भारतातील महत्त्वाच्या व्यक्तींचे झालेले विमान आणि हेलिकॉप्टर अपघात
भारतामध्ये सन 1966 पासून ते 12 जून 2025 अखेर अनेक विमान अपघात व हेलिकॉप्टर अपघात झाले आहेत. त्यामध्ये अनेक लोक मरण पावले. त्यामध्ये अनेक प्रमुख व्यक्ती सुद्धा मरण पावलेले आहेत. याचाच आढावा आपण या लेखात घेऊया.
विमान अपघातात मरण पावलेले महत्त्वाची व्यक्ती
डॉ. होमी भाभा
होमी भाभा, ज्यांना भारतीय अणुकार्यक्रमाचे जनक मानले जाते, इ.स. १९४५ साली टाटा मूलभूत संशोधन संस्थेची स्थापना करण्यात मदत केली आणि आपले संशोधन कार्य संभाळून डॉ. भाभा हे टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे संचालक झाले.
सन १९४८ साली त्यांच्या पुढाकाराने अणु उर्जा आयोगाची स्थापना करण्यात आली.व ते संचालक म्हणून काम पाहू लागले. त्यांच्या अथक परिश्रमांमुळेच भारत देशात अणु भट्टीची स्थापना झाली. त्यांचे १९६६ मध्ये विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले.
मोहन कुमारमंगलम
ते सुरुवातीला कम्युनिस्ट पक्षाचे नेते होते. नंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य होते. त्यांनी १९६६ ते १९६७ पर्यंत मद्रास राज्याचे महाधिवक्ता म्हणूनही काम केले. सन 1971 ते 31 मे 1973 अखेर इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात कोळसा खान मंत्री होते. कोळसा खान विभागाचे राष्ट्रीयकरण त्यांच्याच काळात झाले.
३१ मे १९७३ रोजी ५६ व्या वर्षी इंडियन एअरलाइन्सच्या फ्लाइट ४४० च्या अपघातात कुमारमंगलम यांचा मृत्यू झाला.
संजय गांधी
संजय गांधी हे इंदिरा गांधी यांचे धाकटे पुत्र होते. ते लोकसभा सदस्य देखील होते. १९८० मध्ये दिल्लीत स्वतः चालवत असलेल्या ग्लायडरच्या अपघातात त्यांचे निधन झाले.
इंदर ठाकूर
इंदर ठाकूर हे नादिया के पार' चित्रपटातून प्रसिद्ध झालेले अभिनेते होते. इंदर ठाकूर यांचा 1985 मध्ये एअर इंडियाच्या कनिष्क-182 या विमानाच्या अपघातात मृत्यू झाला.
त्यांच्यासोबत त्यांचे संपूर्ण कुटुंबही होते. या दुर्घटनेत 329 जणांचा मृत्यू झाला होता.
माधवराव शिंदे
माधवराव शिंदे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री. होते.
अभिनेत्री सौंदर्या
सौंदर्या: प्रसिद्ध कन्नड आणि तेलगू अभिनेत्री होत्या.
चित्रपट सूर्यवंशम' मधील राधा ठाकूरच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध.यांचा 17 एप्रिल 2004 रोजी कर्नाटकातील जक्कूर एअरबेस येथून भाजपच्या प्रचारासाठी आंध्र प्रदेशातील करीमनगरला जात असताना विमान अपघातात मृत्यू झाला. त्या त्यावेळी गर्भवती होत्या.
विजय रुपानी
विजय रुपाणी हे गुजरातचे माजी मुख्यमंत्री होते.
१२ जून २०२५ रोजी अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात त्यांचे निधन झाले. ही घटना १२ जून २०२५ रोजी घडली.
या अपघातग्रस्त विमानात एकूण 242 प्रवासी होते. यामध्ये 2 वैमानिक, 10 क्रू मेंबर्ससह 230 प्रवाशांचा समावेश होता. प्रवाशांमध्ये भारताच्या 169 भारतीय नागरिकांचा समावेश होता.
तर 51 ब्रिटीश, 7 पोर्तूगीज, 1 कॅनेडियन नागरिकाचा समावेश होता. तसेच 2 नवजात बालक, 11 लहान मुलं या विमानातून प्रवास करत होती.
अजितदादा पवार
अजित दादा पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तर होतेच परंतु ते लोकप्रिय लोकनेते देखील होते.स्पष्टवक्तेपणा, शिस्त, प्रशासनावरील पकड, काम करण्याची पद्धत, महाराष्ट्रातील सामान्य जनतेपर्यंत असलेला त्यांचा संवाद यासाठी ते ओळखले जात होते.
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी बारामती येथे त्यांच्या चार सभा होत्या. या सभा घेण्यासाठी ते दिनांक 28 जानेवारी 2026 मुंबई येथून बारामती येथे जात विमान प्रवास करत होते.
सकाळी ८ वाजून ४६ मिनिटांनी त्यांचे विमान लँडिंग होत असताना हा अपघात घडला आणि त्यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला.
हेलिकॉप्टर अपघात
डेरा नाटुंग
डेरा नाटुंग हे अरुणाचल प्रदेशचे शिक्षण मंत्री. २००१ मध्ये हेलिकॉप्टर अपघातात त्यांचे निधन झाले.
जी. एम. सी. बालयोगी
जी. एम. सी. बालयोगी हे लोकसभेचे तत्कालीन अध्यक्ष होते.
२००२ मध्ये आंध्र प्रदेशात हेलिकॉप्टर अपघातात त्यांचे निधन झाले.
सी. संगमा
सी. संगमा हे मेघालयचे समुदाय विकास मंत्री होते. २००४ मध्ये हेलिकॉप्टर अपघातात त्यांचे निधन झाले.
ओ. पी. जिंदाल आणि सुरेंद्र सिंग
ओ. पी. जिंदाल आणि सुरेंद्र सिंग हरियाणाचे मंत्री होते. २००५ मध्ये सहारनपूरजवळ हेलिकॉप्टर अपघातात दोघांचाही मृत्यू झाला.
वाय. एस. राजशेखर रेड्डी
वाय.एस. राजशेखर रेड्डी हे आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री होते.
दोरजी खांडू
दोरजी खांडू हे अरुणाचल प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री होते. २०११ मध्ये पवन हंस हेलिकॉप्टर अपघातात त्यांचे निधन झाले.
जनरल बिपिन रावत
जनरल बिपिन रावत हे भारताचे पहिले CDS (Chief of Defence Staff) होते. ८ डिसेंबर २०२१ रोजी तामिळनाडूतील कुन्नूर येथे झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात त्यांचे निधन झाले.
आतापर्यंत भारतात झालेले विमान अपघात
निमगिरी जुन्नर जवळील अपघात
7 जुलै 1962 रोजी अल इटालीया या कंपनीचं विमान महाराष्ट्रातल्या जुन्नरजवळील निमगिरीच्या डोंगराला धडकून कोसळलं होतं. सिडनीवरून रोमला जाणारं हे विमान ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, बँकॉक, कराची आणि तेहरानमार्गे रोमला पोहोचणार होतं.
मुंबई विमानतळावर उतरण्याआधी महाराष्ट्रातल्या जुन्नरजवळील निमगिरीच्या डोंगराला धडकून हे विमान कोसळलं आणि विमानातल्या 94 जणांचा मृत्यू झाला.
हा अपघात पायलटच्या नेव्हिगेशनच्या चुकीमुळे झाला होता. पायलटला असं वाटलं होतं की, निर्धारित स्थान जवळ आलं आहे. त्याचप्रमाणे प्रचंड पाऊस व दात धुके असल्यामुळे त्यातच विमानाला सिग्नल न मिळाल्यामुळे विमानाचा संपर्क तुटला.त्यातूनच अपघात झाला. हे विमान उंच भूभागावर कोसळलं होतं.
12 ऑक्टोबर 1976
12 ऑक्टोबर 1976 रोजी मुंबईवरून मद्रासला जाणाऱ्या या विमानाच्या उड्डाणाला उशीर झाला होता. 27 नंबरच्या धावपट्टीवरून टेक-ऑफ केल्यानंतर इंजिनमध्ये आग लागली.
त्यामुळे या विमानाने 9 नंबरच्या धावपट्टीवर पुन्हा उतरण्याचा प्रयत्न केला. पण या धावपट्टीपासून 800 ते 900 मीटर अंतरावर असतानाच हे विमान कोसळलं.
जमिनीवर कोसळून आग लागल्यामुळे या विमानातील सर्व 89 प्रवासी आणि 6 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. कॅरव्हेल व्हीटी-डीडब्ल्यूएन हे ते विमान होतं.
19 ऑक्टोबर 1988
19 ऑक्टोबर 1988 रोजी, इंडियन एअरलाइन्सचं फ्लाइट 113 हे विमान अहमदाबादजवळ कोसळलं होतं. हे बोईंग 737 विमान होतं.
या अपघातात 133 जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातात फक्त दोन जणांचा जीव वाचला होता.
कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीत लँडिंग करण्याचा प्रयत्न करताना हे विमान कोसळलं होतं. वैमानिकांना सुरक्षितपणे विमान उतरवता आलं नाही.
14 फेब्रुवारी 1990
14 फेब्रुवारी 1990 रोजी कर्नाटकातील बंगळुरूच्या एचएएल विमानतळावर लँडिंगच्या प्रयत्नात असणारं इंडियन एअरलाइन्सचं फ्लाइट 605 हे विमान कोसळलं.
एअरबस A320 हे विमान वेळेपूर्वीच खाली उतरत होतं आणि धावपट्टीच्या अगदी जवळ जाऊन ते कोसळलं. या दुर्दैवी अपघातात 146 प्रवासी आणि क्रू मेंबर्सपैकी 92 जणांचा मृत्यू झाला होता.
26 एप्रिल 1993
आताचे छत्रपती संभाजीनगर आणि पूर्वीच्या औरंगाबादमध्येही एक भीषण विमान अपघात घडला होता.
इंडियन एअरलाइन्सचं 491 हे विमान 26 एप्रिल 1993 रोजी कोसळलं होतं.
औरंगाबाद विमानतळावर बोईंग 737-2A8 या विमानाची चाकं धावपट्टीवर आलेल्या एका ट्रकला धडकली होती.
या धडकेमुळे विमानाचं नियंत्रण सुटलं, ते कोसळलं आणि आग लागली. विमानातील 118 प्रवाशांपैकी 55 जणांचा या अपघातात मृत्यू झाला.
17 जुलै 1998
17 जुलै 1998 रोजी बिहारमधील पाटणा विमानतळाजवळ अलायन्स एअरच्या 7412 या विमानाचा दुर्दैवी अपघात झाला.
बोईंग 737-2A8 या विमानाचं लँडिंग दरम्यान नियंत्रण सुटलं आणि विमानतळाजवळील दाट लोकवस्तीच्या रहिवासी भागात हे विमान कोसळलं.
या दुर्घटनेत 60 जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये विमानातील 55 प्रवासी आणि क्रू मेंबर्स आणि अपघात घडल्या त्या ठिकाणी असलेल्या 5 जणांचा मृत्यू झाला.
7 ऑगस्ट 2020
7 ऑगस्ट 2020 रोजी एअर इंडिया एक्सप्रेसचं IX-1344 हे विमान कोसळलं होतं. अलीकडच्या काळातील हा सर्वात मोठा अपघात होता.
कोरोनाकाळात परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी वंदे भारत मिशन अंतर्गत बोईंग 737-800 हे विमान दुबईहून कोळीकोड (कालिकत) इथं येत होते.
हा अपघात झाला तेव्हा मुसळधार पाऊस होता आणि कमी दृश्यमानता होती.
12 जुन 2025
गुजरातहून लंडनकडे निघालेले एअर इंडियाचे विमान अहमदाबादमधील मेघानी नगर परिसरात कोसळले. दोन वैमानिक, १० क्रू सदस्य आणि २३२ प्रवासी असे एकूण २४२ लोक विमानात होते.
त्यापैकी १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश, १ कॅनडा आणि पोर्तुगालचे ७ नागरिक होते. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र सर्वच प्रवाशांचा मृत्यू झाला.
विमानाला उड्डाण घेण्यासाठी थोडा उशीर झाल्यानंतर दुपारी १.४७ वाजता विमानाने उड्डाण घेतले होते. त्यानंतर अवघ्या काही सेकंदात हा अपघात झाला. या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील प्रवास करत होते. दुर्दैवाने यात त्यांचा मृत्यू झाला.
28 जानेवारी 2026
28 जानेवारी 2026 रोजी सकाळी अजितदादा पवार जिल्हा परिषद प्रचार कार्यासाठी बारामती येथे विमानाने जात असताना अपघात घडला.
28 जानेवारी रोजी सकाळी 8.18 वाजता पहिल्यांदा बारामतीच्या संपर्कात आलं. या अहवालानूसार वैमानिकांना सांगण्यात आलं की सध्या वारा फार नाही आणि दृश्यमानता साधारण 3000 मीटर इतकी आहे.
त्यानंतर विमानातील पायलटने सांगितलं की ते रनवे क्रमांक 11 च्या दिशेने येत आहेत. पण त्यांना रनवे दिसत नाहीय. नंतर पायलटने पुन्हा एटीसीला सांगितलं की रनवे दिसू लागला की सांगतो.
त्यानंतर 8.43 वाजता रनवे क्रमांक 11 लँडिंगसाठी सज्ज करण्यात आला. मात्र पायलटकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
त्यानंतर काही क्षणातच धावपट्टीच्या डाव्या बाजूला ज्वाळा आणि धुराचे लोट उठताना दिसले, असं एटीसीवर काम करत असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
अजित पवारांच्या विमान अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम.
पुणे-बारामती परिसरात दाट धुके, दृश्यमानता अत्यंत कमी होती.बारामतीचे विमानतळ लहान आहे आणि त्याच्याकडेILS (Instrument Landing System) सुविधा नाहीत.
पायलटला मॅन्युअल लँडिंग करावी लागली.विमानाने रनवेवर थेट प्रवेश केला नाही, तर मोठा वळसा घेतला.याचा अर्थ पहिला लँडिंग प्रयत्न रद्द (aborted) केला गेला.
धुक्यात रनवेवर (align) करणे कठीण झाले.दुसरा लँडिंग प्रयत्न केला गेला.DGCAच्या सूत्रांनुसार, हे टेबल-टॉप रनवे आहे.लँडिंगदरम्यान विमान रनवेच्या कडेला कोसळले.
सुमारे 100 फूट उंचीवर विमानाचा तोल गेलारनवेपर्यंत पोहोचण्याआधीच विमान जमिनीवर आदळले आदळल्यावर मोठा स्फोट झाला, त्यानंतर अनेक लहान स्फोट झाले.
विमानात भीषण आग लागली.आगीमुळे तात्काळ बचावकार्य शक्य झाले नाही.
रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती)










अतिशय दूर्गगम भागातील श्री. रामदास तळपे यांची ही गगनभरारी आम्हाला
उत्तर द्याहटवाभूषणावह आहे.
श्री. तळपे हे आमच्या वाडे ता. राजगुरुनगर या माध्यमिक विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत.कौतुकास्पद आहे.धन्यवाद!
छान माहिती
उत्तर द्याहटवा