सुरवातीला मुक्तार देवाला मेंढ्याचा बळी देत असत. त्याला पांजी असे म्हटले जात असे. 

या पांजीचे जेवण जेवण्यासाठी गावातील लोक पितळ्या घेऊन जात असत. हे जेवण रात्री पावसाच्या रिपरीपीमध्ये चालत असे. अजूनही ही प्रथा चालू आहे.

एकत्र कुटुंब पद्धत 

पूर्वीच्या काळात एकत्र कुटुंबात इतके सदस्य असायचे की, कुटुंबातील लग्न झालेल्या जोडप्यामध्ये भांडण झाले किंवा भावंडं आपसात भांडले तर घरातील वडीलधारी मंडळी मतभेद मिटवायचे. त्याचबरोबर योग्य तो सल्ला देखील द्यायचे. 

मात्र आजच्या युगात असे वाद झाले तर घर सोडण्याचा पहिला निर्णय घेतात. तसेच आयुष्यातील महत्त्वाचे मोठे निर्णय घेण्यासाठी अनुभवी माणसांच्या सल्ल्याची गरज असते. अशात मुलांना त्यांच्या जीवनात पुढे जाण्यासाठी कुटुंबातील अनुभवी व्यक्तींच्या सल्ले कामी येतात.

उतरती कळा 

सन 1958 नंतर मोहन पाटलांच्या घराण्याचे विभक्तीकरण झाले. कुटुंबे वेगवेगळी झाली. त्यानंतर या घराण्याचे महत्त्व हळूहळू कमी होत गेले. शिवराम पाटलांचे 1978 साली निधन झाल्यानंतर मुलकी पाटीलकी गेली. व पोलीस पाटील हे पद निर्माण झाले. त्यांना शेत जमीन रूपी इनाम देण्याऐवजी दरमहा पगार चालू झाला. 

पूर्वी मुलकी पाटलाला असलेले सर्व अधिकार काढून घेतले. गावात भांडण तंटा झाल्यावर गावातले वाद पाटील मिटवत असे. परंतु अधिकार काढून घेतल्यामुळे हे वाद पोलीस स्टेशनला, कोर्टामध्ये जाऊ लागले.

त्यामुळे पाटीलकीचे महत्त्व हळूहळू कमी झाले. सरपंच, चेअरमन, सोसायटीचे  डायरेक्टर, ग्रामपंचायत सदस्य, पुढारी, कार्यकर्ते यांना वाजवी महत्त्व आले. 

सद्यस्थिती 

गणपत मोहन आणि खंडू मोहन हे गावात कारभारी आहेत. रामभाऊ मोहन, मारुती मोहन, हरिभक्त परायण आहेत. लक्ष्मण सिताराम मोहन हे साधु महाराज झाले आहेत.

रामभाऊ मोहन यांचा मुलगा मच्छिंद्र हा मुंबई येथे नोकरी करतो.आणि दामू मोहन यांचा मुलगा कृष्णा हा देखील चाकण येथे नोकरी करतो.

शिवराम पाटील यांचा मुलगा दत्ता हे चाकण एमआयडीसी मध्ये कंपनीत नोकरी करतात. तर त्यांची मुलगी सौ. सुंदरबाई देवराम बांगर या अंगणवाडी सेविका या पदावरून सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्यांना गावात त्यांच्या वडिलां इतकाच खूप मानसन्मान आहे. 

लक्ष्मण मोहन यांचा मुलगा देवराम यांची भात गिरणी व पिठाची चक्की आहे. शिवाय त्यांचे वेल्डिंगचे दुकान देखील आहे. 

शांताराम मोहन यांच्या मुलाचे राजगुरुनगर मध्ये बेकरी आणि दुधापासून बनणाऱ्या पदार्थांचे दुकान आहे. दुसरा मुलगा चाकण येथे नोकरी करतो. त्याची पत्नी आरोग्य सहायिका  (ANM) आहे.

शांताराम मोहन यांचा भाऊ तुकाराम हा पुणे येथे स्थायिक आहे. दुसरा भाऊ हरिभाऊ हा मुंबईला कंपनीत परमानंट आहे.

मारुती मोहन यांचा मुलगा अरुण इंजिनियर आहे. शंकर मोहन यांचा मुलगा संतोष गावी शेती करतो.

त्यामुळे एकेकाळी चाळीस-पन्नास माणसे असलेले घर आता सुने सुने आहे. शेवटी काय तर कालाय तस्मै नमः 

रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती)  

मूळ पुरुष मानाजी

      दुसरी पिढी 

1) रामजी मानाजी मोहन 
2) हरी मानाजी मोहन 
3) चिंगाजी मानाजी मोहन 

       तिसरी पिढी 

1) मारुती रामजी मोहन 
2) मानाजी रामजी मोहन 
3) भाऊ रामजी मोहन 
4) गेनू रामजी मोहन 

1) बाळा हरी मोहन 

1) नाना चिंगाजी मोहन 

         चौथी पिढी 

1) सिताराम मारुती मोहन 
    जन्म दि. 06/03/1916

1) शिवराम मानाजी मोहन
     जन्म दि. 24/03/1916

1) गंगाराम भाऊ मोहन 
2) मोतीराम भाऊ मोहन
3) खंडू भाऊ मोहन 

1) भगवंता नाना मोहन 
2) यशवंत नाना मोहन 
3) शंकर नाना मोहन 

         पाचवी पिढी 

1) लक्ष्मण सिताराम मोहन 
2) प्रभाकर सिताराम मोहन 

1) दत्तात्रय शिवराम मोहन 
2) चंद्रकांत शिवराम मोहन

1) रामभाऊ गंगाराम मोहन 
2) दामू गंगाराम मोहन 

1) खंडू मोतीराम मोहन 
2) तानाजी मोतीराम मोहन 

1) गणपत भगवंता मोहन 
2) मारुती भगवंता मोहन 
3) महादू भगवंता मोहन 

1) शांताराम यशवंत मोहन 
2) तुकाराम यशवंत मोहन
3) हरिभाऊ यशवंत मोहन

1) संतोष शंकर मोहन 

वंशावळ माहिती :- 

इंजिनीयर श्री.अरुण मोहन यांच्या कडून साभार..





 

 

  


  






भारतीय शास्त्रज्ञांनी लावलेले विविध शोध

भारत हा प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत संशोधन आणि शोधांचा केंद्रबिंदू राहिला आहे. हे क्षेत्र खूप मोठे आहे, म्हणून मी ते प्राचीन भारतातील शोध, मध्ययुगीन काळातील योगदान, आणि आधुनिक भारतातील शोध व आविष्कार अशा टप्प्यांमध्ये सांगतो.

प्रचीन भारतातील शोध व आविष्कार

शून्याचा शोध (Zero) :

आर्यभट्ट व ब्रह्मगुप्त यांनी "शून्य" गणितात मांडले.

आर्यभट्ट हे प्राचीन भारतातील सर्वात महान गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञांपैकी एक होते. त्यांनी इ.स. ४७६ मध्ये पाटलीपुत्र (सध्याचे पटना, बिहार) येथे जन्म घेतला होता. त्यांच्या संशोधनामुळे भारतीय गणित व खगोलशास्त्र यांना एक नवा आयाम मिळाला.

आर्यभट्ट:

नाव: आर्यभट्ट

जन्म: इ.स. ४७६ (पाटलीपुत्र, बिहार)

काळ: गुप्त साम्राज्याचा सुवर्णकाळ

मुख्य कार्य: गणित व खगोलशास्त्र

प्रमुख योगदान

1. पाय (π) चे मूल्य:

आर्यभट्ट यांनी π (पाय) चे मूल्य ३.१४१६ इतके अचूक काढले होते.

ते सांगत की "π हे अपरिमेय आहे" – हे विधान त्यांच्या काळासाठी खूप मोठे होते.

2. शून्याचा वापर:

शून्याची संकल्पना प्रचलित करण्याचे महत्त्वाचे कार्य भारतात झाले, त्यात आर्यभट्टांचे मोठे योगदान मानले जाते.

3. स्थान-मूल्य पद्धती (Place Value System):

दहाशेष पद्धती (decimal system) व स्थानिक मूल्य पद्धती (place value system) प्रचलित केली.

4. बीजगणित व त्रिकोणमिती:

साइन (ज्या पद्धतीला त्यांनी "ज्या" असे नाव दिले) ही संकल्पना मांडली.

कोसाइन व टॅन्जंटचेही प्रारंभिक रूप दिले.

5. खगोलशास्त्रातील योगदान:

पृथ्वी स्वतःभोवती फिरते याचा त्यांनी उल्लेख केला.

सूर्यग्रहण व चंद्रग्रहण यांचे वैज्ञानिक स्पष्टीकरण दिले.

ग्रह-नक्षत्रांच्या गती व स्थान यांचा अभ्यास करून गणना केली.

6. ग्रंथ:

आर्यभटीय : हा त्यांचा सर्वात प्रसिद्ध ग्रंथ असून त्यात १२१ श्लोक आहेत. यात गणित, बीजगणित, त्रिकोणमिती व खगोलशास्त्र यांचे सविस्तर विवेचन आहे.

भारताने १९७५ मध्ये पहिला उपग्रह "आर्यभट्ट" असे नाव देऊन त्यांना आदरांजली वाहिली.

त्यांचे योगदान आजही गणित व विज्ञान क्षेत्रात आधारस्तंभ मानले जाते.

2. दशमान पद्धती (Decimal System) – संख्यांची मांडणी 1–9 व शून्य यांच्या आधारे दशमान पद्धती भारतातून जगभर गेली.

भारतात दशमान पद्धती (Decimal System) अस्तित्वात आणण्याचे श्रेय भारतीय गणितज्ञांना जाते. ही जगातील सर्वात महत्वाची व क्रांतिकारी पद्धत मानली जाते. तिची सुरुवात आणि विकासाविषयी थोडक्यात माहिती खालीलप्रमाणे –

 सुरुवात:

दशमान पद्धतीचा उगम भारतात इ.स.पूर्व ३ऱ्या शतकाच्या आसपास झाला असे मानले जाते.

प्राचीन भारतीय गणितज्ञांनी १ ते ९ या अंकांचा उपयोग सुरू केला.

शून्याचा (०) संकल्पना आणि त्याचा अंक म्हणून वापर ही भारताची सर्वात मोठी देणगी आहे.

प्रमुख योगदानकर्ते:

1. आर्यभट्ट (इ.स. 476–550)

त्यांनी अंकगणित, बीजगणित आणि खगोलशास्त्र यामध्ये दशमान पद्धतीचा आधार घेतला.

मात्र, त्यांनी शून्याचा स्वतंत्र अंक म्हणून वापर केला नाही, पण त्याची संकल्पना मांडली.

2. ब्रह्मगुप्त (इ.स. 598–668)

शून्याला स्वतंत्र अंक म्हणून मांडले.

शून्याचे गणितीय नियम (बेरीज, वजाबाकी इ.) दिले.

त्यांच्या "ब्रह्मस्फुट सिद्धांत" या ग्रंथात दशमान पद्धती अधिक स्पष्टपणे मांडली गेली.

3. भास्कराचार्य (भास्कर I आणि भास्कर II)

भास्कर I (इ.स. 600–680) यांनी अंक पद्धतीत स्थानमूल्य (Place Value System) व्यवस्थित स्पष्ट केले.

भास्कराचार्य II (1114–1185) यांनी "लीलावती" आणि "बीजगणित" या ग्रंथांत दशमान पद्धतीवर आधारित सखोल गणित दिले.

वैशिष्ट्ये:

१ ते ९ या अंकांचा वापर.

शून्य (०) चा स्वतंत्र अंक म्हणून समावेश.

स्थानमूल्य पद्धत (Place Value System) – म्हणजेच एखादा अंक कुठे आहे त्यावर त्याची किंमत अवलंबून असते.

जागतिक प्रसार:

भारतातून दशमान पद्धती अरब देशांत पोहोचली.अरबांनी ती पुढे युरोपात नेली.

म्हणूनच युरोपियन लोकांनी तिला "हिंदू-अरेबिक नंबर सिस्टीम" (Hindu–Arabic Numeral System) असे नाव दिले.

थोडक्यात सांगायचे झाले तर, दशमान पद्धती भारतातील आर्यभट्ट, ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य यांसारख्या महान गणितज्ञांच्या योगदानामुळे अस्तित्वात आली आणि नंतर संपूर्ण जगात पसरली.

3. बीजगणित, त्रिकोणमिती आणि कलन, भास्कराचार्य, आर्यभट्ट यांनी या शास्त्रांची मांडणी केली.

4. खगोलशास्त्र (Astronomy) – ग्रहांची गती, ग्रहणाची गणना भारतात अचूक केली जात होती.

5. वैद्यकशास्त्र (आयुर्वेद): 

चरक, सुश्रुत यांनी औषधोपचार व शस्त्रक्रिया पद्धती विकसित केल्या.

चरक हे प्राचीन भारतातील महान आयुर्वेदाचार्य आणि वैद्यकशास्त्रज्ञ होते. त्यांना "वैद्यकशास्त्राचा जनक" असे मानले जाते.

चरक:

1. कालखंड – इ.स.पू. 100 ते इ.स. 200 च्या दरम्यान चरक यांचा काळ मानला जातो.

2. चरक संहिता:

चरक यांनी रचलेले चरक संहिता हे आयुर्वेदातील सर्वात महत्त्वाचे ग्रंथ आहे.

या ग्रंथामध्ये औषधी वनस्पती, रोगांचे निदान, उपचार पद्धती, आहार-विहार, तसेच आरोग्य टिकवण्यासाठी लागणारे नियम यांचा सविस्तर उल्लेख आहे.

हा ग्रंथ मूळतः अग्निवेश संहिता होता, त्याचे संपादन व परिष्करण चरक यांनी केले.

3. वैद्यकीय योगदान:

रोगांचे मूळ कारण शरीरातील दोष (वात, पित्त, कफ) यांचा असंतुलन असल्याचे चरकांनी स्पष्ट केले.

औषधोपचारासोबत आहार, जीवनशैली आणि मानसिक संतुलन हेसुद्धा आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे, हे त्यांनी प्रतिपादन केले.

त्यांनी शरीररचना, रोगनिदान, औषधनिर्मिती, शल्यक्रिया याविषयी माहिती दिली.

4. विशेषता:

"चरक" या शब्दाचा अर्थ प्रवासी किंवा भ्रमण करणारा असा होतो. चरक हे राजवैद्य होते आणि त्यांनी संपूर्ण भारतभर फिरून औषधी वनस्पती व उपचार पद्धतींचा अभ्यास केला.

त्यांचे योगदान इतके मोठे आहे की आजही आधुनिक वैद्यकशास्त्रात आयुर्वेदाच्या अभ्यासासाठी चरक संहिताचा वापर होतो.

चरक हे आयुर्वेदाच्या क्षेत्रातील महर्षी होते. त्यांनी मानवाच्या आरोग्य आणि दीर्घायुष्याच्या दृष्टिकोनातून आयुर्वेदाला वैज्ञानिक पद्धतीने मांडले आणि "चरक संहिता"च्या माध्यमातून ते आजवर जिवंत ठेवले.

सुश्रुत यांना "शल्यचिकित्सेचे जनक" मानले जाते.

सुश्रुत हे भारतातील प्राचीन काळातील महान शल्यचिकित्सक (सर्जन) मानले जातात. त्यांना "शल्यतंत्राचे जनक" (Father of Surgery) म्हणूनही ओळखले जाते.

सुश्रुतांविषयी माहिती:

कालखंड: इ.स.पूर्व सहावे शतक (सुमारे 600 BCE) असा त्यांचा काळ मानला जातो.

ग्रंथ: सुश्रुतांनी रचलेले “सुश्रुतसंहिता” हे आयुर्वेदातील अतिशय महत्वाचे शास्त्रीय ग्रंथ आहे. या ग्रंथात शल्यचिकित्सा, नेत्रचिकित्सा, अस्थिचिकित्सा, प्रसूतीशास्त्र, औषधोपचार व आरोग्यसंपादन या विषयांवर सविस्तर माहिती आहे.

शल्यक्रिया (Surgery):

प्लास्टिक सर्जरी व नाकाची पुनर्बांधणी (Rhinoplasty)

मोतीबिंदूची शस्त्रक्रिया:

हर्निया, मूत्रपिंडातील खडे, हाडे जोडणे, जखमा व भाजल्यावरील उपचार

प्रसूतीदरम्यान शस्त्रक्रिया:

विविध प्रकारच्या शस्त्रक्रियेसाठी त्यांनी 125 पेक्षा जास्त उपकरणांचे वर्णन केले आहे.

प्रशिक्षण पद्धती:

सुश्रुतांनी विद्यार्थ्यांना प्रथम भाजीपाला, फळे किंवा मृत प्राणी यांच्या अंगावर शस्त्रक्रिया करून सराव करण्यास सांगितले.

शस्त्रक्रियेत नेहमी स्वच्छता (Sterilization) व बारकाईने निरीक्षण करण्याचे त्यांनी महत्त्व पटवले.

योगदान:

जगात सर्वप्रथम वैज्ञानिक पद्धतीने शस्त्रक्रिया शिकविणारा व लिहून ठेवणारा वैद्य म्हणजे सुश्रुत.

आजच्या आधुनिक शल्यचिकित्सेचा पाया सुश्रुतांनी घातला.

प्लास्टिक सर्जरी: 

सुश्रुत यांनी नाक पुनर्निर्मिती सारख्या शस्त्रक्रिया प्राचीन काळात केल्या.

ओळख:

पाश्चिमात्य देशांतील विद्वान देखील त्यांना "Father of Plastic Surgery" असे म्हणतात.

2014 मध्ये भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ सुश्रुत जन्मजयंती "राष्ट्रीय डॉक्टर दिन" म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली.

थोडक्यात, सुश्रुत हे केवळ आयुर्वेदाचे नव्हे तर संपूर्ण वैद्यकशास्त्राच्या इतिहासातील सर्वात मोठे शल्यचिकित्सक होते.

6. योग व ध्यान:

पतंजली यांनी योगसूत्रे मांडली, जगभर ही पद्धती पसरली.

पतंजली यांची ओळख प्राचीन भारतातील योगशास्त्राचे जनक म्हणून केली जाते. त्यांचा उल्लेख योगसूत्रांचे लेखक म्हणून सर्वाधिक प्रसिद्ध आहे. त्यांना आयुर्वेद व व्याकरण (महाभाष्य) यांचेही योगदान दिलेले मानले जाते. त्यांचा जीवनकाळ नेमका ठरलेला नाही, परंतु साधारणपणे इ.स.पू. २ रे शतक ते इ.स. ५ वे शतक या दरम्यान ते झाले असावेत असे विद्वान मानतात.

पतंजली यांचे प्रमुख कार्य:

1. योगसूत्रे:

१९५ सूत्रांमध्ये योगाचे तत्त्वज्ञान मांडले आहे.

योगाचे अष्टांग योग (यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी) ही संकल्पना त्यांनी दिली.

पतंजली योगसूत्रे हे योगशास्त्राचे मूलभूत आणि प्रमाणभूत ग्रंथ मानले जातात.

2. महाभाष्य (व्याकरण):

पाणिनि यांच्या "अष्टाध्यायी" व्याकरणावर टीका आणि स्पष्टीकरण करणारा हा महत्त्वाचा ग्रंथ आहे.

त्यामुळे संस्कृत व्याकरणशास्त्र अधिक सुसंगत झाले.

3. आयुर्वेद:

काही परंपरेनुसार त्यांनी आयुर्वेदावरही ग्रंथ लिहिला, पण त्याची निश्चित ऐतिहासिक पुरावा मर्यादित आहे.

पतंजलींचा योगदर्शन:

त्यांनी सांगितले की योग म्हणजे चित्तवृत्ती निरोध म्हणजे मनातील चंचलता थांबविणे.

योगाच्या साधनेने आत्मज्ञान व मोक्षप्राप्ती शक्य होते.

शरीर, मन आणि आत्म्याचा संतुलित विकास साधणे हा योगाचा उद्देश त्यांनी स्पष्ट केला.

प्रभाव व वारसा:

पतंजलींचे योगसूत्र आज जगभरातील योगाभ्यासकांसाठी मार्गदर्शक आहे.

आधुनिक काळातील योगशिक्षण, ध्यानपद्धती व मानसिक आरोग्य क्षेत्रातही त्यांच्या विचारांचा प्रभाव दिसतो.

थोडक्यात, पतंजली हे योग, व्याकरण आणि तत्त्वज्ञान या तिन्ही क्षेत्रांत योगदान देणारे महान ऋषी मानले जातात.

7. बुद्धिबळ (Chess): 

चतुरंग" या खेळापासून बुद्धिबळाचा उगम झाला.

8. लौहस्तंभ (Iron Pillar of Delhi)  

1600 वर्षांहून जुना असूनही गंज न लागणारा धातू तंत्रज्ञान.

9. नवग्रह व ज्योतिषशास्त्र: 

भारतीय गणिती पद्धतींवर आधारित.

मध्ययुगीन भारतातील योगदान:

1. कापड उद्योग (Textiles) मुस्लीन, सिल्क, सूत यांचे उत्पादन जगभर निर्यात होत होते.

2. गणित – केरळ गणित शाळेने "अनंत श्रेणी" व कलनाच्या संकल्पना मांडल्या (न्यूटनपूर्वी).

3. धातुकाम व शस्त्रास्त्रे – तोफखाना, वज्रयंत्रे, धातूंची प्रक्रिया यामध्ये प्रगती झाली.

आधुनिक भारतातील शोध आणि योगदान

1. बोस,आइंस्टाइन कंडेन्सेट सिद्धांत सत्येंद्रनाथ बोस यांचे योगदान.

2. रामन प्रभाव (Raman Effect) – सी. व्ही. रामन यांना 1930 मध्ये नोबेल पुरस्कार मिळाला.

3. कृष्ण व कृष्ण–एलिस सिद्धांत (Black hole singularity theorem) – सुब्रह्मण्यन चंद्रशेखर आणि पेनरोज यांचे काम.

4. गोडबोले चाचणी (Number theory, Prime numbers) – भारतीय गणितज्ञांचे योगदान.

5. अंतराळ संशोधन (ISRO) –

चांद्रयान मोहिमा,

मंगळयान (Mangalyaan जगातील सर्वात स्वस्त मंगळ मोहिम),

गगनयान (मानवी मोहिमेची तयारी).

6. परमाणु संशोधन  होमी भाभा यांचे कार्य, अणुभट्टा रिऍक्टर.

7. कंप्युटर सॉफ्टवेअर व IT  भारतीय वैज्ञानिकांनी जागतिक स्तरावर नाव कमावले आहे.

8. औषधनिर्मिती (Pharma)  भारत "जगाचे औषधालय" म्हणून ओळखले जाते.

9. आधुनिक वाहतूक, रेल्वे, दळणवळण तंत्रज्ञानात भारतीय अभियंते अग्रगण्य आहेत.

 निष्कर्ष:

भारताने प्राचीन काळापासून आजपर्यंत गणित, विज्ञान, औषधोपचार, तंत्रज्ञान, अंतराळ संशोधन, संगणक व आयटी क्षेत्रात असंख्य महत्त्वपूर्ण शोध व आविष्कार केले आहेत.

संख्या अचूक सांगणे कठीण आहे कारण हजारो शोध झाले आहेत; पण त्यातील मुख्य योगदान जगाला दिशा देणारे आहे.

भारतातील शोध व आविष्कारांची कालानुक्रमे यादी

प्राचीन काळ (इ.स.पूर्व)

इ.स.पू. 2500 – सिंधु संस्कृतीत शहर नियोजन, नाले व्यवस्था, धातुकाम.

इ.स.पू. 800 – वैदिक कालात औषधी वनस्पतींचे संशोधन (आयुर्वेदाची सुरुवात).

इ.स.पू. 600 – सुश्रुतांनी शल्यचिकित्सा व प्लास्टिक सर्जरीचे ज्ञान दिले.

इ.स.पू. 500 – पाणिनींचे संस्कृत व्याकरण (भाषाशास्त्र).

इ.स.पू. 400 – पिंगलाचार्यांनी द्वयी पद्धती (Binary numbers) चे वर्णन केले.

इ.स.पू. 300 – चाणक्य अर्थशास्त्र (अर्थनीती, राज्यशास्त्र). प्राचीन भारत (इ.स. 1 ते 1000)

इ.स. 499 – आर्यभट्टांनी "शून्य" व ग्रहगतीचा सिद्धांत दिला.

इ.स. 628 – ब्रह्मगुप्त यांनी शून्याचा वापर गणितात अधिकृतपणे मांडला.

इ.स. 600–900 – आयुर्वेदातील चरकसंहिता व सुश्रुतसंहिता जगभर पसरल्या.

इ.स. 700 – बुद्धिबळ (चतुरंग खेळ) भारतातून जगभर गेला.

इ.स. 850 – केरळ गणित शाळेने कलनाच्या संकल्पना मांडल्या.

मध्ययुगीन भारत (इ.स. 1000 – 1700)

इ.स. 1200 – भास्कराचार्य यांनी "सिद्धांत शिरोमणी" लिहून बीजगणित व त्रिकोणमिती मांडली.

इ.स. 1300 – भारतातील धातुकाम तंत्रज्ञान (दमास्कस स्टील, वुट्झ स्टील) जगप्रसिद्ध झाले.

इ.स. 1500 – वस्त्रोद्योगात मुस्लीन, सिल्क, कापूस निर्यात मोठ्या प्रमाणात.

इ.स. 1600 – गंजरोधक दिल्लीचा लौहस्तंभ अजूनही टिकून आहे.

आधुनिक भारत (1700 – 1947)

1774 – शंकराभट्ट यांनी "नवनीत" मध्ये गणितीय सिद्धांत लिहिले.

1860 – जगदीशचंद्र बोस यांनी रेडिओ वेव्ह्स व वायरलेस कम्युनिकेशनवर संशोधन सुरू केले.

1895 – शिवकर बापूजी तलपदे यांनी "मरुत्सखा" हे पहिले विमान उडवले (राईट बंधूपूर्वी).

1898 – रोनाल्ड रॉस यांनी भारतात मलेरियाचा परजीवी शोधला.

1901 – प्रफुल्लचंद्र रे यांनी रसायनशास्त्रात औषधनिर्मिती संशोधन केले.

स्वातंत्र्योत्तर भारत (1947 – आजपर्यंत)

1948 – होमी भाभा यांनी अणुऊर्जा संशोधन सुरू केले.

1958 – सी. व्ही. रामन यांना "रामन प्रभावा" साठी नोबेल पुरस्कार.

1975 – आर्यभट्ट भारताचा पहिला उपग्रह.

1980 – ISRO ने स्वदेशी उपग्रह प्रक्षेपण यशस्वी केले.

1998 – चांद्रयान कार्यक्रमाची सुरुवात.

2013 – मंगळयान (Mangalyaan) – जगातील सर्वात कमी खर्चातील यशस्वी मंगळ मोहिम.

2019 – चांद्रयान-2 मोहिम.

2023 – चांद्रयान-3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग (भारत हा पहिला देश ठरला).

2025 – गगनयान (मानवी अंतराळ मोहिम) ची तयारी.

अशा प्रकारे, भारताने प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत हजारो संशोधन आणि शोध केले आहेत. गणित, विज्ञान, औषधोपचार, धातुकाम, अंतराळ संशोधन, IT आणि फार्मा क्षेत्रात भारताने जगाला दिशा दिली आहे.

आधुनिक भारतातील शास्त्रज्ञ (1700–1947)

1. जगदीशचंद्र बोस (1858–1937) –

वायरलेस कम्युनिकेशन, वनस्पतींमध्ये जीवनाचा शोध.

2. प्रफुल्लचंद्र रे (1861–1944)

आधुनिक रसायनशास्त्राचे जनक, बंगाल केमिकल्स स्थापना.

3. शिवकर तलपदे (1864–1916) 

"मरुत्सखा" हे पहिले विमान उडवले

4. मेघनाद साहा (1893–1956)

साहा आयनीकरण सिद्धांत (Astrophysics)

5. सत्येंद्रनाथ बोस (1894–1974) 

बोस-आइन्स्टाइन सांख्यिकी, "बोसॉन" कणांचे नाव त्यांच्यावरून.

6. सी. व्ही. रामन (1888–1970)

"रामन प्रभाव", नोबेल पुरस्कार (1930).

7. होमी भाभा (1909–1966) 

भारतीय अणुशास्त्राचे जनक, अणुभट्टा रिऍक्टर.

8. श्रीनिवास रामानुजन (1887–1920) 

अंकसिद्धांत, अनंत श्रेणी, गणितीय स्थिरांक.

स्वतंत्र भारतानंतरचे शास्त्रज्ञ:

1. विक्रम साराभाई (1919–1971)

ISRO चे जनक, उपग्रह कार्यक्रम.

2. ए. पी. जे. अब्दुल कलाम (1931–2015) 

मिसाईल मॅन ऑफ इंडिया, अग्नी, पृथ्वी मिसाईल, ISRO/DRDO योगदान.

3. सुब्रह्मण्यन चंद्रशेखर (1910–1995) 

"चंद्रशेखर लिमिट" (Astrophysics), नोबेल पुरस्कार.

4. हरगोविंद खुराना (1922–2011)

जनुकसंहिता (Genetic code), DNA संशोधन, नोबेल पुरस्कार.

5. वैंकटरामन रामकृष्णन (1952 पासुन 

रिबोसोम संरचना, नोबेल पुरस्कार (2009).

6. जयंत नारळीकर (1938 पासुन

खगोलशास्त्र, "Steady State Theory".

7. एम. एस. स्वामिनाथन (1925–2023) 

COVID-19 लस:

भारताने कोरोनावर (COVID-19) लस शोधून काढण्यात मोठे योगदान दिले आहे. 

भारतातील कोरोनावरील लसी:

1. कोव्हॅक्सिन (Covaxin)

विकसित करणारे: भारत बायोटेक (Hyderabad) आणि भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद (ICMR) यांच्या सहकार्याने.

तंत्रज्ञान: Inactivated virus vaccine (संपूर्ण व्हायरस निष्क्रिय करून तयार केलेली).

वैशिष्ट्ये:

भारतात पूर्णपणे मेड-इन-इंडिया लस.

2021 मध्ये आपत्कालीन वापरासाठी मान्यता मिळाली.

दोन डोस आवश्यक.

निर्यात: कोव्हॅक्सिन अनेक देशांना पुरवली गेली.

2. कोव्हिशिल्ड (Covishield)

विकसित करणारे: ऑक्सफर्ड विद्यापीठ (UK) आणि अॅस्ट्राझेनेका यांनी तयार केलेली मूळ लस, परंतु भारतात तिचे उत्पादन सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (Pune) यांनी केले.

तंत्रज्ञान: Viral vector vaccine (Chimpanzee adenovirus vector).

वैशिष्ट्ये:

भारतात सर्वाधिक वापरली गेलेली लस.

दोन डोस आवश्यक:

भारतातून 90 हून अधिक देशांना निर्यात केली.

3. इतर लसी:

स्पुटनिक-V (रशियन लस, पण भारतात उत्पादन झाले).

ZyCoV-D (Zydus Cadila, Ahmedabad) जगातील पहिली DNA-आधारित कोविड लस.

Covovax (Serum Institute, US कंपनी Novavax ची आवृत्ती).

Gemcovac-19 (mRNA लस, भारताची स्वतःची).

भारताचे योगदान:

"Vaccine Maitri" मोहिमेअंतर्गत भारताने अनेक देशांना मोफत/कमी दरात लस पुरवली.

भारत हा जगातील सर्वात मोठा लस उत्पादक देश आहे, आणि COVID-19 महामारीत भारताने जगाला मोठ्या प्रमाणावर लस पुरवून मदत केली.

म्हणजेच, भारताने स्वतःची लस (Covaxin, ZyCoV-D, Gemcovac-19) तयार केली आणि परदेशी लसींचे (Covishield, Covovax, Sputnik V) उत्पादन करून जगात मोठे योगदान दिले.

भारतात हजारो शास्त्रज्ञ झाले आहेत. त्यांचे शोध गणित, खगोलशास्त्र, औषधशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जैवतंत्रज्ञान, अंतराळ संशोधन, IT या सर्व क्षेत्रात आहेत.

जगात आज जे अनेक मूलभूत तत्त्वे वापरली जातात (शून्य, दशमान पद्धती, कलन, आयुर्वेद, प्लास्टिक सर्जरी, बोसॉन, रामन इफेक्ट, चंद्रयान, मंगळयान) त्यांची मुळे भारतात आहेत.

स्वातंत्र्योत्तर काळात (1947 नंतर भारताने अनेक महत्वाच्या यंत्रसामग्री, तंत्रज्ञान व उपकरणे विकसित केली आहेत. भारतातील वैज्ञानिक, संशोधक आणि अभियंत्यांनी केलेल्या या शोधांचा उपयोग शेती, औद्योगिक क्षेत्र, संरक्षण, वैद्यकीय व अवकाश संशोधन यामध्ये मोठ्या प्रमाणात झाला. खाली काही महत्वाच्या यंत्रांची यादी दिली आहे:

शेती व ग्रामीण विकास क्षेत्र:

पंपसेट व डिझेल इंजिन सुधारित आवृत्ती शेतसिंचनासाठी.

ट्रॅक्टर व हार्वेस्टर मशीन – स्वदेशी मॉडेल्स (HMT, सोनालिका, महिंद्रा)

दुध काढण्याची यंत्रे (Milking machines)

धान्य स्वच्छ करणारे व गिरणी यंत्र

औद्योगिक व ऊर्जा क्षेत्र

भारतीय बनावटीची वीज जनित्रे (Generators)

BHEL (भारत हेवी इलेक्ट्रिकल्स) कडून टर्बाइन व ट्रान्सफॉर्मर्स

ISRO कडून क्रायोजेनिक इंजिन:

सौरऊर्जा पॅनेल्स व सोलर पंपसेट:

वैद्यकीय क्षेत्र:

स्वदेशी MRI मशीन व CT स्कॅन उपकरणे (BHEL व इतर संशोधन संस्थांमार्फत)

इलेक्ट्रॉनिक हृदय पेसमेकर (Cardiac pacemaker डॉ. असीम दासगुप्ता यांचे संशोधन.

पोर्टेबल वेंटिलेटर यंत्र.विशेषतः कोविड-19 काळात

स्वदेशी लस निर्मिती उपकरणे व बायोरिऍक्टर तंत्रज्ञान

संरक्षण क्षेत्र:

अर्जुन रणगाडा टँक

तेजस लढाऊ विमान

INSAS रायफल

रडार, सोनार आणि क्षेपणास्त्र प्रक्षेपण यंत्रणा (DRDO मार्फत)

अग्नि व पृथ्वी क्षेपणास्त्र प्रक्षेपण प्रणाली

अवकाश संशोधन क्षेत्र:

SLV-3 रॉकेट प्रक्षेपण यंत्र (डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली)

PSLV व GSLV प्रक्षेपण वाहने

चांद्रयान व मंगळयानासाठी प्रक्षेपण यंत्रणा

स्वदेशी नेव्हिगेशन प्रणाली (IRNSS – NavIC)

दैनंदिन वापरातील उपकरणे:

स्वदेशी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (EVM) भारतानेच विकसित केलेले आणि जगभर वापरले जाते.

चिप आधारित स्मार्ट कार्ड व आधार प्रणालीसाठी बायोमेट्रिक यंत्र

रुपे (RuPay) कार्ड प्रणालीसाठी व्यवहार यंत्रणा:

थोडक्यात सांगायचे झाले तर, शेतीपासून अवकाश संशोधनापर्यंत भारताने स्वातंत्र्योत्तर काळात हजारो प्रकारची यंत्रे, उपकरणे आणि तंत्रज्ञान शोधले व विकसित केली आहेत.

रामदास तळपे (मंदोशी)






संगीतरत्न दत्ता महाडिक जीवनप्रवास

मास्टर दत्ता महाडिक पुणेकर:

काही माणसे एखाद्या ध्येयाने पछाडलेली असतात. ती माणसे एखाद्या ध्येयासाठीच जन्म घेत असावीत. आणि कार्य साध्य झाल्यावर या मानव जातीत आपला अभ्यद्य ठसा उमटवून निघून जात असावीत.

मास्टर दत्ता महाडिक पुणेकर:

img src="..." alt=" दत्ता महाडिक पुणेकर">
त्यापैकी साऱ्या महाराष्ट्रात तमाशा क्षेत्रात अजरामर नाव जर कुणाचं असेल तर ते म्हणजे मास्टर दत्ता महाडिक पुणेकर यांचं. त्यांची सोंगाड्या ही भूमिका, त्यांच्या वगनाट्यातील संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर या भूमिका, कर्णमधुर गाणी आणि संगीत महाडिक साहेबांनी अजरामर केली. ती आजही तितकीच लोकप्रिय आहेत.

हिंदी चित्रपटसृष्टीत जसे राजेश खन्ना व अमिताभ बच्चन सुपरस्टार होते. त्याच पद्धतीने तमाशा क्षेत्रात मास्टर दत्ता महाडिक हे सुपरस्टार होते.

महाडिक साहेबांचा जन्म 4 ऑक्टोबर 1928 रोजी उरुळी कांचन येथे झाला. त्यांच्या आई मुक्ताबाई या धुण्या भांड्यांचे काम करत असत. परंतु लवकरच दीर्घ आजाराने त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळेस महाडिक अवघे पंधरा वर्षाचे होते.

दत्ता महाडिक यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी आर्यभूषण थिएटर'मध्ये काम केले. त्यावेळी 'गंगाराम सातारकर संगीत बारी' चे प्रयोग आर्यभूषणमध्ये सुरू होते. 

इतर कामं करता करता हळूहळू दत्ता गाणं कान देऊन ऐकू लागला. गंगाराम सातारकरांच्या हे लक्षात आले आणि त्यांनी छोट्या दत्ताला कोरससाठी पाठीमागे उभे केले. कोरससाठी उभं राहिलं की दत्ता संगीत वाद्य न्याहाळत असे. दत्ता हळूहळू कडं हातात घेऊन वाजवू लागला, मग मात्र गंगाराम सातारकरांनी दत्ताला संगीताचे प्राथमिक धडे दिले.

परंतु त्यावेळेस मराठी चित्रपट सृष्टी नावारूपाला आल्यामुळे संगीतबाऱ्यांचे महत्त्व कमी झाले.

त्यानंतर मग सन 1945 साली दत्ता महाडिक यांनी दत्ता ओवेकर सह जगताप पाटील पिंपळेकर यांच्या तमाशा प्रवेश केला. परंतु पाच सात वर्षातच हा तमाशा बंद पडला.

त्यानंतर महाडिक साहेब हे माधवराव नगरकर सह गणपतराव सविंदणेकर यांच्या तमाशा मंडळात दाखल झाले. त्यावेळी तेथे चंद्रकांत ढवळपुरीकर, तुकाराम खेडकर, पांडुरंग मुळे, हे दिग्गज कलाकार काम करत होते. त्यांच्यामध्ये दत्ता महाडिक यांनी सोंगाड्या हे पात्र आजारावर केले. त्यांना गाण्याचा छंद असल्यामुळे संगीताच्या बाबतीत सुद्धा तमाशा त्यांच्यामुळे प्रगल्भ झाला.

त्याच सुमारास सन 1952 मध्ये वडझीरे येथील एक तमाशा कलावंत रामचंद्र अटक यांच्या 'राधाबाई' या मुलीशी दत्ता महाडिक यांचा १९५२ साली मंगरूळ पारगाव येथे विवाह झाला.

सन 1962 मध्ये माधवराव नगरकर यांचे आकस्मिक निधन झाल्यामुळे दत्ता महाडिक व चंद्रकांत ढवळपुरीकर यांनी नव्यानेच निर्माण झालेल्या मास्टर तुकाराम खेडकर यांच्या तमाशा मध्ये प्रवेश केला. तेथे त्या दोघांनी दोन वर्ष काम केले.

मास्टर चंद्रकांत ढवळपुरीकर: 

img src="..." alt=" चंद्रकांत ढवळपुरीकर ">
परंतु चंद्रकांत ढवळपुरीकर यांना स्वतःचा तमाशा फड काढायचा होता. त्यासाठी त्यांनी दत्ता महाडिक यांना घेऊन मास्टर चंद्रकांत ढवळपुरीकर सह बाबुराव पडवळ हा तमाशा फड काढला. परंतु एक वर्षभरातच त्यांना हा फड बंद करावा लागला.

त्यानंतर सन 1965 मध्ये चंद्रकांत ढवळपुरीकर यांनी दत्ता महाडिक यांच्यासह नवीन तमाशा फड सुरू केला. आणि याचेच नाव मास्टर चंद्रकांत ढवळपुरीकर सह दत्ता महाडिक पुणेकर.

या तमाशामध्ये मात्तबर व दिग्गज  अभिनेते ढवळपुरीकर यांनी दत्ता महाडिक, विष्णू चासकर, फकीर भाई केसनंदकर, गेनभाऊ आंबेठाणकर असे एकाचढ एक कलाकार तयार केले.

त्यांचे संत ज्ञानेश्वर माझी माऊली, संत तुकाराम, गवळ्याच्या रंभा, सुडाने पेटली लावणी, अशी अनेक वगनाट्य उभ्या महाराष्ट्रात लोकप्रिय झाली. विशेष म्हणजे दत्ता महाडिक यांचे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, भक्त पुंडलिक, सुडाने पेटली लावणी, गुंडानं हेरलं पाखरू, भिल्लांची टोळी, रक्तात भिजला बांगला, महाराष्ट्र झुकत नाही या वगनाट्या मधील भूमिका प्रचंड लोकप्रिय झाल्या. चंद्रकांत ढवळपुरीकर यांनी सुद्धा या सर्व वगनाट्य मध्ये खलनायकांच्या भूमिका तितक्याच ताकदीने रंगपटावर सादर केल्या. चंद्रकांत ढवळपुरीकर हे वगसम्राट होते. 

ज्यावेळी ते संत तुकाराम हे पात्र साकारत होते. त्या काळात त्यांनी मद्यपान किंवा नॉनव्हेज पूर्णपणे वर्ज केले होते. त्यावेळी प्रत्येक कलाकार स्टेजवर चढताना दत्ता महाडिक यांच्या पाया पडून मगच स्टेजवर जात असे.

चंद्रकांत ढवळपुरीकर हे फक्त तिसरी इयत्ता शिकून देखील त्यांचा गणित विषय हा पक्का होता. त्यावेळी तमाशाचा लाख, लाख रुपयांचा हिशोब ते चुटकी सरसा करीत असत. तमाशाचा सारा हिशोब ते बघत असत. अत्यंत काटकसरीने आणि नेटक्या नियोजनामुळे त्यांचा तमाशा नेहमीच फायद्यात असे. त्यावेळेस तमाशाचे संपूर्ण आर्थिक नियोजन, व सर्व हिशोब चंद्रकांत ढवळपुरीकर यांच्याकडे असे. त्यामध्ये दत्ता महाडिक यांनी कधीच लक्ष घातले नाही.

ते हिशोबाच्या वेळेस दत्ता महाडिक यांना महाडिक साहेब अशी हाक मारत. व ढवळपुरीकर महाडिक साहेबांना हिशोब सांगत. परंतु महाडिक साहेबांचे या हिशोबाकडे अजिबात लक्ष नसायचे. त्यांचे लक्ष वगनाट्याची रिहर्सल चाललेल्या कलाकारांवर असायचे. ते म्हणायचे, ढवळपुरीकर तुम्ही हिशोब करा. मला त्यामध्ये रस नाही. मी कलाकारांकडून रिहर्सल करून घेतो. असे म्हणून ते तेथून निघून जात असत. इतका विश्वास त्यांचा ढवळपुरीकर यांच्यावर होता. दत्ता महाडिक यांना साहेब ही पदवी चंद्रकांत ढवळपुरीकर यांनीच दिली होती.

परंतु पुढे सन 1982 मध्ये त्यांचे मोठ्या प्रमाणावर मतभेद झाले आणि त्यांची ही जोडी फुटली. 

दत्ता महाडिक पुणेकर आणि चंद्रकांत ढवळपुरीकर हे दोघेही १९७०–८० च्या काळात तमाशा क्षेत्रातील खूपच लोकप्रिय आणि प्रयोगशील कलाकार होते. त्यांची जोडी काही काळ उत्कृष्ट रंगभूमीवर गाजली. मात्र सन १९८२ मध्ये या दोघांचा फड (तमाशा मंडळ) वेगळा झाला.

यामागची कारणे प्रामुख्याने खालीलप्रमाणे सांगितली जातात :

कलात्मक मतभेद:

दोघांचेही कलाविष्कार दमदार होते, पण तमाशाच्या मांडणीबाबत, विषय निवडीबाबत आणि प्रेक्षकांना काय द्यावे याबाबत त्यांच्या दृष्टीकोनात मतभेद वाढू लागले.

महाडिक साहेबांना त्या तमाशामध्ये जास्तीत जास्त संगीताला प्राधान्य द्यायचे होते. व तमाशाचा एक वेगळाच बाज निर्माण करायचा होता. परंतु वगसम्राट चंद्रकांत ढवळपुरीकर यांना मात्र हे मान्य नव्हते. ते त्यांच्या पारंपारिक जुन्या वळणावर ठाम होते. त्यामुळेही त्यांच्यात मतभेद निर्माण झाले.

व्यवस्थापन व आर्थिक कारणे:

तमाशा हा मोठा फड चालविण्याचा उद्योग असल्यामुळे त्यात मोठा आर्थिक खर्च असतो. आर्थिक व्यवस्थापनात व उत्पन्नाच्या वाटणीमध्ये तणाव निर्माण झाला.

नाव व लोकप्रियतेतील स्पर्धा:

तमाशा फडामध्ये कोण आघाडीवर आहे, कोणाचा आवाज व अभिनय प्रेक्षकांना जास्त भावतो, याबाबत दोन्ही कलाकारांच्या चाहत्यांमध्येच स्पर्धा वाढली. त्यामुळे फड दोन गटांत विभागला गेला.

स्वतःचा ठसा उमटवण्याची जिद्द:

दत्ता महाडिक पुणेकर आणि चंद्रकांत ढवळपुरीकर या दोघांनाही स्वतंत्रपणे कलाक्षेत्रात आपला ठसा उमटवायची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी स्वतंत्र फड स्थापन करून आपापला मार्ग निवडला.

दत्ता महाडिक पुणेकर : स्वतंत्र फडानंतरची कारकीर्द

सन १९८२ मध्ये चंद्रकांत ढवळपुरीकर यांच्यापासून वेगळे झाल्यानंतर दत्ता महाडिकांनी स्वतःचा स्वतंत्र फड उभारला.

लोकनाट्य शैलीला नवे स्वरूप दिले:

पारंपरिक तमाशामधील वगनाट्ये, लावण्या, संवाद या गोष्टी अधिक नाट्यमय आणि सामाजिक जाणीव जागृत करणाऱ्या पद्धतीने त्यांनी सादर केल्या.

सामाजिक विषयांचा आग्रह:

त्यांच्या फडात केवळ मनोरंजन न होता शिक्षण, व्यसनमुक्ती, स्त्री-सशक्तीकरण, अन्यायाविरोधी भूमिका यासारखे सामाजिक संदेश देणारे प्रयोग रंगले.

संगीतात प्रगल्भता:

गंधर्व-परंपरेचा प्रभाव असलेल्या त्यांच्या गायकीने तमाशाला दर्जा दिला. त्यामुळे ग्रामीण प्रेक्षकांबरोबरच शहरी रसिकांचाही मोठा ओढा त्यांच्या फडकडे राहिला.

पुरस्कार व गौरव:

त्यांच्या या योगदानामुळे त्यांना अनेक सांस्कृतिक पुरस्कार मिळाले. विशेष म्हणजे, सन १९९२ मध्ये तत्कालीन सांस्कृतिक मंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते “संगीतरत्न” हा बहुमान मिळाला.

चंद्रकांत ढवळपुरीकर : स्वतंत्र प्रयोग:

दुसरीकडे, ढवळपुरीकर यांनीही स्वतंत्र फड काढून काही वेगळे प्रयोग केले.

शुद्ध तमाशा परंपरेवर भर:

ते अधिक पारंपरिक तमाशा पद्धतीवर ठाम राहिले. जास्त सामाजिक सुधारणा न आणता त्यांनी लावणी-गाणी व पारंपरिक रंगतदार वगनाट्ये जपली.

अभिनय आणि संवादांची ताकद:

त्यांचा आवाज आणि संवादफेक खूपच लोकप्रिय होती. त्यामुळे ग्रामीण भागात त्यांचे फडही तुफान गाजत राहिले.

प्रेक्षकांची निष्ठा:

काही प्रेक्षक महाडिकांचे सामाजिक भान असलेले प्रयोग पाहत, तर काही ढवळपुरीकरांची परंपरा व रंगतदार विनोद यांचा आनंद घेत अशा प्रकारे दोन्ही फडांना स्वतंत्र चाहतावर्ग मिळाला. 

नवीन पर्वाची सुरुवात: 

सन 1982 मध्ये चंद्रकांत ढवळपुरीकर आणि दत्ता महाडिक यांच्यामध्ये विकृष्ट आले. आणि ढवळपुरीकर यांनी दत्ता महाडिक यांना तमाशा फडातून बाजूला केले. त्यावेळी दत्ता महाडिक यांच्याकडे काही कलाकार सोडले तर काहीच नव्हते.

त्यावेळी काही हितचिंतकाच्या मदतीने दत्ता महाडिक यांनी गुलाबराव बोरगावकर यांच्याबरोबर स्वतंत्र्य तमाशा फड काढावा असा विचार पुढे आला. परंतु तमाशा फड काढण्यासाठी दत्ता महाडिक यांच्याकडे भांडवल नव्हते. परंतु काही हितचिंतकांनी त्यांची बेल्हा येथील गटकळ शेठ यांच्याशी गाठ घालून दिली. गटकळ शेठ यांना दत्ता महाडिक आणि गुलाबराव बोरगावकर यांची तमाशातील लोकप्रियता माहीत होती.

त्यांनी तीन वर्षाच्या परतफेडच्या बोलीने दत्ता महाडिक आणि गुलाबराव बोरगावकर यांना 3 लाख 40 हजार रुपये देऊ केले. त्याचप्रमाणे गुलाबराव बोरगावकर यांच्या मुलाने 40 हजार रुपये दिले. अशा तऱ्हेने सन १९८२साली दत्ता महाडिक पुणेकर सह गुलाबराव बोरगावकर हा लोकप्रिय तमाशा उभा राहिला. आणि चंद्रकांत ढवळपुरीकर यांचा अंदाज खोटा ठरला.

बेल्हे येथील सावकार गटकळ यांनी दत्ता महाडिक व गुलाबराव बोरगावकर यांना 3 लाख 40 हजार रुपये दिले होते. ही रक्कम तीन फेडायची होती. परंतु या जोडीने 3 लाख 40 हजार हे रक्कम अवघ्या चार महिन्यातच फेडून मोकळे झाले. इतका तमाशा महाराष्ट्रात लोकप्रिय झाला होता. 

एकदा तर मुंबईला दत्ता महाडिक यांच्या राहुटी मध्ये चंद्रकांत ढवळपुरीकर त्यांच्या चार-पाच बिगारी लोकांना घेऊन आले. आणि ते दत्ता महाडिक यांना अर्वाच्य भाषेत बोलू लागले. त्यांचं म्हणणं असं होतं की आमच्या तमाशाला लोक येत नाहीत. सर्व तिकीट लोक तुमच्या तमाशाचा काढतात. यामध्ये तुम्हीच काहीतरी काळबेरं केलं असलं पाहिजे. ते महाडिक साहेबांना मारण्याच्या विचारानेच आले होते.

महाडिक साहेबांना मारण्यासाठी चंद्रकांत ढवळपुरीकर यांनी हातातले घड्याळ आणि गळ्यातली चैन खिशात ठेवली आणि महाडिक साहेबांच्या अंगावर धावून आले. तेवढ्यात महाडिक साहेबांच्या तमाशातील कलावंत निवृत्तीबुवा पोंदेवाडीकर यांनी चंद्रकांत ढवळपुरीकर यांचा हात धरला आणि त्यांना तेथेच सुनावले. त्यानंतर ढवळपुरीकर आपल्या पोरांना घेऊन निघून गेले.

मा.गुलाबराव बोरगावकर: 

img src="..." alt=" गुलाबराव बोरगावकर ">
माधवराव नगरकर यांच्या तमाशात जेव्हा दत्ता महाडिक काम करत होते. त्यावेळी गुलाबराव बोरगावकर त्या तमाशामध्ये कनातीचे बांबू रोवणे, स्टेज उभा करणे, अशी कामे करत असत. त्यांना दत्ता महाडिक यांचा सोंगाड्या हे पात्र खूप आवडायचे. या पात्रावर ते तेव्हा मनापासून प्रेम करायचे. हळूहळू त्यांनीही तमाशा मध्ये काम करायला सुरुवात केली व ते विनोद सम्राट म्हणून उदयाला आले.
त्यांनी त्यानंतर गुलाब माने सह गुलाबराव बोरगावकर या नावाचा तमाशा फड सुरू केला.

सन 1982 मध्ये चंद्रकांत ढवळपुरीकर व दत्ता महाडिक ही जोडी फुटली. आणि त्यानंतर दत्ता महाडिक यांनी गुलाबराव बोरगावकर यांना घेऊन मास्टर दत्ता महाडिक पुणेकर सह गुलाबराव बोरगावकर हा तमाशा फड निर्माण केला.

सन 1982 ते सन 1984 पर्यंत दत्ता महाडिक आणि गुलाबराव बोरगावकर यांनी तमाशाच्या सादरीकरणात अनेक प्रयोग केले. बी.के. कवठेकर यांची तत्कालीन परिस्थितीवर केलेली गाणी दत्ता महाडिक यांच्या उत्कृष्ट संगीत आणि उडत्या चाली यांनी महाराष्ट्राला वेड लावले तर गुलाबराव बोरगावकर यांनी तत्कालीन राजकारण, तत्कालीन दैनंदिन जीवनातील घटना आणि भूतकाळातील घटना यांची सांगड घालून अजोड विनोद निर्मिती केली आणि उभ्या महाराष्ट्राला हास्यसागरात बुडवले.

दत्ता - गुलाब या जोडीने संपूर्ण महाराष्ट्रात विनोदाचा असा काही धुराळा उडविला की तमाशा रसिक हसून हसून गडबडा लोळले. दत्ता - गुलाब यांचं अफलातुन टायमिंग, परस्पर समन्वय, शाब्दिक कोट्या, वर्तमान आणि भूतकाळ यांची सांगड घालून केलेले विनोद यामुळे रसिकांनी या जोडगोळीला अक्षरश: डोक्यावर घेतले.

परंतु नियतीला हे मान्य नव्हतं म्हणून की काय? दिनांक 18 जानेवारी 1984 च्या पौष महिन्यात दत्ता महाडिक सह गुलाबराव बोरगावकर यांचा तमाशा ओतूर येथून म्हसा येथे जात असताना गुलाबराव बोरगावकर यांना मुरबाड येथे पहाटे साडेचारच्या दरम्यान हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. आणि महाराष्ट्राचा हा विनोद सम्राट काळाच्या उदरात गडप झाला.

परंतु त्यांची कला मात्र नियतीला गडप करता आली नाही. अजूनही गुलाबराव बोरगावकर यांचे विनोद लोक तितक्याच उत्स्फूर्तपणे मीडियाच्या माध्यमातून ऐकत असतात.

दत्ता महाडिक यांच्या तमाशा कारकिर्दीमध्ये अनेक नट उदयाला आले. त्यांनी इतरत्र तमाशात न जाता दत्ता महाडिक यांना शेवटपर्यंत साथ दिली.

फकीरभाई केसनंदकर:

img src="..." alt=" फकीरभाई केसनंदकर ">
फकीर भाई केसनंदकर हे दत्ता महाडिक यांच्या तमाशा मध्ये सन 1982 च्या सुमारास आले. त्यांचा गण, बतावणी, सवाल-जबाब यामध्ये उत्कृष्ट अभिनय करत असत. प्रत्यक्ष वगनाट्य मध्ये देखील त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असत. त्यांनी असे घराणे नष्ट करा मधील त्यांची सीआयडी पोलीसाची भूमिका विशेष गाजली. शिवाय ते उत्कृष्ट विनोदाचे बादशहा देखील होते.
गण गाताना किंवा मुजरा गाताना त्यांनी गेनभाऊ आंबेठाणकर यांना तोडीस तोड साथ दिली. काही लोक फक्त गेनभाऊ आणि फकीरभाई यांचा गण आणि मुजरा ऐकायला येत असत. त्यांच्या आवाजाला अविट गोडी होती. 

विष्णू चासकर:

विष्णू चासकर हे देखील सुरुवातीच्या काळापासून दत्ता महाडिक यांच्याबरोबर होते. त्यांनी माधवराव नगरकर, तुकाराम खेडकर, चंद्रकांत ढवळपुरीकर आणि नंतर दत्ता महाडिक यांच्या बरोबरीने काम केले. त्यांनी सुद्धा गण, गवळण, बतावणी सवाल-जबाब आणि वगनाट्य यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका केल्या. ते विनोदाच्या बाबतीत गुलाबराव बोरगावकर यांच्या खालोखाल काम करत असत. त्याने सुद्धा दत्ता महाडिक यांना शेवटपर्यंत साथ दिली. नाही म्हणायला त्यांनी सुद्धा स्वतंत्र तमाशा फडाची निर्मिती केली होती. परंतु त्यांना त्यामध्ये यश आले नाही लवकरच तमाशा बंद करावा लागला. आणि पुन्हा दत्ता महाडिक यांच्या तमाशा मध्ये ते सामील झाले.

गेनभाऊ आंबेठाणकर:

img src="..." alt=" गेनभाऊ आंबेठाणकर ">
गेनभाऊ आंबेठाणकर हे सुद्धा महाडिक साहेबांच्या बरोबरीचे कलाकार होते. त्यांनी सुद्धा तुकाराम खेडकर, चंद्रकांत ढवळपुरीकर आणि नंतर दत्ता महाडिक पुणेकर यांच्या लोकनाट्य तमाशा मध्ये काम केले.
गण म्हणावा तर गेनभाऊ आंबेठाणकर यांनीच. त्यांच्यासारखा गण तमाशा मध्ये कुणालाच म्हनता येत नव्हता. 
काय तो आवाज ! काय ती तान! काय ते सुर आहाहा ! आजही आंबेठाणकर यांचा गण ऐकला की कान तृप्त होतात.

गेनभाऊ आंबेठाणकर हे उत्कृष्ट विनोदी कलाकार होते. ते गणगवळण, बतावणी, रंगबाजी व प्रत्यक्ष वगनाट्या मध्ये प्रमुख भूमिका करत असत.

अजूनही गेनभाऊ आंबेठाणकर हयात आहेत. ते त्यांच्या काळातील आठवणी अजूनही सांगत असतात.

रमेश खुडे:

img src="..." alt=" रमेश खुडे ">
रमेश खुडे हे अगदी अलीकडचे दत्ता महाडिक यांच्या तमाशातील कलाकार. अगदी लहानपणापासून ते दत्ता महाडिक यांचे फॅन होते. ते दत्ता महाडिक यांचा तमाशा पाहण्यासाठी सायकलवर वीस ते पंचवीस किलोमीटर जात असत. त्यांनी दत्ता महाडिक शिवाय दुसरा कोणताच तमाशा त्यावेळी पाहिला नव्हता.

त्यांचा दत्ता महाडिक यांच्या तमाशा सन 1985 मध्ये प्रवेश झाला. आणि त्यांनी संधीचे सोने केले. ते दत्ता महाडिक यांच्याप्रमाणेच स्टेजवर अप्रतिम गाणी सादर करत असत. विविध भूमिका ते प्रभावीपणे अजूनही तितक्याच समर्थपणे करत असतात. आजही दत्ता महाडिक यांच्या तमाशा मध्ये रमेश खुडे यांच्या नावाला एक वलय प्राप्त झाले आहे. 

तमाशा पंढरी नारायणगाव मध्ये तमाशाची सुपारी देताना रमेश खुडे तमाशात आहेत का? याची विचारणा करूनच तमाशा ठरवला जातो.

जनार्दन वायदंडे ढोलकी वादक:

img src="..." alt=" जनार्दन वायदंडे ">
जनार्दन वायदंडे यांनी सुरुवातीपासून दत्ता महाडिक यांच्या तमाशा मध्ये ढोलकी वाजवण्याचे काम केले. ते अतिशय उत्कृष्ट ढोलकी वादक होते. संगीतरत्न दत्ता महाडिक यांची गाणी जर कोणी आजरामर केली असतील तर ती वायदंडे यांच्या ढोलकीने असेच म्हणावे लागेल. महाडिक साहेबांचा वायदंडे हा अतिशय आवडता कलाकार होता. दत्ता महाडिक यांना त्यांनी शेवटपर्यंत साथ दिली. गण आणि मुजरा त्याचप्रमाणे दत्ता महाडिक यांची गाणी वायदंडे यांच्या ढोलकीने अजरामर झाली.

रंगा लाखे पेटी मास्तर:
img src="..." alt=" रंगा लाखे">
रंगा लाखे हे दत्ता महाडिक यांच्या तमाशा पेटी मास्तर होते. ते आणि गेनभाऊ आंबेठाणकर एकाच वेळी महाडिक साहेबांच्या तमाश्यात दाखल झाले. प्रथम त्यांना तत्कालीन पेटी मास्तर कांबळे हे पेटीच्या जवळ सुद्धा फिरकू देत नसत. परंतु संत तुकाराम हा वाघ आणि फॉर्मत असताना कांबळे मास्तर हे गावाला निघून गेले. त्यानंतर महाडिक साहेबांनी रंगा मास्तर यांना पेटी वाजवायला शिकवले. महाडिक साहेब हे रंगा मास्तर यांचे गुरु होते.
त्यानंतर रंगा मास्तर यांनी खूप मेहनत करून पेटीवर अनेक गाणी बसवली. त्यांनी पंधरा दिवसात आठ गाणी पेटीवर बसवली. त्यांना सर्व लोक रंगा मास्तर म्हणूनच हाक मारीत असत. रंगा मास्तर हे उत्तम लेहरा वाजवायचे. आजच्या पिढीला लेहरा म्हणजे काय हेही माहित नसेल.
ज्यावेळी कांबळे मास्तर पंधरा दिवसानंतर परत तमाशा मध्ये दाखल झाले तेव्हा रंगा मास्तरचे पेटीवरचे वाद्यकाम ऐकून ते आश्चर्यचिकित झाले. 
रंगा मास्तर यांनी पेटीवर वाजवलेलं 
तरी लंगड उडून मारते तंगड हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं.
रंगा मास्तर सांगतात. ज्यावेळी महाडिक साहेब जरी लंगड उडून मारतय तंगड हे गाणे स्टेजवर म्हणत असत. त्यावेळेस त्यांच्यावर प्रेक्षकांकडून पैशाच्या नोटांचा अक्षरशा पाऊस पडत असे.  
रंगा मास्तर सांगतात. महाडिक साहेबांनी मला संगीत शिकवलं, संगीताच्या जागा कशा भरून काढायच्या हे शिकवलं. परंतु महाडिक अण्णा गेल्यानंतर माझे हात पाय गळाले. मी त्यानंतर पेटी वाजवण्याची बंद केले. कोणत्याही तमाशात गेलो नाही. ही एक महाडिक साहेबांना वाहिलेली श्रद्धांजलीच होय. महाडिक साहेबांकडे त्यांनी 26 वर्षे पेटी वाजवली. 

शशिकला शुक्रे: 

img src="..." alt=" शशिकला शुक्रे">
शशिकला शुक्रे ह्या इयत्ता अकरावी म्हणजेच मॅट्रिक शिकलेल्या पहिल्या तमाशातील कलाकार होय. त्या दत्ता महाडिक यांच्या तमाशात सन 1979 मध्ये दाखल झाल्या. तत्पूर्वी त्यांचे पती हे दत्ता महाडिक यांच्या तमाशाचे मॅनेजर होते. शशिकला शुक्रे यांना कोणत्याही प्रकारचा अभिनय येत नव्हता. त्यांना महाडिक साहेबांनी अभिनय शिकवला असे त्या आवर्जून सांगतात. त्यांनी फक्त वगनाट्य मध्ये काम केले. पायात चाळ बांधले नाहीत.

मास्टर दत्ता महाडिक यांची अनेक गाणी त्यावेळी महाराष्ट्रात इतकी लोकप्रिय झाली की त्यांनी एक नवीन उच्चांक केला

रेडा देतुयां धार, टुबामधी जलामलं पॉर
कुणी कुणाला नाय बोलायचं 
मांजरावानी राहयाचं, हे असंच चालायचं
पोरी घालतात फराक लांडा 
रस्त्याने चालतात हलवीत गोंडा 
वारा येता, फराक उडता 
साऱ्या गावाला दर्शन घडायचं. 
कुणी कुणाला नाय बोलायचं 
हे असंच चालायचं

त्यावेळेस जगात नवीनच टेस्ट ट्यूब बेबीचा प्रयोग चालू होता. तत्कालीन परिस्थितीवर केलेले हे गाणे आजही तितकेच लोकप्रिय म्हणावे लागेल.

बाप्या का बाई, कळना काई
नीतीला मोडून ढुंगणाचं सोडून डोईला गुंडाळलं 
हरी ओम हरी दुनिया नाही बरी 
पाप चाले नाना परी आज भूमीवरी 
यांनी वेशीला टांगून लाज 
केले शरीर उघडे आज 
उघड्या शरीराचा अंदाज 
घेण्या टपले तिरंदाज 
ओठात शिळ, मिशीला पिळं 
हे जगच भंजाळलं
नीतीला मोडून ढुंगणात सोडून डोईला गुंडाळलं 
हरी ओम हरी दुनिया नाही बरी 
पाप चाले नाना परी आज भूमीवरी 
तत्कालीन स्त्रियांच्या वाढत्या फॅशनवर विडंबनात्मक तयार केलेले बी.के. कवठेकर यांनी लिहिलेले गाणे दत्ता महाडिक यांच्या संगीत आणि गायनाने आजही ते तितकीच उद्बोधक वाटते.

अशाच एका फॅशनचे दुसरी गाणे

फॅशनच फ्याड, लागलीया गॉड 
जगाच्या पुढं, पडलय कोडं
घरचीन सोडलं लुगडं 
होते फॅशन भलतच लफडं 
होते फॅशन भलतच लफडं 
माप अंगावर देतीया बाई 
त्यात टेलरचा दोष नाही
कधी लाईट अचानक जाई 
माप दुसरंच हातात येई
हाताला घावलं, मार्गाला लावलं
होते फॅशन भलतच लफडं 
होते फॅशन भलतच लफडं 

अजून एक गीताचा नमुना

दिस आल्यात कसं व रांगडं 
आंधळं म्हणतयां, फुटलं तांबडं
चापसून हातानं, चालतंय बेतानं
उरफाट घालून आंगड, तरी लंगडं
कसं उडून मारतय तंगडं
येतो उन्हाळ्यात नदीला पूर 
बर्फ पेटलायां निघतोया धूर 
कापडं पोरींची घालतात पोरं
सासुबाईला सुनेचा घोर 
बहिर कानानं, भलतच ऐकून 
हातरुण आलया घोंगडं 
तरी लंगडं कसं उडून मारतय तंगड 
  
ज्याप्रमाणे हिंदी हिंदी चित्रपट सृष्टीत ऑल टाइम ब्लॉकबस्टर शोले सिनेमाचे संवाद लोकप्रिय झाले. त्याचप्रमाणे तिरंगा आणि दादा कोंडके यांच्या चित्रपटातील संवाद लोकप्रिय झाले तितकेच मास्टर दत्ता महाडिक पुणेकर यांच्या वगनाट्याचे, रंगबाजीचे, बतावणीचे आणि सवाल जवाबाचे संवाद लोकप्रिय झाले. त्याच्या लोकनाट्यातील गाणी तर अजूनही सदाबहार म्हणावी लागतील. इतकी ती आजही लोकप्रिय आहेत.
 
त्यावेळी मा.दत्ता महाडिक साहेबांच्या वगनाट्याच्या, सवाल-जबाब, रंगबाजी आणि बतावणीच्या कॅसेट निघाल्या. या कॅसेटनी महाराष्ट्रभर मोठा धुमाकूळ घातला. आणि दत्ता महाडिक यांचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घुमू लागले. दत्ता महाडिक हे तमाशा सम्राट होते, ते तमाशा सृष्टीचे अनभिशिक्त सम्राट होते.

ज्याप्रमाणे राजेश खन्ना हे चित्रपट सृष्टीतील पहिले सुपरस्टार होते. त्याचप्रमाणे दत्ता महाडिक पुणेकर हे सुद्धा तमाशासृष्टीतील पहिले सुपरस्टार होते. 

काही रसिक तर महाडिक साहेबांचे इतके चाहते होते की ते दत्ता महाडिक यांच्या तमाशा शिवाय दुसरा कोणताही लोकप्रिय असलेला तमाशा देखील बघत नसत.

महाराष्ट्र राज्य सरकारने दत्ता महाडिक यांच्या अप्रतिम कलेची दखल घेऊन त्यांना ऑगस्ट 1992 मध्ये तत्कालीन सांस्कृतिक मंत्री मा. विलासराव देशमुख यांच्या हस्ते पहिला महाराष्ट्र संगीत रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. रोख पंचवीस हजार रुपये व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

त्यांचे गवळ्याची रंभा, असे घराणे नष्ट करा, गुरुची विद्या ही वगनाट्य प्रचंड लोकप्रिय झाली.
गवळ्याची रंभा मधील प्रत्येक पात्र आजरामर झाले. महाराज विरमल आणि प्रधान रणमल, गवळीवाड्याचे पुढारी नामदेव पाटील, नामदेव पाटलांची सून, आणि राज्याची सेवक असलेले आकदंड आणि फकदंड हे सर्व पात्र प्रचंड लोकप्रिय झाली.
प्रधान रणमल महाराजांची भूमिका मास्टर चंद्रकांत ढवळपुरीकर प्रचंड ताकदीने साकारली होती. त्यांचे ते संवाद, संवाद फेकण्याचे कौशल्य, लाजवाब अभिनय यामुळे रणमल महाराज हे पात्र अजरामर झालं.
दत्ता महाडिक आणि गुलाबराव बोरगावकर यांनी साकारलेलं राज्याचे सेवक आकदंड आणि फकदंड यांनी महाराष्ट्र हास्यसागरात बुडवला.
गवळ्याची रंभा या वगनाट्यातील पॅरोडी सॉंग प्रचंड गाजलं.
दिवस पहिला आज मला, 
बाहेर मी बसले.अण राया तुम्हा  
आता मी कशी दिसले,
गेला दरिया पार, घरधनी गेला दरिया पार
उलच्छी उलच्छी दुनिया, काही राती हॊ
आई रे तेरे बिना सारा जग छोड के
मै आई रे तेरे बिना सारा जग छोडके 
हे पॅरोडी सॉंग त्यावेळी प्रचंड गाजले 

आणि यानंतर मराठी चित्रपट सृष्टीतील निर्माते दिग्दर्शक महेश कोठारे यांनी त्यांच्या चित्रपटांमध्ये पॅरोडी सॉंग वापरायला सुरुवात केली. पुढे मैने प्यार किया आणि इतर चित्रपटांमध्ये सुद्धा पॅरोडी सॉंग्स विशेष गाजली. ही आयडिया महाडिक साहेबांकडून घेऊनच. हेही तितकच खरं.

असे घराणे नष्ट करा मधील दत्ता महाडिक यांची जमीनदाराच्या नोकराची भूमिका प्रचंड गाजली. असे घराणे नष्ट करा मधील प्रत्येक पात्र प्रचंड लोकप्रिय झाले. त्यामधील दत्ता महाडिक यांनी केलेले विनोद आणि गाणे अजरामर झाले.
याच वगनाट्यमधील त्यांचे काळ्या आईची किमया भारी हे गीत प्रचंड लोकप्रिय झाले.

गुरुची विद्या गुरूला मध्ये गुरुच्या वेडपट चेल्याची (शिष्य) दामोदर म्हणजे दाम्याची भूमिका महाडिक साहेबांनी साकारली होती. त्यामधील त्यांचा उत्कृष्ट विनोदी अभिनय महाराष्ट्राला पाहायला मिळाला. आणि सर्वांची हसून हसून पुरेवाट झाली.
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम या वगनाट्यमधील भूमिका महाडिक साहेबांनी अजरामर केल्या.
 
महाडिक साहेबांची त्यांच्या कलाकारावर विलक्षण प्रेम होते. अनेक कलाकारांना त्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले. फकीर भाई केसनंदकर यांना मुलीच्या लग्नासाठी त्यावेळेस ऐंशी हजार रुपयाची मदत केली. रंगा मास्तर यांच्या पत्नीच्या आजारपणासाठी सन 1982 साली एक लाख रुपये दिले होते. महादू खुडे यांना घर बांधण्यासाठी पन्नास हजार रुपयांची मदत केली होती. गेनभाऊ आंबेठाणकर यांना अडीच एकर जमीन घेऊन दिली. त्यांचे प्रसिद्ध पेटी वादक बाबुराव कांबळे यांना दहा एकर जमीन घेऊन दिली.   
अनेक कलाकारांना त्यांनी जमीन घेण्यासाठी, विहीर बांधण्यासाठी, लग्नकार्यासाठी, घर बांधकामासाठी, कुटुंबांच्या आजारपणासाठी अनेक वेळा आर्थिक मदत केली. महाडिक साहेब नेहमी म्हणायचे. आज माझं जे काही ऐश्वर्य आहे ते या कलाकारांच्या जीवावर आहे.
बेल्हे येथील शाळेच्या दुसऱ्या मजल्याच्या बांधकामासाठी महाडिक साहेबांनी निधी उभारून दिला.

महाडिक साहेब दर महिन्याला कलाकारांचा पगार त्यांच्या हातात देत नसत तर दूर गावाकडे राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबांकडे पाठवत असत. असे होते महाडिक साहेब.
 
18 नोव्हेंबर 1999 रोजी पंढरपूर येथील कार्तिकी एकादशीनिमित्त अनेक तमाशा पंढरपूरला दाखल होत असतात. त्यानुसार दत्ता महाडिक यांचा तमाशा सुद्धा पंढरपूर मध्ये दाखल झाला होता.

परंतु तेथे गेल्यावर महाडिक साहेबांची तब्येत बिघडली. आणि त्यांनी अचानक त्यांच्या राहत्या घरी म्हणजे बेल्ह्याला जायचा निर्णय घेतला. सर्व तमाशा कलावंतांना तेथेच ठेवून महाडिक साहेबांची गाडी बेल्ह्याच्या दिशेने रवाना झाली.

त्यांच्या मुलांनीही मग त्यांना बेल्हे येथे  त्यांच्या राहत्या घरी आणले. महाडिक साहेबांचे फॅमिली डॉक्टर श्री. मते डॉक्टर यांनी त्यांना तपासून एक इंजेक्शन दिले. दुसऱ्या दिवशी अगदी सकाळीच पुणे येथे हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला.
त्यानंतर महाडिक साहेबांनी घरी जाऊन आंघोळ केली. जेवण केले. आणि त्यानंतर विश्रांती घेतली.
 
दुसऱ्या दिवशी म्हणजेच 20 नोव्हेंबर 1999 रोजी जेव्हा सकाळी पुण्याला जाण्यासाठी पूर्वतयारी म्हणून महाडिक साहेबांना त्यांच्या मुलांनी उठवण्याचा प्रयत्न केला त्याच्या आधीच त्यांनी जगाचा निरोप घेतला होता. 

वायरलेस वरून महाडिक साहेबांच्या मृत्यूची बातमी पंढरपूर येथील पोलीस स्टेशनला कळविण्यात आली. दुपारी पंढरपूर येथील बैल बाजाराकडे असलेल्या मैदानाकडे तमाशाच्या गाड्या जात असताना एका पोलिसाने या गाड्या थांबवल्या आणि महाडिक साहेबांच्या तमाशा कलावंतांना त्यांच्या मृत्यूची बातमी त्या पोलिसांनी दिली.

महाडिक साहेबांच्या मृत्यूची बातमी ऐकताच तमाशा कलावंत शोक सागरात बुडाले. नव्हे सारा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. आणि एका तमाशा कलावंताचा अस्त झाला. परंतु त्यांच्या कलेचा नाही. जोपर्यंत तमाशा संस्कृती महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर टिकून आहे तोपर्यंत मास्टर संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर यांचे विनोद, त्यांची गाणी, त्यांची ध्वनीमुद्रित झालेली वगनाट्य, सवाल-जबाब, बतावणी व रंगबाजी आणि त्यांचा तमाशा कायमच अजरामर राहतील.

सन 1965 साली सुरू केलेला मा. दत्ता महाडिक यांचा तमाशा अजूनही टिकून आहे ही महाडिक साहेबांची कृपाच म्हणावी लागेल.

सन 2025 च्या मार्च महिन्यात आमच्या गावात यात्रेच्या निमित्ताने तमाशा आणण्याचे निश्चित केले. त्याप्रमाणे आम्ही पंधरा-वीस ग्रामस्थ नारायणगाव येथे तमाशा राहुटीमध्ये दाखल झालो. त्या ठिकाणी अनेक राहुट्या उभ्या होत्या. गाव गावचे अनेक लोक तमाशा ठरवण्यासाठी तेथे दाखल झाले होते.
 
मी एकेका राहुटीवर टाकत होतो. समोरच मास्टर दत्ता महाडिक पुणेकर यांची राहुटी होती. त्यांच्या राहुटीवरील महाडिक साहेबांचा फोटो पाहून सर्व जुन्या आठवणी जागृत झाल्या. बाकी सर्व ग्रामस्थ शिवकन्या बढे यांच्या राहूटी कडे गेले. परंतु नकळतपणे मी आणि आमच्या गावचे ग्रामस्थ दत्तूराम गोडे आम्ही दोघेच महाडिक साहेबांच्या राहुटीमध्ये जाऊन बसलो.
 
त्यावेळी मॅनेजर एकटेच तेथे बसलेले होते. त्यांनी आमची विचारपूस केली. आणि म्हणाले. 
तुमचे सर्व ग्रामस्थ तिकडे शिवकन्या बडे यांच्या राहुटी कडे गेले?
त्यावर मी म्हटले, जाऊद्या ! ते गेले तरी नंतर आपोआप इकडे येतील.
आणि आम्ही बोलत असतानाच आमचे सर्व ग्रामस्थ आम्ही बसलो होतो तेथे म्हणजे महाडिक साहेबांच्या राहुटीत दाखल झाले. आणि आम्ही त्यांचा हा तमाशा आमच्या गावच्या यात्रेला म्हणजेच 6 एप्रिल 2025 रोजी ठरवला. त्यांनी सुद्धा अतिशय उत्तम कार्यक्रम केला.

आज तमाशामध्ये प्रचंड बदल झाला आहे. पूर्वीचा तमाशा आता राहिलेला नाही. पूर्वी गण, गवळण, बतावणी, सवाल-जबाब, रंगबाजी आणि त्यानंतर वगनाट्य असा सादरी क्रम असायचा.
परंतु आता काळानुसार खूपच बदल झाला आहे. तमाशा सृष्टीही आताच्या मीडियाच्या जमान्यातही कशीबशी तग धरून आहे. परंतु काहीही म्हणा तमाशा ही कला महाराष्ट्राची लोक परंपरा आहे, लोकधारा आहे. ही कला टिकवण्याची जबाबदारी सबंध महाराष्ट्राची आहे. तुमची आमची आहे, सर्व जणांची आहे. 

काही काही महाभाग तमाशाला तीव्र विरोध करतात.अगदी यात्रेला वर्गण्या सुद्धा देत नाहीत. तमाशा असेल तर वर्गणी देणार नाही अशी भूमिका घेतात. परंतु त्यांची मुले नातवंडे रात्रभर मोबाईलवर गेम खेळतात, अश्लील व्हिडिओ पाहतात, रील पाहतात. याला मात्र ते विरोध करत नाहीत. हे त्यांचे दुर्दैवच म्हणावे लागेल.

 ✍️ माझा हा लेख मूळतः Marathishrushti वर देखील प्रकाशित झाला आहे. लेखक: रामदास तळपे.


लेखक:- रामदास तळपे ( ग्रामीण संस्कृती)

 

  

  

  



      

  




आदिवासींचा डॉक्टर, समाजसेवेचा ध्यास : डॉ. राहुल जोशी

काही माणसे आपल्या पदामुळे मोठी होतात, तर काही आपल्या कार्यामुळे लोकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करतात. डॉ. राहुल जोशी हे दुसऱ्या प्रकारात...